Author: editor desk

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कन्नड तालुक्यातील भाबंरवाडी येथील आनंद महाराज यांच्या आश्रमाजवळ असलेल्या मोठ्या नाल्यात ऋषिकेश विलास राठोड (वय १५ वर्ष ) या तरुणावर बिबट्याने हल्ला केला. त्याला आश्रमाजवळ असलेल्या नाल्यात फरपटत नेऊन ठार केल्याची घटना आज (बुधवार) सकाळी निदर्शनास आली. सविस्तर वृत्त असे कि, भाबंरवाडी येथील आश्रमाचे आनंद महाराज यांच्या आई आश्रमात आल्‍या आहेत. त्या मंगळवार रोजी ऋषिकेश यांच्या घरी जेवायला आल्या होत्या. रात्री साडेसात वाजता जेवन करुन ऋषिकेश आनंद महाराज यांच्या आईला सोडण्यासाठी आश्रमात गेला होता. महाराज नेहमी प्रमाणे फिरायला गेले होते. त्यामुळे महाराज येईपर्यंत थांब असे आईने…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी फिरोज तडवी यांनी जिवाची बाजी लावून रेल्वे रूळावर पडलेल्या एका चिमुकलीचा जीव वाचवल्याची घटना नुकतीच घडली. याबद्दल श्री.तडवी यांचे समाजाच्या सर्व स्तरातून कौतूक होत असताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील त्यांची भेट त्यांचा सत्कार करण्यात आला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना या घटनेची माहिती समजली असता त्यांनी लागलीच श्री.तडवी यांच्या कामगिरीचे कौतुक केले असून त्यांचा दुसऱ्या दिवशी सत्कार करून कौतुक देखील केले.

Read More

हिंगोली : वृत्तसंस्था मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही महिन्यापासून राज्यातील अनेक तरुणांना आपली जीवनयात्रा संपविल्याच्या अनेक घटना घडत असतांना नुकतेच हिंगोलीतील एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या तरुणाने भगव्या फेट्याने गळफास घेतला आहे. या प्रकरणी कुरुंदा पोलिस ठाण्यात मंगळवारी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली आहे. नापीकी व मराठा आरक्षणासाठी जीवन संपवत असल्याचे यात लिहिले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील पांगरा बोखारे येथील तरुण शेतकरी गजानन काशीनाथ बोखारे यांचे पळसगाव शिवारात शेत आहे. या ठिकाणी असलेल्या चार एकर शेतावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. घरी वडिल, पत्नी, दोन मुली, एक मुलगा…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात शिंदे सरकारचे पावसाळी अधिवेश सुरु होत असून आता यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. ते पदवीधर निवडणुकीचे मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलत होते. विरोधी पक्षाला संपवण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा मोदी यांनी वापर केला. पश्चिम बंगाल, दिल्ली, झारखंड, महाराष्ट्रासारख्या राज्यांतील मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदारांना तुरुंगात डांबले. कारण ते भाजपाविरोधी होते. विरोधी पक्षाचा आवाज जपला पाहिजे, देशाला मजबूत विरोधी पक्षाची गरज आहे, असा साक्षात्कार गेल्या दहा वर्षांत मोदी यांना झाला नाही, असे ठाकरे पक्षाने सुनावले आहे. गेल्या दहा वर्षांत मोदी आणि त्यांच्या गुजराती ईस्ट इंडिया कंपनीने देश चालविण्याच्या नावाखाली उत्सव, इव्हेंट, नाटकेच…

Read More

कोल्हापूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक छोट्या मोठ्या शहरात वेश्या व्यवसाय खुलेआम सुरु आहे तर काही ठिकाणी लपून छपून सुरु आहे. नुकतेच विजापूर जिल्ह्यात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणार्‍या शाहूपुरी तिसर्‍या गल्ली येथील वेलनेस स्पावर शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकला. या सेंटरचा चालक नागेश रमेश बेळन्नावर (वय 32, मूळ रा. हिप्पगिरी, जि. विजापूर) याला अटक केली. जागा मालक दत्तात्रय गणपती शिंदे (रा. शाहूपुरी, 3 री गल्ली) याच्यावर गुन्हा दाखल केला असून, दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, शाहूपुरी येथे स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. सोमवारी रात्री छापा टाकून झडती…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील टहाकळी फाटयावर बेकायदेशीररित्या गावठी बनावटीचे कट्याची खरेदी विक्री करणाऱ्या दोघांवर वरणगाव पोलीसांनी झडप घालून दोघाना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्या जवळील दोन गावठी कट्टे व जिवंत काडतुस असे ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत दोघास अटक करण्यात आली. या बाबत पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार असे की, तालुक्यातील टहाकळी फाटा जवळ सार्वजनीक जागी गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस खरेदी विक्री होत असल्याची वरणगाव पोलीसांना गोपनीय माहिती मिळाली. माहिती मिळताच सह पो निरिक्षक भरत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक जितेंद्र जैन व पो कॉ योगेश पाटील यांनी टाहकळी फाट्यावर रविवारी २३ जून रोजी रात्री ११:३० वाजता सापळा रचून टाहकळी फाट्यावर…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात मराठा व ओबीसी आरक्षणाचा मोठा वाद पेटला आहे. त्यात एकमेकाविरोधात आरोप प्रत्यारोप होत असतांना आता ओबीसी आरक्षणाचे नेते लक्ष्मण हाके यांनी थेट जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मनोज जरांगे पाटील हे नेमकी काय मागणी करतात, हे अजून मला कळालेले नाही. कारण प्रत्येक आंदोलनात त्यांची मागणी वेगळी असते. तसेच अतिरिक्त कधीच होणार नाही अशाच गोष्टीची ते मागणी करतात. त्यांचे कोण सल्लागार आहेत हे कळत नाही. त्यांनी थोडा अभ्यास आणि थोडीशी माहिती घेऊन बोलत जा म्हणावं. मनोज जरांगेंना एक काडीचा देखील अभ्यास नाही. अशी टीका त्यांनी केली आहे. हाके म्हणाले की, एसटीची लढाई आमची वेगळी आहे. एसटीची…

Read More

चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेल्या संतोष जगन्नाथ धीवर (वय ४९) याने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी २५ रोजी दुपारी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात संतोष धीवर याच्याविरुद्ध कलम ३५४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, आरोपी संतोष धीवर हा पीडितीला वारंवार घराच्या छतावर बोलून तिचा विनयभंग करत होता. तसेच तुझे फोटो इतरांना दाखवून, बदनामी करेल, नाहीतर तुला मारून टाकेल, अशी धमकी ही देत होता. या जाचाला कंटाळून अल्पवयीन पीडित फिर्यादीने २५ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास या घटनेबाबत चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात येऊन गुन्हा नोंदवला…

Read More

जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून केलेल्या आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करत पोलीस ठाण्यासमोर जमलेल्या न जमावाने २० रोजी रात्री अचानक पोलीस ठाण्यावर दगडफेक केली होती. या प्रकरणातील २२ संशयित आरोपींना २५ रोजी ३ दुपारी ३ वाजता मुख्य न्यायाधीश डी. एन. चामले यांच्या न्यायालयात हजर केले असता, त्यांनी त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या सर्वांची धुळे येथील कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चारही बाजूने पोलिसांचेकडे करून मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पोलीस ठाण्यापासून ते न्यायालयापर्यंत सर्व संशयित आरोपींची पायी धिंड काढण्यात आली. या वेळी आरोपींच्या नातेवाईकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी कामानिमित्त धरणगावकडून जळगावकडे येत असलेल्या बापू जंगलू कुंभार (वय ३८, रा. ममुराबाद, ता. जळगाव) या विटभट्टीवरील मजूराला भरधाव वाहनाने धडक दिली. या अपघातात मजूराचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास मुसळी ते वराड गावादरम्यान, घडली. मंगळवारी त्या तरुणाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. जळगाव तालुक्यातील ममुराबाद गावात बापू कुंभार हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला होता. विटभट्टीवर काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. सोमवार दि. २४ जून रोजी बापू हा सायंकाळी दुचाकीने धरणगावकडून जळगावकडे येण्यासाठी निघाले होते. रात्री ८ वाजेच्या सुमारास मुसळी ते वराड गावादरम्यान भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने…

Read More