यावल : प्रतिनिधी तालुक्यातील दगडी (मनवेल) येथील एका ४० वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटनासमोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दगडी येथील प्रकाश विक्रम कोळी (वय ४०) हे २ जुलै रोजी नियमितपणे जेवण करून आपल्या घरात झोपले. सकाळी कुटूंबीय त्यांना कामासाठी उठवण्यासाठी गेले असता प्रकाश कोळी यांनी घराच्या छतावरील सऱ्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. हा प्रकार कुटुंबीयांच्या निदर्शनास येताच युवकाला तातडीने उपचारासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे डॉ. प्रशांत जावळे यांनी तपासणीत करुन प्रकाश कोळी यांना मृत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात पोलीस पाटील जिवन कोळी यांच्या माहितीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद…
Author: editor desk
चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील एका व्यक्तीच्या बँक खात्यातून सायबर चोरट्यांनी जवळपास पावणेतीन लाखांची रक्कम काढल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी सायबर क्राईम व चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील चौगाव येथील बापूराव आधार पाटील (वय ४७) यांच्या चोपडा येथील बंधन बँकेच्या खात्यातून २ लाख ८१ हजार ४२१ रुपये सायबर चोरट्यांनी २७ जूनला दुपारी २ वाजेच्या सुमारास लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी ही रक्कम एकाच वेळेस न काढता ४ ते ५ वेळेस काढली आहे. त्यांच्या मोबाईलवर आलेल्या मेसेजनंतर बापूराव पाटील यांनी बँकेत संपर्क केला असता त्यांच्या खात्यातून रक्कम लंपास झाल्याचे लक्षात…
मेष राशी मेष राशीच्या लोकांना व्यवसायात चांगले उत्पन्न मिळेल. तुम्हाला एखाद्या जवळच्या मित्राकडून मौल्यवान भेट मिळू शकते. धार्मिक कार्यातून आर्थिक लाभ होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. जमीन खरेदी-विक्रीतून आर्थिक लाभ होईल. वाहन खरेदीची योजना यशस्वी होईल. कार्यक्षेत्रात आर्थिक लाभ होईल. याशिवाय प्रेमप्रकरणात गोडवा वाढेल. जवळच्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील. तुम्हाला कुटुंबातील वरिष्ठ सदस्याकडून मार्गदर्शन आणि आशीर्वाद मिळेल. जंगम आणि जंगम मालमत्ता वादाचे कारण बनू शकते. अनावश्यक ताण टाळा. कुटुंबातील मतभेद वरिष्ठ नातेवाईकांच्या मध्यस्थीने मिटतील. वृषभ राशी आवश्यकतेनुसार पैसे न मिळाल्याने मनात निराशेची भावना राहील. व्यवसायात नुकसान होऊ शकते. काही मौल्यवान वस्तू हरवण्याची शक्यता आहे. व्यवसायातील नवीन सहकाऱ्यांमुळे तणाव निर्माण…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात ४३ वर्षीय व्यक्तीने महिलेची छेड काढल्याच्या विषयावरून मारहाणीत त्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना असोदा या गावात घडली आहे. हि घटना दि. ४ जुलै रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली असल्याने असोदा गावात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेत भास्कर दगडू भंगाळे (वय ४३) यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर जळगाव तालुका पोलीस गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील आसोदा गावात भास्कर भंगाळे हे आपल्या परिवारासह वास्तव्यास असून गुरुवारी ४ जुलै रोजी दुपारी १२ वाजता आसोदा गावातील गोकुळ नगर येथे तो गेला होता. त्यावेळेला मुलीची छेड काढल्याच्या संशयावरून…
धरणगाव : प्रतिनिधी शहरातील जैन गल्लीत धाडसी चोरी झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी धरणगाव पोलिसात अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील जैन गल्लीतील रहिवासी किशोर गुलाबदास जैन यांच्या घरात दि.१ जुलै सोमवारच्या रात्री जैन गल्लीतील हि धाडसी चोरी करण्यात आली आहे. श्री.किशोर जैन व त्यांचा मुलगा आयुष जैन रात्री झोपले असता चोरांनी मागील बाजूने लहान गल्लीतून वर चढून दार उघडले व आत शिरले. खाली आल्यावर त्यांनी घरातून रु.४५००० रोख व २ तोळ्यांची सोनसाखळी लंपास केली. त्यामुळे जैन गल्लीत भीतीचे वातावरण तयार झाले आहे. या घटनेस्थळी सकाळी जैन समाजाचे अध्यक्ष श्री.राहुल जैन,उपाध्यक्ष श्री.प्रतीक जैन यांनी…
मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात नेहमी पुणे शहराचे मनसेचे माजी नेते वसंत मोरे हे आपल्या आंदोलनामुळे राज्यभर प्रसिद्ध आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी वंचितची उमेदवारी घेतली मात्र त्यांना उमेदवारांनी नाकारल्यानंतर आज मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असून येत्या ९ जुलै रोजी ते हाती शिवबंधन बांधणार आहेत. मनसेच्या स्थापनेपासून वसंत मोरे राज ठाकरे यांच्यासोबत होते. पुणे महापालिकेत तीनवेळा नगरसेवक म्हणून ते निवडून आले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी वसंत मोरे यांनी मनसेचा राजीनामा दिला होता. त्यांना वंचित बहुजन आघाडीने पुण्यातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. मात्र त्यांचा पराभव झाला. आज त्यांनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. ९ जुलैला…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था महाराष्ट्रात झिका विषाणूची प्रकरणे आढळल्यानंतर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सर्व राज्यांसाठी अलर्ट जारी केला. आरोग्य गर्भवती महिलांची तपासणी करून आणि झिका पॉझिटिव्ह आढळणार्या गर्भवती मातांच्या गर्भाच्या वाढीवर लक्ष द्यावे, अशा सूचना दिल्या आहेत. पुण्यात झिका विषाणूचे सहा रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे. महाराष्ट्रात झिका विषाणूची प्रकरणे आढळल्यानंतर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सर्व राज्यांना एक सल्लागार जारी केला. आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना गर्भवती महिलांची संसर्गासाठी तपासणी करून आणि झिका पॉझिटिव्ह आढळणार्या गर्भवती मातांच्या गर्भाच्या वाढीवर लक्ष ठेवून सतत देखरेख ठेवण्यास सांगितले आहे. 2 जुलैपर्यंत पुणे, महाराष्ट्रामध्ये झिका विषाणूचे सहा रुग्ण आढळले आहेत. केंद्राने जारी…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात सार्वजनिक ठिकाणी चिलीममधून गांजा ओढणाऱ्यांवर दि. २ जून रोजी कारवाई केली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस दलाकडून सार्वजनिक ठिकाणी अमली पदाथांचे सेवन करणाऱ्यांवर कारवाई बडगा उगारण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील दत्त डेअरीच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत व हॉटेल देव हाईट्सच्या मोकळ्या जागेमध्ये काही इसम गांजा ओढीत होते, त्यांच्यावर शहर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत कारवाई केली. याप्रकरणी प्रभाकर मंगेश पाटील (वय ४८, रा. कांचननगर), अजय सुरेश सोनवणे (वय २५, रा. लक्ष्मीनगर, लाकूडपेठ), अझर कुदबोद्दीन शेख (वय २७, रा. शाहूनगर) व…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका भागात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना २२ जून रोजी रात्री १० वाजता घडली. याप्रकरणी मंगळवारी २ जुलै रोजी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका भागात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दि. २२ जून रोजी रात्री १० वाजता पिडीत मुलगी ही घरी एकटी असतांना तिच्या अज्ञातपणाचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली. पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतु कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर तिच्या पालकांनी मंगळवारी…
जळगाव : प्रतिनिधी राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यास शासन निर्णय अन्वये मान्यता देण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेबाबत काही निकषांमध्ये बदल करण्यात आले असून त्या बाबतचा सुधारित शासन निर्णय शासनाच्या महिला बाल कल्याण विभागाने जरी केला आहे. त्यनुसार जळगाव जिल्ह्याच्या मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष अध्यक्ष म्हणून पालकमंत्री गुलाबराव पाटील हे असणार आहे. तर सदस्य सचिव म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे काम पाहतील. तसेच प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी देखील तालुकास्तरीय…

