जळगाव : प्रतिनिधी शहरातील सिद्धिविनायक नगरातील खासगी व्यवसाय करणाऱ्या एका ३० वर्षीय मुलाची ऑनलाइन टास्कच्या नावावर तब्बल ८ लाख ७६ हजार ३६३ रुपयांची फसवणूक केल्याची घटना १ जुलै रोजी उघडकीस आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, अमोल दिलीप बिरारी (वय ३०, रा. सिद्धिविनायकनगर, जळगाव) असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे. अमोल हा खासगी व्यवसाय करतो, २२ जून ते १ जुलै यादरम्यान या युवकाची फसवणूक करण्यात आली. इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांचा वापर करून निमीशा रघुराम असे नाव सांगणाऱ्या महिलेने तिच्या टेलिग्राम खात्यावरून अमोलच्या टेलिग्राम खात्यावर संपर्क साधला तसेच पार्ट टाइम जॉब देण्याचे आमिष दिले. तसेच रैंक अॅप…
Author: editor desk
मेष राशी कार्यक्षेत्रात कोणताही महत्त्वाचा निर्णय काळजीपूर्वक घ्या. घाईघाईने घेतलेला निर्णय हानिकारक ठरू शकतो. तुमच्या नोकरीतील महत्त्वाच्या पदावरून तुम्हाला काढून टाकले जाऊ शकते. काही सहकाऱ्यांशी वाद घालणे तुम्हाला महागात पडू शकते. त्यामुळे या दिशेने विचारपूर्वक काम करा. संयम आणि संयमाने काम करा. व्यवसायात नवीन सहयोगी मिळतील. व्यवसाय योजना यशस्वी होईल. कोणतेही अपूर्ण काम पूर्ण केल्याने तुमचे मनोबल वाढेल. वृषभ राशी आज तुम्हाला चांगली बातमी मिळेल. कोणत्याही महत्त्वाच्या कामातील अडथळे सरकारी मदतीने दूर होतील. परीक्षा स्पर्धेत यश मिळेल. घरगुती जीवन सुखकर राहील. मेकअपमध्ये अधिक रस असेल. व्यवसायात नवीन सहयोगी मिळतील. राजकारणात प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबात निर्माण झालेले मतभेद मिटतील. दूरच्या देशातून प्रिय…
भुसावळ : प्रतिनिधी एका साडेतीन वर्षीय चिमुकलीसोबत एका शाळेच्या बाहेर स्कूल व्हॅनमध्ये अश्लिल कृत्य करत तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना दि.१ जुलै रोजी दुपारच्या सुमारास भुसावळ तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी गुरूवार ४ जुलै रोजी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात स्कूल व्हॅनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुकयातील एका गावात साडेतीन वर्षीय चिमुकली ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. चिमुकली ही भुसावळ शहरातील एका शाळेत असतांना १ जुलै रोजी स्कूल व्हॅननचा चालक प्रसाद हिरासिंग चौधरी याने दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास चिमुकली व्हॅनमध्ये बसलेली असतांना त्याने चिमुकलीच्या गुप्तांगाला हात लावून दुखापत करत तिचा विनयभंग केला. हा…
जळगाव : प्रतिनिधी एरंडोल तालुक्यातील पाळसदळ येथील शास्त्री इन्स्टीट्यूट येथून पाईप चोरी करून त्याची विल्हेवाट लावणाऱ्या टोळीचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. यात चार जणांना ताब्यात घेतले असून चोरीला गेलेले पाईप हस्तगत करण्यात आले आहे. पुढील कारवाईसाठी एरंडोल पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील पाडसदड येथील शास्त्री इन्स्टिट्यूट परिसरातून ५७ लोखंडी पाईप चोरून नेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या घटनेतील चोरटा हा एरंडोल शहरात असल्याची गोपनीय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने गुरुवारी ४ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता सापळा…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील शनीपेठ परिसरात राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलावर गेल्या आठ महिन्यापासून व्हिडिओ फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अनैसर्गिक अत्याचार करण्यात येत होता. याप्रकरणी मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन पश्चिम बंगाल येथील तरुणाविरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिपेठ भागातील एका 14 वर्षेीय अल्पवयीन मुलाचे फोटो व व्हिडिओ संशयित सायत असित पांडा राहणार पश्चिम बंगाल याने घेतले होते. फोटो सोशल मीडियार व्हायरल करेल अशी धमकी देत त्या अल्पवयीन मुलावर ८ महिन्यांपासून अनैसर्गिक कृत्य केले. त्यानंतर पिडीत मुलाचे काही फोटो इन्स्टाग्रामवर वेगवेगळे बनावट अकांऊट तयार करुन व्हायरल केले. २८ जून रोजी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आगामी काळात विधानसभा निवडणूक येत आहे त्यापूर्वी अनेक नेते विविध पक्षातील नेत्यांच्या भेटी गाठी सुरु असतांना नुकतेच वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्री शिंदे यांनी वंचितने केलेल्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. दीक्षाभूमी आंदोलन प्रकरणी कोणत्याही आंदोलनकर्त्याला अटक केली जाणार नसल्याची प्रमुख मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्याचे वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे. दीक्षाभूमी आंदोलन प्रकरणी कोणत्याही आंदोलनकर्त्याला अटक केली जाणार नाही. गायरान व शासकीय जमिनीवरील घरे हटवण्याच्या नोटीसना स्थगिती द्यावी, अशा मागण्या वंचितकडून करण्यात आल्या होत्या. दरम्यान, दीक्षाभूमी आंदोलन प्रकरणी कोणत्याही आंदोलनकर्त्याला…
मुंबई : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीत राज्यातील महायुतीमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अपेक्षेप्रमाणे यश आले नसल्याने राज्यातील महायुतीमधून राष्ट्रवादी बाहेर पडत असल्याची सध्या जोरदार रंगू लागली आहे. राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीचा फड रंगणार आहे. पण या निवडणुकीपूर्वीच भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताधारी महायुतीमध्ये उभी फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची जोरात चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. भाजप व राष्ट्रवादीच्या काही नेत्यांच्या गत काही दिवसांतील विधानांमुळे या चर्चेला बळ मिळाले आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीची हाराकिरी झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या हाराकिरीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार धरले. लोकसभा…
मुंबई : वृत्तसंस्था ‘सूर्यकुमार यादव डेव्हिड मिलरचा थरारक झेल घेत असताना मी श्वास रोखून बघत होतो. मला वाटलं, जर हा झेल सुटला, तर संघाचे विश्वविजेतेपदही निसटेल. पण, भारताचे हे विश्वविजेतेपद भाग्यामध्ये लिहून ठेवले होते. सूर्याचा तो ड्रोल अप्रतिम होता,’ असे भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने म्हटले. बार्बाडोस येथे धडकलेल्या बेरिल चक्रीवादळामुळे भारतीय संघ दोन दिवस तिथेच अडकला होता. अखेर हे वादळ शमल्यानंतर एअर इंडियाच्या विशेष विमानाने भारतीय संघ गुरुवारी मायदेशी परतला. नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर मुंबईमध्ये भारतीय संघाची विजयी यात्रा निघाली. यावेळी, लाखो क्रिकेट चाहत्यांनी मुंबईच्या रस्त्यावर गर्दी करत आपल्या विश्वविजेत्यांचे थाटात स्वागत केले. त्यानंतर वानखेडे…
जळगाव : प्रतिनिधी आजाराला कंटाळून रमेश काशिनाथ पाटील (वय ५८, रा. असोदा, ता. जळगाव) या शेतमजूराने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. ही घटना दि. ४ जुलै रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास असोदा ते सुजदे रस्त्यावर घडली. याप्रकरणी तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, गावात रमेश पाटील हे आपल्या पत्न ी व मुलासोबत वास्तव्याला होते. बकऱ्या चारणे व दुसऱ्यांची शेती करून आपला उदरनिर्वाह करत होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना दुर्धर आजाराने त्रस्त होते. गुरूवार दि. ४ जुन रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास ते पत्न ीला बाहेर जात असल्याचे सांगून दुचाकी घेवून निघाले. आसोदा ते सुजदे…
भुसावळ : प्रतीनिशी येथील दुहेरी हत्याकांडातील संशयीत बंटी पथरोड वापरत असलेल्या दोन महागड्या कार अज्ञातांनी मध्यरात्री पेटवून दिल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात नोंद नसल्याचे सूत्रांनी सांगितले. मिळालेली माहितीनुसार, भुसावळचे माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांच्या हत्याकांडात संशयित बंटी पथरोड याचे ही नाव असून तो सध्या पसार आहे. संशयित राहत असलेल्या जामनेर रोडवरील वाल्मीक नगर परिसरात झायलो व इको वाहन पार्क केलेले होते. दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी या वाहनांना ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिले. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर शहरात खळबळ उडाली. प्रभारी निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली…

