Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था देशाचा सुपरहिट चित्रपट अभिनेता अक्षय कुमार याला कोरोनाची लागण झाली आहे. अक्षय आज अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्न सोहळ्याला उपस्थित राहणार होता. पण तत्पूर्वीच त्याला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाल्यामुळे त्याला आता या सोहळ्याला हजर राहता येणार नाही. ‘सरफिरा’ चित्रपटाच्या प्रमोशनवेळी अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाली आहे. त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून, त्याने स्वतःला विलगीकरणात ठेवले आहे. त्याच्यावर डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू आहेत. केवळ अक्षयच नाही तर ‘सरफिरा’च्या टीममधील आणखी काही जणांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे, असे एका इंग्रजी वृत्तपत्राने सूत्रांचा दाखला देत म्हटले आहे.

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आगामी काळात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असतांना सर्वच पक्षांनी आतापासून निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे तर लोकसभा निवडणूक प्रचारात आणि निकालानंतर मोदींच्या ४०० पार घोषणेवर विरोधकांची टीका सुरूच आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अबकी बार मविआ २२५ पार अशी घोषणा केली आहे. भाजपचे उदगीर येथील माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या शरद पवार गटात प्रवेशप्रसंगी आयोजित सोहळ्यात ते म्हणाले की, महाविकास आघाडीने लोकसभेला महायुतीला कात्रजचा घाट दाखवला. आता विधानसभेला तर महायुतीचा पार सुपडाच साफ होईल. महाविकास आघाडीला विधानसभेत २८८ पैकी २२५ जागांवर यश मिळेल. वाय बी. चव्हाण सभागृहात गुरुवारी झालेल्या कार्यक्रमात ते म्हणाले…

Read More

जळगाव : प्रतिनिधी हळदीच्या कार्यक्रमात नाचत असताना जळगाव येथील तरुणाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ही घटना चोपडा येथील श्रीरामनगरमध्ये बुधवारी रात्री घडली. मयूर राजेंद्र शिंदे (वय ३१, रा. रामेश्वर कॉलनी, मेहरुण, जळगाव) असे या मृत तरुणाचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे कि, मयूर हा बुधवारी नातेवाईकाच्या लग्नानिमित्त चोपडा येथे आला होता हळदीच्या कार्यक्रमात नाचत असताना त्याच्या छातीत अचानक दुखू लागले आणि तो खाली पडला. त्याचा जागीच मृत्यू झाला. नातेवाईकांनी मयूर याला तातडीने चोपडा उपजिल्हा रुग्णालयात आणले. तिथे डॉ. सागर पाटील यांनी त्याला मृत घोषित केले. याबाबत चोपडा शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ शेषराव…

Read More

जळगाव : प्रतिनिधी आत्याच्या मुलासोबत लग्न ठरले होते. काही महिन्यांत लग्नाची तारीख काढण्यात येणार होती. मात्र, संसार फुलण्याआधीच दोन महिन्यांपूर्वी नियोजित वराचा अपघाती मृत्यू झाला. त्याच्याच मृत्यूच्या विरहात असलेल्या तरुणीने विद्युत कॉलनीतील घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी १० वाजता उघडकीस आली. रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, दुहिता संजयकुमार मोरे (वय २५, रा. विद्युत कॉलनी, जळगाव) असे मयत तरुणीचे नाव आहे. दुहिता विद्युत कॉलनीत शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या आवारात आई, वडील, भाऊ यांच्यासह राहत होती. तिचे नुकतेच बारावीचे शिक्षण झाल्यानंतर ती घरीच होती. दरम्यान, नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, दुहिताचे आतेभावाशी लग्न ठरले…

Read More

जळगाव : प्रतिनिधी वडनगरी फाट्याजवळ एका रिक्षा चालकाने २३ वर्षीय मुलाला माझ्याकडे का पाहतोय ?, असा जाब विचारत त्याला मारहाण करत, त्याच्या हातावर चाकूने वार केल्याची घटना बुधवारी सायंकाळी ५ वाजता घडली. या प्रकरणी तालुका पोलिस स्टेशनला रिक्षा चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आव्हाणे येथील धीरज राजाराम पाटील (वय २३) हा तरुण बुधवारी सायंकाळी वडनगरी फाट्याजवळील बडे जटाधारी महादेव मंदिर येथे दर्शनाला गेला हाता. दर्शन घेतल्यानंतर घरी जात असताना, मंदिरासमोरील रस्त्यालगत मयूर पाटील (पत्ता माहिती नाही) या रिक्षा चालकाने धीरजला माझ्याकडे का पाहतोय ? असे म्हणत जाब विचारला, त्यावर धीरजने पाहत नसल्याचे सांगितले. रिक्षा चालकाने वाद घालून,…

Read More

रावेर : प्रतिनिधी बंद कूलरमध्ये पाणी टाकताना शॉक लागल्याने लक्ष्मण संतोष पाटील (वय ३०) या तरुण शेतमजुराचा मृत्यू झाला. ही घटना अजंदे येथे गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अजंदे येथे हातमजुरी करणाऱ्या संतोष देवराम पाटील यांचा एकुलता मुलगा लक्ष्मण उर्फ गणेश पाटील हा केळीबागेत गुरुवारी बेण्याचे कंद खोदून परतला होता. घरी येताच तो कुलर बंद करुन तो पाणी टाकत होता. त्यावेळी त्याला शॉक लागला आणि तो खाली कोसळला. त्याच्या आईने आरडाओरडा करताच त्याच्या सोबतचे संदीप बिरपन आणि इतरांनी त्याला रावेर ग्रामीण रुग्णालयात हलवले. तिथे वैद्यकीय अधिकारी डॉ. योगिता महानवार यांनी तपासून मृत घोषित केले. संदीप बिरपन यांनी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जिल्हा पोलिस दलात सहाय्यक फौजदार ते पोलिस शिपायांपर्यंत कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रिया सुरु होती. बुधवारी २५० पोलिस शिपायांच्या बदल्या केल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा ६०९ कर्मचाऱ्यांच्या बदल्या जिल्हा पोलिस प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत. ६०९ पोलिस कर्मचारी प्रशासकीय बदलीसाठी पात्र होते. त्यात बहुतांश कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून, काही जणांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. मंगळवारी सहाय्यक फौजदार ते पोलिस नाईक पदापर्यंतच्या ३२१ कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर बुधवारी २५० पोलिस शिपायांच्या मुलाखती घेण्यात आल्या. ही प्रक्रिया झाल्यानंतर बुधवारी बदल्यांचे आदेश काढण्यात आले वर्षानुवर्षे शहरातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यामध्ये ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांची शहराबाहेरील पोलिस ठाण्यात बदली निश्चित मानली जात होती.…

Read More

वरणगाव : प्रतिनिधी शेतीच्या नफ्याचे पैसे घेण्यासाठी गेला असता सात ते आठ जणांनी एका युवकासह त्याची आई व पत्नीस मारहाण केली. याबाबत वरणगाव पोलिसात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १९ जून रोजी घडली होती. याबाबत गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी संशयित आरोपी महिला, तिचा पती, रवी भील, नितीन भिल, नरेंद्र भिल, अजय भिल, ताडन भिल व अन्य एक अशा आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजय कैलास पाटील (२६, रा. पिंपळगाव खुर्द) याचे एका महिलेकडे शेतीचे पैसे बाकी होते. या पैशाबाबत महिलेच्या पतीकडे १९ जून रोजी मोबाइलवरून विचारणा केली असता त्याने…

Read More

मेष राशी महत्त्वाच्या कामात आज विचारपूर्वक निर्णय घ्या. तुमची गुप्त धोरणे विरोधी पक्षाला उघड होऊ देऊ नका. सामाजिक कार्यात रस वाढेल. कुटुंबात शुभ आणि धार्मिक कार्य पूर्ण होऊ शकतात. व्यापार क्षेत्राशी निगडित लोकांना नियोजनबद्ध पद्धतीने काम करून यश मिळेल. व्यक्तींना फायदा होईल. सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांना संघर्ष करावा लागेल. कोर्टाच्या कामात यश मिळेल. नोकरदार वर्गाला रोजगार मिळेल. वृषभ राशी आज नोकरीच्या ठिकाणी एखाद्या अधीनस्थ व्यक्तीशी विनाकारण वाद होऊ शकतो. रागावर व बोलण्यावर नियंत्रण ठेवा. सुरक्षेत गुंतलेल्या सैनिकांना लक्षणीय यश मिळेल. क्रीडा जगताशी संबंधित लोकांना खूप संघर्ष करावा लागेल. कामाच्या ठिकाणी अधिक मेहनत केल्यास परिस्थिती सुधारेल. तुमच्या कार्यशैलीत सकारात्मक बदल करण्याचा…

Read More

मालेगाव : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात अपघाताच्या मालिका घडत असतांना नुकतेच मुंबईहून वडीलांच्या अंत्यविधीसाठी मालेगावी येत असताना मुंबई-आग्रा महामार्गावर वाके शिवारात उभ्या असलेल्या कंटेनरवर कार आदळल्याने झालेल्या अपघातात दोघी सख्ख्या बहिणी व जावयाचा मृत्यू झाल्याची हृदयदावक घटना घडली आहे. गुरूवारी दि.11 पहाटे हा भीषण अपघात घडला. या अपघातात एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरु आहेत. सविस्तर वृत्त असे कि, वाके शिवारात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनर (एमपी 09 एचआर 8322) ला पाठीमागून कारने जोरदार धडक दिली. या अपघातात मिनाक्षी अरुण हिरे(वय 53) रा. टिटवाळा जिल्हा ठाणे, अनिशा विकास सावंत (वय 40) रा. राहुरी जिल्हा ठाणे…

Read More