मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी खास योजना काढली आहे. या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला मोठ्या प्रमाणात अर्ज करत आहेत. मात्र हा अर्ज करताना महिलांना अनेक अडचणी येत आहेत. या अडचणी कमी व्हाव्यात यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. 13 जुलै रोजी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. माझी लाडकी बहीण योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. याच निर्णयात लाईव्ह फोटोसंदर्भात मोठा बदल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे आणि सुलभतेने व्हावी याबाबत या योजनेच्या अटीत आता नव्याने सुधारणा करण्यात आल्या आहेत. या योजनेसाठी महिलांना…
Author: editor desk
जामनेर : प्रतिनिधी शहरातील दामले प्लॉट भागामध्ये गावठी बनावटीचा पिस्तूल हातात घेऊन दहशत माजविणाऱ्या संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून गावठी पिस्तूल हस्तगत केले आहे. पुढील कारवाईसाठी त्याला जामनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस मुख्यालयातील जनसंपर्क कार्यालयाने शनिवारी 13 जुलै रोजी दुपारी एक वाजता दिलेल्या प्रचिती पत्रकान्वये कळविले आहे. निलेश प्रल्हाद मोरे, वय २३, रा. दामले प्लॉट, जामनेर असे संशयित आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर शहरातील दामले प्लॉट भागामध्ये शुक्रवारी 12 जुलै रोजी रात्री आठ वाजता जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक रणजीत जाधव हे पेट्रोलिंग करत असताना परिसरात संशय आरोपी निलेश मोरे…
जळगाव : प्रतिनिधी राज्यातील महिलांना सक्षम करण्यासोबतच त्यांचे कुटुंबातील निर्णय प्रक्रियेतील स्थान वाढावे यासाठी मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण ही योजना राज्यात सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या प्रभावी व सुलभ अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने या योजनेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या साठी शासनाने दि. १२ जुलै रोजी शासन निर्णय जारी केला आहे. त्या सोबतच या योजनेचे यशस्वी अर्ज भरणारे अंगणवाडी सेविका, एनयुएलएम यांचे समूह संघटक, मदत कक्ष प्रमुख, सीटी मिशन मॅनेजर, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिध्द झाल्यावर, एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन अॅप /…
अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील येथील शारदा माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता नववीतला विद्यार्थी घनश्याम जितेंद्र महाजन (वय १५) हा संध्याकाळी ४:३० च्या सुमारास शाळेत मैदानात खेळत असताना अचानक चक्कर येऊन पडला. त्याचवेळी त्याचे निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, घनःश्याम पडल्यानंतर लगेचच त्याला शिक्षकांनी सावरले व स्थानिक डॉक्टरांनी तपासणी केली. त्याच्यावर प्रथमोपचार केले व त्वरित अमळनेर येथे खासगी दवाखान्यात दाखल केले. त्यानंतर त्याला अमळनेर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. जी. एम. पाटील यांनी तपासून मृत घोषित केले. घनश्याम हा आई-वडिलांचा एकुलता मुलगा होता. अत्यंत नम्र व हुशार असलेला हा गुणी विद्यार्थी क्रीडा, नाटक सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी सर्व कार्यक्रमांत भाग घेणारा विद्यार्थी…
जळगाव : प्रतिनिधी गटारीच्या सांडपाण्याच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी होऊन एकमेकांना दगड मारून दुखापत करण्यात आली. ही घटना बुधवारी (१० जुलै) शिरसोली येथे इंदिरा नगरात घडली. याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरून गुरुवारी (११ जुलै) एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोन्ही गटांतील आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी जनाबाई रमेश पाटील (६५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार जणांविरुद्ध तर उज्ज्वला रवींद्र पाटील (३८) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार जणांविरुद्ध बीएनएस कलम १२५ (अ), ११५ (२), ३५२, ३५१(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अधिकार पाटील करीत आहेत.
जळगाव : प्रतिनिधी घरात सर्व जण झोपलेले असताना पहाटे ४:३० वाजेच्या सुमारास घराबाहेर ‘एसी’च्या आउट डोअरला वायरने गळफास घेत प्रमोद गुंड्या माचरेकर (३८, रा. कंजरवाडा) यांनी आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (११ जुलै) पहाटे कंजरवाडा परिसरात घडली. मयताच्या खिशात एक चिठ्ठी सापडली असून, त्यावर पत्नीसह सासरच्या मंडळींची नावे असून, कौटुंबिक वादातून प्रमोद यांनी आत्महत्या केल्याचा आरोप मयताची आई व पुतण्याने केला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करणारे प्रमोद माचरेकर हे पत्नी, दोन मुली, मुलगा व आईसह कंजरवाडा परिसरात राहत होते. घरात सर्व सदस्य झोपलेले असताना गुरुवारी पहाटे…
जळगाव : प्रतिनिधी सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर सीआयडी अधिकारी असल्याचे सांगत व्यावसायिकाला जेवणातून गुंगीचे औषध देत त्याचे आक्षेपार्ह फोटो काढत खंडणी उकळणाऱ्या महिलेला रामानंदनगर पोलिसांनी जेरबंद केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ‘हनी ट्रॅप’ करणारी ही महिला १५ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत गेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रायसोनी नगर परिसरात राहणाऱ्या एका व्यावसायिकाची सोशल मीडियावर एका महिलेशी ओळख झाली. तिने व्यावसायिकाला आपण सीआयडी अधिकारी तर पती रेल्वेत टी.सी. असल्याचे सांगितले. ७ मार्च रोजी धुळे येथे ती व्यावसायिकाला भेटली. तेथे जेवणात गुंगीचे औषध देत एका फ्लॅटवर घेऊन गेली. याठिकाणी व्यावसायिकाचे आक्षेपार्ह फोटो काढत तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. दरम्यान, या महिलेने व्यावसायिकाला…
चाळीसगाव : प्रतिनिधी बसस्थानक परिसरात गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एकास अटक करण्यात आली. पोलिसांनी गुरुवारी रात्री ही कारवाई केली. गणेश तुकाराम पवार (वय २५, रा. बोरमाळी, पो.नागद, ता. कन्न्ड, जि संभाजीनगर, ह.मु, चाकण, ता. खेड, जि. पुणे) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे कि, पोलिस बसस्थानक परिसरात गस्त घालत होते. त्याचवेळी एकजण बसस्थानकाच्या नियंत्रण कक्षासमोर संशयितरीत्या बसलेला दिसला. त्याची विचारपूस केली असता त्याने नागद (ता. कन्नड) येथे जात असल्याचे सांगितले. अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला गावठी बनावटीचे पिस्तूल व २ जिवंत काडतुसे, मॅगझिन, दोन मोबाईल असा एकूण ५१ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला आहे. पोकॉ. समाधान पाटील…
मेष राशी आज आईशी विनाकारण मतभेद होऊ शकतात. जमीन, वाहने, इमारतींच्या खरेदी-विक्रीत अडथळे येऊ शकतात. कामाच्या क्षेत्रात आराम आणि सोयी कमी होऊ शकतात. घर किंवा व्यवसायाच्या ठिकाणी चोरी होण्याची शक्यता आहे. अनावश्यक वादविवाद टाळा. अन्यथा, गोष्टी आणखी वाढल्यास, तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकते. काही महत्त्वाच्या कामात अडथळे आल्याने तुम्हाला वाईट वाटेल. काही सरकारी खात्यामुळे तुम्हाला व्यवसायात अडथळ्यांना सामोरे जावे लागेल. रोजगारासाठी इकडून तिकडे भटकावे लागेल. नोकरीत तुम्ही वरच्या अधिकाऱ्यांच्या रोषाला बळी पडू शकता. वृषभ राशी आज बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळेल. तुम्हाला तुमच्या आवडीचे काम करता येईल. औद्योगिक व्यवसाय योजना राबविण्यात येतील. सैन्याशी संबंधित लोक त्यांच्या साहस आणि…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात उतरले असल्याने निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आजारी असतानाही शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील हे महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी विधीमंडळात दाखल झाले. सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांना काही दिवसांपूर्वी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, नुकतेच ते बरे होऊन सांगोला तालुक्यातील आपल्या चिकमहूद या गावी आले होते. दरम्यान, विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात उतरले असल्याने निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी आमदार शहाजीबापू पाटील गुरुवारीच मुंबईला आले आहेत. सध्या आमदार शहाजीबापू पाटील यांची तब्येत ठणठणीत असून ते रात्री आमदार…

