जळगाव : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने गावठी दारुच्या हातभट्टी कारवाई करण्यात येऊन १६७ लिटर गावठी दारुसह दीड हजार लिटर रसायन हस्तगत करण्यात आले. ही कारवाई शेळगाव येथे तापी नदी काठावर करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, नदी काठी गावठी हातभट्टीची दारु तयार करण्यासह दारुची वाहतूक केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. व्ही. टी. भूकन यांना मिळाली. त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथक प्रमुख निरीक्षक डी. एम. चकोर, एस.बी. भगत, एस.एम. मोरे, दुय्यम निरीक्षक जी.डी. अहिरे, ए. डी. पाटील, आर.डी. जंजाळे, डी.एन. पावरा यांनी आसोदा-शेळगाव रस्त्यावर सापळा रचून एका दुचाकीवर गावठी दारू वाहतूक करताना कारवाई…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी येथील विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार आ. राजूमामा भोळे यांच्या प्रचाराचा नारळ आज दि. ५ नोव्हेंबर रोजी सकाळी साडे सात वाजता ग्रामदैवत श्रीराम मंदिर येथे फुटणार आहे. तेथून जुने जळगाव परिसरात आ. भोळे यांची प्रचार रॅली निघणार आहे. भाजपच्या मंडल क्र. २ तथा प्रभाग क्र. ३ ते ५ या विभागात आज दि. ५ रोजी प्रचार केला जाणार आहे. राम मंदिर,जुने जळगाव येथून सुरुवात होऊन जुने जळगाव परिसरात प्रचार रॅली निघणार आहे. तर दाणाबाजार परिसरात समारोप होईल. दुसऱ्या टप्प्यात भाजपच्या मंडल क्र. ४,६ तथा प्रभाग क्र. ७, ११ या विभागात दुपारी ३ वाजता शिवकॉलनी स्टॉप येथून…
मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी साधारण राहील. व्यापारात घट झाल्यामुळे तुम्ही चिंतित असाल, परंतु तुम्ही तुमचा भरपूर वेळ तुमच्या व्यवसायात द्याल आणि तुमच्या समस्यांपासून सहज बाहेर पडू शकाल. तुम्हाला आश्चर्यकारक भेट मिळू शकते. नोकरीच्या ठिकाणी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न कराल. तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करण्याचीही गरज आहे. जर तुम्ही कोणत्याही अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊन शेअर मार्केटशी संबंधित पैशाचे गुंतवणूक कराल तर तुमच्यासाठी चांगले राहील. वृषभ राशी आज कोणतीही जोखिम अंगावर घेऊ नका किंबहुना जोखमीपासून दूरच राहा. तुमच्या जोडीदाराचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल आणि तुम्ही तुमचे गृहस्थ जीवन सुखात चालवू शकाल. नोकरी शोधणार्यांना काही चांगल्या बातम्या ऐकू येऊ शकतात. तुमचे…
चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्ज माघारीच्या आजच्या शेवटच्या दिवशी वाघळी गावाचे माजी सरपंच विकास चौधरी यांनी आपली माघार घेऊन भारतीय जनता पक्षाशी एकनिष्ठता दाखवत मंगेशदादा चव्हाण यांना पाठिंबा जाहीर केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी विकासाचे व्हिजन घेऊन विधानसभा निवडणुक लढविण्यासाठी तयारी सुरू केली होती. मात्र समाजातील प्रतिष्ठित व सन्माननीय ज्येष्ठांच्या मार्गदर्शन व सल्ल्यानुसार तसेच भारतीय जनता पार्टीचा एकनिष्ठ कार्यकर्ता असल्याने व आमदार मंगेश दादांचा जुना मित्र असून चाळीसगाव च्या विकासासाठी त्यांच्या असलेल्या धडपडीला साथ देण्यासाठी त्यांना बिनशर्त जाहीर पाठिंबा देत असल्याचे विकास चौधरी यांनी स्पष्ट केले. माझ्या सर्व समर्थक व मित्र परिवाराने येत्या २० तारखेला महायुतीचे…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव ग्रामीण मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून असोदा येथील असंख्य तरूणांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे हात बळकट करण्यासाठी पुढे आलेल्या सर्व तरूणांचे मनःपूर्वक स्वागत स्वतः माजी मंत्री श्री.देवकर यांनी पक्षाच्या वतीने केले. यावेळी असोदा ग्रामपंचायतीचे सदस्य हेमंत पाटील, सागर कोळी, सागर पाटील, बंटी बारी, परिक्षित पाटील, यश पाटील, धीरज पाटील, धवल पाटील, सागर पाटील, अजिंक्य पाटील, तन्मय चौधरी, कुणाल पाटील, आदेश देशमुख, मनोज पाटील आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘यांनी’ केला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश चंद्रकिरण बिऱ्हाडे, जयवंत जाधव, जितेंद्र…
जळगाव ; प्रतिनिधी येथील विधानसभा मतदारसंघांचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांनी सिखवाल ब्राह्मण समाज आयोजित अन्नकुट महोत्सवाला उपस्थिती देऊन नागरिकांशी संवाद साधला. प्रसंगी, आध्यात्मिक साधनेमुळे आयुष्यात मन:शांती लाभते असे प्रतिपादन आमदार राजूमामा भोळे यांनी केले. शहरात सिखवाल ब्राह्मण समाजातर्फे अन्नकुट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळेला समाज बांधवांनी शेकडोंच्या संख्येने उपस्थिती दिली होती. कार्यक्रमांमध्ये महिला आणि पुरुष भाविकांनी भक्तीभावाने मनोभावे पूजन-अर्चन केले. यावेळी आ. राजूमामा भोळे यांनी महर्षी ऋष्य शृंग यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन केले. जीवनात आध्यात्मिक साधना महत्त्वाची आहे. दिवसातील काही वेळ भगवंताच्या सानिध्यात व पूजनात घालवला पाहिजे. त्यामुळे मनःशांती लाभते असे प्रतिपादन यावेळी आ.…
जळगाव : प्रतिनिधी शहराचे आ. राजूमामा भोळे यांनी रविवारी गेंदालाल मिल भागातील तक्षशिला बुद्ध विहार येथे भेट दिली. भाऊबीज सणानिमित्त भगिनींनी राजूमामांचे औक्षण करून भाऊबीज साजरी केली. गेंदालाल मिल भागातील ३५८ ग्रुपचे संस्थापक आयोजक अजय गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक राजू मराठे, संजय शिंदे, विनय चौधरी यांच्यासह अनेक महिला, पुरुष उपस्थित होते. रविवारी भाऊबीज सण असल्यामुळे महिला भगिनींनी राजूमामांचे औक्षण करून त्यांना विजयासाठी व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. यावेळी तक्षशिला बुद्ध विहार येथे भगवान गौतम बुद्ध यांना वंदन करून राजूमामा भोळे यांनी अभिवादन केले. प्रसंगी स्थानिक प्रश्नांवर नागरिकांनी आ. राजूमामा भोळे यांच्याशी संवाद साधला. आपल्या…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुकीची आज माघारीची अंतिम दिनांक असतांना एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. त्यांना राज्याच्या पोलिस महासंचालक या पदावरून हटवल्याचे वृत्त समोर आले आहे. काँग्रेस आणि इतर पक्षांच्या तक्रारींवरून केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्ला यांच्या बदलीचे आदेश दिल्याचे केंद्रीय आयोगाने स्पष्ट केले आहे. तसेच पोलीस महासंचालक शुक्ला यांची तत्काळ बदली करण्यात आली येत असून, पोलीस महासंचालकांचा पुढील पदभार सर्वात वरिष्ठ IPS अधिकाऱ्याकडे सोपवला आहे. यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांना उद्या (दि.५) दुपारी १ वाजेपर्यंत पर्यंत तीन आयपीएस अधिकाऱ्यांचे पॅनेल पाठवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. राज्यातील विधानसभा निवडणूकांसाठी मुख्य निवडणूक…
उत्तराखंड : वृत्तसंस्था उत्तरखंडमधील अल्मोड येथे बस थेट दरीत कोसळून ३६ जणांचा मृत्यू झाल्याची भयानक घटना समोर आली आहे. बचाव पथक, पोलिसांसह एनडीआरएफचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले. मिळालेल्या माहितीनुसार, नैनी डांडा येथून बस रामनगरकडे जात होती. चालकाला अंदाज न आल्यामुळे सकाळी बस दरीत कोसळली. गीत जागीर नदीच्या किनाऱ्याला बस दरीत कोसळल्यामुळे अनेक जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. आतापर्यंत ३६ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले असून ५ जणांच्या मृत्यूची अधिकृत माहिती समोर आलेली आहे. या अपघातामध्ये काहीजण जखमीही झाले आहेत. ४२ आसनी बसमध्ये ३५ पेक्षा अधिक प्रवासी होते. बस दरीत कोसळल्याची घटना सकाळी घडली. या अपघातानंतर काही प्रवासी स्वतः बसमधून…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुकीची माघारीचा दिवस उगविला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. मागच्या अनेक दिवसांपासून उमेदवारांच्या निवडीसाठी खल सुरु होता. पण आता मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. काल दिवसभर मतदारसंघानुसार सगळ्यांसोबत सविस्तर चर्चा झाली. मतदारसंघ सुद्धा ठरले, काही कमी तर काही वाढले असतील. मराठा समाजाने मतदानावर लढायचं आहे. आमच्या मित्र पक्षाची आणखी यादी आली नाही. लढायचं जमेल का? यादीच नाही म्हणल्यावर… एका जातीवर कस निवडून यायचं, त्यामुळे नाईलाज आहे एकटयाने कसं लढायचं. यावर रात्री आमची चर्चा झाली. यादी न आल्यामुळे नाईलाजाने एका जातीवर जिंकणे शक्य नाही त्यामुळे थांबून…

