Author: editor desk

चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील हिंगोणे परिसरात धारदार शस्त्राचा धाक दाखवून १९ बोकड व ७ बकऱ्यांची चोरी करणाऱ्या टोळीचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला असून त्यांच्याकडून १ लाख ३५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोणे गावातील एका झोपडीच्या ठिकाणी टोळीने धारदार शस्त्राचा धाक दाखवत १९ बोकड व ७ बकऱ्या चारचाकी वाहनात टाकून चोरी केल्याची घटना घडली होती. याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान ही चोरी चाळीसगाव तालुक्यातील भवाळी गावातील चेतन गायकवाड यांनी केल्याची माहिती स्थानिक…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी बंदुकीशी आरशात बघून खेळत असताना अचानक गोळी सुटली आणि यात गोळी डाव्या गालाला चाटून गेल्याने तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास बस स्टँडच्या पाठीमागील परिसरात घडली. मंजितसिंग दिलीपसिंग बावरी (२०, रा. बस स्टँडच्या पाठीमागे, चाळीसगाव) असे या जखमी तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंजितसिंग बावरी हा त्याच्याजवळील शस्त्र हाताळत असताना त्यातून सुटलेली गोळी लागून जखमी झाला. या घटनेनंतर त्याला तत्काळ परिसरातील लोकांनी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पोलिस तपासात पुढे असे समजले की मंजितसिंगकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही वैध परवाना नव्हता उपनिरीक्षक कैलास पाटील यांनी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून बावरी…

Read More

पाचोरा : प्रतिनिधी दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दुचाकीस्वार ठार झाला. ही घटना जळगाव-पाचोरा राष्ट्रीय महामार्गावर हडसननजीक गुरुवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. सविस्तर वृत्त असे कि, मृताचे नाव बापू दलपत पाटील (५६) रा. वेरुळी खुर्द, ता. पाचोरा असे आहे. नांद्रा गावाहून वेरुळीकडे बापू पाटील व कृष्णा शिवाजी पाटील (४३) दुचाकीने क्रमांक (एम. एच. १९ सी. एल. ०४३३) येत असताना पाचोऱ्याहून जळगावकडे जाणाऱ्या दुचाकीने क्रमांक (एम. एच. १९ बी. डब्ल्यू ११८५) समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात बापू पाटील गंभीर जखमी झाले. त्यांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला. याबाबत पाचोरा पोलिसांत कृष्णा शिवाजी पाटील यांच्या फिर्यादीवरून…

Read More

जळगाव : प्रतिनिधी माझ्या सासूरवाडीला का जाता, अशी विचारणा करत व अन्य कौटुंबिक कारणावरून मंगलाबाई लालचंद परदेशी (६२, रा. शिवाजीनगर हुडको) यांना त्यांच्याच मुलाने मारहाण करत धारदार वस्तूने वार केला. तसेच भाऊ व भावजयीलाही शिवीगाळ केली. ही घटना गुरूवारी (३ ऑक्टोबर) शिवाजीनगरमधील अमर चौकात घडली. या प्रकरणी सुरेंद्र लालचंद परदेशी याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगलाबाई परदेशी या मोठा मुलगा गणेश परदेशी व सुनेसह राहतात तर दुसरा मुलगा सुरेंद्र परदेशी हा वेगळा राहतो. गुरूवारी मंगलाबाई या मोठा मुलगा व सुनेसह त्यांच्या दिराकडे घटस्थापनेच्या कार्यक्रमाला गेल्या होत्या. त्यावेळी सुरेंद्रने तेथे येऊन आईला मारहाण करत हाताच्या मनगटावर धारदार…

Read More

जळगाव : प्रतिनिधी पती-पत्नीच्या वादाचा गैरफायदा घेत विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर तरुणाने अत्याचार केला. यातून सदर विवाहिता गर्भवती राहिली असून तरुणाने ऐनवेळी लग्नास नकार दिला. हा प्रकार सन २०१८ ते ३० सप्टेंबर २०२४ दरम्यान घडला. याप्रकरणी तुषार राजेंद्र आहिरे (२८, गोपाळपुरा) याच्याविरुद्ध ३ ऑक्टोबर रोजी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका परिसरात बाहेर गावाहून जळगावात आलेली एक २६ वर्षीय विवाहिता पतीसह राहते. सदर विवाहिता व तिचा पती यांचे नेहमी भांडण होत असल्याचा गैरफायदा घेत विवाहितेच्या ओळखीचा तुषार आहिरे याने ‘पतीला घटस्फोट दे, मी…

Read More

धरणगाव :  प्रतिनिधी DPDC मधून राजमाता जिजाऊ चौक सुशोभिकरण साठी 10 लक्ष तर वैशिष्ठ्यपूर्ण योजनेंतर्गत अमळनेर रस्त्यावर क्रांतीसुर्य महाराणा प्रताप प्रवेशद्वार उभारणार असल्याचे सांगून 14 फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लवकरच उभारणार आहे. मराठा समाजाच्या एकत्रिततेसाठी आणि सांस्कृतिक जतनासाठी हे कार्यालय मोठे योगदान देऊ शकते. या ठिकाणी विविध कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित करून समाजाच्या एकात्मतेला बळ मिळू शकते. बहुउद्देशीय सभागृह हे भविष्यातील पिढ्यांसाठी एक महत्वपूर्ण ठेवा असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते धरणगाव येथे मराठा समाज प्रबोधिनी आयोजित मराठा समाज बहुउद्देशीय सभागृह भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी खासदार स्मिताताई वाघ होत्या. अध्यक्षीय भाषणात खा. स्मिताताई…

Read More

मेष राशी तुम्हाला एखादी वाईट किंवा अप्रिय बातमी मिळू शकते. व्यावसायिकांची स्थिती सुधारेल. नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या कामात जास्त मेहनत करावी लागू शकते. नवीन कामाचे आराखडे इत्यादी बनतील. भविष्यात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. वृषभ राशी आजचा दिवस लाभदायक आणि प्रगतीकारक राहील. हळूहळू कामे होतील. कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्या बुद्धीच्या आधारे निर्णय घ्या. कौटुंबिक समस्यांमुळे मानसिक तणाव असू शकतो. संयम ठेवा. कोणालाही कठोर शब्द बोलू नका. नियोजनबद्ध पद्धतीने काम करा. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला तुमच्या भावंडांकडून सहकार्य मिळत राहील. मिथुन राशी व्यापार क्षेत्राशी संबंधित लोकांना अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. आणखी संघर्ष होऊ शकतो. नोकरीत अधीनस्थांशी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु होण्याच्या तयारीत असतांना या काळात गुन्हेगारीवर आळा बसावा यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मोठी कारवाई केली आहे. जिल्ह्यातील अमळनेर, पारोळा आणि जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्याच्या अंतर्गत स्थानबद्धतेची मोठी कारवाई करण्यात आली असून यातील एकाला कोल्हापूर तर इतर दोघांना नागपूर मध्यवर्ती कारागृहात परवानगी केली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काढले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आगामी निवडणुकीच्या आणि सणांच्या पार्श्वभूमीवर वाळू तस्कर, अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणारे आणि धोकायदायक व्यक्ती यांच्यावर आळा बसावा, या अनुषंगाने अमळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगार विशाल दशरथ चौधरी वय-३२, रा. भोईवाडा अमळनेर,…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात निवडणुकीची तयारी जोरधरीत असतांना दुसरीकडे राज्यातील महायुती सरकारकडून अनेक घोषणा करत महत्त्वाच्या निर्णयांना हिरवा कंदिल दाखवला आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज (दि.४) रमाई, शबरी आवास योजनेतील घरकूल अनुदानात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत राज्य सरकारकडून ४१ नवीन निर्णयांना मंजूरी देण्यात आली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. राज्यातील अकृषिक कर पूर्णपणे माफ, बैठकीतील मोठा निर्णय राज्य सरकारच्या आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महसूल विभागांतर्गत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये राज्यातील अकृषिक कर पूर्णपणे माफ करण्यात आला…

Read More

पाचोरा : प्रतिनिधी शहरातील भडगाव रोडवरील एका मंडळातर्फे गरबा दांडियाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रात्री ११ वाजेच्या सुमारास एका २७ वर्षीय तरुणास हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा शहरात विविध मंडळांच्या वतीने गरबा दांडिया स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये ३ ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास सिंधी कॉलनी परिसरातील रहिवासी असलेले लखन रमेशलाल वाधवाणी नामक युवकाचा एका कार्यक्रमात गरबा खेळत असतांना अचानक चक्कर आल्याने सदर युवक जमिनीवर खाली पडला. तात्काळ काही सहकाऱ्यांच्या मदतीने पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र तो पर्यंत खुप उशिर…

Read More