Author: editor desk

राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षाच्या उमेदवारांची जोरदार फिल्डिंग लावणे सुरु असतांना नुकतेच परळी मतदार संघातातील राजकारण तापले आहे. राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी नुकतेच विरोधकावर टीकास्त्र सोडले आहे. मंत्री मुंडे म्हणाले कि, ‘मुझे गिराने के लिए कई बडे लोग बार ‎‎बार गिरे, मगर ये ‎‎मुमकिन नही है’, ‎‎मला टार्गेट ‎‎करण्याचा अनेक ‎‎जणांनी प्रयत्न ‎‎केला आहे. ज्या ‎‎नेत्यांचा आम्ही आजही आदर करतो, ‎‎त्या नेत्यांनी ही पातळी गाठल्याचे‎ वाईट वाटते, अशा शब्दात त्यांनी नाव न घेता शरद‎पवारांवर परळीत टीका केली.‎ परळीत दिव्यांग कल्याण‎विभागाचे उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे‎यांच्यातर्फे, परळी विधानसभा मतदार‎संघातील एक हजार कर्णबधीर‎दिव्यांग बांधवांना, अद्ययावत मशीन‎वाटप कार्यक्रम सोमवारी झाला.‎त्यावेळी मंत्री मुंडे…

Read More

पारोळा : प्रतिनिधी जिल्ह्यातून हद्दपार झालेला इसम पारोळा शहरात बिनापरवानगी वावरत असताना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पारोळा येथे अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हद्दपार केलेल्या आरोपींवर वेळोवेळी नजर ठेवण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी खास पथक तयार केले आहे. सध्या सुरू असलेल्या नवरात्रोत्सवानिमित्त पेट्रोलिंग करीत असताना पारोळा येथील वंश ऊर्फ गणेश काशिनाथ नरवाडे (वय २०) हा पारोळा येथे वावरत असताना त्यास शिताफीने अटक करण्यात आली. उपविभागीय दंडाधिकारी, एरंडोल यांच्या आदेशानुसार २८ नोव्हेंबर २०२३ रोजी एक वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून त्याला हद्दपार करण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, जळगावचे…

Read More

जळगाव : प्रतिनधी सून व जेठाणीसह मंदिरातून दर्शन घेऊन परतत असताना कलाबाई लक्ष्मण सोनवणे (५३, रा. मोहाडी, ता. जळगाव) यांच्या गळ्यातील सोनपोत दोन जणांनी ओढून नेली. ही घटना सोमवारी (७ ऑक्टोबर) नागझिरी शिवारात नागाई जोगाई मंदिराजवळ घडली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकाला अटक करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कलाबाई सोनवणे या सून व जेठाणीसह नागाई जोगाई मंदिरात दर्शन घेऊन परतत असताना अमर ताराचंद मोरे (३२, रा. भातखंडा, ता. पाचोरा, ह.मु. श्यामनगर, जळगाव) व नीलेश अरूण सोनवणे (रा. भातखंडा, ता. पाचोरा) हे आले. अमरने महिलेच्या गळ्यातील सोनपोत ओढली व दोघांनी नदीपात्राकडे पळ काढला होता. मात्र…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी रेल्वे स्थानकावर स्कॅनिंग मशीनमध्ये बॅग तपासणी करत असताना आरोपी समीर खान जमील खान (वय २५, रा. चंदोला, अहमदाबाद) याच्याकडील बॅगमध्ये चार किलो गांजा मिळून आला. हा गांजा चाळीस हजार रुपये किमतीचा होता. जीआरपीचे रफिक शेख, अतुल कराळे आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सुनील कपाटे हे बेंग स्कॅनिंग मशीनजवळ तपासणी करत होते. त्यावेळी त्यांना संशयिताच्या बॅगेत ओला गांजा मिळून आला. त्यांनी तातडीने आरपीएफचे सहायक सुरक्षा आयुक्त अशोक कुमार यांना माहिती दिली. त्यानंतर गांजा जप्त करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुधीर धायरकर करीत आहेत.

Read More

मेष राशी महत्त्वाच्या कामातील अडथळे दूर होतील. कामाच्या ठिकाणी खूप व्यस्तता राहील. राजकारणात मोठे पद मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात तुमच्या समर्पण आणि शहाणपणामुळे चांगला नफा आणि प्रगती होण्याची शक्यता आहे. नोकरीत प्रमोशनसोबतच तुम्हाला हव्या त्या ठिकाणी पोस्टिंग मिळू शकते. उद्योगधंद्याशी संबंधित लोकांना काही चांगल्या बातम्या मिळतील. वृषभ राशी जोखमीच्या कामात यश मिळेल. व्यवसायात नवीन करार होतील. इमारतीच्या बांधकामाशी संबंधित लोकांना महत्त्वपूर्ण यश मिळेल. राजकारणात महत्त्वाच्या मोहिमेचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल. नोकरीत बढतीची चांगली बातमी मिळेल. सामाजिक कार्यात अधिक व्यस्त रहाल. मिथुन राशी कोर्ट केसमध्ये कोर्ट तुमच्याविरुद्ध निर्णय घेऊ शकते. त्यामुळे तुम्ही योग्य वकिली करा. कुटुंबात कठोर भाषा वापरू नका. सरकारी…

Read More

चोपडा : प्रतिनिधी मनुदेवीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या यावल- चोपडा रस्त्यावर कारचे टायर फुटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात धुळे जिल्ह्यातील निजामपूर येथील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर कारचालक गंभीर जखमी असून चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार, नवरात्रीमध्ये दरवर्षी यावल तालुक्यातील सातपुडा निवासिनी मनुदेवीचे दर्शन घेवून याठिकाणी भंडारा देणारे धुळ्याच्या साक्री तालुक्यातील निजामपूर येथील वाणी कुटुंब यांच्यावर काळाने घाला घातला. दरवर्षी प्रमाणे मंगळवारी ८ ऑक्टोबर रोजी सकाळी वाणी कुटुंबातील शैलेश श्रीधर वाणी (वय ३४), निलेश श्रीधर वाणी (३०) हे दोन भाऊ आणि त्यांच्या सोबत जितेंद्र मुरलीधर भोकरे (वय ४७) हे कारने मनुदेवी येथे भंडारा देण्यासाठी सकाळी निघाले…

Read More

जळगाव : प्रतिनिधी दिनांक ७/१०/२०२४ रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षातर्फे आंदोलन व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.सातत्याने महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला हलवण्यात येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी तरुणांचा हातातील हक्काचा रोजगार कमी होत चालला आहे प्रचंड बेरोजगारी वाढत चालली आहे. त्यामुळे मराठी तरुण बेरोजगारीने त्रस्त झाला आहे. त्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षातर्फे महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेणाऱ्या खोके सरकार विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या नेतृत्वात राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले आहे. गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्र राज्यात खोके सरकार स्थापन झाल्यापासून सरकारच्या दुर्लक्षित कारभाराने वेदांता फस्कॉन, टाटा एअर बस प्रकल्प, कोकण पाणबुडी प्रकल्प,मुंबई स्थित…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी दि ७ ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता वीर शिरोमणी हिंदूसूर्य महाराणा प्रताप चौक लोकार्पण सोहळा ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या शुभहस्ते मोठ्या थाटात पार पडला. यावेळी आमदार मंगेश चव्हाण, गुजरात येथील भारतीय जनता पक्षाचे निते सुरेशजी मकवाना, महाराणा प्रताप ट्रस्टचे अध्यक्ष ठाणसिंग अप्पा पाटील यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, राजपूत समाज बांधव व पदाधिकारी उपस्थित होते. भारतातील एकमेव चित्तोडगढ येथील विजयस्तंभाची प्रतिकृती शहरात झाल्याने चाळीसगावकरांना आमदार चव्हाण यांनी सुखद धक्का देत विरोधकांना आपल्या विकास कामांचा जोरदार झटका दिला आहे. यावेळी लोकार्पण सोहळ्यात मंत्री महाजन यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या कार्याला साजेसा अतिशय सुंदर आणि देखणा चौक सुशोभित केल्याबद्दल…

Read More

मुंबई :  वृत्तसंस्था देशातील हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचे कल हाती येत आहेत. मतमोजणीच्या सुरुवातील काँग्रेस आघाडीवर होती. मात्र काही वेळाने भाजपने मुसंडी मारत काँग्रेसला पिछाडीवर टाकले आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अंतिम निकालावेळी हरियाणात काँग्रेस विजयी होणार, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला मोदी, अमित शहा आणि अमित शहा यांचा पक्ष पराभूत होत आहे. मी जिंकण्याचा पूर्ण बंदोबस्त केला आहे, असे सेनी काल म्हणाले होते. त्यांनी नेमका काय बंदोबस्त केला ते पहावे लागेल. भाजप महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये पराभूत होत आहे. मोदींचा कृत्रिम मुखवटा पूर्णपणे उतरला आहे. हरियााणात भाजप विरोधी लाट…

Read More

जळगाव : प्रतिनिधी पटेल जहाँआरा अब्दुल मुनाफ यांना त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्य आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल मौलाना अबुल कलाम आझाद ग्रंथालय, रावेर यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार शिक्षण क्षेत्रातील एक महत्त्वाचा सन्मान असून, त्यांच्या दीर्घकालीन सेवेमुळे आणि त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी केलेल्या मेहनतीमुळे त्यांना हे मानपत्र मिळाले आहे. कार्यक्रमात उपस्थित असलेले डॉ. करीम सर (अध्यक्ष, इकरा एज्युकेशन सोसायटी), डॉ. हारून (अध्यक्ष, डायमंड एज्युकेशन सोसायटी), प्रल्हाद पाटील (जि. प. अध्यक्ष) आणि दारा मोहम्मद (नगराध्यक्ष, रावेर) यांनी पटेल जहाँआरा यांच्या कार्याचे कौतुक केले. या मान्यवरांनी आपल्या भाषणात त्यांच्या शैक्षणिक पद्धती, विद्यार्थ्यांवरील निष्ठा, आणि समाजातील योगदानाची…

Read More