• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अज्ञातांनी दोघा बहीणींना नदीत फेकल्याचा संशय : जिल्ह्यात उडाली खळबळ

editor desk by editor desk
October 6, 2024
in क्राईम, राज्य, राष्ट्रीय
0
अज्ञातांनी दोघा बहीणींना नदीत फेकल्याचा संशय : जिल्ह्यात उडाली खळबळ

अकोला : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना नुकतेच अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरातील भीमकुंड नदीत दोघा बहीणींना अज्ञातांनी फेकून दिल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. या दोघी बहिणी काल दुपारपासून घरी न आल्याने त्या हरविल्याची तक्रार त्यांच्या पालकांनी काल दाखल केली होती. परंतू या बहिणींना नदीच्या पात्रात फेकल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी पाणबु्ड्यांच्या मदतीने नदीच्या पात्रात शोध सुरु केला आहे. रात्रीची वेळ असल्याने शोधकामात अडथळे येत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील लाखनवाडा गावातल्या दोन अल्पवयीन मुलींना अकोल्यात भिकुंड नदीत फेकून दिल्याचा संशय व्यक्त केला जातोय. मुलीच्या नातेवाईकांनीच हे कृत्य केल्याचा संशय देखील बुलढाणा पोलिसांना आहे. दरम्यान, काल दुपारपासून या दोन अल्पवयीन बहिणी बेपत्ता आहेत. या अल्पवयीन बहिणी बेपत्ता असल्याची तक्रार बुलढाणा जिल्ह्यातील हिवरखेड पोलीस ठाण्यात दाखल आहे. कालपासून बुलढाणा पोलिसांकडून या दोन्ही मुलींचा शोध सुरु आहे. याच दरम्यान पोलिसांना काही माहिती हाती लागली आहे. दोन्ही अल्पवयीन मुलींना नदीत फेकून दिल्याचा संशय आता पोलिसांकडून व्यक्त केला जातोय.

दरम्यान अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातल्या भीमकुंड नदीत काल सायंकाळच्या सुमारास या दोन्ही मुलींना नदीत टाकून दिल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे अकोल्यातील बाळापूर आणि बुलढाणा पोलिसांकडून नदीपात्रात शोध मोहीम सुरू आहे. शोध व बचाव पथकामार्फत ही शोध मोहीम सुरू आहे. नातेवाईकांनीच मुलींना नदीत टाकून देण्याचा संशय पोलिसांना आहे. त्या आधारावरच आता पोलिसांची भीमकुंड नदीपात्र आणि परिसरात बचाव पथकाच्या मार्फत शोधमोहीम सुरु केली. आलिया आणि सदफ असं या बेपत्ता मुलींची नाव असल्याचे प्राथमिक माहिती समोर आली.  दरम्यान काल बुलढाण्यातील कदमापूर येथे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी दोघी बहिणी घरून निघाल्या होत्या. मात्र, बराच वेळ झाला, मुली घरी परतल्या नाही, अखेर कुटुंबियांनी मुली बेपत्ता असल्याची तक्रार हिवरखेड पोलिसांत दाखल केली होती.

Previous Post

भरधाव दुचाकीच्या धडकेतील जखमीचा मृत्यू

Next Post

मुंबईत दुमजली इमारतीला भीषण आग : ५ जणांचा मृत्यू

Next Post
मुंबईत दुमजली इमारतीला भीषण आग : ५ जणांचा मृत्यू

मुंबईत दुमजली इमारतीला भीषण आग : ५ जणांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !
राजकारण

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !

July 5, 2025
नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !
क्राईम

नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !

July 5, 2025
त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !
राजकारण

त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !

July 5, 2025
…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !
Uncategorized

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !

July 5, 2025
संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group