जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका रुग्णालयातून काम संपवून घरी परतत असताना एका अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत यावल तालुक्यातील आडगाव येथील ३२ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री ११ वाजता ममुराबाद गावाजवळ घडली. जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजेश दिलीप पाटील, असे मयत तरुणाचे नाव आहे. तो जळगाव शहरातील एका खासगी रुग्णालयातील पॅथॉलॉजी लॅबमध्ये कामाला होता. रात्री काम संपवून दुचाकीने आडगावला जायला निघाला. ममुराबाद गावाच्या पुढे यावलकडून जळगावकडे जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने राजेशच्या दुचाकीला धडक दिली. त्यात राजेशचा जागीच मृत्यू झाला. ममुराबाद येथील काही तरुणांनी घटनेची माहिती पोलिसांना कळवली. पोलिसांनी राजेशचा…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी शहरातून गेलेल्या महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, बुधवारी पहाटे ३ वाजता अजिंठा चौकात अज्ञात वाहनाने एका दाम्पत्याच्या दुचाकीला दिलेल्या धडकेत ५२ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात महिलेच्या पतीला जबर दुखापत झाली आहे. याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनिता सुनील राणे (वय ५२, रा. सद्गुरूनगर, जळगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. अनिता राणे या बुधवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास पती सुनील बाबूराव राणे यांच्यासोबत सद्गुरूनगरातून दुचाकीने रिंगरोड भागात बांधकाम सुरू असलेल्या त्यांच्या घराकडे पाणी भरायला जात होत्या. ते अजिंठा चौकात आले असताना समोरून आलेल्या एका…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एसटी वर्कशॉपसमोरील गॅरेज, कुशन व रेक्झिन विक्रीच्या गोडावूनसह बाजूच्या तीन दुकानांना भीषण आग लागल्याने लाखो रुपयांचे सामान जळून खाक झाल्याची घटना बुधवारी सकाळी ११ वाजता घडली. या आगीत दुकानाच्या बाहेर लावलेल्या चारचाकी वाहनाचेही नुकसान झाले असून, याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेख साबीर इस्लाम (वय ४५, रा. सालार नगर) यांचे एसटी वर्कशॉपच्या समोर कुशन व रेक्झिनचे गोडावून आहे. बुधवारी १०:३० वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत कुशन व रेक्झिनच्या गोडावूनला भीषण आग लागली. आग एवढी भयंकर होती की, अग्निशमन विभागाचे पथक येण्याआधीच बाजूला असलेल्या सुधीरचंद मन्ना यांच्या गॅरेजच्या शेडला व…
पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील गजानन पळासखेडे येथील जि.प.च्या शाळेत ५ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील गजानन पळासखेडे येथील जि. प. शाळेत शिक्षण घेणाऱ्या ५ विद्यार्थ्यांना बुधवारी अन्नातून विषबाधा झाली. पारोळा कुटीर रुग्णालयात त्यांच्यावर वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत रनाळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. जिनेंद्र पाटील, कर्मचारी समाधान पाटील, राजू वानखेडे, परिचारिका बोरसे यांनी उपचार केले. घटनास्थळी वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत सूर्यवंशी, गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील. प्रभारी केंद्रप्रमुख संजय राजपूत आदींनी भेट दिली. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या पालकांनी कुटीर रुग्णालयात धाव घेत गर्दी केली होती. डॉक्टरांची सर्व टीम घटनास्थळी दाखल झाली होती. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी खिचडी खाल्ली, त्या सर्व विद्यार्थ्यांची…
मुंबई : वृत्तसंस्था देशाच्या उद्योग क्षेत्रातील बापमाणूस, प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झाल्याची बातमी रात्री समोर आली आहे. रतन टाटा यांना रविवारी (6 ऑक्टोबर) रात्री उशिरा साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रतन टाटा यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रतन टाटा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर टाटा यांनी सोमवारी (7 ऑक्टोबर) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास स्वत: ट्विट करत आपल्या प्रकृतीची मीहिती दिली होती. “माझ्या प्रकृतीविषयी अफवा पसरली आहे. पण माझे वय लक्षात घेता आणि सध्याची माझी प्रकृती पाहता माझ्या काही वैद्यकीय तपासण्या केल्या जात आहेत. त्यामुळे काळजी करण्यासारखं…
मेष राशी प्रोफेशनला लाईफमध्ये तुमच्यावर तुमच्या भावनांना वरचढ होऊ देऊ नका. पैशाचा योग्य वापर करा. नाही तर मोठा खर्च होईल. मन लावून तुमची मेहनत पार पाडा. तुमच्या क्षमतांना कमी समजू नका. तुमच्या पर्सनॅलिटीला चमकू द्या. ऑफिसमधील कामामुळे तुम्ही दिवसभर व्यस्त राहाल. हायड्रेटेड राहायला विसरू नका. डाएटमध्ये सुधारणा करा. वृषभ राशी आज वृषभ राशीच्या लोकांनी आपली क्रिएटीव्हीटीवर फोकस ठेवावा लागणार आहे. तुमच्या लव्ह लाइफमधील बदल स्वीकारा. हेल्दी लाइफस्टाईल ठेवा. आज संधी तुमचं दार ठोठावेल. त्यामुळे तुम्हाला चांगला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. रोज एक्सरसाईज करा. वाहने वेगात चालवू नका. दूरचा प्रवास टाळा. मिथुन राशी पैसे आणि परिस्थितीत तुमच्यासाठी आज पॉझिटिव्ह असेल.…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुकीचा जोर वाढला असतांना महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या काही दिवसापूर्वी कागलचे भाजप नेते समरजितसिंह घाटगे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यानंतर अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकरही शरद पवार गटात दाखल होणार आहेत. त्यांच्यासोबत अजित पवारांनी उमेदवारी जाहीर केलेले फलटणचे विद्यमान आमदार दीपक चव्हाणही शरद पवारांना साथ देणार आहेत. १४ ऑक्टोबर रोजी त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. इंदापूरमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात शरद पवारांनी फलटणमधील १४ तारखेच्या मेळाव्याची माहिती देत रामराजेंच्या प्रवेशाचे संकेत दिले होते. त्यातच आता रामराजेंचाही तुतारी…
नागपूर : वृत्तसंस्था देशातील हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने 48 जागा जिंकत बहुमत मिळवले आहे. निकालाआधी हरियाणात काँग्रेस विजयी होणार, असा विश्वास काँग्रेसच्या नेत्यांकडून व्यक्त केला जात होता. मात्र निकालानंतर सर्व चित्र स्पष्ट झाले. हरियाणातील निकालानंतर ठाकरे गटाकडून काँग्रेसवर टीका होत आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, कालपर्यंत हम साथ साथ है म्हणणारे आता हम आपके है कौन असे म्हणत आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. ते नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी फडणवीस यांनी महायुतीतील जागावाटपावर देखील भाष्य केले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरे गट काल निवडणूक निकालामुळे भाजपला घेरण्याची संधी पाहत होते. हरियाणामध्ये भाजप कधी…
चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी चाळीसगाव तालुक्यात महापुरुषांचे विचार व त्यांचे कार्य याचा जोगवा करण्याचा चंग बांधला आहे. त्यातूनच तालुक्यात महापुरुषांचे स्मारके, त्यांच्या नावाने, चौक, रस्ते , सभामंडप, सभागृहे उभी राहिली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौक, महाराणा प्रताप चौक, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने सभागृह, अहिल्यादेवी सभागृह, संत सावता सभागृह, वीर एकलव्य भवन, संत सेवालाल भवन या महापुरुषांना बरोबरच तालुक्यातील शहीद जवानांचे स्मारक उभारण्यात आले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने देखील तालुक्यातील 14 ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन उभारले जाणार आहे. सदर सामाजिक भवन…
धुळे : प्रतिनिधी राज्यात महायुती सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा सध्या सगळीकडे बोलबाल सुरु असून या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना महिना 1500 रुपये देण्याची घोषणा सरकारने केली असून आत्तापर्यंत राज्यातील महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. धुळ्यातही नुकताच लाडकी बहीण योजनेसंदर्भात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र तेव्हा तेथे आलेल्या एका महिलेने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. ‘ मला योजनेचे पैसे मिळाले नाहीत मी सावत्र बहीण आहे का ?’ असा सवाल त्या महिलेने थेट व्यासपीठावरून केला. तिच्या या विधानाची सध्या सर्वत्र चर्चा असून बरेच पडसाद उमटताना दिसत आहेत. उर्वरित महिलांनाही या योजनेचा लाभ द्यावा अशी…

