भुसावळ : प्रतिनिधी पुरीहून अहमदाबादकडे निघालेल्या एक्स्प्रेसमध्ये रेल्वे सुरक्षा बलाला बेवारस बॅगेत तब्बल १ लाख रुपयांचा १० किलो गांजा आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार मंगळवारी रात्री समोर आल्यानंतर पुन्हा गांजा तस्करी ऐरणीवर आली आहे. या प्रकरणात अज्ञात प्रवाशाविरोधात लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून आता गांजा तस्कराला शोधण्यास सुरूवात केली आहे. सविस्तर वृत्त असे कि, २८ जानेवारीला पुरी-अहमदाबाद १२८४३ या गाडीच्या पुढील जनरल डब्यात एक बेवारस बॅग आढळली. यानंतर एका प्रवाशाने भुसावळ स्थानक आल्यानंतर ८.३५ वाजता आरपीएफकडे ही बॅग दिली. सीसीटिव्ही व पंचासमक्ष बॅगेची झडती घेतली असता पिवळ्या रंगाच्या कपड्यात सफल पान मसाला लिहिलेले दोन बंडल आढळले. भुसावळ…
Author: editor desk
अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पातोंडा येथील रहिवासी असलेले योगेश पाटील (वय २९) या युवकाला बुधवारी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास अमळनेर ते चोपडा रोडवरील नगावफाट्याजवळ अज्ञात दोन युवकांनी नाकावर जोराचा बुक्का मारुन व चाकूचा धाक दाखवून २ हजार रुपये व मोबाईल लुटल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, योगेश पाटील हे पारोळा येथील एका खासगी शाळेत शिक्षक आहेत. ते रोज पातोंडा ते पारोळा दुचाकीने ये-जा करतात. नेहमीप्रमाणे ते पारोळा येथून घराकडे येत असताना अमळनेर ते चोपडा रोडवरील नगाव फाट्यापासून काही अंतरावर ७ वाजेच्या सुमारास दोन अज्ञात चोरटे पल्सर या दुचाकीने योगेश पाटील यांच्या गाडीसमोर उभे ठाकले. गाडी थांबताच त्यांनी योगेश यांच्या नाकावर जोराचा…
जळगाव : प्रतिनिधी दोन महिन्यांपूर्वी लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच विवाहीता मुंबई येथे संसाराचा सामान घेऊन रेल्वेतून प्रवास करीत होत्या. वाटेतच अचानक विवाहितेची तब्येत बिघडली आणि त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना अकोला ते जळगाव रेल्वे स्टेशनदरम्यान घडली. प्रियंका अक्षय सुरोशे (वय २०, रा. ज्ञानेश्वर नगर, अकोला) असे मयत विवाहीतेचे नाव आहे. या घटनेमुळे विवाहितेच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी भुसावळ रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अकोला येथील अक्षय सुरोशे हे मुंबईतील एका खाजगी कंपनीत नोकरीस आहे. त्यांचे प्रियंका यांच्यासोबत दोन महिन्यांपुर्वीच विवाह झाला होता. दोन महिने सासरी राहिल्यानंतर मुंबईत स्थायिक होण्यासाठी त्या सासूसोबत निघाल्या…
जळगाव : प्रातिनिधी मुंबई येथून रेल्वेने प्रवास करत असताना अचानक त्रास होवू लागल्याने कृष्णा देवधारी पासवान (वय ५२, रा. टिकर रा. झारखंड) या परप्रांतीय प्रौढाचा मृत्यू झाला. घटना गुरुवार दि. ३० जानेवारी रोजी सकाळी ६.१५ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा पासवान हे मुंबई येथून बिहार राज्यातील गया येथे जाण्यासाठी त्यांचा मुलासोबत गुरुवार दि. ३० जानेवारी रोजी सकाळी ६.१५ सुमारास हावडा एक्सप्रेस यामधून प्रवास करीत होते. अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. लागल्याने जागेवरच मृत्यू झाला. त्यांना जळगाव येथील रेल्वे स्थानक येथे उतरून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले असता…
चोपडा : प्रतिनिधी शहरातील एका भागात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीस तिच्या घरात घुसून कैचीचा धाक दाखवत विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध शहर पोलिसांत पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील एका भागातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस आरोपी भूषण मनोरे (वय ३०) याने दि. २९ रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास पीडित मुलीच्या घरात घुसून शैक्षणिक नुकसानीचा धाक दाखवत तिचा विनयभंग केला. मात्र मुलीने त्याला विरोध केला. मुलीची आई परत आल्यावर तिला घडलेली घटना सांगितली. मुलीच्या आईने दि. ३० रोजी चोपडा शहर पो.स्टे.ला सदर आरोपीविरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार संशयित आरोपी भूषण मनोरे याच्याविरुद्ध ३३४, ७४, ७५, ११५,…
भुसावळ : प्रतिनिधी परिसरात राखेच्या बंडाबाबत तक्रारी वाढत असून मारहाणीपर्यंत पोचल्या आहेत. शहरातील सुपर वायझरला मारहाण करण्यात आली. ही घटना २४ रोजी रात्री १० वाजता घडली. याबाबत गुरुवारी वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शब्बीर तडवी रा. भुसावळ हा विकी चाहेल व बाळू इंगळे यांच्या राखेच बंडावर काम करतो. २४ रोजी रात्री ड्युटीवर असताना करण बेलदार व नितीन बेलदार रा. विल्हाळे यांनी तुझ्या मालकाला बोलाव, अशी धमकी देत मानेवर लोखंडी रॉड मारला. शिविगाळ व मारहाण करीत जबर जखमी केले. शब्बीर तडवी यांच्यावर जळगावला उपचार करण्यात आले. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली जात नव्हती. चार-चार तास ठिय्या आंदोलन…
मेष राशी आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगली बातमी मिळेल. करिअर आणि बिझनेसमध्ये परिश्रमपूर्वक काम कराल. परिणाम आनंददायी राहील. सत्तेत असलेल्यांशी जवळीक साधण्याची संधी मिळेल. तुमच्या कार्यशैलीचे सर्वजण कौतुक करतील. नोकरीचा शोध पूर्ण होईल. लांबच्या प्रवासाला जाता येईल. अडथळे दूर होतील. वृषभ राशी करिअर, व्यवसायात सकारात्मकता राहील. राजकारणात प्रभाव वाढेल. प्रतिभा आणि व्यवस्थापनाचे कौतुक होईल. न्यायालयीन प्रकरणांमध्ये निर्णय तुमच्या बाजूने होईल. मेकअपमध्ये अधिक रस वाटेल. कर्ज घेण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. दूरच्या देशातून प्रियजन घरी येण्याची शक्यता आहे. तुम्हाला लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात मिथुन राशी व्यवहारात सावध राहा. न्यायालयीन खटल्यात दबाव येऊ शकतो. कौटुंबिक कलह, भांडणे एकत्र मिळून सोडवा. राजकारणात मोठी जबाबदारी…
जळगाव : प्रतिनिधी समाजाचा चौथा आधारस्तंभ असलेले पत्रकार नेहमीच जीवाची बाजी लावत, ऊन, वारा, पाऊस, थंडी सहन करीत दिवसरात्र धावपळ करीत असतात. गेल्या वर्षभराच्या कालावधीत दोन मोठ्या निवडणुका पार पडल्या. सणोत्सव आटोपल्यावर विविध धर्म, जात, शासकीय, निम शासकीय कार्यालयातर्फे क्रिकेटसह इतर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. सर्वच आपला विचार करतात मात्र पत्रकारांचा कुणीही विचार करत नाही. पत्रकारांच्या मनोरंजनासाठी आणि जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या पत्रकारांना एकत्र करण्याच्या उद्देशाने राज्यात प्रथमच जळगाव शहरात पत्रकार प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले आहे. पत्रकार प्रीमियर लीगबाबत माहिती देण्यासाठी गुरुवार दि.३० रोजी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी आयोजक वाल्मिक जोशी, किशोर पाटील, चेतन वाणी, वसीम…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात दि.२८ रोजी मध्यरात्री झालेल्या चेंगराचेगरीत ३० भाविक ठार तर ५० भाविक जखमी झाल्याची घटना ताजी असतांना आता दि.३० दुपारी पुन्हा एकदा भीषण आग लागली. छतनाग घाट नागेश्वर घाट सेक्टर २२ मधील घडलेल्या दुर्घटनेत अनेक तंबू जळून खाक झाले आहेत. अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आग विझवण्यात आली आणि या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असे वृत्त ‘ANI’ने दिले आहे. छतनाग घाट नागेश्वर घाट सेक्टर २२ जवळ आज दुपारी एका खासगी कंपनीने उभारलेल्या वैदिक टेंट सिटीमध्ये आग लागली आहे. तत्काळ अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीचे कारण अद्याप कळलेले नाही. यापूर्वी १९ जानेवारी…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील चमगाव येथील ४५ वर्षीय व्यक्तीने शेतातील कर्जबाजारीला कंटाळून सोमवारी २७ जानेवारी रोजी दुपारी शेतात विषारी औषध घेतले होते. त्यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले असता गुरुवारी ३० जानेवारी रोजी पहाटे ५ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यासंदर्भात धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राजेश्वर आनंदा सावंत वय-४५, रा.चमगाव ता. धरणगाव असे मयत झालेले शेतकऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील चमगाव येथे राजेश्वर सावंत हे आपल्या आई, पत्नी आणि दोन मुलांसह वास्तव्याला होते. शेती करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. गेल्या काही वर्षापासून त्यांनी शेती करण्यासाठी कर्ज काढले होते. पण…

