मुक्ताईनगर : प्रतिनिधी भाजपच्या नेत्याच्या कन्येसह तिच्या मैत्रिणींची संत मुक्ताबाई यात्रेत छेड काढल्या प्रकरणात सातपैकी तीन आरोपी अद्याप फरार आहेत. या आरोपींच्या शोधार्थ तीन पथके स्थापन केली आहेत. फरार आरोपींमध्ये माजी नगरसेवक पीयूष मोरे, चेतन भोई आणि सचिन पालवे यांचा समावेश आहे. तर अटकेतील आरोपी अनिकेत भोई, किरण माळी आणि अनुज पाटील यांची पोलिस कोठडी ५ रोजी संपणार आहे. एक अल्पवीन आरोपी बालसुधार गृहात रवाना करण्यात आला आहे. २८ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास कोथळी येथे संत मुक्ताबाई यात्रोत्सवात उच्चपदस्थ लोकप्रतिनिधी तथा भाजप नेत्याच्या कन्येची व तिच्या मैत्रिणीची छेड काढण्यात आली होती. याप्रकरणी पीडितांच्या तक्रारीवरून २ मार्च रोजी येथील…
Author: editor desk
मेष राशी श्रीगणेश म्हणतात की, आज संपत्तीशी संबंधित प्रलंबित कामे मार्गी लागतील. धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनामुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रबळ राहील. तुमच्या प्रत्येक योजना गुप्त ठेवा. अन्यथा कोणीतरी त्यांचा फायदा घेईल. आर्थिक व्यवहार करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. कोणत्याही बेकायदेशीर कामात रस घेऊ नका. वृषभ राशी श्रीगणेश सांगतात की, आज नातेसंबंध मजबूत करण्यासाठी तुम्हाला अहंकाराचा त्याग करावा लागेल. तरुणांच्या करिअरच्या चिंता दूर होतील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. प्रवास टाळणे हितकारक ठरेल. व्यवसायात यश मिळेल. मार्केटिंगशी संबंधित कामांना प्राधान्य द्या. मिथुन राशी आज मित्र आणि नातेवाईकांबरोबर झालेली भेट लाभदायक ठरेल. अनेक समस्या सहजपणे सोडवल्या जातील.मात्र तुमचा संशयी स्वभावामुळे नवे प्रश्न निर्माण होणार…
अकोला : वृत्तसंस्था बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व व्हिडिओ समोर आल्यानंतर संपूर्ण राज्य हादरले असून या आरोपींनी अत्यंत क्रूर व अमानुषपणे संतोष देशमुख यांची हत्या केली होती. संतोष देशमुख यांना मारहाण करताना व्हिडिओ देखील या नराधमांनी बनवले होते. या संपूर्ण घटनेवर संपूर्ण राज्यातून संतापाची लाट निर्माण झाली आहे. यावर प्रहार संघटनेचे नेते व माजी आमदार बच्चू कडू यांनी संतप्त प्रतिक्रिया देत थेट औरंगजेबाशी तुलना केली आहे. बच्चू कडू म्हणाले, मला असे वाटते की एकंदरीत एवढी निर्घृण हत्या झाली आणि एवढे सगळे होऊन राजकारणी लोकांनी त्यावर राजकारण केले आहे. खरे तर हा दोन जातीतला वाद नसून…
बीड : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे. बीडच्या केज येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात टायर जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. बीड जिल्ह्यात रात्रीपासूनच संताप व्यक्त केला जात आहे. तसेच आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, बीड जिल्हा बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. बीड शहरात व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त पद्धतीने दुकाने बंद ठेवून सहभाग नोंदवला. तर सामाजिक संघटनांनी रस्त्यावरती उतरून बंदसाठी आवाहन केले. तसेच परळी तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या सिरसाळा येथेही कडकडीत बंद पाळण्यात आला.…
चाळीसगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना आज दि.४ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास चाळीसगाव तालुक्यातील वाघळी गावाजवळ ट्रक आणि आयशरची समोरासमोर झालेल्या भीषण आयशर चालकाचा जागीच मृत्यू झाला तर इतर तीन जण गंभीर जखमी झाले आहे. यावेळी जेसीबीच्या माध्यमातून जखमींना अपघातग्रस्त वाहनातून काढण्यात आले. याप्रसंगी रस्त्यावरील दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली होती. समाधान मेघराज पाटील गाव सार्वे ह.मु.तांबोळा खुर्द असे मयत चालकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील वाघळी गावाजवळ ट्रक क्रमांक (एमएच १९ झेड ४७५८) आणि आयशर क्रमांक (एमएच १९ सीवाय ०७०४) यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाल्याची घटना मंगळवारी ४ मार्च रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे. या…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील बीड येथील संतोष देशमुख हत्येप्रकरणी वादात सापडलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला. सोमवारी मध्यरात्री झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. मुंडे यांचे पीए, ओएसडी यांनी ‘सागर’ बंगल्यावर मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सोपवला आहे. थोड्याच वेळात फडणवीस विधानभवनात राजीनाम्याची घोषणा करतील. विविध भ्रष्टाचार प्रकरणात आरोप झालेले धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी आपल्यावरील आरोपांबाबत स्पष्टीकरण दिले. धनंजय मुंडे हे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजीनामा देतील असा दावा त्यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी केला…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पिंपळकोठा ते पिंप्री महामार्गावर जळगाव येणाऱ्या डंपरने ओव्हरटेक करताना दोन दुचाकींना दिलेल्या धडकेत दोन्ही दुचाकीवरील चौघे जण जखमी झाले आहेत. तर या अपघातानंतर डंपर चालक डंपर काही अंतरावर सोडून पसार झाला आहे. धरणगाव तालुक्यातील पिंपळकोठा ते पिंप्री महामार्गावर जळगावकडून येणाऱ्या डंपरने ट्रकला ओव्हरटेक करताना फॅशन प्लस या दुचाकी (एमएच १९, बीए- ५२१६) ला धडक दिली. यात पिंप्री खुर्द येथील दुचाकीवरील भीमराव रमेश पाटील व त्यांचा मुलगा कुणाल भीमराव पाटील हे जखमी झाले आहेत. ते पिंपळकोठा गावात पाण्याचे जार भरण्यासाठी जात होते. याच वेळी त्यांच्या दुचाकीला डंपरने मागाहून धडक दिली. त्यानंतर ही दुचाकी समोरून येणाऱ्या प्लॅटिना या…
मुंबई ; वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. देवगिरी बंगल्यावर सोमवारी रात्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांची बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांना धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. त्यानुसार आज धनंजय मुंडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सादर करतील, अशी शक्यता आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सूत्रधार वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांना निकटचा सहकारी आहे. या प्रकरणात त्यांचे नाव आल्यापासून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची…
चाळीसगाव : प्रतिनिधी मालेगाव रोडवरील वृंदावननगरमध्ये बंद घराचे कडीकुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेल्या १ लाख रुपयांच्या रोकडसह सोन्याचे दागिने असा जवळपास अडीच लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, वृंदावन नगरमध्ये राहणारे तुषार ईश्वर पाटील हे दि. १ मार्च रोजी घराला कुलूप लावून व बाहेरील गेट बंद करून कुटुंबासह गावी शिरसगाव येथे गेले होते. ३ मार्च रोजी सकाळी १० वाजता ते कुटुंबासह चाळीसगाव येथील घरी आले तेव्हा घराच्या मुख्य दरवाजाला असलेला कडीकोयंडा तुटलेला दिसला. तर दरवाजा आतून बंद केलेला होता. त्यांनी घराच्या…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील चंदू अण्णानगर परिसरातील गिरणाई कॉलनी भागातील एका बांधकामाच्या ठिकाणी दुसऱ्या मजल्यावर पाणी मारत असताना तोल जाऊन एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री ९ वाजता घडली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद आहे. मनोहर ढेमा बारेला (वय ३०, रा.उंबऱ्या, ता. भगवानपूर, जि. खरगोन, मध्य प्रदेश) असे मृत झालेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे कि, मनोहर बारेला हे गेल्या दीड वर्षापासून शहरातील नरेंद्र साळुंखे यांच्या बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. परिसरातील एका ठिकाणी झोपडीत मनोहर बारेलासह पत्नी व मुले असा परिवार होता. रविवारी रात्री नियमितप्रमाणे बांधकामाच्या ठिकाणी जाऊन पाणी मारत असताना…

