एरंडोल : प्रतिनिधी येथील रीलस्टार हितेश पाटील याच्या खूनप्रकरणी त्याचे वडील माजी सैनिक विठ्ठल सखाराम पाटील (५०) यांना खूनात मदत केल्याच्या संशयावरून त्यांचे बंधू नामदेव सखाराम पाटील (५५), त्याचा मुलगा भालचंद्र नामदेव पाटील (२८) आणि जेसीबी चालक रवींद्र सुरेश पाटील (२४) यांना पोलिसांनी अटक केली आहे, त्यांना ३ मार्चपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, मारहाणीला कंटाळून माजी सैनिक विठ्ठल पाटील यांनी मुलगा हितेश याचा गळा आवळून खून केला होता. त्यानंतर भवरखेडा गावापासून दोन ते अडीच कि.मी. अंतरावरील पाझर तलाव परिसरात त्याचा मृतदेह पुरण्यात आला होता. यानंतर स्वतः विठ्ठल पाटील यांनीही घरात आत्महत्या केली होती. ‘हितेशच्या मृत्यूला…
Author: editor desk
मेष राशी दारू पिऊन वेगाने गाडी चालवू नका. अन्यथा अपघात होऊ शकतो. वाहन, जमीन आणि इमारतीशी संबंधित कामात आज शर्यत लागेल. पण काम पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. तुमचा संयम कमी होऊ देऊ नका. रागावर नियंत्रण ठेवा. विरोधी पक्ष्याला तुमची कमजोरी कळू देऊ नका. वृषभ राशी व्यवसायात आज उत्पन्न आणि खर्चाचा समतोल साधा. जितके उत्पन्न जास्त तितका खर्चही जास्त. पैशाच्या बाबतीत सावधगिरी बाळगा. शक्यतो कर्ज घेणे टाळा. वादात अडकू नका. नवीन मालमत्तेच्या खरेदी-विक्रीमध्ये व्यस्तता वाढू शकते. नीट विचार करूनच याबाबत अंतिम निर्णय घ्या. मिथुन राशी आज दिवसाची सुरुवात चांगल्या बातमीने होईल. नोकरीत उच्च अधिकाऱ्यांच्या निकटतेचा लाभ मिळेल. राजकीय क्षेत्रात तुमचे…
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील शेळगाव बॅरेज प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्याने यंदा प्रथमच आवर्तन सोडले जाणार आहे. सध्या 67% पाणीसाठा उपलब्ध असल्याने जळगाव, धरणगाव, यावल आणि चोपडा तालुक्यातील 25 गावांना मोठा दिलासा मिळणार आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता यशवंत भदाणे यांना तात्काळ उचित कार्यवाही करून पुढील दोन दिवसांत पाणी सोडण्याचे स्पष्ट निर्देश दिले. तसेच, शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्पातील पुलांचे काम, भूसंपादन आणि बुडीत क्षेत्रातील अनुषंगिक कामांना तृतीय सुप्रमा मिळण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत विषय मांडण्यासाठी सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही दिले. या बैठकीला आ. प्रा.…
रायगड : वृत्तसंस्था राज्यभर सध्या पुणे श्र्हातील स्वारगेट एसटी स्टॅडमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच रायगडमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. रायगडच्या पेणमध्ये भाजप महिला आघाडी पदाधिकारीच्या मुलाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी तरुणाविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रायगड जिल्हा भाजपा महिला सरचिटणीस आणि रायगड जिल्हा शांतता कमिटी सदस्या वंदना म्हात्रे यांचा मुलगा मनिष म्हात्रेला पोलिसांनी अटक केली आहे. मनिष म्हात्रेने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले असून त्याच्याविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाल करण्यात आला आहे. पेण पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या घटनेमुळे रायगडमध्ये खळबळ उडाली आहे. वंदना म्हात्रे यांचा मुलगा मनिष म्हात्रेने १५…
मुंबई : वृत्तसंस्था देशभरातील अनेक नेते, अभिनेते व उद्योजकांना नेहमीच धमकीचे फोन येत असतात मात्र आता मंत्रालयामधील मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ला करण्यात येईल असा धमकी देणारा मेसेज मुंबई वातूक पोलिसांना मिळाला आहे. व्हॉट्सॲपवर हा मेसेज मुंबई वाहतूक पोलिसांना पाठवण्यात आला होता. याप्रकरणी वरळी पोलिसानी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. मिळालेल्या माहितीनुसार एका पाकिस्तानी नंबरवरून ट्रॅफिक पोलिसांना व्हॉट्सॲपवर हा धमकीचा मेसेज आला होता. बुधवारी दुपारच्या सुमारास हा मेसेज आला होता, त्यानंतर पोलिस यंत्रणा या अलर्ट मोडवर आहेत. त्यांनी तपास सुरू केला आहे. मेसेज करणाऱ्या व्यक्तीने मालिक शहाबाज हुमायून राजा देव असे नाव सांगितले, अशी माहिती समोर आली. दरम्यान, दोन आठवड्यांपूर्वीच…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील पुणे शहरातील स्वारगेट प्रकरणावरून राज्याचे राजकारण तापले असतांना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वारगेट बलात्कार प्रकरणात पीडितेने ‘प्रतिकार’ न केल्याच्या मुद्यावर बोट ठेवणाऱ्या गृह राज्यमंत्री योगेश कदम यांना संवेदनशीलतेने बोलण्याचा सल्ला दिला आहे. अशा प्रकरणांत बोलताना संवेदनशीलता बाळगली पाहिजे. कारण, बोलताना चूक झाली तर त्याचा थेट समाजमनावर परिणाम होतो. त्यामुळे मंत्री असो की लोकप्रतिनिधी सर्वांनी संवेदनशीलतेने बोलावे असा माझा सल्ला आहे, असे ते म्हणालेत. गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी गुरुवारी स्वारगेट बलात्कार प्रकरण ‘फोर्सफुली’ घडले नसल्याचा दावा केला होता. स्वारगेट एसटी स्टँडवर घडलेली घटना स्ट्रगल किंवा फोर्सफुली घडलेली कृती नाही. ही घटना घडली तेव्हा शिवशाही बसच्या…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात महिला व तरुणींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. प्रेम प्रकरणातून हल्ले, बलात्कार, लैंगिक अत्याचार असे अनेक गुन्हे घडताना दिसत आहेत. अशीच एक घटना मुंबई येथील विरारमध्ये घडली आहे. प्रियकराने प्रेयसीवर धारदार शस्त्राने अनेक वार करत तिला गंभीर जखमी केले आहे. विशेष म्हणजे या दोघांचे लग्न देखील ठरले आहे. सविस्तर वृत्त असे कि, अक्षय जनार्दन पाटील असे या आरोपीचे नाव असून तो विररार पूर्वच्या गास कोपरी या गावात राहतो. त्याच गावात राहणाऱ्या 23 वर्षीय भाविका भालचंद्र गावड हिच्यासोबत मागील 11 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. अक्षय आणि भाविका यांचे डिसेंबरमध्ये लग्न देखील ठरले आहे.…
पुणे : वृत्तसंस्था स्वारगेट येथील तरुणीवर अत्याचार करणारा दत्तात्रय गाडे गेल्या दोन दिवसापासून शिरूर तालुक्यातील गुनाट गावातील उसात लपून बसला होता. पोलिसांनी गुनाट गावात जवळपास 50 तास ऑपरेशन राबवले. मात्र तो सापडला नव्हता. अखेर भूक लागल्याने रात्री बाराच्या सुमारास तो गावातील एका नातेवाईकांच्या घरी गेला. तिथे त्याने मला प्रचंड भूक लागली असून काहीतरी खायला द्या, अशी मागणी केली. त्यानंतर नातेवाइकांनी त्याला खायला आणि पाण्याची बाटली दिली. त्याचवेळी दत्तात्रय गाडेने आपल्याला पश्चात्ताप झाला आहे, असे नातेवाईकांना सांगितले. तसेच जे काही केले ते चुकीचे आहे. मला पोलिसांना सरेंडर व्हायचंय, असे देखील तो म्हणाला. त्यानंतर पाण्याची बाटली घेऊन तो निघून गेला. त्याचवेळी नातेवाइकांनी…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील गेंदालाल मिल भागातील एक हायस्कूलमधील एका शिक्षिकेचा विनयभंग केल्याच धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बुधवारी रात्री उशिरा शाळेचे मुख्याध्यापक आसीफ पठाण व चेअरमन मुश्ताक अहमद इक्बाल या दोघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, गेंदालाल मिल भागात असलेल्या हायस्कूलमधील एका शिक्षिकेचा २८ जानेवारी व ८ फेब्रुवारी रोजी मुख्याध्यापक आसीफ पठाण व चेअरमन मुश्ताक अहमद इक्बाल यांनी शाळेतील आवारात व शौचालय परिसरात विनयभंग केल्याची तक्रार शिक्षिकेने केली आहे. यासह शिक्षिका शाळेत शिकवत असताना, त्यांचा डावा हात पकडून दमदाटीदेखील केली. यासह शिवीगाळदेखील केली. दरम्यान, याप्रकरणी बुधवारी शिक्षिकेने शहर पोलिस ठाण्यात जाऊन…
जळगाव : प्रतिनिधी एसटी वर्कशॉपजवळ राहणाऱ्या एका सोनार कारागिराचे बंद घर फोडून घरातून २ लाख रुपये किमतीचे सोने व चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता उघडकीस आली. या प्रकरणी बुधवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, सुरेश हिरामण सोलंकी (वय ४१, रा एसटी वर्कशॉप) यांचे घर बंद असताना २५ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे लोखंडी गेटचे कुलूप तोडून लोखंडी कपाटातून सोन्याचे व चांदीचे दागिने आणि ४० हजार रुपयांची रोकड असा एकूण २ लाख रूपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. या प्रकरणी सुरेश…

