Author: editor desk

पुणे : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा कहर सुरु असतांना आता राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार वारे आणि मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा धोका कायम आहे. पालघर, ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये आज (हलका ते मध्यम स्वरूपाचा) वादळी पाऊस होईल असा अंदाज वर्तवला आहे. मात्र, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आजही जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मागच्या 48 तासात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचं धुमशान सुरू आहे. पुढचे दोन दिवस पाऊस सुरूच राहील असा अंदाज वर्तवला आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. शेतरस्त्याची किमान रुंदी ३ मीटर असावी असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. शेतरस्त्याची नोंद आता ७/१२ च्या ‘इतर हक्कां’मध्येच होणार आहे. प्रत्येक शेतरस्ताप्रकरणाचा निर्णय ९० दिवसांत देणं बंधनकारक आहे. राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारनं शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागानं शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आदेश जारी केला असून, त्यानुसार शेतरस्त्यांची किमान रुंदी आता ३ मीटर अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच, या रस्त्यांची नोंदणी ७/१२ उताऱ्यावर ‘इतर हक्क’ म्हणून करावी लागणार असून, संबंधित प्रकरणांचा निर्णय ९० दिवसांच्या आत देणे बंधनकारक ठरणार आहे.…

Read More

मुक्ताईनगर : प्रतिनिधी पिकअप वाहन आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले. ही घटना मुक्ताईनगर-खामखेडा रस्त्यावर गुरुवारी रात्री घडली. यात वाहन चालकास अटक करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, या अपघातात पुंडलिक रामकृष्ण कोळी (५४) आणि भागवत महारू कोळी (६२) या दोघांचा मृत्यू झाला. भागवत कोळी हे शिंदे सेनेचे तालुका उपप्रमुख होते. मुक्ताईनगर पोलिसात लखन वसंत मोरे राहणार लोहारखेडा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलेले आहे की, गुरुवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मुक्ताईनगर खामखेडा रस्त्यावरील स्मशानभूमीजवळ पिकअप व्हॅनने दुचाकीला धडक दिली. यात वरील दोन जण ठार झाले. पिकअप वाहन चालक धर्मेंद्र नंदकिशोर साहू (रा.इंदूर) यास अटक करण्यात आली आहे.…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी सोशल मीडियावर कमी किमतीत इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रीच्या बहाण्याने हरयाणातील डॉक्टरची १७ लाख रुपयांत फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी निखिल सुनीलकुमार मनवानी (२५, रा. सिंधी कॉलनी, भुसावळ) याला फरिदाबाद पोलिसांनी अटक केली आहे. सविस्तर वृत्त असे कि, फरिदाबाद (हरयाणा) येथील डॉ. श्रीमंत गुईन हे सोशल मीडियावर इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीसाठी शोध घेत होते. त्यात त्यांचा भुसावळ येथील एका विक्रेत्याशी संपर्क साधला. मनीष शर्मा नावाच्या व्यक्तीने त्यांच्याशी संवाद साधला. डॉ. गुईन यांना वस्तू देण्याच्या नावाखाली चार वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगण्यात आले. या खात्यांमध्ये त्यांनी १७ लाख १० हजार १८० रुपये जमा केले. मात्र, त्यानंतर कोणतीही वस्तू न देता टाळाटाळ…

Read More

रावेर : प्रतिनिधी गेल्या १० वर्षापूर्वी मुलाचा संसार उघड्यावर पडला. पहिल्या व दुसऱ्या नातवाची प्राणज्योत त्यांच्या बालपणीचं विझली. तिसरा नातू गोविंदा हा तरी वृद्धापकाळात आपली काठी ठरेल, ही आशा उराशी बाळगून असलेल्या आजोबांच्या आशेवरही क्रूर नियतीने पाणी फेरले. तिसरा नातू गोविंदाचा मूत्रपिंडाच्या आजाराने मृत्यू झाला आणि वृद्ध आजोबांचा आधारच हिरावला. क्रूर नियतीच्या या क्रूर खेळाने वाघोडकर निःशब्द झाले आहेत. सविस्तर वृत्त असे कि, रावेर तालुक्यातील वाघोड गावातील श्यामराव पाटील यांना चार मुले व मुलगी असा परिवार होता. सन १९८२ मध्ये पत्नीच्या अकाली मृत्यूनंतर एका मुलाचाही मृत्यू झाला. दरम्यान, त्यांचा मुलगा वामन पाटील याला भुवनेश्वर व हर्षल ही दोन मुले झाली.…

Read More

मेष राशी आज अचानक एखादा लांबचा प्रवास किंवा परदेश प्रवास घडू शकतो. न्यायालयीन प्रकरणांमध्ये वाद वाढू शकतात. धार्मिक कार्यांवरील श्रद्धा कमी होईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्यांच्या व्यवसायात चढ-उतारांचा सामना करावा लागेल. नोकरी करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस खडतर जाऊ शकतो. वृषभ राशी आज तुम्हाला नोकरीत बढती तर होईलच पण महत्त्वाची जबाबदारी मिळेल. व्यवसायात नवीन सहकारी फायदेशीर ठरतील. राजकारणात पद आणि प्रतिष्ठा वाढेल. तुम्हाला व्यवसायाच्या कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. तुम्हाला सरकारी सत्तेचा लाभ मिळेल. बेरोजगारांना रोजगार मिळेल. मिथुन राशी आज तुमच्या प्रिय व्यक्तीकडून चांगली बातमी मिळेल. कुटुंबात प्रेम आणि जवळीक वाढेल. आध्यात्मिक कार्यात रस वाढेल. तब्येतीची चांगली काळजी घ्या. कर्क राशी…

Read More

जळगाव दि. २३ (जिमाका वृत्तसेवा) : सामान्य जनतेच्या अडचणी तत्काळ मार्गी लागाव्यात, यासाठी शासनातर्फे आयोजित करण्यात येणारी ‘छत्रपती शिवाजी महाराज स्व-समाधान शिबिरे’ ही एक सकारात्मक आणि लोकाभिमुख पावले असून, प्रशासन अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम व्हावे, हा या उपक्रमामागील खरा उद्देश आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. पाळधी (ता. धरणगाव) येथील शासकीय विश्रामगृहात महसूल विभागाच्या वतीने आयोजित शिबिरात विविध शासकीय योजनांचा थेट लाभ लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला. शिबिरात शेतकरी, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, गरजू नागरिक अशा सर्व स्तरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. शिबिरातील महत्त्वाचे उपक्रम व लाभ : शिबिरात एकूण ८८५ शासकीय दाखले…

Read More

जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्यात खरीप हंगाम हे शेती क्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असून, राज्यातील शेतकरी हा हंगाम यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील असतो. खरीप हंगामात बियाणे, खते व किटकनाशके या निविष्ठांचा वेळेत, गुणवत्तापूर्ण व मुबलक प्रमाणात पुरवठा होणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या खरीप हंगाम 2025 च्या आढावा बैठकीमध्ये, निविष्ठांच्या गुणवत्तापूर्ण उपलब्धतेसंदर्भात शेतकरी, वितरक व विक्रेत्यांना येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्याच्या दृष्टीने निर्देश देण्यात आले. त्यानुसार, कृषि आयुक्तालय स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी खालील सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. WhatsApp क्रमांक: 9822446655, टोल फ्री क्रमांक: 18002334000 , ई-मेल: controlroom.qc.maharashtra@gmail.com निविष्ठांच्या गुणवत्ता, किंमत, साठेबाजी,…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात गुरुवारी सकाळी सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. छत्रू परिसरातील सिंहपोरा भागात दहशतवाद्यांच्या हालचालींबाबत मिळालेल्या माहितीवरून लष्कर आणि पोलिसांनी संयुक्त शोधमोहीम राबवली. यावेळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. मात्र, देशासाठी लढताना महाराष्ट्रातील सुपुत्राला वीरमरण आले. संदीप गायकवाड असे शहीद जवानाचे नाव आहे. शहीद जवान संदीप गायकर हे महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातल्या करंडी गावचे रहिवासी होते. अवघ्या नऊ महिन्यांपूर्वी त्यांनी मराठा रेजिमेंटच्या आरआर बटालियनमध्ये लष्करी सेवेत प्रवेश केला होता. गुरुवारी दहशतवाद्यांशी लढताना ते शहीद झाले. गायकर यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी अहिल्यानगरातील अकोले येथील ब्राम्हणवाडा येथे उद्या आणण्यात येणार…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही वर्षापासून अनेक वादग्रस्त विधान करण्यात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे हे नेहमीच चर्चेत येत असतांना आता शुक्रवारी आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे. रायगडावर 6 जून रोजी साजरा होणारा शिवराज्याभिषेकाचा सोहळा नामशेष झाला पाहिजे. देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्षे लोटली, पण त्यानंतरही आपण आपले मानसिक अधिष्ठान ब्रिटिशांच्या स्वाधीन ठेवले आहे, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याचेही जोरदार समर्थन केले. छत्रपी शिवाजी महाराज यांचा 6 जून 1674 रोजी राज्याभिषेक झाला होता. त्यानुसार दरवर्षी 6 जून रोजी किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. पण आता संभाजी भिडे यांनी या सोहळ्यास कडाडून विरोध…

Read More