Author: editor desk

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यानंतर, भारत सरकारने आता दहशतवाद्यांना मुळापासून उखडून टाकण्याचा निर्धार केला आहे.  दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना आणि त्यांच्या सूत्रधारांना उद्धवस्त केले जाईल. यासाठी लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे. दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला करण्यासाठी वेळप्रसंगी सीमा ओलांडण्यास लष्कर मागेपुढे पाहणार नाही.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत याला मान्यता देण्यात आली. ही बैठक पंतप्रधानांच्या दिल्लीतील ७ लोककल्याण मार्गावरील निवासस्थानी जवळपास अडीच तास झाली. गुरुवारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहार दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते दहशतवादाविरोधात मोठा संदेश देतील, अशी शक्यता आहे. सदर बैठकीअगोदर, बुधवारी दिवसभर राजधानी…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी चारचाकी वाहनाने दुचाकीला समोरून धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. मागे बसलेला इसम जखमी झाल्याची घटना धुळे-चाळीसगाव रस्त्यावरील दहिवद फाट्याजवळील वळणावर घडली. याप्रकरणी मेहुणबारे पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, संभाजी शिवाजी पाटील (४७, सोयगाव, मालेगाव) व राजेंद्र शालीदर जाधव (३९, राममंदिर, ग्रा. पं. मालेगाव) हे शनिवारी रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास दुचाकी (एमएच ४१/बीक्यू २८१७) वरून जात असताना धुळेकडून चाळीसगावकडे येणाऱ्या चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिली. त्यात राजेंद्र शालिंदर जाधव यांचा मृत्यू झाला तर संभाजी शिवाजी पाटील हे जखमी झाले. हा अपघात धुळे-चाळीसगाव रस्त्यावरील दहिवद फाट्याजवळ वळणावर झाला. अपघात होताच चारचाकी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी रात्रीच्या वेळी पथदिव्याखाली सुरू असलेल्या ‘तीन पत्ती’ जुगारावर शहर पोलिसांनी कारवाई करीत ११ जणांना ताब्यात घेतले. या ठिकाणाहून १३ हजार ८८० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. ही कारवाई २१ एप्रिल रोजी रात्री लाकूडपेठेत करण्यात आली. एका घराच्या बाजूला पथदिव्यांच्या उजेडात तीन पत्ती हा जुगार सुरू असल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. त्यांनी सपोनि शीतलकुमार नाईक, रामचंद्र शिखरे, पोउनि महेश घायतड, सहायक फौजदार सुनील पाटील, पोहेकॉ किशोर निकुंभ, पोकॉ उद्धव सोनवणे यांना कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने लाकूडपेठेत जाऊन जुगार अड्ड्यावर कारवाई केली. तेथून ११ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एकूण १३ हजार…

Read More

जळगाव : प्रतिनिधी महामार्गाला लागूनच असलेल्या ईच्छा देवी चौकातील अशोका लिकर गॅलरी या मद्यविक्रीच्या दुकानातून चोरट्यांनी रोख ७० हजार रुपयांसह १० लाख रुपयांचे दारूचे बॉक्स चोरून नेले. ही घटना बुधवारी (२३ एप्रिल) सकाळी उघडकीस आली. दुकानानजीक असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची चोरट्यांनी तोडफोड करीत डीव्हीआरही चोरून नेला. सविस्तर वृत्त असे कि, भुसावळ येथील अशोक नागराणी यांचे जळगावात शहरातील ईच्छादेवी चौकात महामार्गालगत अशोका लिकर गॅलरी नावाने मद्य विक्रीचे दुकान आहे. मंगळवारी मध्यरात्री दुकान बंद असताना, चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकवून आत प्रवेश केला. त्यांनी गल्ल्यातून ७० हजार रुपये रोख, १० लाख रुपये किमतीचे दारूचे १२६ बॉक्स चोरून नेले. चोरी करण्यापूर्वी दुकानाच्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी प्लंबर परवाना नूतनीकरणासाठी सहाशे रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या भुसावळ नगरपालिकेच्या पाणीपुरवठा अभियंत्यासह दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. बुधवारी सायंकाळी नगरपालिकेच्या कार्यालय परिसरात ही कारवाई केली. पाणीपुरवठा अभियंता सतीश सुरेश देशमुख, लिपिक शांताराम उखई सुरवाडे (वय ५७) व शाम समाधान साबळे (२८) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. सविस्तर वृत्त असे कि, तक्रारदार हे ४६ वर्षीय प्लंबर आहेत. त्यांचे प्रत्येक वर्षाला परवाना नूतनीकरण करावे लागते. त्यासाठी पाणीपुरवठा विभागात गेल्यानंतर शाम साबळे यांनी बुधवारी सातशे रुपयांची लाच मागितली व साबळे यांनी पाणीपुरवठा अभियंता देशमुख यांना फोन केल्यानंतर त्यांनी सहाशे रुपये लागतील, असे सांगितले. एसीबीकडे तक्रार केली. सुरुवातीला लिपिक…

Read More

मेष राशी आज तुमचे नशीब तुमच्यासोबत असेल. कोणत्याही महत्त्वाच्या कामातील अडथळा सरकारच्या मदतीने दूर होईल. व्यवसायात तुम्हाला तुमच्या वडिलांकडून सहकार्य आणि साथ मिळेल. तुम्हाला एखाद्या सरकारी योजनेची जबाबदारी मिळू शकते. समाजात तुमचा मान आणि प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. वृषभ राशी आज तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. पैशाशी संबंधित कोणत्याही कामातील अडथळा दूर होईल. व्यवसायात उत्पन्न वाढेल. नवीन प्रेमसंबंधांमध्ये पैसे आणि दागिने मिळण्याची शक्यता आहे. वाहन खरेदीची योजना यशस्वी होईल. मिथुन राशी आज तुम्हाला आध्यात्मिक कार्यात रस असेल. तुम्हाला जुन्या मित्रासोबत सत्संगाचा आनंद मिळेल. कामाच्या ठिकाणी कनिष्ठ व्यक्तीशी खोल जवळीक निर्माण होईल. आई-वडिलांसह तीर्थ यात्रेला जायचा योग आहे. कर्क राशी…

Read More

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था देशातील जम्मू काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे, पोलिसांच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पहलगाम येथे पर्यटकांना त्यांचं नाव विचारून त्यांच्यावर गोळीबार केला. या दुर्दैवी घटनेत आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट आहे.  यावर प्रतिक्रिया देताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आता पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. दहशतवादी हल्ल्याला सडेतोड उत्तर दिलं जाईल, भारत अशा हल्ल्याला घाबरणार नाही. दहशतवाद्यांना असं उत्तर मिळेल की संपूर्ण जग बघेल, दहशतवादाला रोखण्यासाठी भारताची झिरो टॅलरन्स पॉलिसी आहे, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे, याचबरोबर पडद्यामागे कारस्थान रचनाऱ्यांनाही शिक्षा मिळणार, असा थेट…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यात 26 पर्यटक ठार झाले. नागपूरच्या एका प्रत्यक्षदर्शी दाम्पत्याने या घटनेचा थरार सांगितला आहे. त्यांच्या मते, ते हल्ला झाला त्या ठिकाणापासून केवळ 20 मिनिटांच्या अंतरावर होते. हल्लेखोरांनी बराच वेळ गोळीबार केला. त्यानंतर आम्ही जिवाच्या आकांताने माघारी फिरलो. नंतर आम्ही मागे वळूनही पाहिले नाही. दरम्यान, या हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 जण मृत्यूमुखी पडलेत. यात डोंबिवलीतील 3, पुण्यातील 2 व पनवेल येथील एकाचा समावेश आहे. नागपूरच्या दाम्पत्याने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, आम्ही घटनास्थळावरून अवघ्या 20 मिनिटांच्या अंतरावर होतो. गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर सर्वजण जिवाच्या आकांताने सैरावैरा धावत सुटले. पहिल्यांदा तर काय झाले हे कुणालाच समजलेच नाही.…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला. पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये मंगळवारी दुपारी २.४५ वाजता झालेल्या या हल्ल्यात २० हून अधिक लोक जखमी झाले. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहलगाम हल्ल्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. हा अतिशय चीड आणणारा हल्ला आहे. त्यात निष्पाप नागरिकांची त्यांचा धर्म विचारून हत्या करण्यात आली. हा देशात व समाजात उभी फूट पाडण्याचा प्रयत्न असून, हल्लेखोरांवर अतिशय कडक व टोकाची कारवाई होईल याविषयी माझ्या मनात कोणतीही शंका नाही, असे ते म्हणालेत. महाराष्ट्रातीय सर्व पर्यटक सुरक्षित असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. देवेंद्र फडणवीस येथे पत्रकारांशी संवाद…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील काश्मीर खोर्‍यातील पहलगाम येथील बैसरन येथे लष्करी गणवेशात आलेल्या दोन दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. यात 30 पर्यटकांचा मृत्यू झाला असून 15 हून अधिक जखमी आहेत. मृतांत दोन परदेशी पर्यटकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे दहशतवाद्यांनी पर्यटकांना धर्म विचारून अंदाधुंद गोळीबार करत स्वर्गभूमीवर रक्ताचा सडा सांडला. दरम्यान, सौदी अरेबिया दौर्‍यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतले. तत्पूर्वी त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांना संपर्क करून परिस्थितीची माहिती घेतली. गृहमंत्री शहा हेही तातडीने काश्मीरला रवाना झाले असून आपत्कालीन बैठक बोलावण्यात आली आहे. या हल्ल्यावर देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दलाच्या जवानांनी…

Read More