• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दादांचे मोठे वक्तव्य : तेव्हा शेतकऱ्यांनी आम्हाला चुना लावला…

editor desk by editor desk
April 22, 2025
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
दादांचे मोठे वक्तव्य : तेव्हा शेतकऱ्यांनी आम्हाला चुना लावला…

पुणे: वृत्तसंस्था

राज्यातील महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते मात्र सरकार स्थापन झाल्यावर त्यांनी याला नकार दिल्याने शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठे वक्तव्य केले आहे.

एक रुपयात पीकविमा दिला जात होता. मात्र, अनेक शेतकर्‍यांनी या योजनेत चुना लावल्याने ही योजना अडचणीत आली आहे. आम्ही ते सगळं काढलं आहे. आता तुमच्या भल्याचं करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. त्यामुळे आता याबाबत नव्याने विचार केला जात असून, मुख्यमंत्री तसेच कृषिमंत्री यांची एकत्रित बैठक झाली आहे. तीत शेतकर्‍यांना चांगला कार्यक्रम देणार आहोत, अशी माहिती पवारांनी या वेळी दिली.

जिल्हा प्रशासन तसेच कृषी विभागाच्या वतीने ‘दिशा कृषी उन्नतीची’ या जिल्ह्यातील शेतीच्या पाच वर्षांच्या आराखड्याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पवार म्हणाले, ‘जिल्ह्याचा पाच वर्षांचा आराखडा आखण्यात येत आहे. यासाठी निधीची उपलब्धतादेखील करून दिली जाईल. मात्र, हा निधी त्याच कामासाठी वापरावा ही किमान अपेक्षा आहे.

मी माझं जीवन संपवतोय, मुलाबाळांना सोडून आत्महत्या करतोय, ही भावना शेतकऱ्यांच्या मनात येता कामा नये, यापद्धतीने पुढे जायचं आहे. त्याचे देखील नियोजन आम्ही केले आहे आणि कामाला लागलो आहे. मी आज अर्थमंत्री म्हणून सात लाख वीस कोटींचा अर्थसंकल्प सादर केलाय. चांद्यापासून बांद्यापर्यंत माझ्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही, त्याच्या पाठीशी उभे राहू. तुम्ही तुमचा आत्मविश्वास ढळू देऊ नका, असंही आवाहन अजित पवारांनी केलं.

 

Previous Post

भरधाव ट्रकची चारचाकीला जबर धडक : तीन जागीच ठार तर १४ गंभीर !

Next Post

खळबळजनक : औरंगाबाद खंडपीठ बॉम्बने उडवण्याची धमकी !

Next Post
खळबळजनक : औरंगाबाद खंडपीठ बॉम्बने उडवण्याची धमकी !

खळबळजनक : औरंगाबाद खंडपीठ बॉम्बने उडवण्याची धमकी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुचाकी व पिकअपचा अपघात : दोन जण ठार !
क्राईम

दुचाकी व पिकअपचा अपघात : दोन जण ठार !

May 24, 2025
भुसावळच्या तरुणाने हरयाणातील डॉक्टराला १७ लाखात फसवले !
क्राईम

भुसावळच्या तरुणाने हरयाणातील डॉक्टराला १७ लाखात फसवले !

May 24, 2025
वृद्ध आजोबांचा आधारच हिरावला : नातवाचा आजाराने मृत्यू !
क्राईम

वृद्ध आजोबांचा आधारच हिरावला : नातवाचा आजाराने मृत्यू !

May 24, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

आज तुमच्या प्रिय व्यक्तीकडून चांगली बातमी मिळणार !

May 24, 2025
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते योजनांचा थेट लाभवाटप
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते योजनांचा थेट लाभवाटप

May 23, 2025
खरीप हंगाम 2025 अनुषंगाने नियंत्रण कक्ष कार्यान्वित – शेतकऱ्यांसाठी संपर्क सुविधा उपलब्ध
कृषी

खरीप हंगाम 2025 अनुषंगाने नियंत्रण कक्ष कार्यान्वित – शेतकऱ्यांसाठी संपर्क सुविधा उपलब्ध

May 23, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group