जळगाव : प्रतिनिधी पती कामावर, पत्नी आणि मुलगी लग्नाला गेलेले असताना चोरट्यांनी दरवाजाची कडी तोडून घरातून एक लाख ५२ हजार रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना १९ एप्रिल रोजी अयोध्यानगरात घडली. भरदिवसा झालेल्या घरफोडीने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अयोध्यानगर परिसरात एका अपार्टमेंटमध्ये राहणारे अभियंता विलास तुकाराम चौधरी हे शनिवारी सकाळी कामावर गेले. तसेच त्यांच्या पत्नी व मुलगी इंदूर येथे लग्नाला गेले. त्यानंतर दुपारी १२:३० ते १:३० या वेळेत चोरट्यांनी – चौधरी यांच्या घराच्या दरवाजाची कडी व – कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरात एका कपाटामध्ये असलेल्या प्रत्येकी ३२ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन – चेन,…
Author: editor desk
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील मुसळी फाट्याजवळील उड्डाणपुलाखालील बोगद्यात पाळधी येथून पिंप्री खुर्द येथे मका विक्रीसाठी घेऊन जाणारे ट्रॅक्टर समोरून अचानक वाहन आल्याने उलटले. ही घटना शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा रस्त्यावरील उड्डाणपुलाजवळ मुसळी फाटा येथे पुलाखालून जात असलेले मक्याचे ट्रॅक्टर वळत असताना समोरून धरणगावकडून अचानक वाहन आल्याने उलटले. याठिकाणी गतिरोधक नसल्याने वाहने सुसाट धावतात. त्यामुळे रोज किरकोळ अपघात होत आहेत. एखाद्या वेळेस मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. वराडकडे जाताना व जळगावकडून येताना वाहने भरधाव वेगाने धावतात. पुलाखालील रस्त्यावर गतिरोधक नसल्यामुळे रोज छोटे-मोठे अपघात होत आहेत.…
भुसावळ : प्रतिनिधी भुसावळ रेल्वे विभागाने राबवलेल्या तिकीट तपासणी मोहिमेत अजब प्रकार समोर आला आहे. विनातिकीट प्रवाशांकडून पैसे वसूल करणाऱ्या बनावट सात लिनेन बॉय (चादर, गाद्या पुरवणारे कर्मचारी) यांना पकडण्यात आले. रविवारी कामाख्या एक्सप्रेसमध्ये मनमाड ते भुसावळ या दरम्यान हा प्रकार उघडकीस आला. या तिकीट तपासणी मोहिमेत १३२ प्रवाशांकडून पावणेचार लाख रुपये वसूल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, शफीकुल, तयजुल इस्लाम, फारुकुद्दीन, सईदुल इस्लाम, रफिकुल इस्लाम, सद्दाम हुसैन आणि हबीब अली अशी अटक करण्यात आलेल्या बनावट लिनेन बॉयची नावे आहेत. वाणिज्य विभाग व रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) यांच्या पथकाने ट्रेन क्र. १२५१९ लोकमान्य टिळक टर्मिनस-कामाख्या (एलटीटी-कामाख्या) एसी एक्स्प्रेसमध्ये मनमाड ते भुसावळ…
मेष राशी मेष राशीच्या व्यक्तींना आज विनाकारण धावपळ करावी लागेल. ज्यामुळे मन उदास राहील. बोलण्यात आणि वागण्यात संयम ठेवा, अन्यथा त्रास होऊ शकतो. मालमत्तेसंबंधी न्यायालयीन प्रकरणाचा निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे. वृषभ राशी वृषभ राशीच्या व्यक्तींना आज आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. व्यवसायात नवीन संधी येतील. पण भागीदारीने व्यवसाय करणे टाळा. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांनी सावध राहावे. तुमचे मन सतत चिंतेत राहील मिथुन राशी मिथुन राशीसाठी आजचा दिवस अत्यंत शुभ आहे. कारण तुम्ही नवीन वाहन खरेदी कराल. यामुळे तुमची अनेक दिवसांपासूनची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबासोबत धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. नवीन कामात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. कर्क राशी…
नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींसाठी मोठी योजना सुरु केली होती आता पुन्हा एकदा लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महिला व बाल विकास विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या महत्वाकांक्षी “पिंक ई-रिक्षा” योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील पात्र महिलांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी (दि. २०) १० हजार पिंक ई-रिक्षा वितरीत करण्यात आल्या. महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत महिलांना सवलतीच्या दरात पिंक रिक्षा उपलब्ध करून देण्याच्या सरकारच्या योजनेची नागपूरात सुरुवात झाली आहे. नागपूर शिवाय पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर, अमरावती या आठ जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने पिंक रिक्षा…
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील छत्रपती संभाजीनगर शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. बायजीपुरा परिसरात दुहेरी हत्याची घटना घडली आहे. यात सलमान खान आरेफ खान (30) आणि त्याचा साला सुलतान शेख (17) असे हत्या झालेल्यांची नावे आहेत. दुचाकीच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दोघांच्या डोक्यावर तसेच चेहऱ्यावर दगडाने ठेचून ही हत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 12.30 च्या सुमारास शेख आसिफ शेख हाफिज (रा. सिल्लोड) याचा फोन आला होता. यावेळी बोलताना त्याने सुलतानने त्याची गाडी परत केली नसल्याचा राग व्यक्त केला होता. पोलिस सारखे त्याच्या घरी येत असल्याने तो सुलतानला सोडणार नसल्याची धमकी दिली. या…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील देना नगर परिसरात १६ एप्रिल रोजी लहान मुलांमधील शाब्दिक वादाचे रूपांतर प्रौढांमधील – तुफान हाणामारीत झाले. या प्रकरणी दोन्ही गटांकडून बाजारपेठ पोलिसांत परस्पर तक्रारी दाखल झाल्या आहेत. दोन्ही बाजूंच्या मिळून १४ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सविस्तर वृत्त असे कि, मुन्नाबाई हंसराज पासी (वय ५८, रा. विश्वेश्वर मंदिराजवळ, भुसावळ) यांनी तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार, नलिनीबाई सुरवाडे, किरण सुरवाडे, ललित नेमाडे, अनिल सोनवणे, छाया सोनवणे, शीतल सुरवाडे आणि चार अनोळखी व्यक्तींनी मिळून त्यांच्या सुनेला व मुलाला शिवीगाळ केली आणि मारहाण केली. यामध्ये त्यांच्या सुनेच्या दागिन्यांचे नुकसान झाले. या आधी पहिल्या गटातर्फे अन्य आठ जणांविरोधात गुन्हा दाखल…
चाळीसगाव : प्रतिनिधी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रांजणगाव फाट्याजवळ रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांवर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. यामुळे वाहनचालकांसह प्रवाशांमध्येही भीतीचे वातावरण पसरले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे लुटीचा प्रकार यशस्वी होऊ शकला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामीण पोलिसांना गस्तीदरम्यान, रांजगणाव येथील २३ वर्षीय तरूण हाती लागला. त्याच्याजवळ धारदार चाकू मिळून आला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे. मात्र तक्रार न आल्याने गुन्हा दाखल झाला नाही, अशी माहिती पोलिस निरीक्षक राहुल पवार यांनी दिली. शुक्रवारी रात्री एक क्रुझरचालक चाळीसगावकडून छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रांजणगाव फाट्याजवळ दोन तरुण दगडफेकीत वाहनाच्या अपघात झाल्याचा बनाव करून रस्त्यावर दुचाकी आडवी लावून ते…
भडगाव : प्रतिनिधी वृंदावन, मथुरा यात्रेसाठी निघालेल्या भाविकाचा रस्त्यातच मृत्यू झाला. या घटनेमुळे गुढे येथील बाविस्कर कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील गुढे येथील मूळ रहिवासी आणि बोईसर येथे कामानिमित्त वास्तव्यास असलेले प्रवीण रूपचंद बाविस्कर हे बोईसर येथून एका खाजगी यात्रा कंपनीच्या माध्यमातून वृंदावन, मथुरा येथे आठ दिवसांच्या यात्रेकरिता गेले होते. त्यांच्यासह एकूण ६० भाविक निघाले होते. या प्रवासात त्यांच्यासोबत मुलगा पत्नीदेखील होते. बोईसर ते मनमाड हा प्रवास भाविकांनी खाजगी बसने केला. तेथून मनमाड ते वृंदावन जाण्याची व्यवस्था यात्रा कंपनीने रेल्वेने केली होती. मनमाड येथून रेल्वेमध्ये बसल्यानंतर बाविस्कर यांना छातीत त्रास जाणवू लागल्यावर त्यांना चाळीसगाव स्टेशनवर थांबवून रेल्वे…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील जामनेर रोडवरील वाल्मीक नगर भागात काल रात्री उशिरा दोन गटांमध्ये वाद होऊन त्याचे रूपांतर दगडफेकीत झाले. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत चार जणांना ताब्यात घेतले आहे. उर्वरित संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाकडून धडक मोहीम राबविण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाल्याने मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणी निखिल धामणे, गोपी धामणे, कालू जाधव, आकाश रायसिंग पंडित या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १९४(२), १२५ (क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर परिसरात गोळीबार झाल्याच्या अफवा पसरल्या…

