मुंबई : वृत्तसंस्था राज्यात पुन्हा एकदा करोना रुग्णसंख्येत आणखी वाढ झाली असून सर्वाधिक २५ रुग्ण मुंबईतील आहेत. याच वेळी पुण्यातही एक रुग्ण आढळून आला आहे. या वर्षभरात करोनाचे एकूण १३२ रुग्ण आढळून आले असून, त्यांपैकी १२६ मुंबईतील आहेत. राज्यातील करोना रुग्णसंख्येत वाढ सुरूच आहे. गेल्या २४ तासांत राज्यात आणखी २६ रुग्ण आढळले असून, त्यातील सर्वाधिक २५ रुग्ण मुंबईतील आहेत. याच वेळी पुण्यातही एक रुग्ण आढळून आला आहे. तर दुसरीकडे राज्यात मान्सूनपूर्व खबरदारी घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महापालिकांना आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत, राज्यात जानेवारी ते २१ मेपर्यंत करोनाच्या ६ हजार २०६ संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये १३२ रुग्णांना करोनाचे…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून अनेक विषयावर ठाकरे गटाचे नेते आक्रमक होत असतांना आता आदित्य ठाकरे देखील आक्रमक होवून थेट इशारा दिला आहे. मुंबईत वरळीमधील आर्थर रोड नाका येथील शंभर वर्षे जुन्या श्री लक्ष्मीनारायण मंदिर समितीला बीएमसी आणि बिल्डरमार्फत नोटीस देण्यात आली आहे. यावरून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी महापालिका आणि बिल्डरला थेट इशारा दिला आहे. मंदिर तोडण्यासाठी पुढे सरसावलेल्या महापालिका आणि बिल्डरची दादागिरी आम्ही सहन करणार नाही, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी ठणकावले आहे. अर्थर नाक्यावरील बीएमसी कर्मचारी निवासस्थान परिसरात श्री लक्ष्मीनारायण मंदिर हे शंभर वर्षे जुने आहे. मुंबई महापालिका आणि बिल्डर्समार्फत या मंदिराला नोटीस बजावण्यात आली. आदित्य…
चाळीसगाव : प्रतिनिधी चहा पिण्यासाठी हॉटेलवर आलेल्या चौघांना चहाचे पैसे मागितल्याचा राग येऊन हॉटेलचालकासह कामगारास मारहाण करीत चॉपरसह अन्य लोखंडी वस्तूने डोक्यावर वार करून जबर जखमी केल्याची घटना शहरातील नागद रस्त्यावर घडली. याप्रकरणी नागदरोड झोपडपट्टी भागातील चौघांविरोधात चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे. सविस्तर वृत्त असे कि, मझहर खान इक्बाल खान (रोशननगर, पाटणादेवी) याचे नागद रोडवर चहाचे हॉटेल आहे. १६ रोजी रात्री ८ वाजता हॉटेलमालक मझहरखान व कामगार उमेर शेख रफीक है ग्राहकांना चहा देत असताना करीम खान रसुल ऊर्फ पप्पू तसेच शोएब खान जमील खान व त्यांच्या सोबत दोन व्यक्ती (नागदरोड झोपडपट्टी) चहा पिण्यासाठी आल्या. चहा…
जळगाव : प्रतिनिधी शहरात बॅटरी चोरीचे प्रकार वाढले असताना, एमआयडीसी पोलिसांनी २४ तासांच्या आत एका चोरीचा छडा लावला आहे. अजिंठा चौफुली येथील चौधरी बॅटरी ट्रेडिंग या दुकानातून ४१ जुन्या बॅटऱ्या चोरून नेणाऱ्या दोन संशयित आरोपींना पोलिसांनी तेल्हारा, जि. अकोला येथून अटक केली असून, त्यांच्याकडून सहा लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, १७ मे रोजी, अब्दुल्ला किताबुल्ला चौधरी यांच्या दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी ४१ हजार रुपये किमतीच्या ४१ जुन्या बॅटऱ्या चोरल्या होत्या. १९ मे रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे प्रभारी…
भुसावळ : प्रतिनिधी पतीने घरगुती कारणावरून झोपलेल्या पत्नीवर लोखंडी हातोड्याने हल्ला करत जबर जखमी केल्याची घटना २० मे रोजी पहाटेच्या सुमारास किन्ही एमआयडीसी परिसरातील एका बांधकामस्थळी पत्र्याच्या शेडमध्ये घडली. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीच्या माहितीनुसार, संशयित आरोपी संतोष लालिया खर्ते (रा. रूकगड, म.प्र, ह.मु, किन्ही एमआयडीसी) हा दि. २० मेच्या रात्री १ ते ३ वाजण्याच्या सुमारास पत्री शेडमध्ये झोपलेल्या पत्नी आशाबाईकडे आला. घरगुती कारवावरुन त्यांच्यात वाद झाला आणि रागाच्या भरात संतोषने लोखंडी हातोड्याने आशाबाईच्या डाव्या कानाजवळ जोरदार मारहाण केली. त्यामुळे तिला गंभीर दुखापत झाली. हल्ल्यानंतर आरोपीने वापरलेला हातोडा घटनास्थळी टाकून पळ काढला. दरम्यान, जखमी…
भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील साकरी फाट्याजवळ दीपनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर बुधवारी दुपारी एक कार पलटली. या अपघातात आरोषी विजय बशीरे (वय ४, रा. निंभोरा, ता. भुसावळ) हिचा जागीच मृत्यू झाला जुना फेकरी टोल नाका परिसरात महामार्गावर कार (क्रमांक एमएच ०४ जीएम ०६८०) उलटली. या अपघाताची माहिती डॉ. लोकेश नेहेते यांनी पोलिसांना दिली. त्यांच्या खबरीवरून भुसावळ तालुका पोलिस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस कर्मचारी संदीप बडगे करीत आहेत.
अमळनेर : प्रतिनिधी येथील रहिवासी व नुकताच साखरपुडा झालेल्या इन्साफ खान या तरुणाने त्याचा मित्र मयूर गांगुर्डे बुडताना वाचविताना यास स्वतःचा जीव गमावल्याची घटना धुळे तालुक्यातील अवधान शिवारात घडली. इन्साफ आजाद खान (वय २२, अमळनेर) असे मित्राला वाचवताना मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे कि, इन्साफ व मयूर मोहन गांगुर्डे (वय २५, दोन्ही रा. अमळनेर) हे दोघे धुळे येथील एसव्हीकेएम महाविद्यालयात बी. फार्मसीच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेत होते. दोघेही मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता अवधान शिवारातील धरणावर गेले होते. यावेळी मयूरचा तोल गेल्याने तो धरणाच्या पाण्यात बुडू लागला. हे पाहून इन्साफने त्याला हात देत बाहेर काढले; मात्र हे करीत…
भुसावळ : प्रतिनिधी शहरात बुधवारी सकाळी तापी नदीत अंघोळीसाठी गेलेल्या जालना येथील मामा-भाच्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. रामराजे नंदलाल नाटेकर (वय ५५) आणि आर्यन नितीन काळे (वय २१) अशी मृतांची नावे आहेत. सविस्तर वृत्त असे कि, दोघेही मूळचे जालना जिल्ह्यातील रहिवासी असून पेंढारवाडा भुसावळ येथे संदीप हरिश्चंद्र रणधीर यांच्याकडे कार्यक्रमासाठी आले होते. सकाळी १० वाजेच्या सुमारास रामराजे नाटेकर हे आर्यन याच्यासोबत तापी नदीपात्रात अंघोळीसाठी गेले होते. अंघोळ करताना अचानक पाय घसरल्याने दोघेही नदीत बुडाले. परिसरातील नागरिकांनी दोघांनाही ट्रामा केअर सेंटरमध्ये नेण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. सुमन चौधरी यांनी त्यांना मृत घोषित केले.
मेष राशी आज वेळेअभावी योजना राबविण्यात अडचणी येतील. व्यवसायातील स्थिरतेमुळे हे शक्य आहे. शेजाऱ्यांशी संबंध चांगले राहतील. धर्म किंवा अध्यात्म यासारख्या विशिष्ट विषयात अचानक श्रद्धा जागृत होईल. सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. वृषभ राशी आज काही महत्त्वाचे काम विनाकारण थांबू शकते किंवा काम बिघडू शकते. कोणत्याही कामात नवीन सहकारी फायदेशीर ठरतील. तुमच्या नोकरीत तुम्हाला कामाचा आनंद मिळेल. कोर्ट केसेसमध्ये तुम्हाला यश मिळेल. राजकारणात सावधगिरी बाळगा. मिथुन राशी आज तुम्ही काही जुने प्रकरण जिंकाल. तुम्हाला कोणत्याही प्रकारे यश मिळेल. व्यवसायात नवीन करार होतील. तुम्ही व्यवसायाच्या सहलीवर जाऊ शकता. नोकरीत पदोन्नतीची शक्यता राहील. राजकारणात तुम्हाला फायदे आणि उच्च पद मिळू शकते.…
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून भारताने पाकिस्तानमधील दहशतवादीना ठार केले होते त्यानंतर भारताने पाकच्या कुरापती जगापुढे मांडण्यासाठी विविध देशांत एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. पण खासदार संजय राऊत यांनी बुधवारी पुन्हा एकदा या प्रकरणी सरकारवर निशाणा साधत या शिष्टमंडळाला टूर्स अँड ट्रॅव्हल्सची उपमा दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 200 देशांचा दौरा केला, पण काहीही फायदा झाला नाही, असेही ते म्हणालेत. संजय राऊत म्हणाले की, मला कुणावरही टीका करायची नाही. पण ज्या प्रकारे हे शिष्टमंडळ पाठवण्याचा प्रयत्न झाला तो काही बरोबर नाही. सरकारने ज्या देशांत शिष्टमंडळ पाठवण्याचा…

