Author: editor desk

मुंबई: वृत्तसंस्था राज्यात कोरोना पुन्हा एकदा डोके वर काढत असतांना दोन रुग्णाचा मृत्यू झाला असून आता ‘बिग बॉस’ फेम आणि बॉलिवूड तसेच दाक्षिणात्य चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिरोडकरच्या प्रकृतीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांचा कोविड-19 चा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. अभिनेत्रीने सर्वांना सावध राहण्याचा आणि मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. या बातमीने चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. 2020 मध्ये आलेल्या कोविड-19 महामारीने जगभरात हजारो लोकांचा बळी घेतला. सध्या पुन्हा एकदा कोविड-19 च्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर शिल्पा शिरोडकर यांचा पॉझिटिव्ह अहवाल चिंतेचा विषय ठरला आहे. त्यांनी…

Read More

जळगाव  : प्रतिनिधी “ना झुके हैं, ना बिके हैं, ना टूटे हैं, हम बाळासाहेब के चेले हैं, खुलकर लड़े हैं और खुलकर जिए हैं !” या जोशपूर्ण शायरीने सुरुवात करत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केलं. शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीच्या वतीने आयोजित जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्राच्या संवाद मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात जनतेच्या हृदयाशी जोडलेली आहे. शिवसेना म्हणजे चळवळ, शिवसेना म्हणजे जनतेच्या मनातील ताकद.” असे म्हणत त्यांनी उपस्थितांना आगामी नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या तयारीसाठी सज्ज होण्याचे आवाहन…

Read More

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असतान संभाजीनगर येथील नातेवाईकांना भेटून लातूरकडे निघालेल्या भरधाव कारवरील चालकाचे एका वळणावर  नियंत्रण सुटल्याने कारने रस्त्याच्या खाली जाऊन चार पाच पलट्या खाल्या. या दुर्घटनेत कारमधील माय-लेकीचा जागीच मृत्यू  झाला. तर पाच जण जखमी झाले. त्यात चौघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने छ. संभाजीनगर येथील खासगी रूग्णालयात दाखाल केले आहे. ही दुर्घटना धुळे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील डोणगाव दर्गा (ता.अंबड) जवळील  सौंदलगाव फाट्यानजीक आज (दि.१९) सकाळी नऊ च्या दरम्यान घडली. सविस्तर वृत्त असे कि, रोहिणी अमर चव्हाण (वय ३२) आणि नुरवी चव्हाण (वय २) या मायलेकीच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा घटनास्थळीच…

Read More

पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील बिल्दी फाट्याजवळ बसने मोटरसायकलला धडक दिल्याने मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १८ मे रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशन मध्ये अपघाताची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, असलम शहा सलीम शहा (वय ३६, रा. रोहीण खेडा, बुलढाणा ह. मु. मुस्लिम मोहल्ला, किनगाव ता. यावल) हे १८ मे रोजी पाचोऱ्याहुन जळगावच्या दिशेने मोटरसायकलने जात असताना पाचोरा तालुक्यातील बिल्दी फाट्याजवळ जळगावकडुन पाचोऱ्याच्या दिशेने येणाऱ्या बसने असलम शहा यांच्या मोटरसायकलला धडक दिली. या अपघातात असलम शहा यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होवुन घटनास्थळाचा पंचनामा करून…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी आगीच्या घटना सातत्याने घडत असतान एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मुंबईतील विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आग लागल्याची घटना घडली आहे. स्कॅनिंग मशिनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं ही आग लागल्याचं समोर आलं आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले,  या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असून, कोणतीही जीवीतहानी झालेली नाहीये. आग लागल्याची घटना घडली त्यावेळी आमदार देखील विधानभवनातच होते. एकीकडे आज विधानभवनात विविध समित्यांच्या उद्घाटनाचा क्रार्यक्रम सुरू आहे, तर दुसरीकडे विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरच आग लागल्याची घटना घडली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली, अग्निशमन दालाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. घटनास्थळी धुराचे लोट…

Read More

जळगाव : प्रतिनिधी संसदेत उत्कृष्ट आणि सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या खासदारांना दरवर्षी दिला जाणारा संसदरत्न पुरस्कार २०२५ यंदा जाहीर झाला असून, महाराष्ट्राने यामध्ये बाजी मारली आहे. राज्यातील सात खासदारांना या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यंदा ज्या महाराष्ट्रातील खासदारांची निवड झाली आहे, त्यात पुढील नावे आहेत: • सुप्रिया सुळे • श्रीरंग बारणे • अरविंद सावंत • नरेश म्हस्के • स्मिता वाघ • मेधा कुलकर्णी • वर्षा गायकवाड तसेच इतर देशपातळीवरील नेत्यांमध्ये भर्तृहरी महताब आणि एन. के. प्रेमचंद्रन यांनाही संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. हे पुरस्कार लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयाच्या आकडेवारीवर आधारित असून, प्राइम पॉइंट फाउंडेशन या संस्थेकडून दरवर्षी दिले जातात.…

Read More

उन्हाळ्यात त्वचेच्या समस्या अधिक वाढतात. उन्हाची तीव्रता, घाम, प्रदूषण आणि दुर्लक्ष यामुळे डार्क स्पॉट्स, टॅनिंग, पिंपल्स, आणि चेहऱ्यावरील निस्तेजपणा वाढतो. अशावेळी बाजारात मिळणाऱ्या महागड्या केमिकलयुक्त प्रोडक्ट्सचा उपयोग करूनही फारसा फरक जाणवत नाही. पण नैसर्गिक उपाय म्हणजे घरगुती उटणं हे डार्क स्पॉट्सपासून मुक्ती मिळवण्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. चला तर जाणून घेऊया अशाच ५ घरगुती उटणांबद्दल जे तुम्ही घरी सहज तयार करू शकता. १. हळद आणि बेसन उबटन साहित्य: ३ चमचे बेसन अर्धा चमचा हळद गुलाबपाणी (ऑयली स्किनसाठी) / दूध (ड्राय स्किनसाठी) कसं वापरावं: सर्व साहित्य एकत्र करून पेस्ट तयार करा आणि चेहऱ्यावर १५-२० मिनिटं लावा. हे उबटन पिगमेंटेशन आणि डार्क…

Read More

जळगाव : प्रतिनिधी समाजसेवा, आरोग्य आणि रक्तदान क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करणारे मुकुंद गोसावी यांची रक्तदान जनजागृतीसाठी आरोग्य विभागाच्या ब्रँड अ‍ॅम्बेसडर म्हणून निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. उन्हाळ्यात रक्तदानाचा तुटवडा भासतो, अशावेळी थॅलेसेमिया, हिमोपिलिया रुग्णांसह गर्भवती महिलांना सतत रक्ताची गरज भासते. याच पार्श्वभूमीवर मुकुंद गोसावी यांनी ‘मिशन सिंदूर’ उपक्रमातून रक्त संकलन व प्रबोधन यामार्फत आरोग्य विभागाला मोठे योगदान दिले आहे. मुकुंद गोसावी यांनी आतापर्यंत १०० पेक्षा अधिक वेळा रक्तदान करून इतरांना प्रेरणा दिली असून, त्यांनी स्वतः रक्तदान शिबिरांचे आयोजनही केले आहे. शहरासह ग्रामीण भागातही रक्तदानाबाबत जागरूकता निर्माण करण्यात त्यांचे मोलाचे…

Read More

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी सध्या आग लागण्याच्या घटना घडत असतांना आता मध्यरात्रीच्या सुमारास सोलापूर एमआयडीसी परिसरातील सेंट्रल इंडस्ट्री या कारखान्याला लागलेल्या आगीने थैमान घातले. या आगीत आतापर्यंत 3 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला असून, 3 जण गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले आहेत. अजूनही 5 ते 6 जण अडकले असावेत, अशी माहिती घटनास्थळी असलेल्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. आग नेमकी कशामुळे लगली, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार ही दुर्घटना रात्री 3 वाजण्याच्या सुमारास घडली. अक्कलकोट रोडवरील एमआयडीसी परिसरात असलेल्या ‘सेंट्रल…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा सत्ताधारी व विरोधक असा वाद सुरु झाला असतांना नुकतेच खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुंबईतील प्रभादेवीतील रवींद्र नाट्यमंदीर येथे पार पडला. या प्रकाशन सोहळ्याला देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. याशिवाय या प्रकाशन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ लेखक जावेद अख्तर यांची देखील विशेष उपस्थिती होती. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे ही देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या पुस्तकाबाबात केलेल्या विधानाचा त्यांचे नाव न घेता टोला लगावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खासदार संजय…

Read More