चाळीसगाव : प्रतिनिधी शांताबाई या फेसबुक अकाऊंटवर बदनामी केली व ३० हजारांची खंडणी घेतल्याप्रकरणी शांताबाई अकाऊंट धारकसह अन्य साथीदारांविरोधात १४ रोजी शहर पोलिसांत खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. यात शांताबाई फेम रणजितकुमार सुदेशकुमार दराडे याला गुरुवारी रात्री पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी दुपारी त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला ५ दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. यातील दोघे आरोपी फरार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोणे येथील शिक्षक शेख अजिज शेख बशीर खाटीक यांच्या बाबतीतही शांताबाई या अकाऊंटवर बदनामीकारक पोस्ट केली होती व त्यानंतर आमच्याकडे तुमचे अजून व्हिडिओ असून आम्ही ते अपलोड करू अशी धमकी देऊन त्यांचेकडे वेळोवेळी पैशांची मागणी केली जात होती.…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी ‘मी येणार नाही, घरी लक्ष ठेव!’ असे बहिणीला मोबाइलद्वारे कळवून हिरालाल नारायण चौधरी (५२, रा. विठ्ठलपेठ) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १६ मे रोजी रात्री कुसुंबा शिवारात उघडकीस आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका कंपनीमध्ये कामाला असलेले हिलाराल चौधरी हे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी यांच्यासह विठ्ठलपेठेत राहत होते. ते १४ मेपासून घरून निघून गेलेले होते. १५ मे रोजी त्यांनी त्यांच्या बहिणीशी संपर्क साधून ‘मी येणार नाही, घरी लक्ष ठेव!’ असे कळविले होते. त्यानंतर १६ मे रोजी रात्री कुसुंबा शिवारातील एका शेतात ते गळफास घेतलेल्या अवस्थेत…
भुसावळ : प्रतिनिधी कामायनी एक्स्प्रेसला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याची माहिती भोपाळ रेल्वे पोलिस प्रशासनाने दुपारी १२:४८ वाजता प्रसारित केली. दरम्यान, खंडवा स्थानकावर कामायनी एक्स्प्रेसला पोहोचताच तत्काळ खबरदारी घेत, सुरक्षा यंत्रणांनी प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर तासभर कसून तपासणी केली. सविस्तर वृत्त असे कि, यादरम्यान, आरपीएफ, जीआरपी, सिव्हिल पोलिस, डॉग स्क्वॉड आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कामायनी एक्स्प्रेसच्या सर्व डब्यांची कसून तपासणी करण्यात आली. आयपीएफ खांडवा स्वतः घटनास्थळी तपासणीसाठी उपस्थित होते. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्लॅटफॉर्म परिसर पूर्णपणे बंद करून आवश्यक त्या सर्व सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या. श्वान पथक आणि पोलिस पथकाने कसून तपासणी केल्यानंतर, कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. खात्री…
चोपडा : प्रतिनिधी शेतातील कडब्याला आग लागून या आगीत पंडित डोमन रायसिंग (६५) या शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना अनवर्दे खुर्द, ता. चोपडा येथे शनिवारी दुपारी उघडकीस आली. सविस्तर वृत्त असे कि, शेतकरी पंडित रायसिंग हे शनिवारी सकाळी हातेड शिवारातील आपल्या शेतात मशागत करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी शेतातील कडब्याला अचानक आग लागली. ते धुराच्या व आगीच्या तडाख्यात सापडल्याने होरपळून जमिनीवर कोसळले असावेत, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. पंडित हे दुपारपर्यंत घरी आले नाहीत. त्यामुळे घरातील मुले त्यांना बघायला शेतात गेली असता ते जळालेल्या व मयत स्थितीत आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच भाऊबंदांनी शेताकडे धाव घेत मृतदेह घरी…
मेष राशी श्रीगणेश म्हणतात की, गुंतवणुकीसाठी हा काळ खूप अनुकूल आहे. घरात बदल या विषयावरही महत्त्वाची चर्चा होईल. तुमच्या मार्गदर्शनाखाली मुलांना काही विशेष यश मिळू शकते. कुटुंबासोबत मनोरंजन आणि आरोग्याशी संबंधित कामांमध्येही वेळ घालवला जाईल. आळशीपणामुळे तुम्ही कोणत्याही कामाकडे दुर्लक्ष करू शकता, ज्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीवरही परिणाम होऊ शकतो. शहाणपणाने आणि सावधगिरीने वागण्याची वेळ आली आहे. कामाच्या क्षेत्रात अडकलेले काम आता वेग घेईल. घराचे वातावरण आनंददायी असेल. आरोग्य चांगले राहील. वृषभ राशी श्रीगणेश म्हणतात की, तुम्ही तुमचा दैनंदिन दिनक्रम व्यवस्थित ठेवण्यासाठी काही नियोजन कराल आणि त्यात यशस्वी व्हाल. तुम्हाला मनःशांती आणि तुमच्या आत ऊर्जा भरलेली जाणवेल. इतरांच्या म्हणण्याकडे लक्ष देण्याऐवजी,…
मुक्ताईनगर : प्रतिनिधी तालुक्यातील बेलसवाडी गावाजवळ मजूर घेऊन जात असलेला आयशर ट्रक उलटून झालेल्या अपघातात सुमारे १५ जण जखमी झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका आयशर ट्रकमधून मजूर रावेरच्या दिशेने जात होते. बेलसवाडी गावाजवळ अचानक ड्रायव्हरचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा ट्रक उलटून पडला. यात सुमारे १५ स्त्री-पुरूष जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे जखमींमध्ये काही बालकांचा देखील समावेश आहे. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा जेसीबीच्या मदतीने आयशर ट्रक हलविण्यात आला होता. तर या संदर्भात पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्याचे काम सुरू होते.
बीड : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घडत असून नुकतेच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजे असतानाच आता बीडमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या घटनेमुळे बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरून गेला. या घटनेचा भयानक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेने राज्यभर संतापाची लाट उसळली असून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भारताने ज्या प्रकारे पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूर सीमेवर केले होते. तसेच महाराष्ट्राच्या बीडमध्ये देखील केले पाहिजे, अशी मागणी केली आहे. अंजली दमानिया म्हणाल्या, जसे आपण ऑपरेशन सिंदूर सीमेवर केले…
मुंबई : वृत्तसंस्था पहलगाम हल्ल्याचा भारताने बदला घेतल्यानंतर देशासह राज्यातील प्रमुख शहरे दहशतवाद्यांच्या टार्गेटवर आहेत. त्यातच मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. ही धमकी मुंबई विमानतळ पोलिसांच्या ईमेल आयडीवर पाठवण्यात आली आहे, ज्यामध्ये मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला पुन्हा एकदा बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. ईमेलमध्ये दावा करण्यात आला आहे की ताज हॉटेल आणि विमानतळाला बॉम्बने उडवले जाईल. मुंबई विमानतळ आणि ताजमहल पॅलेसला बॉम्बने उडवण्याच्या धमकीच्या ईमेलमुळे खळबळ उडाली आहे. पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून तपास सुरू झाला आहे. असे सांगितले जात आहे की ईमेलमध्ये दहशतवादी अफजल गुरु आणि सैवक्कू शंकर…
जळगाव : प्रतिनिधी शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळख असलेल्या दगडी बँकेची नोकर भरती प्रक्रिया ऑफलाइनची औपचारिकता सुरू झाली आहे. कंपनीच्या चर्चेसाठी व काही डीलिंग साठी जिल्हा बँकेतील प्रमुखासह चार्जेस चार ज्येष्ठ संचालकांनी दिल्लीत जाऊन संबंधित कंपनीशी चर्चा केली आहे. त्यानंतर कागदावर आकडेमोड सुरू झाली आहे. मोठ्या प्रमाणात रेट देखील अंतर्गत फुटलेला आहे. पुन्हा जळगाव जिल्ह्यातील अनेक तरुणांची गर्दी दगडी बँकेच्या पुढार्यांच्या दारात उभी झाली आहे. दगडी बँकेत अंतर्गत संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये देखील खुली ऑफर सर्व संचालकांना दिली गेली त्यामुळे अंतर्गत आर्थिक गुदगुल्या अनेकांना फुटले आहे. जे सहा महिन्यापूर्वी एकमेकांचे खडे फोडत होते आता मात्र ते गळ्यात गड्या घालून दिल्ली वारी करून…
मुंबई : वृत्तसंस्था नैऋृत्य मोसमी वाऱ्यांनी गुरुवारी (१५ मे) दक्षिण अरबी समुद्रासह, मालदीवचा काही भाग, श्रीलंकेच्या किनारपट्टीपर्यंत प्रगती केली आहे. अंदमान बेटे आणि बंगालच्या उपसागरातही मॉन्सूनने चाल केली असून, त्यामुळे मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यानुसार पुढील दोन दिवसांत अरबी समुद्र, मालदीव, कोमोरीन, बंगालच्या उपसागराच्या काही भागासह, संपूर्ण अंदमान बेटांवर मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये पुढील दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये पूर्वमोसमी वादळी पावसाने हजेरी लावली आहे. गुजरात आणि उत्तर कोकणच्या किनाऱ्यालगत अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहत असल्याने पावसाच्या सरी बरसत आहेत. काही ठिकाणी तर जोरदार…

