Author: editor desk

अमळनेर : प्रतिनिधी पिंगळवाडे येथील २८ वर्षीय तरुणाचा पाण्याची मोटर सुरू करताना विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना १३ रोजी घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिंगळवाडे येथील सचिन मनोहर पाटील (२८) हा १३ रोजी ४:३० वाजेच्या सुमारास नळाला पाणी आल्याने नवीन घरच्या बांधकामावर पाणी मारण्यासाठी इलेक्ट्रिक मोटर सुरू करण्यास गेला. मात्र मोटार सुरू करताच विजेचा झटका लागून तो फेकला गेला. त्याचा आवाज आल्याने आजूबाजूच्या लोकांनी पाहिले असता तो जमिनीवर पडलेला होता व डाव्या हातात मोटरची वायर होती. लोकांनी विजेचा प्रवाह बंद करत त्याला उचलून खासगी वाहनाने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्याला मृत घोषित करण्यात आले.

Read More

जळगाव : प्रतिनिधी गेल्या तीन दिवसापासून खान्देशातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचे वातावरण असून जळगाव जिल्ह्यात वीज पडून तरुणासह दोन ठार झाले. पाचोरा आणि मुक्ताईनगर तालुक्यात शनिवारी या घटना घडल्या. मोहित जगतसिंग पाटील (२५, रा. खेडगाव नंदीचे, ता. पाचोरा) व शांतीलाल शंकर कठोरे (४४, रा. पूरणाड, ता. मुक्ताईनगर) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. धुळ्यातील शिरपूर तालुक्यातील ताजापुरी गावातील नथ्थू हरचंद सनेर (वय ६३) शेतकऱ्याचाही वीज पडून मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील घटनेत, मोहित हा शनिवारी दुपारी खेडगाव शिवारातील शेतात आई-वडिलांसोबत मका लागवड करीत होता. दुपारी ३ वाजता पाऊस सुरू झाला आणि त्याचवेळी मोहित याच्या अंगावर वीज कोसळली. या…

Read More

मेष राशी आजचा दिवस आनंदाचा आणि प्रगतीचा असेल. महत्त्वाच्या कामात कोणताही मोठा निर्णय तुमच्या वैयक्तिक परिस्थिती लक्षात घेऊनच घ्या. वृषभ राशी आज कामाच्या ठिकाणी निरर्थक वाद टाळा. अन्यथा, सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. कधीकधी वातावरण आनंदी तर कधीकधी तणावपूर्ण असू शकते. कामाच्या ठिकाणी महत्त्वाच्या योजना एखाद्या अज्ञात कारणामुळे पुढे ढकलल्या जाऊ शकतात. महिलांचा वेळ हास्य आणि विनोदात जाईल. मिथुन राशी तरुण मित्रांसोबत बाहेर जाण्याची योजना आखतील. भौतिक सुख, समृद्धी आणि व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. सामाजिक, राजकीय चर्चा किंवा वादविवाद टाळा. कर्क राशी आज तुम्ही कायदेशीर अडचणीत येऊ शकता. ज्यामुळे तुम्हाला प्रचंड शारीरिक आणि मानसिक त्रासाला तोंड द्यावे लागेल. दुविधा निर्माण…

Read More

नवी दिल्ली: वृत्तसंस्था देशातील प्रत्येक व्यक्तीची ओळख आधारकार्ड झाली आहे. याच आधारकार्ड बाबत एक मोठी घोषणा आता केंद्र सरकारने केली आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची अंतिम मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. यापूर्वी ही मुदत १४ जून २०२५ रोजी संपणार होती, ती आता १४ जून २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. UIDAI ने आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ द्वारे ही माहिती दिली. या निर्णयामुळे ज्या नागरिकांनी अद्याप आपले आधार कार्ड अपडेट केलेले नाही, त्यांना आणखी एक वर्षाचा कालावधी मिळाला आहे. विशेषतः ज्या व्यक्तींचे आधार कार्ड १० वर्षे किंवा त्याहून अधिक जुने आहे, त्यांनी एकदाही ते अपडेट…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्याच्या संतापाने आता भाजपचे आमदार संजय कुटे यांचे निवासस्थान पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास जळगाव जामोद येथे हा प्रकार घडला. संग्रामपूर तालुक्यातील एका अतिवृष्टी पीडित शेतकऱ्याने नुकसान भरपाई न मिळाल्याने संतापाच्या भरात हे कृत्य केले. याप्रकरणी, संबंधित शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये यंदा मे महिन्याच्या शेवटीच जोरदार पावसाने हजेरी लावली. परिणामी, शेतपिकांसह फळबागांचेही मोठे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले असतानाही, शासनाच्या मदतीची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत अजूनही कोणतीही ठोस मदत पोहोचलेली नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. अतिवृष्टीमुळे…

Read More

अमरावती : वृत्तसंस्था गेल्या ७ दिवसापासून राज्यातील शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी अन्नत्याग उपोषण करणाऱ्या बच्चू कडू यांनी शनिवारी आपले उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली. या प्रकरणी त्यांनी सरकारला आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी 2 ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे. सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर 2 ऑक्टोबर रोजी आम्ही थेट मंत्रालयात शिरू, असे ते या प्रकरणी सरकारला इशारा देताना म्हणालेत. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू गत 7 दिवसांपासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी अन्नत्याग उपोषण करत होते. या उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला होता. पण त्यानंतरही बच्चू कडू यांनी आपले उपोषण नेटाने पुढे नेण्याचा संकल्प…

Read More

अहमदाबाद : वृत्तसंस्था गुजरात राज्यातील अहमदाबाद विमानतळाजवळ झालेल्या एअर इंडिया बोईंग 787 ड्रीमलायनर (एआय-171) विमान अपघातातील मृतांची संख्या 274 वर पोहोचली आहे. लंडनला जाण्यासाठी उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच कोसळलेल्या या विमानात 241 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते, तर उर्वरित 33 मृत्यू स्थानिक रहिवाशांचे आहेत. मृतांमध्ये बीजे मेडिकल कॉलेज कॅम्पस परिसरातील 10 डॉक्टर, त्यांचे नातेवाईक, वैद्यकीय विद्यार्थी, कर्मचारी आणि मेघनीनगरमधील रहिवासी आहेत. शुक्रवारी (13 जून 2025) रात्रीपर्यंत चाललेल्या बचाव मोहिमेत 100 हून अधिक कामगार आणि 40 अभियंत्यांनी विमानाचा ढिगारा हटवला. यावेळी ब्लॅक बॉक्स बीजे मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थी मेसच्या छतावर सापडला, ज्यामुळे अपघाताच्या कारणांचा तपास सुलभ होईल. तपास अधिकाऱ्यांनी 319 मृतदेहांचे अवयव…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील ५०० मेगावॅट प्रकल्पात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या एमएसएफ (महाराष्ट्र सुरक्षा दल) जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. गणेश बापू दैवत (वय ३१, रा. माहीजी, ता. पाचोरा) हे नियमित वॉकिंगदरम्यान मैदानावर कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. ११ जून २०२५ रोजी गणेश दैवत यांनी ड्युटी पूर्ण करून सायंकाळी मैदानावर फिरण्यासाठी गेले. तेथेच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. ते मैदानावरच कोसळले. त्याचवेळी पावसाला सुरुवात झाली होती. पावसातही उठत नसल्याचे पाहून त्यांच्या सहकाऱ्यांनी जवळ जाऊन पाहणी केली. गणेश यांना भुसावळ येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांचा…

Read More

फैजपूर : प्रतिनिधी यावल रोडवरील हॉटेल तृभावी मालकाला मारहाण करून खंडणी मागत त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चैन लंपास केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध दि.१२ मध्यरात्री गुन्हा दाखल झाला आहे सविस्तर वृत्त असे कि, यावल रोडवर हॉटेल तृभावीचे मालक किशोर पूनमचंद आईदासानी (वय ४६) यांना दि. १० रोजी दुपारी ४ ते वाजेच्या दरम्यान संशयित आरोपी शेख आरीफ शेख कलीम, गोपी साळी, मुजाहिद उर्फ मज्जू डॉन, शाहरुख शेख कलीम व त्याच्यासोबतचा राहणारा पप्पू सर्व (रा. फैजपूर) यांनी बिलाचे पैसे न देता मारहाण केली आणि प्रत्येक महिन्याला २० हजार रुपये द्यावे लागतील, असे म्हणत खंडणी मागितली. गळ्यातील १ लाख ८० रुपये किमतीची दोन तोळ्याची…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी नगरपालिकेच्या बालवाडी परिसरात बसण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून शहरातील आगाखान वाडा, शिवाजी नगर येथे एका युवकाला मारहाण करण्यात आली. यानंतर हल्लेखोरांनी युवकाच्या घरात घुसून कुटुंबीयांनाही बेदम मारहाण करत तोडफोड केली. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध बाजारपेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, गुलाम मोहम्मद शेख बिस्मिल्ला (वय २७) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि. ११ जून रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास ते घराजवळील नगरपालिकेच्या बालवाडीसमोर बसले होते. त्यावेळी अहमद इब्राहीम कुरेशी, सुलताना बी अहमद कुरेशी आणि साहील मुशीर शेख हे तेथे आले आणि वाद घातला. याला उत्तर दिल्यावर तिघांनी शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर…

Read More