जळगाव : प्रतिनिधी नागपूरहून धुळ्याकडे जाणाऱ्या टँकरवरील चालकाला डुलकी लागल्याने ते विरुद्ध दिशेला उभ्या असलेल्या ट्रॉलावर धडकले. सुदैवाने यात कोणाला दुखापत झाली नाही. मात्र वाहनांचे नुकसान झाले. हा अपघात रविवारी (१५ जून) सकाळी ११.३० वाजता आकाशवाणी चौकात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, वापी येथून बॉयलर टैंक घेऊन बिहारकडे जाणारा ट्रॉला (सीजे ०७, सीए ४६८२) आकाशवाणी चौकात सिग्नलजवळ उभा होता. त्यावेळी नागपूरकडून धुळ्याकडे जाणाऱ्या टँकरवरील (जीजे १६ एडब्ल्यू ९६१५) चालक निशांत सिंग (२३, रा. पिलीभीत, उत्तर प्रदेश) याला डुलकी लागली व ते थेट दुभाजक ओलांडून ट्रॉलाच्या चालक कॅबिनजवळ धडकले. सुदैवाने तेथे असलेला ट्रॉलाचालक विरेंद्र जाधव (३५ रा. नालंदा, बिहार) याला दुखापत झाली नाही.…
Author: editor desk
भुसावळ : प्रतिनिधी वरणगाव येथून जवळ असलेल्या फुलगावजवळ राष्ट्रीय महामार्गावर शनिवार पहाटे ३ वाजेच्या सुमारास झालेल्या विचित्र अपघातात एक जण जागीच ठार तर रिक्षातील तिघे जण जखमी झाले. याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, ट्रक क्रमांक (एम. एच. ३७ टी ६७७१) वरील चालक अजहर खान सखाउल्ला खान (रा. समतानगर, कारंजा लाड, जि. वाशिम) हा भुसावळकडून वरणगावकडे भरधाव वेगाने जात असताना वेस्टन हॉटेल समोरून निघणाऱ्या पिकअप वाहन क्रमांक (एम. एच. १९ सी. वाय. ४५७६) ला जोरदार धडक दिली. या धडकेत पिकअप चालक राजू गुलाब ओंतारे (रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) जागीच ठार झाले. याच…
चाळीसगाव : प्रतिनिधी शेतातील झाडावर वीज कोसळून त्याखाली आश्रयाला थांबलेले एकाच कुटुंबातील तीनजण ठार, तर दोनजण जखमी झाले. ही हृदयद्रावक घटना कोंगानगर (ता. चाळीसगाव) येथे रविवारी दुपारी २ वाजता घडली. मिळालेल्या माहितीनुसार, दशरथ उदल पवार (वय २४), त्याचा पुतण्या दिलीप पवार (१४, दोघे रा कोंगानगर) आणि शालक समाधान प्रकाश राठोड (९, रा. जेहूर ता. कन्नड जि. छत्रपती संभाजीनगर) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. यापैकी दशरथ याचा १५ दिवसांपूर्वीच विवाह झाला होता. उदल गणपत पवार व दिलीप उदल पवार हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. पवार कुटुंबीय गावानजीकच्या शेतात रविवारी कपाशी लागवड करण्यासाठी गेले होते. दुपारी दोन वाजता वादळी वाऱ्यासह पावसासह विजांचा…
मेष : तुम्ही लवकर उठले पाहिजे जेणेकरून तुम्ही तुमचे सर्व काम वेळेवर पूर्ण करू शकाल. दररोज तुमच्या जीवनात हा मंत्र स्वीकारा. जर नोकरी करणारे लोक जोखीम घेऊन कोणतेही काम करत असतील तर त्यांना थोडे सतर्क राहावे लागेल. ब्रह्मा, सर्वार्थ सिद्धी योगाच्या निर्मितीमुळे, कामाच्या ठिकाणी तुमच्या सादरीकरणाची आणि प्रगतीची प्रशंसा होऊ शकते. विद्यार्थ्यांच्या मनात कलात्मक कल्पना येतील. वृषभ : १०-१५ मिनिटांच्या ध्यानाने दिवसाची सुरुवात करा. व्यावसायिकांना सतर्क राहावे लागेल, कारण विरोधक तुमच्या कमकुवतपणाचा फायदा घेऊ शकतात. खेळाडू त्यांचे लक्ष्य साध्य करण्यात यशस्वी होतील. कामाच्या ठिकाणी तुमचे काम लवकर पूर्ण करा. कुटुंबात शक्य तितके शांत रहा, कारण वडीलधाऱ्यांशी वादाची परिस्थिती उद्भवू शकते. मिथुन: दिवसाच्या…
पुणे : वृत्तसंस्था राज्यातील पुणे जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जुना पूल कोसळून दुर्घटना घडली आहे. रविवार असल्याने कुंडमळा येथे पर्यटकांची गर्दी होती. यादरम्यान पूल कोसळल्याने 25 ते 30 पर्यटक इंद्रायणीत बुडाल्याची भीती आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस, ग्रामस्थ, रेस्क्यू व्हॅन, फायर टेंडर बोट, एनडीआरएफ पथक आणि आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. दोन दिवसांपासून मावळ परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून इंद्रायणीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. यामुळे नदीत पडलेल्या पर्यटकांना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न यंत्रणांकडून सुरू आहे. मदत व पुनवर्सन…
मुंबई : वृत्तसंस्था भारतील जनता पक्षाला मुंबईत आणखी मदतीची गरज आहे, असे दिसून येत आहे. म्हणून ते इतर पक्षांसोबत संपर्क साधत असून हॉटेलमध्ये भेटी घेत आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. जयंत पाटील म्हणाले की, रश्मी ठाकरेंच्या हस्तक्षेपामुळे शिवसेना फुटली असे म्हणता येणार नाही. आम्ही संपूर्ण इाकरे कुटुंबियांना जवळून पाहिजे आहे, आम्हाला असे काही वाटत नाही. आगामी निवडणूक आम्ही आमच्या विचाराच्या मविआतील पक्षासोबत लढवू असेही त्यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे. जयंत पाटील म्हणाले की, मुंबई पालिकेच्या 92 हजार कोटी रुपयांच्या ठेवी होत्या .या ठेवी आता रिकाम्या होऊ लागल्या आहेत .2 लाख 36 कोटी…
सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मोहोळ तालुक्यातील लांबोटी गावात शनिवारी रात्री उशिरा पुणे जिल्ह्यातील एका सराईत गुन्हेगारास अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिस आणि आरोपी यांच्यात चकमक उडाली. या चकमकीत शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख (वय अंदाजे 30, रा. गल्ली क्र. 23/ए, सय्यदनगर, हडपसर, पुणे) हा ठार झाला. मिळालेल्या माहितीनुसार शेख याच्यावर हडपसर, वानवडी, कोंढवा, काळेपडळ आदी पुणे शहरातील पोलिस ठाण्यांत खून, खंडणी, घरफोडी, दरोडा अशा स्वरूपाचे 15 पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल होते. त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MOCA) अंतर्गत कारवाई झाली होती, मात्र तो गेली काही दिवस फरार होता. पुणे क्राईम ब्रँचच्या पथकाला…
डेहराडून : वृत्तसंस्था गुजरात राज्यात विमान अपघाताची घटना ताजी असतांना आज रविवारी पहाटे ५:२० वाजता केदारनाथजवळील गौरीकुंड येथे एक हेलिकॉप्टर कोसळले. यामध्ये पायलटसह सर्व ७ प्रवाशांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका २ वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. हे हेलिकॉप्टर केदारनाथ मंदिरातून गौरीकुंडला भाविकांना घेऊन गेले होते. प्राथमिक माहितीनुसार, खराब हवामानामुळे हा अपघात झाला. हे हेलिकॉप्टर आर्यन एव्हिएशन कंपनीचे आहे. उत्तराखंड नागरी विमान वाहतूक विकास प्राधिकरण (UCADA) नुसार, हेलिकॉप्टरमध्ये उत्तर प्रदेश-महाराष्ट्रातील प्रत्येकी २ आणि उत्तराखंड, राजस्थान, गुजरातमधील प्रत्येकी १ प्रवासी होता. गौरीकुंड येथून NDRF आणि SDRF बचाव पथके रवाना करण्यात आली आहेत. चारधाम यात्रा हेलिकॉप्टर सेवेवर बंदी घालण्यात आली आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह…
जळगाव : प्रतिनिधी घराशेजारी राहणाऱ्याच्य दुचाकीजवळ तीन वर्षीय बालक खेळत असल्याच्या तरुणाने बालकाला शिवीगाळ केली. त्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन चौघांनी बालकाच्या वडीलांसह काका व आजोबांना बेदम मारहाण केली. तेथे पडलेला विटेचा तुकडा त्यांच्या डोक्यात मारुन जखमी केले. ही घटना दि. १३ रोजी सायंकाळी उस्मानिया पार्क परिसरात घडली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील उस्मानिया पार्क परिसरात मोहम्मद सलीम मोहम्द नजीर शेख (वय ५८) हे वास्तव्यास आहे. दि. १३ रोजी ते घरी असतांना त्यांचा नातू हा घरासमोर खेळत होता यावेळी तो गल्लीत राहणाऱ्या जाकीर कुरेशी यांच्या गाडीजवळ खेळत असल्याचा राग आल्याने तो जोरजोरात शिवीगाळ करु लागला.…
जळगाव : प्रतिनिधी ट्रान्सपोर्ट कार्यालयात पार्सल देण्यासाठी गेलेल्या मुस्तकीम शेख अलीम शेख (वय २०, रा. सुप्रिम कॉलनी) व प्रफुल्ल कोळी (रा. मोहाडी, ता. जळगाव) यांना दोन जणांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच मुस्तकीम यांना लोखंडी पाईपाने मारहाणही करण्यात आली. ही घटना शुक्रवारी दाणाबाजारात घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील सुप्रिम कॉलनीत राहणारे मुस्तकीम शेख अलीम शेख हा तरुण भाटीया मार्केटमधील हार्डवेअरच्या दुकानात कामा आहे. दुकान मालक पवन दांडगे यांनी त्याला दाणा बाजार येथे जावून हिरा धनगर यांच्या ट्रान्सपोर्ट ऑफिसला पार्सल देण्यासाठी सांगितले. त्यामुळे मुस्तकीम हा त्याच्यासोबत काम करणारा प्रफुल्ल कोळी…

