भुसावळ : प्रतिनिधी शहरातील जळगाव रोडवरील अंगारा ढाब्यावर जेवण केल्यानंतर बिल मागितल्याच्या कारणावरून ढाबा मालकास चाकू दाखवत लुटमार, शिवीगाळ व मारहाणीचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. सविस्तर वृत्त असे कि, रोशन होलाराम सचदेव (वय ४०, रा. सिंधी कॉलनी, भुसावळ) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १४ जून रोजी संध्याकाळी ४ वाजेच्या सुमारास तस्लीम उर्फ काल्या सलीम शेख व शेख नईम शेख सलीम हे दोघे ढाब्यावर आले होते. दारूच्या नशेत त्यांनी जेवण करून बिल मागितल्यावर सचदेव यांना शिवीगाळ केली व चाकू दाखवून धमकावले. यानंतर त्यांच्या इतर साथीदारांना बोलावून मिळून मारहाण करण्यात आली.…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी पोलिसांना पाहून पळ काढणाऱ्या टोळीच्या वाहनाचा पाठलाग करताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या अंगावर गुरे चोरी करणाऱ्यांनी वाहन घातले. ही धक्कादायक घटना अकोला जिल्ह्यात सोमवारी (१६ जून) पहाटे ३:४० वाजता घडली. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आले, अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्री यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील, पोउनि अनिल जाधव, पोहेकॉ दर्शन ढाकणे हे १५ जून रोजी रात्री जिल्ह्यात गस्त घालत होते. मुक्ताईनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कुंड गावात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने एका घराकडे जाणाऱ्या चार…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील कानळदा येथे वडिलांना दोन जण शिवीगाळ व मारहाण करीत असल्याने सोडविण्यासाठी गेलेल्या अभिजित भगवान सपकाळे (१९, रा. कानळदा, ता. जळगाव) या मुलालाही मारहाण करण्यात आली. ही घटना १४ जून रोजी रात्री कानळदा येथे घडली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कानळदा येथील भगवान सुनील सपकाळे यांना त्यांच्या राहत्या घराजवळ दोन जण शिवीगाळ व मारहाण करीत होते. त्यावेळी सपकाळे यांचा मुलगा अभिजित हा सोडविण्यासाठी गेला असता त्यालादेखील मारहाण करण्यात आली. बाप-बेट्यांना लोखंडी कडे मारून दुखापत केली. या प्रकरणी अभिजित सपकाळे याने तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्या…
भुसावळ : प्रतिनिधी पालिका अंतर्गत कार्यरत असलेल्या सफाई कामगाराला सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करत असताना शिवीगाळ व नोकरी घालविण्याची धमकी देण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सफाई कामगार उमेश रामलाल जेधे (वय ४१, रा. भारत नगर, भुसावळ) यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी ६:३० वाजता उमेश जेधे नेहमीप्रमाणे आपल्या कर्तव्यासाठी पापा नगर येथे गेले होते. सकाळी आठच्या सुमारास पापा नगर येथील ईकबाल कालू शेख (४५) यांच्या घरासमोरील मुख्य रस्त्यावर साफसफाई करत असताना वाऱ्यामुळे रस्त्यावरील कचरा त्यांच्या घराजवळ गेल्यामुळे ते संतप्त झाले. त्यांनी शिवीगाळ करीत धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान घटनेच्या निषेधार्थ नगरपालिकेच्या…
मेष राशी आज मुलांमुळे आनंद वाढेल. तुम्हाला जवळचा मित्र भेटेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन मित्र मिळतील. नोकरीतहि समाधान वाढेल. व्यवसायात अनोळखी व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवू नका. अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते. वृषभ राशी आज तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तुम्ही उधार दिलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. व्यवसायात परिश्रमपूर्वक काम करा. तुम्हाला चांगला नफा आणि भरपूर यशही मिळेल. पशुपालनात गुंतलेल्या लोकांना यश मिळेल. मिथुन राशी आज, ज्या लोकांना कोणत्याही गंभीर आजाराची भीती वाटते त्यांना त्यांच्या आजाराच्या भीती आणि गोंधळातून आराम मिळेल. तुमचे आरोग्य सुधारेल. तुम्हाला कोणत्याही हंगामी आजाराचा त्रास होऊ शकतो. उगाच धावपळ करू नका. कर्क राशी आज तुम्ही कायदेशीर अडचणीत येऊ…
जळगाव : प्रतिनिधी राज्य शासनाच्या ‘शाळा प्रवेशोत्सव २०२५-२६’ उपक्रमांतर्गत जळगाव जिल्ह्यातील १८६० जिल्हा परिषद, महानगरपालिका व नगर परिषद शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ आज उत्साहात झाला. सर्व शाळांमध्ये नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे औक्षण, पुष्पगुच्छ देऊन, टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. खा. स्मिता वाघ, आ. प्रा.चंद्रकांत सोनवणे, आ. अमोल चिमणराव पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, शिक्षक, पालक व शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनीही या उपक्रमात सहभाग नोंदवत वातावरण आनंदमय केले. अमळनेर तालुक्यातील जवखेडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत झाले. गणवेश, शालेय साहित्य वाटप आणि वृक्षारोपण यासह पर्यावरण…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री अजित पवार आता वादग्रस्त विधानाने चर्चेत आले आहे. रिलायन्स उद्योग समुहाच्या माध्यमातून जगभरात भारताचा मान उंचावणारे दिवंगत उद्योगपती धीरूभाई अंबानी यांच्याविषयी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वादग्रस्त विधान केले आहे. धीरूभाई अंबानी पेट्रोल पंपावरील पेट्रोल चोरी करून कोट्यधीश झाले, असे ते म्हणालेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांच्या विधानाचा व्हिडिओ पोस्ट करत त्यांना खोचक टोला हाणला आहे. धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरून कोट्यधीश झाले आणि तुम्ही? असा सवाल त्यांनी यासंबंधी केला आहे. बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारन्याची येत्या 22 जून रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या प्रचारात…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली आहे. त्यामुळे या सरकारला केंद्रात आणि महाराष्ट्रात पनवती सरकार म्हणायला हरकत नाही. सातत्याने अपघात, घातपात सुरू असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या माध्यमातून त्यांनी मावळ मधील पुल दुर्घटना आणि मालवण मधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याभोवती खचलेल्या जमिनीबाबत सरकारवर निशाणा साधला आहे. या संदर्भात संजय राऊत म्हणाले की, पुंछ भागात सतरा लोक मारले गेले, त्याच्या आधी पहलगाम येथे 26 महिलांचा सिंदूर उजाडले गेले. अहमदाबादला भयानक असा विमान अपघात झाला. वास्तविक तो अपघात की, आणखी काही? याचा तपास सुरू आहे. यातही महाराष्ट्राचे 15 ते 16 लोक…
पुणे : वृत्तसंस्था राज्यातील पुणे येथील मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील जुन्या लोखंडी पुलाच्या कोसळण्याच्या दुर्घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. रविवारी (15 जून 2025) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला, तर 51 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. तर अद्यापही काही जण बेपत्ता आहेत. या संपूर्ण घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीट करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. सरकार जर निष्काळजीपणा दाखवणार असेल तर आपणच सतर्क रहायला हवं, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे. राज ठाकरेंचे ट्वीट – “काल मावळ तालुक्यातील कुंडमाळा गावाजवळ इंद्रायणी नदीवरचा जुना झालेला लोखंडी पूल कोसळला. त्यात अनेक जणं वाहून गेलेत आणि काही…
अमळनेर : प्रतिनिधी झन्ना मन्ना जुगार खेळणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून धरणगाव, एरंडोल व अमळनेर येथील १२ जणांना अटक करून त्यांच्याजवळून २ लाख ४२० रुपये जप्त करण्यात आले आहेत. पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार टाकरखेडा शिवारातील कंडारी रस्त्यावरील गट नंबर १८० मधील समाधान धर्मा पाटील यांच्या शेतात पत्त्यांचा जुगाराचा अड्डा सुरू आहे. त्यांनी सहायक पोलिस निरीक्षक नामदेव बोरकर, संदीप धनगर, विनोद संदानशिव, अमोल पाटील, जितेंद्र निकुंभे, गणेश पाटील, उज्ज्वलकुमार म्हस्के, प्रशांत पाटील, चरणदास पाटील, उदय बोरसे, राहुल पाटील, नरेश बडगुजर यांच्यासह छापा टाकला. त्यांच्याजवळून २ लाख ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या दोघांनाही…

