Author: editor desk

वरणगाव : प्रतिनिधी शहरातील येथील छत्रपती शिवाजीनगर व रेणुकानगरला जोडणाऱ्या जुन्या महामार्गावरील पुलावर गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात अयुब खान रशीद खान (वय ६५) यांचा मृत्यू झाला. पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. सविस्तर वृत्त असे कि, देवा संतोष गुमळकर (रा. वरणगाव, ता. भुसावळ) हा एम.एच. ३७, एच. ९११९ या दुचाकीने लखन सुरेश बाविस्कर, यश मनोज चावरीया, रोहित मुकेशतरु शाह या चौघा मित्रांसह भरधाव वेगाने जात होता. त्याने समोरून येणाऱ्या एम.एच. १९ ई. एम. ७५२९ या दुचाकीला धडक त्याच दुचाकी चालक आयुब खान रशिद खान (रा. साई पार्क वरणगाव), आणि त्यांचे मागे बसलेले…

Read More

रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील तासखेडा येथे विजेचा धक्का बसून पित्यासह लेकीचा करुण अंत झाल्याची दुर्दैवी घटना तासखेडा (ता. रावेर) येथे शुक्रवारी सकाळी ६ वाजता घडली. समाधान अशोक कोळी (३६) आणि त्यांची मुलगी मानवी कोळी (११) अशी या मृतांची नावे आहेत. समाधान यांच्या वडिलांनाही सुरुवातीला विजेचा धक्का बसला होता, त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात असताना ही घटना घडली. सविस्तर वृत्त असे कि, समाधान यांचे वडील अशोक माधव कोळी हे घरात कापडे टांगण्यासाठी बांधलेल्या तारेवरील रुमाल घेण्यासाठी गेले असता त्या तारेत वीज प्रवाह उतरला होता. रुमालाला स्पर्श होताच तार तुटली आणि ते बाजूला फेकले गेले. हा प्रकार पाहताच समाधान व मानवी हे त्यांना उचलण्यासाठी…

Read More

मेष राशी नोकरीच्या शोधात तुम्हाला घराबाहेर जावे लागू शकते. व्यवसायात अचानक समस्या वाढू शकतात. तुमच्या जवळच्या सहकाऱ्यांचा विश्वास कायम ठेवा. बेकरीच्या कामात गुंतलेल्या लोकांना चांगला नफा मिळेल. वृषभ राशी आज दिवसाची सुरुवात काही चांगल्या बातम्यांनी होईल. कला, लेखन, अभिनय या क्षेत्राशी संबंधित लोकांना जनतेकडून प्रचंड प्रेम आणि पाठिंबा मिळेल. नोकरीत उच्च अधिकाऱ्यांच्या जवळीकतेचा फायदा तुम्हाला मिळेल. जुने वाद मिटतील. मिथुन राशी नोकरीत चांगल्या कामामुळे तुम्हाला आदर मिळेल. राजकारणात काही महत्त्वाची जबाबदारी लोकांना मिळू शकते. न्यायालयीन प्रकरणांमध्ये तुम्हाला यश मिळेल. कामासाठी दुसऱ्या ठिकाणी बदली होऊ शकते. कर्क राशी गायनात रस वाढेल. तुमच्या शहाणपणामुळे व्यवसायात मोठी समस्या टळेल. एखाद्या विश्वासू व्यक्तीकडून तुमची…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील हातले येथे  आज दिनांक 13 जुन 2025 रोजी सामाजिक सभागृह, हातले येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी आमदार चव्हाण यांनी विविध प्रशासकीय विभागांनी शासकीय योजनांची माहिती देणे,लाभार्थ्यांना थेट लाभ देणे यासाठी लावलेल्या स्टॉलची पाहणी केली व उपस्थित अधिकारी – कर्मचारी यांना लोकाभिमुख काम करण्याच्या सूचना दिल्या. समाधान शिबिरे आयोजित करण्यामागची शासनाची भूमिका स्पष्ट करत, शासनाने लोकाभिमुख राज्यकारभाराचे आदर्श उदाहरण असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने सुरू केलेली ही शिबिरे म्हणजे शासन,प्रशासन नागरिकांच्या दारी जाऊन त्यांच्या समस्या सोडवण्याचा व…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. परंतु गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीने यात अचानक ट्विस्ट आला. यावर काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही भाऊ एकत्र आल्यास भाजपला परवडणार नाही. त्यामुळे त्यांना एकत्र येऊ द्यायचे नाही असे भाजपने ठरवल्याचे या भेटीगाठीवरून दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. “ठाकरे बंधुंच्या एकत्रिकरणाचे आम्ही स्वागत केले होते. कुटुंब एकत्र येणार असेल तर त्याला आमचे समर्थन होते. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट राजकीय होती की वैयक्तिक होती याची माहिती आपल्याला नाही. मात्र ठाकरे बंधू एकत्र येणे…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून सोन्याच्या दरात कमी अधिक होत असतांना आता पुन्हा एकदा सोने १ लाख पार झाले आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX) शुक्रवारी सोन्याच्या वायदे दरात २ टक्के म्हणजेच २ हजारांची वाढ झाली. यामुळे सोन्याचा प्रति १० ग्रॅम दर १ लाख ४०० रुपयांवर पोहोचला. तर चांदीचा दर ८०० रुपयांनी वाढून प्रति किलो १ लाख ६ हजारांवर गेला. एमसीएक्सवरील सोने दराचा हा सर्वकालीन उच्चांक मानला जात आहे. इस्रायलने शुक्रवारी पहाटे इराणमधील अनेक ठिकाणांवर हल्ला केला. यात इराणच्या अण्विक तळांचा समावेश आहे. यात इराणचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. इस्रायलने या कारवाईला ‘रायझिंग लायन’ असे नाव दिले…

Read More

जळगाव : प्रतिनिधी कंपनीतून ड्युटी आटोपल्यानंतर पत्नीसोबत जेवण केले. त्यानंतर झोपलेल्या अजय बुधराम पाटील (वय २२, रा. अंबेरी, ता. नेपानगर, मध्यप्रदेश) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना एमआयडीसी परिसरात रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील अंबेरी गावात राहणारा अजय पाटील हा रोजगारासाठी जळगावात आला होता. एमआयडीसीतील एका कंपनीत नोकरी करुन तो कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होता. रात्री कंपनीतून घरी आल्यानंतर पत्नीसोबत जेवण करून, अजय काही वेळासाठी झोपला. या दरम्यान, अजयच्या पत्नीने घरातील आवर-सावर करुन, अजय झोपलेल्या खोलीत गेली. खोलीचा दरवाजा…

Read More

अहमदाबाद : वृत्तसंस्था अहमदाबाद येथून लंडन येथे जाणाऱ्या एअर इंडिया विमानाच्या भीषण अपघातात 265 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असताना, या दुर्घटनेतून एकमेव बचावलेले प्रवासी विश्वास कुमार रमेश यांची कहाणी सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. ब्रिटनमध्ये वास्तव्यास असलेले भारतीय वंशाचे 40 वर्षीय विश्वास कुमार यांनी अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमधून डीडी न्यूजशी संवाद साधला आणि त्या क्षणाचे थरारक वर्णन केले. “एक क्षण वाटलं की मीही मेलोय, पण जेव्हा डोळे उघडले, तेव्हा लक्षात आलं की मी जिवंत आहे. अजूनही विश्वास बसत नाही की मी कसा बचावलो,” असं विश्वास यांनी सांगितलं. अपघाताच्या वेळी ते इकॉनॉमी वर्गामधील डावीकडील खिडकीजवळ, म्हणजेच रांग 11 ए मध्ये बसले…

Read More

अमरावती : वृत्तसंस्था राज्यातील अमरावती जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी, त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती, दिव्यांग, विधवा महिलांना 6 हजार रुपये मानधन, वंचित घटकांचे प्रश्न या मागण्यांसाठी मोझरी येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. त्यांच्या या उपोषणाने राज्य सरकारचे लक्ष वेधले गेले आहे. बच्चू कडू यांना महसूल मंत्री बावनकुळे यांनी फोन केल्याची माहिती समोर अली आहे. परंतु बावनकुळे यांच्याशी झालेल्या संभाषणानंतर कडूंनी नाराजी व्यक्त केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी वापरलेल्या भाषेवर बच्चू कडू यांनी आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले, सरकारने सरकारचे काम करावे, आम्ही आमचे काम करू. शेतकऱ्यांसाठी…

Read More

नागपूर ; वृत्तसंस्था मागील महिन्यात भारताच्या वतीने राबवण्यात आलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे ‘कम्प्युटर गेम’ असल्याचे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे नेते आमदार नाना पटोले यांनी केले आहे. त्यांच्या या विधानावर आता भारतीय जनता पक्षाने देखील टीका केली आहे. नाना पटोले यांचे मन आणि मेंदू भ्रष्ट झाला असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. नाना पटोले यांच्या वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. ‘काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ’ हे पुन्हा एकदा सिद्ध झाले असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे. या संदर्भात त्यांनी एका पोस्टच्या माध्यमातून नाना पटोले यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. या देशद्रोही मानसिकतेला देश…

Read More