चाळीसगाव : प्रतिनिधी सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागांतर्गत चाळीसगाव येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलां-मुलींकरिता शासकीय निवासी शाळा कार्यरत आहे. या शासकीय निवासी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या निवासाची सोय निवासी शाळेच्या आवारातच व्हावी. तसेच, त्यांना निवासी शाळेतील प्रवेशित विद्यार्थ्यांसोबत कायमस्वरूपी राहता यावे, त्यांच्यावर योग्य ते संस्कार करता यावे, यासाठी संबधित शासकीय निवासी शाळेच्या आवारात उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागेमध्ये कर्मचारी निवासस्थान बांधणे तसेच, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने त्यांच्या कला, क्रिडा गुणांना वाव देण्याकरिता आवश्यक सोयी-सुविधा निर्माण करणे आवश्यक होते. आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी देखील या संदर्भात वेळोवेळी शाळेला भेट देऊन सोयी-सुविधा उपलब्ध होण्यासाठी मागणी लाणून धरली केली…
Author: editor desk
अहमदाबाद : वृत्तसंस्था 242 प्रवाशांना घेऊन अहमदाबादवरुन लंडनला निघालेले विमान अहमदाबादमधील रुपानी नगर येथे कोसळल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. टेक ऑफनंतर काही मिनिटांमध्येच विमान कोसळले असून घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. अहमदाबादमधील मेघानी नगर येथे गुरुवारी दुपारी जोरदार आवाज आला आणि परिसरात धूराचे लोट दिसू लागले. काही क्षणांतच हा विमान अपघात असल्याचे स्पष्ट झाले. एअर इंडियाचे हे विमान असून सरदार वल्लभभाई विमानतळावरून दुपारी एक वाजून 17 मिनिटांनी विमानाने टेक ऑफ केले होते. यानंतर काही मिनिटांमध्येच हे विमान मेघानीनगरमधील निवासी भागात कोसळले. एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, AI 171 हे विमान अहमदाबादहून लंडनमधील गॅटविक विमानतळाच्या…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरात विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने दि. ११ रोजी रात्री आठच्या हजेरी लावली. या वादळी पावसामुळे शहरातील झाडे कोसळून रस्ते अडले होते. नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. मेहरूण येथे संतोष चिंधु तायडे यांची गाय वीज पडून ठार झाली. जळगाव-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील पॉलीटेक्निक कॉलेजपासून बांभोरी कॉलेजपर्यंत अनेक झाडे रस्त्यावर कोसळल्यामुळे महामार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने झाडे हटवण्याचे काम स रू केले होते. वादळामुळे शहरातील अनेक घरांच्या आणि दुकानांच्या पत्रे उडून गेले असून, मोठ्या प्रमाणावर मालमत्ता हानी झाल्याचे प्राथमिक अंदाज आहेत. यासंदर्भातील अधिकृत पंचनाम्यासाठी प्रशासनाने आज सकाळपासून चौकशी सुरू करण्याचे आदेश…
फैजपूर : प्रतिनिधी हॉटेलमधील बिलावरून झालेल्या भांडणात जातिवाचक शिवीगाळ का केली, याचा फोनवरून जाब विचारल्याचा राग आल्याने हॉटेल व्यवस्थापक आणि त्याच्या दोन मित्रांना चार जणांनी बेदम मारहाण करत, गावठी कट्टा फिर्यादीवर रोखून त्याला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची ही घटना दि १० रोजी रात्री ११:४५ मिनिटांनी सुभाष चौकात घडली. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेप्रकरणी शेख आरिफ शेख कलीम, शाहरुख शेख, आसिफ शेख, आकीब शेख या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेलचे व्यवस्थापक सुमित उर्फ छोटू मार्तंड साळुंके रा. फैजपूर याला जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली होती सुमित साळुंके याने फोनवरून जाब विचारला होता, याचा…
जळगाव : प्रतिनिधी उपचार करण्यासाठी घेऊन जाते असे सांगून एक अज्ञात महिला ही ज्योतीबाई भगवान बाविस्कर (४७, रा. संत गाडगेबाबा बेघर निवारा केंद्र, जळगाव) या महिलेचे दागिने व मोबाइल घेऊन पसार झाली. हा प्रकार ७ जून रोजी घडला. या प्रकरणी १० जून रोजी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवीन बसस्टँडसमोरील मंदिराजवळ अज्ञात महिला ज्योतीबाई यांना भेटली होती. मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात महिलेने ज्योतीबाई यांना साकेगाव शिवारातील खासगी रुग्णालयात नेले. तेथे त्यांच्याजवळील दागिने, मोबाइल घेऊन पसार झाली. ज्योतीबाई भुसावळ येथे पोलिस ठाण्यात गेल्या असता तिला नशिराबाद पोलिस ठाण्यात जाण्याविषयी सल्ला देऊन त्यांना रिक्षात बसवून देण्यात आले.…
जळगाव : प्रतिनिधी पोलिस ठाण्यात तक्रार का केली, या कारणावरून वाद होऊन एकमेकांना शिवीगाळ करीत सळईने मारहाण करण्यासह कोयत्याने वार करण्यात आले. ही घटना १० जून रोजी पिंप्राळा हुडको परिसरात घडली. परस्परविरोधी तक्रारीवरून एकूण आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातील रहिवासी किरण अर्जुन सोये ( वय३१) यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पिंप्राळा हुडको परिसरातील चार जणांनी त्यांना मारहाण करत जखमी केले. दुसऱ्या गटातील बेबाबाई अभिमान भालेराव यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, आमच्या विरुद्ध पोलिसात तक्रार का केली म्हणत त्यांना चौघांनी मारहाण करून कोयत्याने वार केले. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली…
मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी खूपच चांगला राहील. बऱ्याच काळापासून मनात असलेली एखादी इच्छा आज पूर्ण होऊ शकते, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी असाल. व्यापारी वर्गासाठी आजचा दिवस फायदेशीर ठरेल. तुम्ही व्यवसायाच्या कामासाठी प्रवासाला जाऊ शकता. वैवाहिक आयुष्यात प्रेम वाढेल. तुमचा जोडीदार तुम्हाला कोणतीतरी प्रॉपर्टी खरेदी करण्यास सांगू शकतो. वृषभ राशी आजचा दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी खर्चाचा असेल. तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत शॉपिंगला जायला लागू शकते. ज्यामुळे तुमच्या खिशावर परिणाम होईल. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक बाबतीत आजचा दिवस थोडा कमजोर असू शकतो. कोणत्याही गोष्टीबद्दल अति-आत्मविश्वास ठेवू नका. कामाच्या बाबतीत आजचा दिवस चांगला ठरेल. विवाहित लोकांच्या जीवनात आज थोडा तणाव वाढू शकतो. मिथुन…
पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात अपघाताच्या घटना घडत असतांना पुण्यात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. भरधाव ट्रकने एका महिलेला चिरडले असून या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना पुण्यातील मार्केट यार्ड येथील गंगाधाम चौकात घडली. बुधवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, दीपाली सोनी (वय 29) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तसेच या अपघातात जगदीश पन्नालाल सोनी (वय 61) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या अपघातानंतर मार्केट यार्ड पोलिसांनी ट्रक चालक शौकत आली पापालाल कुलकुंडी (वय 51) यास ताब्यात घेतले असून वैद्यकीय तपासणी केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्केट…
चाळीसगाव : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बनावट सहीचे जॉइनिंग लेटर देऊन मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष दाखवत चाळीसगावमधील एका तरुणीची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चाळीसगाव तालुक्यातील तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील सायगाव येथील तरुणीला मुंबई येथील मंत्रालयात क्लार्क पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवण्यात आले. तिच्याकडे देण्यात आलेले जॉइनिंग लेटर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लेटरपॅडवर आणि बनावट सहीसह तयार करण्यात आले होते. त्यामुळे ते खरे असल्याचा भास झाला. मात्र, मुख्यमंत्री कार्यालयाच्या नियमानुसार अशा लेटरवर संबंधित विभागप्रमुख अथवा सचिवांची सही असते, हे लक्षात आल्यावर…
पुणे : वृत्तसंस्था महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून अनेक महत्वाचे निर्णय घेत असतांना आता महाराष्ट्राच्या परिवहन खात्यातील (एसटी) सर्व बसेस इलेक्ट्रीक करणार असून पुढील 10 वर्षात जुन्या एसटी बसेस टप्प्प्याने बंद केल्या जातील आणि त्या जागी नवीन बसेस येतील, अशी घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुण्यात केली. तसेच राज्यातील सर्व एसटी बस आणि डेपो अद्ययावत करण्याचे काम दोन महिन्यात सुरू होणार असून सुरक्षा आणि स्वच्छता याचा विचार करून काम केले जाईल, असे आश्वासन सरनाईकांनी दिले. प्रताप सरनाईक हे बुधवारी कार्यक्रमानिमित्त पुण्यात होते. माध्यमांशी संवाद साधताना सरनाईक यांनी एसटीच्या विकासाचा प्लानच मांडला. एसटी खात्यात 5 हजार बस घेणार असू तर…

