एरंडोल : प्रतिनिधी तालुक्यातील रिंगणगाव येथील तेजस गजानन महाजन (वय १३) याचा गळा चिरून खून केल्याप्रकरणी दोनजणांना बुधवारी अटक करण्यात आली. यातील तिसरा संशयित मात्र पसार झाला आहे. धक्का लागल्याच्या कारणावरून तीनही जणांनी तेजसला मारहाण केली नंतर एकाने चाकूने गळ्यावर वार करून खून केल्याची कबुली दिली आहे. हरदास डेमशा वास्कले (वय ३५, रा. नांदीया, ता. भगवानपुरा, जि. खरगोन) आणि सुरेश नकल्या खरते (वय ३४, रा. धोपा, ता. झिरण्या, ता. खरगोन) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यातील तिसरा आरोपी रिचडिया तुकाराम कटोले (२०, रा. रा. नांदीया, ता. भगवानपूरा) याच्या शोधासाठी पथक रवाना झाले आहे. सविस्तर वृत्त असे कि, रिंगणगाव येथील…
Author: editor desk
मेष : मेष राशीच्या लोकांसाठी खास दिवस नाही. तुम्हाला काही समस्या आणि अडचणींना तोंड द्यावे लागू शकते. तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल गोंधळलेले असाल. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांना प्रत्येक काम खूप संयमाने करावे लागेल. तसेच, व्यवसाय करणाऱ्यांनाही संघर्षानंतर यश मिळेल. तुमच्यासाठी पैसे मिळण्याची आणि बचतीची चांगली शक्यता आहे. मिथुन : मिथुन राशीच्या लोकांना घरगुती बाबींमध्ये काही समस्या येऊ शकतात. आईचे आरोग्य कमकुवत होऊ शकते. कुटुंबात परस्पर समन्वय आणि सुसंवादाचा अभाव असेल. कर्क : कर्क राशीच्या लोकांची काही महत्त्वाची कामे सध्या अपूर्ण राहणार आहेत. ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. चुकीची संगत किंवा व्यसन टाळा. सिंह : सिंह राशीच्या लोकांना समाजात आदर मिळेल.…
पुणे : वृत्तसंस्था जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीने आज हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत आषाढी वारीसाठी पंढरीच्या दिशेने प्रस्थान केले. देहू गावापासून निघालेल्या या पालखीत विठ्ठल-रखुमाईच्या भेटीची ओढ असणाऱ्या हजारो वारकऱ्यांचा समावेश आहे. संत तुकाराम महाराज यांचा यंदाचा हा 340 वा पालखी प्रस्थान सोहळा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते संत तुकारामांच्या पादुकांचे पूजन झाले. त्यानंतर तुकोबांची पालखीचे पंढरीच्या दिशेने प्रस्थान झाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. तत्पूर्वी, येथील मुख्य मंदिराजवळील शिळा मंदिराच्या समोर वारकऱ्यांनी फुकडी खेळण्याचा आनंद लुटला. यावेळी टाळ – मृदुंगाचा गजर तुकोबांचे नामस्मरण केले जात होते. श्री…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी शरद पवारांबाबत केलेल्या विधानाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. शरद पवार यांनी वेळोवेळी भाजपला मदत केली आहे, शिवाय राज्यात भाजपचं सरकार आणण्यात त्यांचा सिंहाचा नाही तर हत्तीचा वाटा आहे, असा खळबळजनक दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केला आहे. “राज्यात 2014 साली भाजपचे सरकार आणण्यासाठी शरद पवार साहेबांचा सिंहाचा नाही तर हत्तीचा वाटा आहे. वेळोवेळी त्यांनी भाजपला मदत केली आहे. मात्र आता त्यांना एवढा भाजपचा तिटकारा का? तर देशात सर्वात मोठा विरोधक मी व माझा पक्ष, हे दाखवण्यासाठी आणि आपल्या पक्षाचं…
मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्राच्या शैक्षणिक धोरणाबाबत आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याविरोधात राज ठाकरे यांनी शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र लिहिलं. “सरकारचं हे काय धोरण आहे आणि कशासाठी आहे. कारण केंद्रीय शैक्षणिक धोरणात अशी गोष्ट लिहिलेली नाही, त्यात दिलेलं आहे की, राज्य सरकारने संस्कृती पाहून निर्णय घ्यावा. मग राज्य सरकार ही गोष्ट का लादत आहे? IAS अधिकाऱ्यांच्या लॉबीचा दबाव आहे का? त्रिभाषा सूत्र सरकारचा विषय आहे. त्याचा शैक्षणिक धोरणाशी काय संबंध येतो. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहारमध्ये तिसरी कोणती भाषा शिकवणार आहात?” असा सवाल राज ठाकरे यांनी केला. “गुजरात काऊन्सिल एज्युकेशन रिसर्च अँड…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही महिन्यापासून शालेय शिक्षण विभागाने हिंदी भाषा पहिल्या इयत्तेपासून तिसरी भाषा म्हणून घोषित केल्याने प्रचंड विरोध झाला. त्यानंतर शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यावर हा निर्णय मागे घेण्याची वेळ आली. पण त्याबाबत लेखी निर्णय जाहीर करण्यात आला नाही. राज्य सरकारने इयत्ता पहिलीपासूनच त्रिभाषा सूत्र स्वीकारले असून मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये तिसरी भाषा ही हिंदी अनिवार्य, असा शासन निर्णय केला आहे. त्यानुसार, मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये यापुढे इयत्ता 1ली ते 5वी साठी हिंदी ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असेल, परंतु ज्या विद्यार्थ्यांनी हिंदी या तृतीय भाषेऐवजी इतर भारतीय भाषांपैकी एक भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्याची…
एरंडोल : प्रतिनिधी तालुक्यातील कासोदा येथील सुतार गल्लीमध्ये राहणाऱ्या समाधान संतोष वाघ (वय ३२) या युवकाने १६ रोजी रात्री जेवण केल्यानंतर रात्री गळफास घेतल्याची घटना सकाळी ९ वाजता उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, समाधान वाघ यांचा चुलत भाऊ प्रकाश बाळू वाघ हे समाधान यांच्याकडे मोबाईलचे चार्जर घेण्यासाठी गेले असता समाधान याने गळफास घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले. या नंतर समाधान याला प्राथमिक उपचारासाठी तत्काळ एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यास मयत घोषित केले. एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर कासोदा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. तपास कासोदा येथील स.पो. नि. नीलेश राजपूत यांच्या मार्गदर्शनात…
भडगाव : प्रतिनिधी सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या मेसेजचा राग अनावर झाल्याने गॅरेज चालकावर चाकूहल्ला करण्याची घटना भडगाव-बाळद रोडवर घडली. याबाबत एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जखमी झालेल्या गॅरेज चालकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी महेश विश्वनाथ पाटील (२७, बाळद बु, ता. पाचोरा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. बाळद खु, येथील आपल्या मित्राची पत्नी ही तिच्या आई-वडिलांकडे निघून गेली होती. त्यानंतर पतीने पत्नीकडे जावून त्याच्या दोन्ही मुली घरी येथे घेउन आला होता. या मुलींची चौकशी करण्यासाठी त्याच्या पत्नीने महेशला मुलींची खुशाली विचारण्यासाठी सोशल मीडियावर मेसेज केला होता. ही बाब मित्राच्या भावास आवडली नाही. याचा त्यास राग आला होता. मंगळवारी…
जळगाव : प्रतिनिधी घरगुती गॅस सिलिंडरमधून व्यावसायिक सिलिंडरमध्ये गॅस भरणाऱ्यांवर शनिपेठ पोलिसांनी कारवाई करीत ६१ गॅस सिलिंडर व साहित्य जप्त केले. ही कारवाई मंगळवारी (१७ जून) दुपारी असोदा रस्त्यावर पत्र्याच्या शेडमध्ये करण्यात आली. याप्रकरणी नारायण दाजीबा सोनवणे (वय ६०), राहुल नारायण सोनवणे (२९, रा. दोघे रा. दिनकरनगर), आदेश राजू पाटील (२३, रा. दिनकरनगर) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, असोदा रस्त्यावरील पिवळी भिंत परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये घरगुती गॅसचा काळाबाजार होत असल्याची माहिती शनिपेठ पोलिसा ठाण्याच्या पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना मिळाली. त्यांनी गुन्हे शोध पथकातील पोहेकॉ शशिकांत पाटील, प्रदीप नन्नवरे, कमलेश पाटील विक्की इंगळे, गजानन वाघ,…
जळगाव : प्रतिनिधी कौटुंबिक वादाविषयी तडजोड झाल्यानंतर पत्नीला घेण्यासाठी गेलेले योगेश रामचंद्र सोनवणे (३२, रा. रिंगणगाव, ता. एरंडोल) यांना शालकाने जबर मारहाण केली. तसेच पत्नीसह शालकाच्या पत्नीनेही शिवीगाळ केली. ही घटना दि. १६ जून रोजी तालुक्यातील आसोदा येथे घडली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, योगेश सोनवणे व त्यांची पत्नी सपना सोनवणे यांच्यामध्ये कौटुंबिक वाद असल्याने त्याविषयी महिला दक्षता समितीमध्ये तक्रार करण्यात आली होती. त्यामध्ये तडजोड झाली व योगेश हे आसोदा येथे पत्नीला घेण्यासाठी गेले. त्यावेळी शालकाच्या पत्नीने ‘माझ्या नवऱ्याला उठविण्याच्या धमक्या देत असतात’, असे म्हणत वाद घातला व शिवीगाळ केली. त्यावेळी योगेशची…

