पुणे : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यात मराठी व हिंदी भाषेचा वाद सुरु असून आता राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा विषयाच्या सक्तीवरुन वातावरण तापले आहे. हिंदी सक्तीच्या वाढत्या विरोधानंतर राज्य शासनाने एक पाऊल मागे घेतले आहे. त्रिभाषा सूत्रासंदर्भात साहित्यिक, भाषातज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील हिंदी सक्तीच्या निर्णयावरून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत हिंदी सक्ती नको, अशी भूमिका मांडली. “कोणत्याही भाषेला विरोध नाही. त्या दोन्ही भाषा लोकांना येतात. पहिलीपासून विद्यार्थी जेव्हा मराठी…
Author: editor desk
पुणे : वृत्तसंस्था राज्यातील महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्यावर पक्षातीलच अनेक मोठे नेते नाराज असल्याचे समोर आले आहे. पक्षांतर्गत या नाराजी मुळे पक्षात असंतोषाचे वारे वाहताना दिसत आहेत. ज्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांवर अजित पवार यांची पकड मानले जाते, त्या पुण्यातीलच अनेक बडे नेते हे नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये पक्षातील काही माजी आमदारांचा देखील समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे देवेंद्र भुयार, जुन्नरचे अतुल बेनके, दिलीप मोहिते पाटील, यशवंत माने, बाळासाहेब आजबे, सुनील टिंगरे हे पक्षात प्रचंड नाराज आहेत. पक्षातील कोणत्याच बैठकीला आपल्याला बोलावले जात नाही. तसेच…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील एका परिसरात राहणाऱ्या एका ४१ वर्षीय महिलेला मारहाण करीत तिचा विनयभंग केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर तिच्या मुलांना देखील जबरदस्तीने हिसकावून घेतले. या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील एका भागात राहणाऱ्या विवाहितेला ननंद, नंदोई भाऊ आणि ननंदचा मुलगा यांनी एकत्र येऊन तिच्या चार मुलांना जबरदस्तीने हिसकावून घेतले. त्यानंतर घरात घुसून सार्वजनिक ठिकाणी, गल्लीतील लोकांसमोर महिलेला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. तसेच विवाहितेचा विनयभंग करत तिला घरातून हाकलून दिले आणि जीवे मारण्याची धमकी देखील दिली. या संतापजनक घटनेनंतर पीडित महिला थेट भुसावळ शहर पोलीस ठाण्यात…
बोदवड : प्रतिनिधी रिक्षा अपघातात तरुणाच्या मृत्यूप्रकरणी येथील पोलिसांत रिक्षाचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, जामनेर-बोदवड रस्त्यावर रिक्षाने (एम. एच.१९/ बी. यू. ४६०७) शिरसाळा मारोतीच्या दर्शनाला नाशिक सातपूर येथील मंगळकर कुटुंबीय जात असताना २१ रोजी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान रिक्षाचालक दीपक भास्कर नेवल याने जय माँ वैष्णवी जिनिंगजवळ पुढे चालणाऱ्या चारचाकीला ओव्हरटेक करण्याच्या नादात रिक्षा पलटी झाली. त्यात एकाच कुटुंबातील सात जण गंभीर जखमी झाले होते. तर योगेश ज्ञानदेव मंगळकर याचा दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबत मयत योगेश मंगळकर याचा लहान भाऊ वैभव ज्ञानदेव मंगळकर याने बोदवड पोलिसांत सदर अपघाताची फिर्याद दिल्यानंतर आरोपी रिक्षाचालक दीपक…
अमळनेर : प्रतिनिधी अमळनेर येथील मोज्जम शेख शब्बीर याला एक वर्ष आणि अडावद, ता. चोपडा येथील संजय रवींद्र इंगळे याला तीन महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले असल्याची प्रांताधिकारी माहिती नितीनकुमार मुंडावरे यांनी दिली. अमळनेर शहरातील गांधलीपुरा भागातील दर्गाअली भागातील मोज्जम शेख शब्बीर याच्यावर चोरी, घरफोडी, मालमत्ता नुकसान, मारहाण यासारखे गुन्हे आहेत. पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी मोज्जम विरोधात हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून उपअधीक्षक विनायक कोते यांच्याकडे पाठवला. त्यावर सुनावणी घेऊन उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी मुंबई पोलिस अधिनियमाप्रमाणे मोज्जम याला जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले आहे. अडावद, ता. चोपडा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पिंप्री येथील संजय रवींद्र इंगळे याच्यावर…
जळगाव : प्रतिनिधी जिल्हा पोलिस दलातील १९ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील आदेश सोमवारी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले असून, बदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये ६ सहायक पोलिस निरीक्षक तर १३ पोलिस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. या बदली प्रक्रियेत चार अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्या झाल्या आहेत. बदली प्रक्रियेचे आदेश जारी झाल्यानंतर संबधित पोलिस अधिकाऱ्यांना नवीन नेमणुकीच्या ठिकाणी तत्काळ हजर व्हावे लागणार आहे. सहायक पोलिस निरीक्षकांमध्ये अजयकुमार वाढवे यांची यवतमाळ येथून यावल, संजय निकुंभ पुणे शहरातून पाचोरा, नितीन पाटील यांची नाशिक येथून भुसावळ बाजारपेठ, गणेश फड यांची नियंत्रण कक्षातून आर्थिक गुन्हे शाखेत, योगीता नारखेडे यांची मानव संसाधन विकास विभागातून एएचटीयू…
मेष: व्यावसायिकांसाठी नवीन भेटवस्तू घेऊन येईल. तुमची कार्यशैली तुम्हाला कामाच्या ठिकाणी प्रसिद्धी देईल. तुमच्या आरोग्याबाबत कोणतीही चूक करू नका. वृषभ: हॉटेल, मॉडेल, अन्न आणि ज्यूस किंवा रेस्टॉरंट व्यवसायिकांना आता यश मिळू लागेल. तुमची व्यावसायिक वाढ शक्य आहे, तुम्ही तुमच्या बॉसशी चांगले संबंध ठेवावेत. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ तुमच्या कुटुंबासाठी खूप चांगला आहे, फक्त स्वतःची जास्तीत जास्त काळजी घ्या. मिथुन: तुम्ही वडिलोपार्जित व्यवसाय करत असाल तर तुम्हाला काही नुकसान सहन करावे लागू शकते, वेळेत त्यात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करा. बेरोजगारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. आई किंवा वडिलांना आरोग्याशी संबंधित समस्या येऊ शकतात. कर्क: व्यवसायाच्या वाढीमध्ये आता नवीन ऊर्जा परत येईल. सरकारी…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव – भुसावळ महामार्गावरील स्वामी नारायण मंदिराजवळील महामार्गांवर दोन ट्रकची जोरदार धडक झाल्याने या अपघातात एका ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा चालक हा गंभीर जखमी झाला. हा अपघात मंगळवारी रोजी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास घडला. सविस्तर वृत्त असे कि, ओडिशा पासिंगचा ट्रक (क्रमांक ओडी 15 सी.2963) व राजस्थान पासिंगचा ट्रक (क्रमांक आर.जी.14 जेटी 0421) यांच्यात समोरासमोर धडक झाली. अपघातानंतर एका ट्रकमधील चालक कॅबिनमध्ये अडकल्याने दोरीच्या सहाय्याने ओढून त्याला बाहेर काढण्यात आले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला. दुसर्या ट्रकचा चालक गंभीर जखमी असून त्याच्या डोळ्याला मोठी इजा झाली आहे. त्यास तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले…
पुणे : वृत्तसंस्था संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेनं विठुरायाकडे निघाला आहे. माऊलीच्या पालखी आज जेजूरीमध्ये दाखल झाली. रविवारी दिवे घाट पार करून पालखी सासवड मुक्कामी पोहोचली असून, येथे मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होती. दिवे घाट सर केल्यानंतर माऊलीच्या पालखीत सोळ्यातील बैल उधळला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पंढरीच्या वाटेत काही ठिकाणी पावसाच्या सरींचा अनुभव येतोय. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत वारकरी आपली सेवा व भक्तीभावात तल्लीन होत वाट चालत आहेत. दिवे घाट पार केल्यानंतर सासवड जवळ अचानक गर्दीमुळे बैल उधळला. सासवडच्या जवळ माऊलीची पालखी विसावाल्या थांबली होती, त्यावेली गर्दीमुले एक बैल उधळला. दोन दिवसांपूर्वी ही घटना…
नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील नाशिक येथील त्र्यंबकेश्वर परिसरात पावसाची संततधार कायम असल्याने गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी, सोमवारी (दि.23 ) दुपारी 2 वाजता या धरणातून 6 हजार 160 क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे गोदावरीला हंगामात दुसर्यांदा पूर आला आहे. नदीचा जलस्तर मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याने नागरिकांनी सुरक्षेसंबंधी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जिल्ह्यात सर्वदूर पर्जन्यवृष्टी होत असल्याने धरणांच्या पाण्याच्या पातळीत समाधानकारक वाढ होऊ लागली आहे. परिणामी, अपवाद वगळता सर्वच धरणांतून विसर्ग करण्यात येत आहे. गंगापूर धरणातील जलसाठा ६१.८७ टक्क्यांवर गेल्याने शुक्रवारपासून धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. हा विसर्ग…

