जळगाव : प्रतिनिधी मद्यपी मुलाकडून कुटुंबियांना सातत्याने शिविगाळ व मारहाण होत असल्याने त्यास कंटाळून पित्यानेच मुलाच्या डोक्यात भला मोठा दगड टाकून त्याचा खून केला तर भावासह काकाने मृतदेहाची विल्हेवाट मदत केल्याचा प्रकार फत्तेपूर पोलिस ठाणे हद्दीत घडला. सुरूवातीला अनोळखी वाटणार्या पुरूषाची ओळख पटल्यानंतर संयुक्त तपासात खुनाचा प्रकार उघड होवून तिघांना बेड्या ठोकण्यात यंत्रणेला यश आले. सविस्तर वृत्त असे कि, जामनेर तालुक्यातील फत्तेपूर पोलीस स्टेशन हद्दीत कसबापिंप्री ते पिंपळगांव चौखांबे रस्त्यावर रविवार, 22 जून रोजी रोजी सकाळी सात वाजतात अनोळखीचा मृतदेह आढळला. घातपाताचा प्रकार लक्षात घेता पोलिसांनी ओळख पटवण्यावर भर दिला. मयत हा कसबा पिंप्री गावातीलच राहणार असल्याची व शुभम धनराज…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी शेतामधील खांबाजवळ शिडी लावून काम करीत असताना त्यावरून पडल्याने कैलास भिकाजी महाजन (५२, रा. गणेशवाडी) यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (२२ जून) दुपारी दोन वाजेच्या सुमारास शिरसोली शिवारामधील शेतात घडली. सविस्तर वृत्त असे कि, गणेशवाडी परिसरातील टेन्ट हाऊसचे मालक कैलास महाजन यांचे शिरसोली शिवारात शेत आहे. रविवारी ते शेतातील एका खांबाजवळ शिडी लावून काम करीत होते. त्यावेळी शिडीवरून ते खाली पडले व त्यांच्या बरगड्यांना मार लागला. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. बराच वेळ ते व्यवस्थित बोलतही होते. मात्र, नंतर अचानक प्रकृती खालावली व त्यांचा मृत्यू झाला. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. मयताच्या…
जळगाव : प्रतिनिधी वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या रिक्षा बाजूला घेण्याचे सांगितल्याने एका रिक्षा चालकाने विरोध करीत त्याच्यासह काही जण साखळदंड घेऊन वाहतूक पोलिसांच्या अंगावर धावून आले. हा प्रकार २१ जून रोजी बेंडाळे चौकात घडला. या प्रकरणी रिक्षाचालक अरुण रामदास टिलोरे (६७, रा. समतानगर) याच्यासह पाच जणांविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी ज्ञानेश्वर कोळी, गणेश नेटके, विशाल पाटील हे बेंडाळे चौकात वाहतूक नियंत्रण करीत होते. पथकाने वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या रिक्षा व फळविक्रेत्यांच्या हातगाड्या रस्त्याच्या बाजूला लावण्यास सांगितले. तेथील अरुण टिलोरे या चालकाने रिक्षा (क्र. एमएच १९, सीडब्ल्यू…
जळगाव : प्रतिनिधी पत्नी मुलीसह माहेरी गेलेली असताना प्रमोद धनराज सोनवणे (३७, रा. कुसुंबा, ता. जळगाव) यांनी मोबाइलमध्ये चित्रीकरण करीत गळफास घेत आत्महत्या केली. २१ जून रोजी ही घटना घडली. पत्नी घरी आल्यावर तिने दरवाजा उघडताच पती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. सविस्तर वृत्त असे कि, पेंटर असलेले प्रमोद सोनवणे यांची पत्नी आठ वर्षीय मुलीसह आसोदा येथे माहेरी गेलेली होती. त्यावेळी घरी एकटेच असलेल्या सोनवणे यांनी घराच्या समोरील दरवाजाला बाहेरून कुलूप लावले आणि चावी शेजारच्यांकडे दिली. त्यानंतर, त्यांनी मागील दरवाजाने घरात जाऊन आतून कडी लावली व गळफास घेतला. पत्नी परतल्यानंतर तिने शेजारच्यांकडून चावी घेत दरवाजा उघडला असता, पती गळफास घेतलेल्या अवस्थेत…
मेष राशी मेष राशीसाठी आजचा दिवस सामान्य राहील. तुमचे आरोग्य उत्तम राहील. आज तुम्ही एखाद्या लांबच्या प्रवासाला जाऊ शकता. वाहन जपून चालवा. मित्रांकडून आर्थिक मदत मिळेल. व्यवसायात फायदा होईल. कुटुंबासोबतचे संबंध सुधारतील. वृषभ राशी वृषभ राशीसाठी आजचा दिवस धावपळीचा असेल. तुमचे मन अशांत राहू शकते. तब्येत बिघडू शकते. व्यवसायात संयमाने निर्णय घ्या. कारण एखादी मोठी डील हातातून निसटण्याची शक्यता आहे. कुटुंबात पत्नीसोबत मतभेद होऊ शकतात. मिथुन राशी मिथुन राशीसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुमचे एखादे अडलेले जुने काम पूर्ण होईल. ज्यामुळे मनात प्रसन्नता राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आरोग्यात चढ-उतार राहतील. व्यवसायातही लाभाचे योग आहेत. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तुम्ही…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील मोहराळा येथील गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 19 वर्षीय तरुणाचा शुक्रवारी विहिरीत मृतदेह आढळून आला. कुटुंबियांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. या घटनेमुळे गावात प्रचंड तणाव निर्माण होत संतप्त जमावाने एकाचे चारचाकी वाहन फोडले असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक गावात दाखल झाले. एका कुटुंबातील काही जणांना पोलिसांनी चौकशीकरता ताब्यात घेतले आहे. मोहराळा गावातील साहिल शब्बीर तडवी (वय 19) हा 16 जूनपासून बेपत्ता झाला होता. त्याचा शोध घेण्यात आला मात्र, तो कुठेच मिळून आला नाही. म्हणून यावल पोलिसात हरवल्याची तक्रार नोंदवली होती. दरम्यान, या तरुणाचा मृतदेह शुक्रवारी मोहराळा गावापासून वड्रीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील शेत विहिरीत मिळून आला.…
जळगाव : प्रतिनिधी “जिथे स्त्री सक्षम आहे, तिथे कुटुंब समृद्ध असतं आणि जिथे कुटुंब समृद्ध आहे तिथे समाज उन्नत होतो. महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा मार्ग स्वीकारला, हेच खरं सशक्तीकरण आहे, आणि त्या सशक्ततेचं प्रतीक म्हणजे ‘बहिणाई मार्ट’,” असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं. पाळधी-बांभोरी परिसरातील स्त्री शक्ती महिला प्रभाग संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते ‘बहिणाई मार्ट’ या उपक्रमाचं भूमिपूजन पार पडलं. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या वेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले, सरकार तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. गावागावातल्या घराघरातून उद्योजिका तयार…
पुणे : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधूनी एकत्र येण्याच्या जोरदार चर्चा सुरु असतांना आता मनसेच्या नेत्यांनी थेट शिवसेनेच्या नेत्यांना टोला लगावला आहे. ट्रम्पपासून गल्लीतल्या नगरसेवकाला प्रश्न विचारणारे आम्हाला सल्ले देतात की प्रश्न विचारू नका. मग आमचाही सल्ला आहे ताटातल्या चमच्यांनी ताटातच राहावं बाहेर येऊन घास भरवण्याचा प्रयत्न करू नये, असे ट्विट करत मनसे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी शिवसेनेच्या नेत्यांना टोला लगावला आहे. संदीप देशपांडेंनी पुढे म्हटलंय की, जे बोलायचं आहे ते तुमचे आणि आमचे पक्ष प्रमुख बोलतील तुमची चमचेगिरी आणि चमकोगिरी बंद करा, त्यांनी आपल्या ट्विटमध्ये कोणाचे नाव घेतले नसले तरी उबाठाचे खासदार संजय राऊत यांना…
बीड : वृत्तसंस्था जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडची बीड तुरुंगात प्रकृती बिघडली आहे. त्याची तुरुंगातच वैद्यकीय पथकाकडून तपासणी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, कराडला शुगर आणि कमी रक्तदाबाचा त्रास जाणवत आहे. सध्या वैद्यकीय पथक त्याच्यावर लक्ष ठेवून आहे आणि तब्येतीत अधिक बिघाड झाल्यास त्याला रुग्णालयात दाखल केले जाण्याची शक्यता आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून वाल्मीक कराड ओळखले जातात. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांच्यावर मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा दबाव निर्माण झाला होता. अखेरीस त्यांनी प्रकृती कारण पुढे करत मंत्रिपदाचा राजीनामा दिला. दरम्यान, वाल्मीक कराडला कठोर शिक्षा व्हावी यासाठी या प्रकरणाचे वकीलपत्र प्रसिद्ध…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील भोकर येथे दि. २० जूनला विनापरवाना व अत्यंत निर्दयीपणे वाहनामध्ये गुरे कोंबून त्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर तालुका पोलिसांनी कारवाई करीत गुरांची सुटका केली. या वाहनातील एका अडीच वर्षीय वासराचा मृत्यू झाल्याचे आढळून आली आले. या प्रकरणी वाहनचालक व गुरे मालकाविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील भोकर येथे एका ट्रकमधून (जीजे ०३, बीडब्ल्यू ८७५६) गुरे वाहतूक होत असल्याचे आढळून आले. चालकाकडे गुरे वाहतुकीचा कोणताही परवाना नव्हता. पाच गायी, सहा लहान वासरू यांना बांधून दाटीवाटीने वाहनात कोंबलेले होते. तसेच एक अडीच वर्षीय वासरू मतावस्थेत आढळले. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल प्रवीण कोळी…

