Author: editor desk

अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील प्र. डांगरी येथील ६७ वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्जबाजारी झाल्याच्या ताण तणावातून विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना २२ रोजी रात्री घडली. सविस्तर वृत्त असे कि, प्र. डांगरी येथील अल्पभूधारक शेतकरी विनोद रामराव शिसोदे (वय ६७) हे २२ रोजी दुपारी ३ वाजता कुणाला काहिही न सांगता घरातून निघून गेले होता. त्यांचा मुलगा राहुल व पुतण्या राकेश शिसोदे यांनी त्यांचा शोध घेतला असता ते मारवड रस्त्याकडे गेल्याची माहिती मिळाली. मारवड रस्त्यालगत शेतांमध्ये शोध घेतला असता ते गावातील पुष्पाबाई शिसोदे यांच्या शेतात बेशुद्ध अवस्थेत मिळाले. तर त्यांच्याजवळ विषारी औषधाची बाटली ही पडली होती. यानंतर त्यांना तत्काळ खासगी वाहनाने…

Read More

जळगाव : प्रतिनिधी गर्दीचा फायदा घेत बसमध्ये चढणाऱ्या ज्योती प्रमोद वाघ (वय ४७, रा. ह.मु. पांडुरंग नगर, मूळ रा. हिवरखेडा, जामनेर) या आरोग्य सेविकेच्या गळ्यातून ७० हजार रुपयांची १३ ग्रॅम वजनाची सोनपोत चोरट्याने चोरुन नेली. ही घटना दि. २१ रोजी दुपारच्या सुमारास नवीन बस स्थानक परिसरात घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, जामनेर तालुक्यातील हिवरखेडा येथील ज्योती प्रमोद वाघ या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात आरोग्य सेविका असून त्या सद्या त्या जळगावातील पांडुरंग नगरात राहतात. दि. २१ रोजी सुट्टी असल्याने दुपारी गावी जाण्यासाठी बस स्थानकात आल्या. त्या जामनेर बस मध्ये चढत असतांना त्यांना…

Read More

भडगाव : प्रतिनिधी तालुक्यातील मांडकी येथील ग्रामसेवक सोनिराम शिरसाठ (रा. पाचोरा) व रोजगार सेवक जितेंद्र चौधरी (रा. पाचोरा) यांना घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी व गट नंबर नमुना आठ मिळवून देण्यासाठी ५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. तक्रारदाराने दि. २३ जून रोजी तक्रार दाखल करण्यात आली. त्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  पडताळणी केली. सहा हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. अखेर तडजोडीनंतर लाचेची रक्कम पाच हजारांवर आली होती. त्यानुसार विभागाने सापळा रचला आणि दोघांना लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलिस निरीक्षक नेहा सूर्यवंशी, तपास अधिकारी निरीक्षक नेत्रा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Read More

भडगाव : प्रतिनिधी तालुक्यातील घोडदे येथे अवैध वाळू वाहतूक करताना पकडलेले दोन ट्रॅक्टर तहसील कार्यालयात आणत असताना २२ रोजी रात्री वाळू माफियांनी डोळ्यावर वाळू फेकत दोन ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) व एक कर्मचाऱ्यास मारहाण केली. याबाबत १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. प्रशांत भिका कुंभारे, विशाल सुर्यवंशी आणि मेहमूद जब्बार खाटीक अशा मारहाण झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री भडगाव तहसील कार्यालयातील पथक गस्तीवर होते. त्यावेळी घोडदे शिवारात वाळूने भरलेले दोन ट्रॅक्टर आढळून आले. बेकायदा वाळू वाहतूक करणारे हे दोन्ही ट्रॅक्टर पुढील कारवाईसाठी तहसील कार्यालय भडगाव येथे आणले जात होते. त्याचवेळी…

Read More

मेष : मेष राशीच्या लोकांसाठी दिवस खूप चांगला जाणार आहे. तुमच्या मनाप्रमाणे खर्च करण्याचे वातावरण तयार होईल, त्यामुळे खरेदी करून तुम्हाला आनंद मिळेल, तुम्हाला बाहेरील व्यक्तीकडून किंवा बाहेरील ठिकाणाकडून फायदा मिळू शकतो. वृषभ: वृषभ राशीच्या लोकांसाठी दिवस खूप चांगला राहणार आहे. तुम्हाला फक्त तुमच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करावे लागेल, इतरांच्या समस्यांमध्ये अडकल्याने नुकसान होऊ शकते. मिथुन: मिथुन राशीच्या लोकांसाठी कामात प्रतिकूल परिस्थिती येऊ शकते. तथापि, दुपारी तुमची परिस्थिती थोडी सुधारेल आणि तुम्ही सुटकेचा नि:श्वास सोडू शकाल. कर्क: कर्क राशीच्या लोकांसाठी दिवस थोडा त्रासदायक असेल. सुरुवातीला कुटुंबातील सदस्यांशी मतभेद आणि वाद वाढतील. पैशाचा खर्च आणि नफा कमी झाल्यामुळे मानसिक अशांतता राहील.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी खोटे नगर परिसरातील सेवानिवृत्त परिचारीका महिलेचा खून करून लाखोंची रक्कम लंपास केल्याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या आरोपींकडून जप्त करण्यात आलेली ३० लाख रुपये रक्कम सोमवारी २३ जून रोजी दुपारी १ वाजता मयत महिलेच्या नातेवाईकांना परत करण्यात आली. अशी माहिती पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे. सविस्तर वृत्त असे कि, नाशिक येथील रहिवाशी असलेल्या सेवानिवृत्त परिचारीका असलेल्या स्नेहलता अनंत चुंबळे यांच्याजवळील ३० लाख रुपये मिळवण्याच्या लालसेपोटी कट रचला २० ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास संशयित आरोपी जिजाबराव अभिमन्यू पाटील (वय ४८, रा. अमळनेर, मूळ रा. खडकीसिम, ता. चाळीसगाव) आणि विजय रंगराव निकम…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था गेलीय काही दिवसापासून राज्याच्या राजकारणात राज व उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीची चर्चा आहे. पण मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सोमवारी एका पोस्टद्वारे ठाकरे गटावर जहरी टीका केल्यामुळे या युतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आम्ही नवीन आहोत, पण कधी केम छो वरळी म्हणत आम्ही कुणाचेही पाय चाटले नाहीत, असे त्यांनी म्हटेल आहे. दरम्यान, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी संतप्त प्रतिक्रिया देत महाराष्ट्र व मराठी माणसाच्या हितापुढे सगळ्या प्रकारच्या टीकाटिप्पणी क्षुल्लक असल्याचे स्पष्ट केले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्र हितासाठी तथा मराठी माणसाच्या भल्यासाठी जुने वाद…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ वर लिहिलेल्या एका स्तंभात त्यांनी पंतप्रधान मोदींना भारतासाठी एक प्रमुख संपत्ती म्हणून वर्णन केले आहे. ते म्हणाले की, “पंतप्रधान मोदींची ऊर्जा, सक्रियता आणि इच्छाशक्तीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला बळकटी मिळाली आहे. यापूर्वीही त्यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले होते, त्यानंतर ते विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. शशी थरूर यांनी लिहिले की, “पंतप्रधान मोदींची ऊर्जा, गतिमानता आणि सहभाग घेण्याची तयारी यामुळे भारत जागतिक स्तरावर एक मजबूत स्थानावर पोहोचला आहे. ते भारतासाठी एक प्रमुख संपत्ती आहेत, परंतु या मोहिमेला अधिक पाठिंब्याची आवश्यकता आहे.” त्यांनी असेही…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला गेल्या काही महिन्यापासून अनेक धक्के बसत असतांना आता आमदार भास्कर जाधव यांनी केलेल्या एका विधानाची सध्या चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. शरद पवारांना सोडून चूक केली, असे विधान भास्कर जाधव यांनी केले आहे. भास्कर जाधव हे सुरुवातील शिवसेनेत होते. पक्षनेतृत्वाशी मतभेद झाल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर भास्कर जाधव यांनी पुन्हा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. भास्कर जाधव यांनी एका मुलाखतीत पवारांना सोडून शिवसेनेत दाखल होणे, ही माझी आयुष्यातील सर्वांत मोठी चूक होती असे म्हटले होते. याबाबत विचारले असता भास्कर जाधव म्हणाले की, “शरद पवारांची साथ सोडण्याचा निर्णय चुकीचा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील अनेक ठिकाणाहून मोबाईल मोबाईल चोरीच्या घटना सातत्याने घडत असतांना या घटनांना आळा घालण्यासाठी एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत चोरीचे तब्बल ३३ मोबाईल हस्तगत करण्यात आले असून, तरुण नोरसिंह गुजरिया (वय २३, रा. इंदूर, मध्य प्रदेश) या संशयित आरोपीला कासमवाडी परिसरातून अटक करण्यात आली आहे. अशी माहिती पोलीस अधिक्षक महेश्व रेड्डी यांनी सोमवारी २३ जून रोजी दुपारी १ वाजता पत्रकार परिषदेत दिली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी आणि अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी श्री. संदीप गावीत…

Read More