धरणगाव : प्रतिनिधी शहरातील जवाहर रोडवरील श्रीराम मंदिरासमोर राहणाऱ्या वृद्ध महिलेवर भरदिवसा अज्ञात हल्लेखोराने घरात घुसून जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात लीलाबाई रघुनाथ विसपुते (७३) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर सध्या जळगावमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सविस्तर वृत्त असे कि, लिलाबाई विसपुते आपल्या मुलीकडे काही दिवसांसाठी आल्या होत्या. दुपारी ३:१५ वाजेच्या सुमारास त्या खोलीत विश्रांती घेत असताना अज्ञात हल्लेखोराने मागच्या दरवाजातून घरात प्रवेश करून त्यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने आठ ते नऊ वार केले. यामध्ये त्यांचा डावा हातही गंभीर जखमी झाला असून एक बोट तुटले आहे. हल्ल्यावेळी कुटुंबातील सदस्य हॉलमध्ये होते. नातू तेजस पोतदारने घरात प्रवेश करताना मागच्या दरवाजातून एक…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी नवीन बसस्थानक परिसरात प्रवाशांचे खिसे कापून चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश झाला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी दुपारी ४ वाजता अमरावती जिल्ह्यातील तीन संशयित आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून रोकड, पाच मोबाइल आणि एक कार असा एकूण साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या जनसंपर्क विभागाने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना या टोळीवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते. स्थानिक गुन्हे शाखा पथकातील पोलिस कॉन्स्टेबल प्रवीण भालेराव आणि अक्रम शेख यांना गुप्त माहिती मिळाली की, अमरावती येथील काही रेकॉर्डवरील खिसेकापू गुन्हेगार बसस्थानक परिसरात सक्रिय आहेत. त्यांनी ही माहिती तत्काळ वरिष्ठांना दिली.…
चोपडा : प्रतिनिधी मामलदे शिवारातील चोपडा- चुंचाळे रोडवर बुधवारी रात्री दरोड्याच्या तयारीत असलेल्या पुणे येथील सहा अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी शिताफीने अटक केली. यामध्ये तीन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहर पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, पोलिसांनी पथक तयार केले होते. बुधवारी रात्री मामलदे शिवारातील चोपडा-चुंचाळे रोडवर अंधारात निर्जनस्थळी उभी असलेली कार शिताफीने शोधून काढली. या कारमध्ये सहाजण दडून बसले होते. त्यांना ताब्यात घेत चौकशी केली असता लोखंडी टॉमी, मिरचीपूड, दोर असे घरफोडी करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य मिळून आले. चारचाकी वाहन, मोबाईल असा मिळून एकूण १० लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल यावेळी पोलिसांनी जप्त करून…
जामनेर : प्रतिनिधी नेरी येथून फत्तेपूरकडे गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी जप्त केले. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी घडली. सविस्तर वृत्त असे कि, नेरी येथे स्वयंम ईश्वर कुमावत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २४ रोजी दुपारी नेरी येथून फत्तेपूरला पिकअप वाहनात पाच बैलांची वाहतूक अवैध केली जात होती. कुमावत व त्याच्या मित्रांनी वाहनचालकाला बैल कोठे नेत असल्याचे विचारल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे पोलिसांनी वाहन नेरी दूरक्षेत्र पोलिस ठाण्यात आणले आहे. पोलिसांनी राकेश रघुनाथ रागडे (रा. भराडी, ता. सिल्लोड) व सयद अरबाज सयद नूर (रा. कुरेशी मोहल्ला, फत्तेपूर, ता. जामनेर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास हवालदार…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील न्हावी येथे एकाच रात्री दोन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या यापैकी एका ठिकाणी दागिने व रोकड असा साडेअकरा लाखांचा ऐवज लंपास झाला. दुसऱ्या ठिकाणी २५ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. सविस्तर वृत्त असे कि, सदाशिव नगरमध्ये नारायण कडू नेमाडे यांच्या घरी २५ जून रोजी सकाळी २ वाजून ५१ मिनिटांनी तीन चोरटे घरात शिरले व ९ लाख ५० हजार किमतीचे सोन्याचे दागिने तसेच १ लाख ६५ हजार रुपये रोख असा एकूण ११ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. सीसीटीव्हीमध्ये चोरटे अस्पष्टपणे आढळून आले आहेत. याचबरोबर येथील चावदस नगरामध्ये राहुल अरुण चौधरी यांच्या घरामध्ये कोणी नसल्याची संधी साधत चोरांनी…
बोदवड : प्रतिनिधी अयोध्या येथील अल्पवयीन तरुणीच्या आत्महत्याप्रकरणी गेल्या दोन दिवसांपासून उत्तर प्रदेशमधील अयोध्या येथील पोलिस बोदवडमध्ये ठाण मांडून होते. दोन दिवस चाललेल्या चौकशीनंतर बोदवड येथील तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेत हे पथक रवाना आहे. सविस्तर वृत्त असे कि, अयोध्या येथील जन्मभूमी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन साडेसोळा वर्षीय मुलीने आत्महत्या केली. या तरुणीची सोशल मीडियावर बोदवड येथील तरुणासोबत मैत्री झाली व या प्रकरणात तिने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. या तरुणीच्या मोबाइलमधील संपर्क क्रमांक काढून अयोध्या येथील पोलिस बोदवड शहरात आले होते. याप्रकरणी त्यांनी बोदवड शहरातील कुरेशी वाड्यात राहणारा विवाहित समीर कुरेशी या तरुणाची चौकशी करत गुरुवारी (दि. २६) वैद्यकीय…
मेष राशी आज तुम्हाला परीक्षेत किंवा स्पर्धेत चांगलं यश मिळेल. पत्रकारिता क्षेत्राशी संबंधित लोकांचं त्यांच्या लेखन किंवा कामाबद्दल बॉसकडून कौतुक होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात रस वाटेल. वृषभ राशी आज नोकरदार वर्गाला काम मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात रस वाटेल. सरकारी मदतीने व्यावसायिक कामातील अडथळे दूर होतील. आज तुम्ही नवीन काम किंवा व्यवसाय सुरू करू शकता. मिथुन राशी आज तुम्ही तुमच्या कामाच्या क्षेत्रात अत्यंत व्यस्त राहाल. नोकरीतील महत्त्वाच्या पदावरून तुम्हाला काढून टाकले जाण्याची शक्यता आहे. राजकारणात पक्ष बदलण्यापूर्वी, विचार आणि परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यानंतरच निर्णय घ्या. कर्क राशी आज तुमचा गोड आवाज आणि साधे वर्तन लोकांना तुमच्याकडे आकर्षित करेल. राजकारणात तुमच्या उत्कट…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी सोशल मीडियावर सरकारविरोधात पोस्ट करणाऱ्या तरुणांना उद्देशून वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांनी केलेल्या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं. त्यांनी केलेल्या विधानाचा सर्वच पातळ्यांवरून निषेध केला जात आहे. अशातच खासदार संजय राऊत यांनी आपल्या शैलीत बबनराव लोणीकर यांच्यावर टीकेचे बाण सोडले आहेत. आजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी बबनराव लोणीकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेध केला आहे. ‘जर बबन लोणीकर म्हणत असतील की त्यांचा जन्म मोदींमुळे झाला, सगळ्या गोष्टी मोदींमुळे मिळतात, तर हा थेट जनतेने निवडून दिलेल्या सरकारचा आणि लोकशाहीचा अपमान आहे’, असं स्पष्ट मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. तसेच, पहलगाममध्ये…
जळगाव : प्रतिनिधी शहरात गेल्या दोन दिवसापासून ढगाळ वातावरण असून कालपासून शहरात पाऊस सुरु असतांना आज मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एका वखारीला भीषण आग लागल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. पावसाचे वातावरण असतांनाही आगीने प्रचंड रौद्र रूप धरण केले होते. त्यामुळे परिसारत भीतीचे वातावरण पसरले होते. सविस्तर वृत्त असे की, शहरातील पुष्पलता बेंडाळे चौकाजवळ मटन मार्केटच्या समोर असलेल्या चंद्रिका सॉ मिलला (वखारीला) गुरुवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. आगीचे नेमकी कारण समोर आलेले नसले तरी ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे बोलले जात आहे. सकळी अकरा वाजेच्या सुमारास लागलेली आग दुपार पर्यंत सुरू होती. मनपाच्या अग्निशमन दलाचे तीन बंब आग विझवण्याच्या कामी…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग याठिकाणी भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. याठिकाणी प्रवाशांनी भरलेली बस अनियंत्रित होऊन घोलथीर परिसरात अलकनंदा नदीत कोसळली. अपघातादरम्यान सुमारे चार-पाच जण बसमधून बाहेर पडले. यानंतर संपूर्ण परिसरात गोंधळ उडाला. या बसमध्ये सुमारे १८-२० प्रवासी होते, त्यापैकी आठ जणांना वाचवण्यात आले आहे, तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. बचाव पथक घटनास्थळी मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात बद्रीनाथ महामार्गावर घडला, ज्याठिकाणी घोलथीरजवळ बस अनियंत्रित होऊन अलकनंदा नदीत पडली. अपघातावेळी बसमध्ये प्रवासी देखील होते. बस टेकडीवरून खाली कोसळली आणि थेट अलकनंदा नदीत पडली. खराब हवामान आणि डोंगरात पावसामुळे नदीचा…

