मेष राशी आज दिवसाची सुरुवात काही तणावपूर्ण बातम्यांनी होऊ शकते. तुम्हाला अनावश्यकपणे इकडे तिकडे धाव घ्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी खूप सुव्यवस्था असेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वयाने वागा. अनावश्यक वाद टाळा. वृषभ राशी आज क्रीडा जगताशी संबंधित लोकांना काही महत्त्वाचे पद किंवा जबाबदारी मिळू शकते. ज्यामुळे समाजात तुमचा प्रभाव वाढेल. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाच्या कामावर चर्चा करण्याची संधी मिळेल. मिथुन राशी आज नोकरीत स्थान बदलण्याची शक्यता आहे. विरोधक राजकारणात अधिक सक्रिय होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या विरोधकांच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवावे लागेल. कोणताही नवीन व्यवसाय सुरू करणे टाळा.व्यवसायात सर्व गुंतवणूक काळजीपूर्वक विचार करून करा. कामगार वर्गाला नोकरी…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर मंत्री नितेश राणे यांनी मदरशांवर लक्ष्य करत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. हिंदी-मराठी भाषेच्या वादावर बोलताना मंत्री नितेश राणे यांनी मराठी सक्तीचीच असली पाहिजे म्हटले. तर काँग्रेसकडून अमराठी भाषिकांना मराठी शिकवण्याचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याबद्दल राणे म्हणाले, ‘विरोधी पक्षांनी मुस्लिमांना सांगितले पाहिजे की, मशिदींमध्ये अजान पठण होते, अजानही मराठीतून झाली पाहिजे. मदरशांमध्येही मराठी सक्तीची करण्यात आली पाहिजे.” “मराठीतून शिक्षण दिले गेले, तरच तिथे खरे शिक्षण सुरू होईल. नाहीतर तिथून केवळ बंदूकाच निघतील. महाराष्ट्रात खूप मदरसे आहेत. तिथे उर्दूऐवजी मराठी सुरू करा, त्यामुळे तुमची मेहनत कमी होईल. तुमच्या मुल्ला-मौलवींना सांगा…
मुंबई: वृत्तसंस्था राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हनी ट्रॅप मुद्द्यावरून विरोधक आज (दि. १७) विधानसभेत आक्रमक झाले. त्यानंतर त्यांनी सभात्याग करत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी काँग्रेस नेते व आमदार नाना पटोले यांनी हनी ट्रॅपबाबत माझ्याकडे पेनड्राईव्ह असल्याचा दावा करून सरकारने उत्तर द्यावे, अशी मागणी केली. राज्यातील अनेक वरिष्ठ अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकेले आहेत. त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. हा मुद्दा मी विधानसभेत मांडला, पण सरकारने गांभीर्याने घेतलेला दिसून येत नाही. सरकार अजून उत्तर देत नाही. मला कोणाचे चारित्र्य हणन करायचे नाही. माझ्याकडे पेनड्राईव्ह सुद्धा आहे,असा दावा काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना केला. याबाबत सरकार वास्तविक गोष्टी…
नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील नाशिक जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. दिंडोरी कळवण रस्त्यावरील संस्कृती लॉनच्या समोर झालेल्या अपघातात सात जण ठार झाले आहे. अपघातामधील मृतांमध्ये तीन महिला, तीन पुरुष तसेच लहान बालकांचा देखील समावेश आहे. मोटरसायकल आणि अल्टो कार यांच्यात हा अपघात झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी मध्यरात्री 11 :30 च्या सुमारास मोटरसायकल आणि अल्टो कार क्रमांक एम एच ०४ डी वाय ६६४२ यांचा अपघात झाला असून अल्टो कार मधील सात प्रवासी ठार झाले आहेत. तर मोटरसायकल चालवणारे मंगेश यशवंत कुरघडे वय-२५, अजय जगन्नाथ गोंद वय -१८, राहणार नडगे गोट, तालुका जव्हार जिल्हा पालघर सध्या राहणार सातपूर…
मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणातील राणे व राऊत या दोन्ही नेत्यामुळे तापलेले असते आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात भाजप नेते नारायण राणे यांना बजावण्यात आलेले समन्स रद्द करण्याची मागणी सत्र न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांच्या विरुद्ध नारायण राणे या प्रकरणावरील सुनावणी सुरुच राहणार आहे. या सर्व प्रकरणात नारायण राणे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा खटला 15 जानेवारी 2023 रोजी भांडूप येथील कोकण महोत्सवात राणे यांनी केलेल्या भाषणादरम्यान केलेल्या टिप्पणीशी संबंधित आहे. जिथे त्यांनी 2004 च्या लोकसभा निवडणुकीत राऊत यांच्या उमेदवारीच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.…
चाळीसगाव : प्रतिनिधी गुटख्याची वाहतूक करताना शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत नागदच्या व्यापाऱ्याचा ७लाख १९ हजार २९ रूपये किंमतीचा गुटखा पकडला आहे. वाहनासह एकूण १५ लाख १९ हजार २९ रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई १६ रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान शहर पोलिसांच्या पथकाने केली आहे. याप्रकरणी तीनजणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वाहनचालक सलीम मुनीर खान (२४, ग्रीन पार्क, जारगाव चौफुली, पाचोरा), अरबाज इब्राहीम पठाण (२२, सार्वे, ता. पाचोरा) व गुटख्याचा पुरवठादार दीपक प्रविणचंद बेदमुथा उर्फ जैन (नागद, ता. कन्नड) अशी तिघा आरोपींची नावे आहेत. सविस्तर वृत्त असे कि, चाळीसगाव शहर पोलिस…
जळगाव : प्रतिनिधी बदली होऊन एक वर्ष होत आले तरी पोलिस मुख्यालय परिसरातील शासकीय निवासस्थाने न सोडणाऱ्या पाच पोलिस अंमलदारांना मोठा दंड करण्यात आला आहे. ही रक्कम त्यांच्या पगारातून कपात केली जाणार असून, तसे आदेश काढण्यात आले आहेत. पोलिस मुख्यालय परिसरात शासकीय निवासस्थाने आहेत. ज्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या इतरत्र झाल्या आहेत, त्यांना ही निवासस्थाने सोडण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली जाते. मात्र इतरत्र बदली झालेल्या पाच कर्मचाऱ्यांनी कालावधी उलटूनही निवासस्थानांचा ताबा सोडलेला नाही. त्यामुळे त्यांनी दिलेली मुदत उलटून किती कालावधीसाठी निवासस्थान ताब्यात ठेवले आणि क्षेत्रफळानुसार दंड करण्यात आला आहे. एका जणाला एक लाख दोन हजार २१९, दुसऱ्याला एक लाख १३ हजार ४१२…
जळगाव : प्रतिनिधी गतिरोधकावर दुचाकी उधळल्याने सागर रामचंद्र सूर्यवंशी (वय ३२, रा. रावळगाव, ता. मालेगाव) हे दुचाकीस्वार खाली पडून डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (१५ जुलै) रात्री प्रेम नगरातील महाराणा प्रताप हायस्कूलजवळ घडली. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सूर्यवंशी हे कामानिमित्त सासरी आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील दशरथ नगरात सागर सूर्यवंशी यांचे सासर आहे. ते सोमवारी (१४ जुलै) कामानिमित्त दुचाकीने सासरी आलेले होते. मंगळवारी (१५ जुलै) रात्री ते दुचाकीने प्रेम नगरातील महाराणा प्रताप हायस्कूल जवळून जात असताना गतिरोधकावर त्यांची दुचाकी आदळली गेली. त्यात ते खाली पडले व त्यांच्या…
एरंडोल : प्रतिनिधी तालुक्यातील खडकेसिम येथील महिला बचत गटाच्या अध्यक्षा जयश्री योगेश सुतार व सचिव संगीता भरत पाटील या बचत गटाची कर्जाची रक्कम स्टेट बैंक एरंडोल शाखेतून काढून घरी जात असताना दुचाकीवरील दोघांनी रोकड असलेली पिशवी धूम स्टाईलने लांबवली. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. सविस्तर वृत्त असे कि, जयश्री सुतार यांनी हातातील पिशवी बाजूला असलेल्या ओट्यावर ठेवली. त्यावेळी चोरट्यांनी संधी साधू पोबारा एरंडोल तालुक्यातील खडकेसिम येथे सावित्री महिला बचतगट असून त्यात एकूण १० सदस्य आहेत. या बचतगटाच्या अध्यक्षा जयश्री योगेश सुतार व सचिव संगीता भारत पाटील या आहेत. उमेद अभियानांतर्गत मे महिन्यात ६ लाख रुपयांचे कर्ज या बचत गटास मंजूर…
जळगाव : प्रतिनिधी कोणाला नायब तहसीलदार तर कोणाला क्लास वन ऑफिसर सांगून धरणगाव येथील निनाद विनोद कापुरे याने लग्नाच्या नावाने अनेक तरुणींना गंडविल्याचा प्रकार उघडकीस आला असून नाशिक आणि फलटण येथील तरुणींनी यासंदर्भात बुधवारी (१६ जुलै) पोलिस अधीक्षकांना भेटून लेखी तक्रार केली. यापैकी फलटणची तरुणी डॉक्टर आहे. तरुणींच्या तक्रारीवरुन नाशिक व फलटण येथे त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल झालेला आहे, मात्र नाशिकच्या गुन्ह्यात अद्याप अटक झालेली नाही. या तरुणींनी दिलेल्या माहितीनुसार, मॅरेज ब्युरो या ऑनलाइन साईटवरुन निनाद कापुरे याने त्यांच्याशी संपर्क साधला. आई, वडिलांच्या संमतीने त्याने नाशिकच्या तरुणीकडून सात लाख तर फलटणच्या डॉक्टर तरुणीकडून आठ लाख रुपये उकळले. आपल्याला पदोन्नती मिळाली असून,…

