मेष : दिवस संतुलित राहील. वडीलधाऱ्यांचा सल्ला फायदेशीर ठरू शकतो. काम सामान्य राहील, आर्थिक स्थिती स्थिर राहील. कौटुंबिक समस्या सोडवल्या जातील. वृषभ : दिवस आनंदाने भरलेला असेल, जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्न बळकट होईल, काम पूर्ण समाधानाने पूर्ण होईल. मुलांशी संबंधित योजना प्रत्यक्षात येतील. मिथुन : दिवस व्यस्ततेने भरलेला असेल. काम चांगले होईल, परंतु वाद टाळा. धार्मिक कार्यक्रम शक्य आहेत, सुसंवाद राखा. मानसिक थकवा कायम राहू शकतो. कर्क : दिवस चांगला आहे, लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात, कामात यश मिळेल. नातेसंबंधांमध्ये नवीन ऊर्जा येईल. सर्जनशील काम मानसिक आराम देईल. सिंह : सुवर्ण दिवस, तुम्हाला…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुंबईत दि.१८ जुलै २०२५ रोजी सकाळी अचानक एक तीन मजली चाळ कोसळली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 12 जण अडकल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाने (एमएफबी) लेव्हल-2 अलर्ट जारी केला आणि बचाव कार्य सुरू केले. पोलिस आणि बचाव पथकांनी मोठ्या प्रयत्नानंतर लोकांना बाहेर काढले आहे. मुंबईतील वांद्रे परिसरातील भारत नगर येथील चाळ क्रमांक-37 मध्ये ही दुर्घटना घडली. स्फोटानंतर संपूर्ण इमारत कोसळली. आतापर्यंत ढिगाऱ्यातून बाहेर काढलेल्या 12 जणांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना आज सकाळी 7:50 च्या सुमारास घडली. प्राथमिक तपासानुसार, इमारतीत सिलिंडरचा स्फोट झाला, त्यानंतर इमारतीचा काही…
पुणे : वृत्तसंस्था देशात सोन्याचे भाव गगनाला भिडले असतानाच, सामान्य ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीनंतर अखेर सरकारने नऊ कॅरेट सोन्यालाही हॉलमार्किंगची परवानगी दिली आहे. यामुळे लवकरच बाजारात नऊ कॅरेटचे प्रमाणित हॉलमार्क दागिने उपलब्ध होणार असून, ग्राहकांना आता स्वस्त दरात दागिने खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. हॉलमार्किंग परवानगी मिळाल्यामुळे सोन्याच्या दागिन्यांची विविधता वाढणार असून, ग्राहकांसाठी एक नवीन पर्याय खुला झाला आहे. नऊ कॅरेट म्हणजे सुमारे 38% शुद्धता असलेले सोनं, जे 24 कॅरेटच्या तुलनेत तब्बल 60% पर्यंत स्वस्त पडते. सध्या 24 कॅरेट सोन्याची किंमत 1 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास असून, त्याच वजनाचे नऊ…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील विधीमंडळाच्या लॉबीत गुरुवारी गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणाची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गंभीर दखल घेतली. जी घडना घडली ती गंभीर आहे. याबाबत सुरक्षा अधिकाऱ्यांनी अहवाल दिला असल्याचे नार्वेकर यांनी शुक्रवारी (दि.१८ जुलै) सभागृहात सांगितले. या प्रकरणी ६ ते ७ जणावर मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात आली. दोघे जण परवानगी न घेता विधीमंडळ परिसरात आले. ते कोणत्याही स्वरूपाची परवानगी नसताना आणि अनधिकृतपणे सदस्यांसोबत आले. हे आक्षेपार्ह कृत्य असल्याचे नार्वेकर यांनी नमूद केले. विधानभवन सभागृहात असे कधीही झाले नाही. मुळात त्या अभ्यांगतांना आत आणायची…
मुंबई: वृत्तसंस्था विधानभवन परिसरात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीच्या घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “ही चित्रफीत पाहून महाराष्ट्राची काय अवस्था झाली आहे, असा प्रश्न पडतो,” असे म्हणत त्यांनी सध्याच्या राजकीय संस्कृतीवर जोरदार टीका केली. जर अशा घटनांना वेळीच आवर घातला नाही, तर “भविष्यात विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही,” असा गंभीर इशाराही दिला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर बोलताना ठाकरे म्हणाले, “सत्ता हे साध्य नसून साधन आहे, याचा विसर पडल्याने वाटेल त्या लोकांना पक्षात घेऊन त्यांचा वापर ज्येष्ठ नेत्यांवर गलिच्छ शेरेबाजीसाठी केला जात आहे. हा भंपकपणा आता जनतेच्या लक्षात…
मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या विधिमंडळ परिसरात आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये काल हाणामारी झाली. त्यानंतर जितेंद्र आव्हाड रात्री दोन वाजेपर्यंत विधिमंडळ परिसरात थांबून आंदोलनाच्या भूमिकेत होते. त्याच दरम्यान विधानभवनाच्या मागच्या गेटने आव्हाड यांचा समर्थक नितीन देशमुख याला पोलिस घेऊन जात असताना आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांची काडी अडवली. पोलिसांच्या गाडीच्या समोरच आंदोलन करत आव्हाड थेट गाडीच्या खाली घुसले होते. त्यामुळे काल मध्यरात्री विधिमंडळ परिसरात चांगलाच गोंधळ उडाला. पोलिसांच्या वतीने मार खाणाऱ्याला अटक केली जात असून त्याला मारहाण करणारे पाच जणांची पाठराखण केली जात असल्याचा आरोप यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी केला. या प्रकरणातील गोपीचंद पडळकर यांच्या समर्थक…
जळगाव : प्रतिनिधी रात्रीच्या सुमारास घराकडे पायी जात असलेल्या सैय्यद फैय्याज गयासुद्दीन (वय ५२, रा. सुप्रिम कॉलनी) या व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोकड जबरीने हिसकावून नेल्याची घटना घडली होती. यातील संशयित अमन उर्फ खेडका सैय्यद रशिद (रा. सुप्रिम कॉलनी) याच्या एमआयडीसी पोलिलसांनी मुसक्या आवळल्या. शहरातील कांद्याचे व्यापारी असलेले सैयद फैय्याज गयासुद्दीन हे दि. १२ जुलै रोजी रात्री अजिंठा चौफुलीपासून सुप्रिम कॉलनीकडे पायी जात होते. त्या वेळी एका बेकरीजवळ अमन खेकडा नामक व्यक्तीने त्यांना अडविले व चाकू काढून त्यांच्या पोटाला लावला. कॉलर पकडून शिवीगाळ करीत ‘किती पैसे आहे लवकर काढ नाही तर भोसकून देईल’, अशी धमकी दिली. सैयद यांनी प्रतिकार…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील महिला महाविद्यालयात पदविचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीशी मोबाईलवर संपर्क करुन रिक्षाचालकाकडून त्रास दिला जात होता. गुरुवारी या रिक्षाचालकाने मुलीला रिक्षात बसवुन खान्देश सेंट्रल येथे नेत अंगलट करण्याचा प्रयत्न केला. परिसरातील नागरीकांनी पोलिसांना पाचारण केल्यानंतर पिडीतेच्या तक्रारीवरुन शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असलेली २० वर्षीय तरुणी शहरातील एका महिला महाविद्यालयात पदविचे शिक्षण घेत आहे. या विद्यार्थीनीला गेल्या काही दिवसांपासुन एक रिक्षाचालक मोबाईलवर संपर्क करुन त्रास देत होता. मुलीने माझे लग्न ठरलेले असल्याचे सांगीतल्या नंतरही संशीताकडून त्रास सुरु असतांना मुलीने दुर्लक्ष केले. आज गुरुवार दुपारी साडेबारा वाजता कॉलेज सुटल्यावर…
बोदवड : प्रतिनिधी शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील भोईवाडा परिसरात १७ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घराशेजारी जागेच्या मोजणीवरून वाद झाला. यातून दोन गटात हाणामारी झाली. मिळालेल्या माहितीनुसार, नगरसेविका बेबीबाई चव्हाण यांच्या घराशेजारील नमदाबाई एकनाथ भोई या दोन कुटुंबांमध्ये हा वाद झाला. फिर्यादी नर्मदाबाई भोई यांनी नगरसेविका बेबीबाई चव्हाण यांचा मुलगा नितीन रमेश चव्हाण व सचिन रमेश चव्हाण तसेच रमेश नामदेव चव्हाण, सुरेश नामदेव चव्हाण, दीपक सुरेश चव्हाण, सागर सुरेश चव्हाण यांनी मारहाण करत शिवीगाळ केल्याची तक्रार दिली. तर या घटनेत माजी नगरसेवक व नगरसेविकेचा मुलगा नितीन रमेश चव्हाण यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांना जळगाव येथे हलविण्यात आले आहे. यामुळे…
जळगाव : प्रतिनिधी चोपडा तालुक्यातील वैजापूर परिसरात हरणाचे मांस विकण्यासाठी आलेल्या दोन जणांना बुधवारी दुपारी २ वाजता चोपडा ग्रामीण पोलिसांनी वनविभागाच्या मदतीने अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून हरणाचे मांस आणि दोन शिंगे जप्त करण्यात आली असून, याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील वांगऱ्या बारेला आणि त्याचा साथीदार दुचाकीवरून (एमपी १०, एनसी ४८५७) वैजापूर परिसरात हरणाचे मांस विक्रीसाठी येणार होते. ही माहिती वन्यप्राण्यांच्या तस्करीशी संबंधित असल्याने, तत्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात त्यानंतर, पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांच्यासह राजू महाजन, राकेश पाटील, गजानन पाटील, विनोद पवार, चेतन महाजन, सुनील कोळी तसेच वनविभागाचे…

