मेष राशी आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी धावपळीचा असेल. आज तुम्हाला लांब प्रवास करावा लागेल. मात्र त्यात असुविधा आणि थकवा जाणवू शकतो, त्यामुळे सावधगिरी बाळगा. कामात काही संभ्रम निर्माण होईल, पण संयम महत्त्वाचा आहे. खर्च वाढेल. पण बचत कायम राहील. रखडलेले पैसे मिळतील. नवीन नात्यात घाई करणे टाळा. आरोग्याकडे लक्ष द्या. वृषभ राशी वृषभ राशीच्या व्यक्ती आज इतरांना मदत करतील. जुन्या मित्रांसोबत वेळ घालवल्याने मन हलके होईल. नोकरीत चांगले परिणाम मिळतील. नवीन कामाची सुरुवात उत्साहात होईल. हळूहळू केलेली आर्थिक पायाभरणी भविष्यात फायदेशीर ठरेल. गुंतवणुकीतून लाभ संभवतो. पार्टनरसोबतचे नाते अधिक दृढ होईल. थोडा आळस जाणवू शकतो. आपल्या कल्पना इतरांशी मोकळेपणाने शेअर करा. फायदा होईल. मिथुन राशी मिथुन…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी अखेर आमदार शशिकांत शिंदे यांची निवड झाली आहे. पक्षाच्या आज झालेल्या बैठकीत विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर एकमताने शशिकांत शिंदे यांची त्या पदावर निवड करण्यात आली. या निवडीमुळे जयंत पाटील यांच्या राजीनाम्याविषयी गत 4 दिवसांत निर्माण झालेला संभ्रम संपुष्टात आला आहे. दरम्यान, शरद पवार गटाचे अनेक नेते सध्या सत्ताधारी महायुतीत जात आहेत. शशिकांत शिंदे यांच्यापुढे पक्ष एकसंध ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. शशिकांत शिंदे हे पक्षाच्या स्थापनेपासूनच शरद पवार यांचे खंदे सहकारी राहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीवेळी त्यांनी पवारांची निष्ठेने साथ दिली. पश्चिम महाराष्ट्रातील प्रभावशाली नेतृत्व…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी मैदानात उतरलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी पदयात्रेने संपूर्ण राज्यभराचे लक्ष वेधून घेतले. मात्र आता बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय महामार्ग रोखून धरल्या प्रकरणी बच्चू कडूंसह 12 जणांवर यवतमाळच्या महागांव पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. बच्चू कडू यांच्या सातबारा कोरा पदयात्रेची समारोप सभा श्री गजानन महाराज मंदिर आंबोडा येथे नियोजित होती. मात्र ऐनवेळी आयोजकांनी व बच्चू कडू यांनी समारोप सभा आंबोडा उडान पुलावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर आयोजित केली. यावेळी ट्रॅक्टर महामार्गवर आडवे लावून वाहतूक पूर्णपणे बंद केली होती, यामुळे तीन…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात पावसाचा पुन्हा एकदा जोर धरला असून, हवामान विभागाने राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. रायगड जिल्ह्यात काही तासांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक भागांत पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. नद्या-ओढे दुथडी भरून वाहत असून काही सखल भागात पाणी साचले आहे. यामुळे स्थानिक प्रशासन सतर्क झाले असून, जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोकण आणि घाटमाथ्याच्या परिसरात दक्षिण-पश्चिम मान्सून पूर्ण ताकदीने सक्रीय झाल्यामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, मुंबई, पुणे आणि नाशिक या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ‘यलो’ आणि ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. रायगडमध्ये आज संध्याकाळनंतर आणि रात्रीच्या…
मुंबई : वृत्तसंस्था मागील आठवड्यात ५ जुलै रोजीच्या मेळाव्यानंतर शिवसेना(उबाठा) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना युती होईल अशी चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली आहे. मात्र, अद्यापर्यंत या वृत्ताला ठाकरे बंधूंकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. मेळाव्याचे औचित्य हे मराठीचा मुद्दा असल्याचे सांगितले जात आहे. उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांच्याकडून ठाकरे बंधू एकत्र येण्यावर सकारात्मक विधानं केली जात आहे. उद्धव ठाकरे यांनी देखील युतीबाबत प्रतिसाद दर्शविला आहे. मात्र, राज ठाकरे यांच्याकडून सावध भूमिका घेतली जात आहे. अशातच आता युतीबाबत स्वतंत्र अनौपचारिक गप्पांमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनीहीह मोठं भाष्य केले आहे. युतीबाबत सध्या टप्प्याटप्प्याने प्रक्रिया सुरू असल्याचे उद्धव ठाकर म्हणाले…
जळगाव : प्रतिनिधी सहा महिन्यांपुर्वीच लग्न झालेल्या अश्विनी गणेश पाटील (वय १९, रा. लमांजन, ता. जळगाव) या विवाहितेने घरी कोणीही नसतांना गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी विवाहितेची सासू कामावरुन घरी आल्यानंतर उघडकीस आली. विवाहितेच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील लमांजन येथे अश्विनी गणेश पाटील या विवाहिता पत्नी, सासू सासऱ्यांसह वास्तव्यास होत्या. सहा महिन्यांपुर्वीच त्यांचे गावातीलच गणेश पाटील यांच्यासोबत विवाह झाला होता. सोमवारी त्यांचे पती एमआयडीसी परिसरातील कंपनीत कामाला गेले होते, तर सासू सासरे हे मजूरी कामासाठी गेले होते. त्यामुळे घरी एकट्याच असलेल्या अश्विनी पाटील या…
चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील घाट रोडवरील साबीर स्क्रब या भंगार दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील ४० हजार रुपये रोख रकमेसह ३० हजार रुपये किमतीचे ३० किलो केस लांबविले. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. तर अन्य तीन फरार आहेत. संशयितांकडून मालवाहू वाहन जप्त करण्यात आले आहे. सविस्तर वृत्त असे कि, चोरीची ही घटना दि. ९ जुलै रोजी सायंकाळी ७:३० ते दि. १० रोजी घडली होती. पोलिसांनी आलमगीर शेख रफिक (३८, रा. मदनीनगर, जामनेर) व हकीम खान रफिक खान (२९, रा. पहूर पेठ, पहूर, . जामनेर) यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता.…
चाळीसगाव : प्रतिनिधी युनियन बँकेच्या एटीएम मधून ५ ग्राहकांचा एटीएम कोड वापरून किंवा अन्य मार्गाने त्यांच्या खात्यातून सुमारे २ लाख ७ हजार १० रूपयांची रक्कम काढून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संभाजी पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.नि. अमितकुमार मनेल हे करीत आहेत. संभाजी भाऊराव पाटील (रा. तरवाडेपेठ, ता. चाळीसगाव) यांनी दि. १३ रोजी दुपारी ३ वाजता भडगाव रोडवरील युनियन बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्याचा प्रयत्न केला. त्यांचे अन्य बँकेचे एटीएम कार्ड हे मशीनमध्ये अडकले. कार्ड निघत नव्हते. त्यावेळी एटीएमच्या बाजूला अनोळखी इसम उभा होता. त्याने मशीनवर…
फैजपूर : प्रतिनिधी यावल तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. ही घटना जानेवारी ते जून २०२५ दरम्यान घडली. याप्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात दुसखेडा येथील तरुणाविरुद्ध पॉक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, या अल्पवयीन मुलीला चेतन अमोल सोनवणे (रा. दुसखेडा, ता. यावल) याने लग्नाचे आमिष दाखविले व तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला पळवून मुक्ताईनगरच्या जंगलात नेले. तेथेही तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. घडलेला प्रकार या मुलीने आपल्या कुटुंबात सांगितल्यानंतर फैजपूर पोलिस ठाण्यात पीडित अल्पवयीन मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून तरुणाविरुद्ध फैजपूर पोलिसात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात…
मेष : आई-वडिलांच्या आशीर्वादाने कामात चांगले परिणाम मिळतील. तुमच्या वागण्याचा आणि कामाचा इतरांवर सकारात्मक परिणाम होईल. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर योग्य दिवस आहे. त्यासाठी तुम्ही अनुभवी व्यक्तीचा सल्ला नक्कीच घ्या. वृषभ : तुम्ही जर विवाहित असाल तर जीवनात गोडवा राहील आणि मन आनंदी राहील. नोकरीतील परिस्थिती सामान्य राहील, संयम ठेवा. व्यावसायिक कामे थोडी मंदावतील, परंतु परिस्थिती पाहता संयम योग्य राहील. घरातील सुखसोयींशी संबंधित काहीतरी खरेदी करण्याची शक्यता आहे. पैसे सावधानीने खर्च करा. मिथुन : नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. काही गोंधळ दूर होतील, ज्यामुळे मन हलके राहील. आर्थिक कामांवर लक्ष केंद्रित करा. खर्च मर्यादित ठेवा आणि अनावश्यक बाबींमध्ये…

