Author: editor desk

मेष राशी आजचा दिवस कठीण जाईल. महत्त्वाचं काम पूर्ण करण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागू शकतो. सामाजिक कार्य करताना वागण्यात संयम ठेवा. विरोधक तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करू शकतात. या बाबतीत सावधगिरी बाळगा. कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम करूनही, तुम्हाला चांगले परिणाम मिळणार नाहीत. वृषभ राशी कोणत्याही महत्त्वाच्या कामाची जबाबदारी दुसऱ्यावर देण्याऐवजी ते काम स्वतः करा. व्यवसायात, भावनांपेक्षा तुमच्या बुद्धिमत्तेला आणि विवेकाला जास्त महत्त्व द्या. राजकारणात, तुमच्या प्रभावी भाषणाचे कौतुक केले जाईल. जर तुम्ही तुमच्या जवळच्या नातेवाईक आणि मित्रांसोबत एकत्र काम केले तर नफ्याची शक्यता जास्त असेल. मिथुन राशी आज तुम्ही तुमच्या शत्रूंवर विजय मिळवाल. व्यवसायातील परिस्थिती सुधारेल. राजकीय विरोधकांचा पराभव होईल.…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात एक मोठी बातमी समोर आली आहे. महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने नवा डाव टाकला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेना आणि आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेची युती होणार आहे. हे दोन्ही पक्ष आगामी महापालिका निवडणुका आणि जिल्हापरिषदेच्या निवडणुका एकत्रितपणे लढणार आहेत. आनंदराज आंबेडकरांच्या पक्षासोबत युती करुन एकनाथ शिंदेंनी मराठी आणि दलित मतदार सोबत घेण्याची खेळी खेळल्याची राजकीय चर्चा सध्या सुरु झाली आहे. दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्षाने त्यासाठी कंबरही कसली आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधाती महाविकास आघाडीतील मित्र पक्ष आपली…

Read More

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था राज्यातील काबाडकष्ट करून चार एकर शेतामध्ये कोथिंबिरीचे पीक घेतले. चार पैसे हाताशी येतील या आशेने जीवापाड जपलेल्या कोथिंबिरीला बाजारात योग्य भाव न मिळाल्याने एका शेतकऱ्याने निराश होऊन चक्क ४ एकर कोथिंबिरीवर रोटर फिरवल्याची दुर्दैवी घटना चाकूर येथे घडली आहे. दयानंद धोंडगे हे चाकुरातील एक अल्पभूधारक शेतकरी आहेत. ते दिवसरात्र शेतीत राबतात, त्या पिकास विविध खते, अत्याधुनिक औषधी आणि फवारणीचा वापर करून चाळीस दिवस त्याची निगा राखली. बाजारात चांगला भाव मिळेल या आशेने त्यांनी बाजारात कोथिंबीरच्या भावाची विचारपूस केली. कोथिंबीरचे भाव पडल्याचे लक्षात येताच शेतात केलेली मेहनत आणि त्यासाठी केलेला ४० हजार खर्च निघणार नाही, मजुरीचे पैसेही…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधूंच्या मराठीच्या मुद्यावरून एकत्र आल्यानंत शिवसेना उबाठा आणि मनसेच्या युतीच्या जोरदार चर्चा होत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या असताना ठाकरे बंधूंचे एकत्र येणे याला राजकीय लेअर असल्याचे बोलले जात आहे. मात्र, अद्यापर्यंत उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्यावर सकारत्मकता दाखवली असली तरी राज ठाकरे आपली सावध भूमिका घेत आहेत. अशातच उद्धव ठाकरे यांची सामनाचे संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा टीझर समोर आला आहे. या टीझरमध्ये राऊत विविध मुद्यांवर उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणातले ठाकरी वारे काही हटत नाही थंड पडत नाही, असं विचारतात. “सदा सर्वदा ठाकरे…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर शशिकांत शिंदे यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली. मात्र जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देताच एका दिग्गज नेत्याकडून त्यांना महायुतीसाठी ऑफर देण्यात आली आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जयंत पाटलांना महायुतीत येण्याची ऑफर दिली आहे. “जयंत पाटील यांचे तिकडे मन लागत नसेल किंवा त्यांना मार्ग बदलायचा असेल तर त्यांनी महायुती सोबत आले पाहिजे. जयंत पाटील हे संघर्षशील नेते आहेत. त्यांनी राजीनामा दिला आहे, त्यांना विकास करायचा असेल तर सत्तेसोबत आलं पाहिजे. राष्ट्रवादी सोडणार असाल तर मी मध्यस्थी करून त्यांना महायुतीत आणायला तयार आहे”,…

Read More

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील दहिगाव येथील एका ३५ वर्षीय तरुणाचा शेतातील विहिरीत पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे घडली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सविस्तर वृत्त असे कि, दहिगाव येथील प्रदीप घनश्याम महाजन (वय ३५) हा तरुण मोहराळे शिवारातील बाळू रघुनाथ पाटील यांच्या शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेला होता. विहिरीजवळ असताना पाय घसरून तोल गेल्याने प्रदीप महाजन हे विहिरीत पडले. यात विहिरीतील पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १५ रोजी पहाटे घडली. या बाबत पुरुषोत्तम छगन महाजन यांनी दिलेल्या माहितीवरुन यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन रविंद्र रामचंद्र धनगर (वय ३५, रा. त्रिभूवन कॉलनी, कानळदा रोड) यांच्यासह त्यांच्या भावाला तिघांनी बेदम मारहाण केली. तसेच रविंद्र धनगर यांच्या डोक्यात लोखंडी पाईप मारुन जखमी केले. ही घटना दि. १५ रोजी सकाळच्या सुमारास त्रिभूवन कॉलनीत घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील कानळदा रोडवरील त्रिभूवन कॉलनीत रविंद्र धनगर हे वास्तव्यास असून महावितरण येथे वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून नोकरीस आहे. दि. १४ रोजी त्यांचा लहान भाऊ सुनिल धनगर हा रात्री ११ वाजता कामावरुन घरी येत असतांना, योगेश परदेशी याने काहीही कारण नसतांना त्याला शिवीगाळ केली.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी किराणा दुकानात चहा मसाल्याची पुडी घेण्यासाठी आलेल्या दोन जणांनी दुकानमालक महिलेच्या गळ्यातील एक लाख रुपये किमतीची सोनपोत ओढून नेली. ही घटना १४ जुलै रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास निवृत्ती नगरात घडली. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्तअसे कि, शहरातील निवृत्ती नगर परिसरात पुंडलिक पाटील यांचे घराला लागूनच किराणा दुकान असून, १४ जुलै रोजी रात्री ते घरात गेले व त्यांच्या पत्नी प्रमिला पाटील दुकानात थांबल्या होत्या. त्यावेळी दोन जण दुचाकीने आले व त्यांनी चहा मसाल्याची पुडी घेतली. त्यांना पैसे परत देण्यासाठी पाटील खाली वाकल्या असता त्यांच्या गळ्यातील एक लाख…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील एका भागात भांडणात तिघांविरुद्ध महिलेच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिस ठाण्यात अश्लील शिवीगाळ, विनयभंग, मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला व तिचा मोठा भाऊ तसेच लहान बहीण यांना किरकोळ कारणावरून भास्कर चावदस चिनावले, विनोद बढे, अतुल बढे व राहुल बढे या चौघांनी दमबाजी केली. महिलांवर अश्लील टिप्पणी केली. फिर्यादी महिलेच्या भावासही मारहाण केली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात भास्कर चावदस चिनावले (रा. गडकरी नगर), विनोद, अतुल व राहुल बढे (सर्व रा. गांधी नगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Read More

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील पाडळसे आणि भोरटेक परिसरात वाघाचे वास्तव्य असल्याच्या चर्चाना आता पुष्टी मिळत आहे. मंगळवारी पहाटे भोरटेक गावाजवळ शेतकरी भास्कर रमेश कोळी यांच्या गुरांच्या गोठ्यावर हल्ला करून एका म्हशीला ठार केले. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात वाघाच्या अस्तित्वाची चर्चा होती. वनविभागाच्या मते हा बिबट्या असावा, असे म्हटले होते तर काही ग्रामस्थांनी वाघाला प्रत्यक्ष पाहिल्याचा दावा केला होता. या घटनेनंतर पाडळसे येथील पोलिस पाटील, सुरेश खैरनार यांनी वन विभागाला माहिती दिली. यावल पूर्वचे वनक्षेत्रपाल एस. एम. पटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली डोंगरकठोरा वनपाल आय. एस. तडवी, फैजपूर वनपाल अतुल तायडे, गस्तीपथक…

Read More