नेहमीच सर्वाना ॲसिडिटीच्या समस्येमुळे त्रस्त असतात त्यावर नेमका उपाय आजही काहीना सापडलेला नाही. पोटात काही उलट-सुलट पदार्थ गेला नाही की लगेच गॅस, अपचन, आंबट ढेकर येणे असा त्रास दिवसभर होत राहतो. या समस्यांमुळे पोटदुखी , पोट जड होणे, चिडचिड होणे, अशा समस्याही उद्भवतात. त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी बरेचसे लोक गॅसचा त्रास दूर करणारी औषधे, गोळ्या यांचे सेवन करण्यास सुरवात करतात. ॲसिडची समस्या अनेकदा उद्भवत असेल तर तुम्हाला गॅस्ट्रिक प्रॉब्लेम असू शकतो. त्यामुळे वेदना होणे, जळजळ होणे असेही त्रासही होतात. अशा परिस्थितीत तुम्ही अधिक तळलेले पदार्थ तसेच मसालेदार पदार्थांचे सेवन करणे टाळले पाहिजे. आपली जीवनशैली तसेच आहार-विहारात बदल केल्यास ॲसिडिटीच्या समस्येवरही मात…
Author: editor desk
तुळशी हि प्राचीन काळापासून आरोग्यासाठी महत्वाची वनस्पती म्हणून मानली जाते तर हिंदू धर्मात तुळस ही पूजनीय मानली जाते. लोक विधीवत तुळशीची पूजा करतात. आयुर्वेदातही तुळशीला विशेष महत्त्व आहे. त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्मही असतात. तुळशीमुळे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. दररोज तुळशीच्या 4 पानांचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. बद्धकोष्ठता दूर होते तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. रिकाम्या पोटी तुळशीच्या पानांचे सेवन केल्यास पचनक्रिया सुधारते. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. पचनसंस्था निरोगी राहण्यासाठी तुम्ही दररोज तुळशीच्या पानांचे सेवनही करू शकता. हाडे मजबूत होतात तुळशीच्या पानांमध्ये पोटॅशिअम आणि फॉलेट यासारखी पोषक तत्वे असतात, ज्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते.…
औरंगाबाद : वृत्तसंस्था साहेब, मी बायकोला मारून आलोय, मला अटक करा,’ असे म्हणत आपतगाव ग्रामपंचायतीच्या महिला सदस्याचा पती रविवारी दुपारी २ वाजता चिकलठाणा पाेलिस ठाण्यात हजर झाला. कडुबा भागाजी हजारे (४२) असे आरोपीचे नाव असून त्याने ठाण्यात येण्याच्या तासाभरापूर्वी पत्नी सुनीता (३८) यांचा शेतात गळा दाबून खून केला. चिकलठाणा पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. रविवारी दुपारी चिकलठाणा पोलिस ठाण्यात दैनंदिन कामे सुरू होते. पोलिस कर्मचारी काही स्थानिकांच्या तक्रारी ऐकत होते. तेवढ्यात कडुबा ठाण्यात आला. समोर बसलेल्या अधिकाऱ्याने काय काम आहे? असे विचारले. तेव्हा ‘साहेब, मी बायकोला मारून आलाेय, मला अटक करा,’ असे चेहऱ्यावर शांत…
पुणे : वृत्तसंस्था मुंबई-बंगळुरू बाह्य वळण महामार्गावर नवले पूल परिसरात वेगाने जात असलेल्या चालकाचे उतारावर नियंत्रण सुटल्याने ट्रकने ४८ वाहनांना धडक दिली. या भीषण अपघातात २० जण जखमी झाले. सर्व वाहनांचे मोठे नुकसान झाले. रविवारी रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. आंध्र प्रदेशमधील मालवाहतूक करणारा एक ट्रक रविवारी रात्री साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. नवले ब्रिज परिसरातील दरी पूल पार केल्यानंतर ट्रक नवले पुलाजवळील तीव्र उतारावर आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले. ट्रकने समोरून येणाऱ्या कार आणि रिक्षा यांना धडक दिली. हा ट्रक ४०० ते ५०० फूट गेला. वाहनांना धडकून थांबल्यानंतर चालक ट्रक सोडून पसार झाला. वाहनांत अनेक चालक अडकून पडले…
नाशिक : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसापासून बोचरी थंडी होती मात्र कालपासून उत्तर भारतातील हिमवृष्टी आणि उत्तरेकडून येणाऱ्या बोचऱ्या गार वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात थंडी वाढली असून मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले आहे. महाराष्ट्राचे ‘मिनी काश्मीर’ समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वरच्या (१०.६) तुलनेत औरंगाबाद, नाशिक, धुळे, जळगावात तर पारा जास्तच खाली आला आहे. नाशिक जिल्ह्यात आेझर येथे रविवारी सर्वात कमी म्हणजे ६ अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली. हवामानतज्ज्ञांच्या मते पुढील १०-१२ दिवस थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे. राज्यात यंदा पंधरा दिवस थंडीचे अगोदर आगमन झाले. आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून किमान तापमानात घसरण होण्यास सुरुवात झाली. गेल्या आठवड्यात अंशत: ढगाळ वातावरण तयार झाल्याने थंडी…
जळगाव : प्रतिनिधी भारताचे आराध्य दैवत व महाराष्ट्राची अस्मिता असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोषारी यांनी “छत्रपती शिवाजी महाराज हे जुने आदर्श आहेत” आणि भाजप चे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी “छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला 5 वेळा माफीनामे लिहुन दिले” असे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे व आक्षेपार्ह , संतापजनक बेताल वक्तव्य केलेले आहे . या वक्तव्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव तर्फे तिव्र आंदोलन करून निषेध करण्यात आला . आंदोलनादरम्यान भगवान सोनवणे यांनी प्रतिकात्मक स्वरूपात कोषारी यांची वेशभूषा करत डोक्यावरची काळी टोपी काढुन त्यातून कांदे बटाटे खाली पडल्यावर , कोषारी यांचे डोक्यात कांदे बटाटे भरलेले आहे…
औरंगाबाद : वृत्तसंस्था ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गेल्या काही दिवसापासून राज्याचे लक्ष वेधून धरले आहे ते शिंदे गटाच्या आमदारावर त्यांच्या मतदार संघात जावून तुटून पडत आहे. त्यांनी नुकतेच राज्याचे कृषी अब्दुल सत्तार यांच्या होमपिचवर जात तुफान फटकेबाजी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फुटीर आमदारांना घेऊन कामाख्या मंदिरात दर्शनाला गेले होते. त्यावेळी अब्दुल सत्तार कुठे होते? असा संतप्त सवाल करतानाच अब्दुल भाई तुम्ही घरवालीचे तरी आहात का? असा सवालही सुषमा अंधारे यांनी केला. सिल्लोडमध्ये महाप्रबोधन यात्रेला संबोधित करताना सुषमा अंधारे यांनी हा हल्लाबोल केला आहे. एकनाथ शिंदे आमच्या अब्दुल सत्तार भाईला गुवाहाटीला घेऊन गेले. तुम्ही कामाख्या मंदिरात गेला…
मुंबई : वृत्तसंस्था वि. दा. सावरकरांबद्दल कॉंग्रसे नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यांचे पडसाद राज्यभरात उमटले. अशातच शिवसेनेने त्यांचे मुखपत्र सामनातून आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. राहुल गांधी यांना कोणीतरी समजवा असे शिवसेनेने म्हटले आहे. सावरकर दोन-तीन वर्षे अंदमानच्या तुरुंगात राहिले. त्यानंतर त्यांनी इंग्रजांना माफीनामे पाठवायला सुरुवात केली. नंतरच्या काळात सावरकरांनी वेगळ्या नावाने स्वत:वर पुस्तक लिहले आणि आपण किती शूरवीर होतो, हे सांगितले. सावरकरांना इंग्रजांकडून पेन्शन मिळायची, ते इंग्रजांसाठी काँग्रेस पक्षाविरोधात काम करायचे, असे राहुल गांधी यांनी म्हटले. त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठल्यानंतर सावरकरांच्या पत्राचा दाखला देत राहुल गांधी यांनी आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे म्हटले. आता यावर शिवसेनेने रोखठोकमधून आपली…
मुंबई : वृत्तसंस्था जर नेहमी अंगदुखी, गुडघेदुखीची समस्या जाणवत असतील तर या समस्या हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात जाणवायला लागतात. बदलता आहार आणि लाईफस्टाईलमुळे गुडघेदुखीची समस्येचा सामना अनेकांना करावा लागतो. ही समस्या वृद्धांमध्येच दिसून येत नाही, तर आता तरुणांमध्येही ही समस्या दिसून येत आहे. अनेक तरुणांना हिवाळ्यात गुडघेदुखीचा त्रास होतो. हिवाळ्यात जर गुडघेदुखी समस्येपासून दूर राहायचं असेल तर या टीप्स तुम्ही फॉलो करु शकता. हळद हळदीला अँटिऑक्सिडंट्सचे पॉवर हाऊस म्हटले जाते. हळदीमध्ये औषधी गुणधर्म असतात. हळदीची पेस्ट गुडघ्यांवर लावल्याने हिवाळ्यात होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळतो. याशिवाय रात्री झोपताना दुधात हळद टाकूनही पिऊ शकता. याचे रोज सेवन केल्याने गुडघेदुखीपासून आराम मिळेल. गुडघेदुखी थंडीमध्ये पायांचा…
मुंबई : वृत्तसंस्था औरंगाबादमध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं. त्यावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. “हे ‘भाज्यपाल’ मराठी माणसाच्या राशीला नकोत!”, असं म्हणत आव्हाडांनी कोश्यारी यांच्या विधानाचा निषेध केलाय. “थोड्या दिवसांपूर्वी स्वतः रस्त्यावर उतरून आंदोलन केलं होत की हे भाज्यपाल मराठी माणसाच्या राशीला नकोत! महात्मा फुले,छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल वाईट बोलले गेले. पुन्हा एकदा संपूर्ण देशाचे आदर्श आहेत अशा महाराजांबद्दल त्यांना जुने आदर्श म्हणून हिणवले. बस झाले आता बोचंक गुंडाळ!”, असं ट्विट आव्हाडांनी केलं आहे. तुम्हा तरूण मुलांना जर कुणी विचारलं तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता…

