अहमदनगर : वृत्तसंस्था अहमदनगर -औरंगाबाद महामार्गावर भरधाव वेगात येणाऱ्या दोन कारची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला. गंगापूर कायगाव रोडवर हा कार अपघात झाला. या अपघातात 3 जण जखमी झाल्याचेही वृत्त आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी कसेबसे गाडीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढले आणि जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याआधी गुरुवारी रात्री उशिरा मुंबई-पुणे महामार्गावर कारची ट्रकला धडक बसली, यात 5 जणांचा मृत्यू झाला, तर 4 जण जखमी झाले. अपघातातील स्विफ्ट कारमधील मृत व्यक्ती बजाजनगर येथील आहे. सुधीर पाटील, रावसाहेब मोटे, रतन बेडवाल व अन्य 1 अशा चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर वॅगनार कारधील 3 जखमी…
Author: editor desk
आपल्या आहारात मिठला खूप महत्व दिले आहे. त्यामुळे आपल्या अन्नाची चव समजते पण हेच मीठ आपल्या आहारात जास्त प्रमाणात झाले तर आपले आरोग्यावर त्याचा परिणाम होवू शकतो. कार्डिओव्हस्कुलर रिसर्चमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, शास्त्रज्ञांना आढळून आले आहे की जास्त मिठाच्या सेवनामुळे स्ट्रेस हार्मोनची पातळी 75 टक्क्यांनी वाढते. मिठाचं अधिक सेवन केल्याने हृदय, रक्तवाहिन्या आणि मूत्रपिंडांचं नुकसान होते, हे बहुतेकांना ठाऊक असेल. पण यामुळे तणावही वाढतो हे आता अभ्यासातून समोर आलं आहे. अधिक मीठ सेवन केल्यामुळे तणावाची पातळी वाढते एडिनबर्गच्या युनिव्हर्सिटी ऑफ कार्डिओव्हस्कुलर सायन्स सेंटरमधील रेनल फिजिओलॉजीचे प्राध्यापक मॅथ्यू बेली यांनी म्हटलं आहे की, आपण जे अन्न खातो त्यामध्ये असलेले मीठ…
जळगाव : प्रतिनिधी याही वर्षी पूर्ण भरलेल्या गिरणा धरणातून शेती सिंचनासाठी ३ व बिगर सिंचनासाठी २ अशी एकूण ५ आवर्तने जिल्ह्यासाठी सोडण्यात येणार असल्याचा निर्णय आज कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. गिरणा धरणातून दोनच आवर्तने मिळणार असतांना शेतकऱ्यांची वाढती मागणी व गरज लक्षात घेता पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी शेतकरी आणि लाभक्षेत्राच्या परिसरातील जनतेच्या हितासाठी तिसरे आवर्तन सोडण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सिंचनासाठी अतिरिक्त ४ थे आवर्तना बाबत पाण्याच्या उपलब्धतेनुसार व पाण्याची मागणी नुसार विभागाने निर्णय घेण्याचे ठरले. या अनुषंगाने गिरणा धरणातून अनुक्रमे १५ – २० डिसेंबर, १४ -२० जानेवारी आणि १६- २१ फेब्रुवारी रोजी ३ आवर्तने…
मुंबई : वृत्तसंस्था बीपीपो कर्मचारी असलेल्या मैत्रिणीला तिच्याच बॉयफ्रेंड असलेल्या अमेय दरेकर याने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये ठार मारण्याचा जो प्रयत्न करण्यात आला तो अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक आहे. यामध्ये 15 व्या मजल्यावर असलेल्या पाण्याच्या टाकीवर बसलेल्या गर्लफ्रेंडला तिच्याच बॉयफ्रेंडने मारहाण करत धक्का दिला आहे. त्यात ती सुदैवाने वाचली असली तरी तिचे मनके फ्रॅक्चर झाले आहेत. ज्यामध्ये डॉक्टरांच्या माहितीनुसार 30 महीने तिला रिकव्हर होण्यासाठी लागतील अशी माहिती समोर येत आहे. या प्रकरणी पोलीसांनी पीडित तरुणीचा बॉयफ्रेंड अमेय दरेकर याला अटक केली असून त्याची चौकशी केली जात आहे. त्याच्या एका मित्राला पोलीसांनी जबाबासाठी बोलावले आहे. बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला चक्का…
नाशिक : प्रतिनिधी सोशल मिडीयावर तरुणीमध्ये तुफान राडा होण्याचे व्हिडीओ व्हायरल होत असतात तसेच एक प्रकरण नाशिकमध्ये घडले आहे. नाशिकच्या मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक या संस्थेच्या महाविद्यालयातील हा व्हिडिओ असून हाणामारीची जोरदार चर्चा होत आहे. हाणामारीमध्ये मुली एकमेकांच्या केस ओढतांना दिसून येत आहे. हीच फ्री स्टाईल हाणामारी महाविद्यालयातील तरूणांणी आपल्या मोबाईल मध्ये चित्रित करत व्हायरल केली आहे. मुलींसह त्यांच्या पालकांना नाशिकच्या सरकारवाडा पोलीसांनी समज देण्यात आली आहे. महाविद्यालयात प्रशासनाने याबाबत मुलींसह त्यांच्या पालकांकडून लेखी माफी लिहून घेतली जाणार आहे. जेणेकरून पुन्हा असे प्रकार घडणार नाही. नाशिकमधील तरुणी आपापसात भिडण्यामागील कारण अद्याप समोर आले नसले तरी उपहार गृहात सुरुवातीला शाब्दिक…
मुंबई : वृत्तसंस्था केंद्रसरकारच्यावतीने पीएम किसान योजनेच्या माध्यमातून दरवर्षाला शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळतात. दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये हप्ता बँकेच्या खात्यात जमा होतो. पीएम किसान योजनेसाठी देशातील 12 कोटीहूं अधिक शेतकरी पात्र ठरलेले होते. 11 वा हप्ता आला तेव्हा 12 कोटीवरून ही संख्या 11 कोटी आणि 19 लाखावर आली आहे. याशिवाय 12 हप्ता म्हणजेच नुकताच नोव्हेंबर महिन्यात जमा झालेला हप्ता आलेली शेतकऱ्यांची संख्या 8 कोटीवर आलेली आहे. जवळपास साडेतीन कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम पोहचली नाही, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली असून पैसे का आले नाही म्हणून संभ्रम निर्माण झाला आहे. यंदाच्या वर्षी कोट्यवधी शेतकरी नव्या यादीपासून…
मुंबई : वृत्तसंस्था भीमा कोरेगांव हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आनंद तेलतुंबडे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं आज शुक्रवार त्यांचा जामीन मंजूर केला. तेलतुंबडे यांना 2020 पासून तळोजा तुरुंगात ठेवण्यात आलं आहे. भीमा – कोरेगाव प्रकरणातील संशयित आनंद तेलतुंबडेंना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 1 लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. एनआयएच्या सुप्रीम कोर्टात अपील करण्याच्या विनंतीवरून उच्च न्यायालयाने आदेशाला एका आठवडयाची स्थगिती दिली आहे. अर्बन नक्षलवाद प्रकरणी आयआयटीचे प्राध्यापक व दलित विचारवंत आनंद तेलतुंबडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. तेलतुंबडे यांचे बंदी घातलेल्या ‘सीपीआय’ (माओवादी) या संघटनेशी संबंध असलेल्या आरोप…
मुंबई : वृत्तसंस्था देशात सुरु असलेल्या यात्रेनिमित राहुल गांधी राज्यात येवून थांबले असून हि यात्रा आम्ही पहिल्याच दिवशी थांबविली असती मात्र आम्हाला त्याच्यात रस नाही. महाराष्ट्रात येऊन वीर सावरकर यांच्याविरोधात बोलणे आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींना दिला आहे. राहुल गांधी यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी असल्याचेही यावेळी ते म्हणाले. पुढे बावनकुळे म्हणाले, राहुल गांधी यांच्या वक्तव्याने देशाची मान खाली गेली आहे. वीर सावरकरांबद्दल राहुल गांधी आक्षेपार्ह वक्तव्य करत आहे. काँग्रेस पार्टी (INC) त्याचं समर्थन करत आहे. राहुल गांधी यांना सावरकरांचा इतिहास माहित असूनही ते जाणूनबुजून तो इतिहास दडपून टाकण्याचा…
मुंबई : वृत्तसंस्था काँग्रेस नेते राहुल गांधी हे भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. ही यात्रा इंदूरमध्ये पोहोचल्यानंतर राहुल गांधी यांना बॉम्बस्फोटानं उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. इंदूरमधल्या एका मिठाईच्या दुकानात हे धमकीचे पत्र ठेवण्यात आले होते. इंदूर पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक हे पत्र ठेवणाऱ्याचा शोध घेत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, जुनी इंदूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मिठाईच्या दुकानात राहुल गांधी यांना धमकी देणारं पत्र ठेवण्यात आलं होतं. या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, अज्ञात व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. साधारण २४ नोव्हेंबरला राहुल गांधी इंदूरच्या खालसा स्टेडियममध्ये रात्री विश्रांती घेतील. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, हा प्रकार खोडसाळपणाचा असू…
अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील जळोदकडून अमळनेर शहराकडे येणाऱ्या चारकीतून नेत असलेला ५३ किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. यासह चारचाकी, मोटरसायकल व मोबाईल असा सुमारे १२ लाख रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केल्याची घटना दि १८ रोजीच्या मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास जळोद रोडवर घडली. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे हे १७ नोव्हेंबरच्या रात्री गस्त घालत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली. जळोद– अमळनेर रस्त्यावरून एक चारचाकीमध्ये गांजा विक्रीसाठी अमळनेर शहरात आणला जात आहे. हिरे यांनी तात्काळ डीवायएसपी राकेश जाधव यांना माहिती देऊन हेडकॉन्स्टेबल किशोर पाटील, मिलिंद भामरे, दीपक माळी, रवींद्र पाटील, सूर्यकांत साळुंखे, चालक सुनील पाटील यांना घेऊन जळोद रस्त्यावर विजयनाना कृषी महाविद्यालयाजवळ…

