मुंबई : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज पहाटे 6 वाजताच अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने छापे टाकले आहेत. हसन मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्यातील घरांवर ईडीसह आयकर विभागानेही छापे टाकल्याची माहिती आहे. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप केले होते. आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्यात हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या जावयासह 100 कोटींचा घोटाळा केला, असा आरोप सोमय्यांनी केला होता. या प्रकरणीच ही छापेमारी असल्याचे सांगण्यात येत आहे. आज ईडी व आयकर विभागाने छापेमारी केल्याबाबत हसन मुश्रीफ यांनीही माध्यमांकडे पुष्टी केलील आहे. लवकरच सर्व माहिती घेऊन बोलणार असल्याचे…
Author: editor desk
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील एका गावात आपल्या परिवारासह वास्तव्यास असलेल्या १६ वर्षी अल्पवयीन मुलीस अनोळखी व्यक्तींनी दिनांक ९ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास पळून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोहे को मुकुंद पाटील हे करीत आहे.
मुंबई : वृत्तसंस्था रस्ता ओलांडताना दुचाकीने बच्चू कडू यांना धडक दिली आहे. या अपघातात बच्चू कडू जखमी झाले आहेत.समोर आलेल्या माहितीनुसार, सकाळी 6. 30 च्या सुमारास बच्चू कडू रस्ता क्रॉस करत होते. त्या सुमारास समोरून येणाऱ्या एका दुचारीस्वाराने त्यांना जोरदार धडक दिली, यामुळे बच्चू कडू रोडच्या डिव्हायडरवर जाऊन आदळले यात त्यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर इजा झाली आहे. याबाबत स्वतः बच्चू कडू यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. “आज सकाळी रस्ता क्रॉस करताना माझा अपघात झाला. माझी प्रकृती ठीक असुन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला विश्रांतीची गरज आहे. कृपया सर्व हितचिंतकांना विनंती की कोणीही भेटायला येऊ नये.”, असे ट्वीट बच्चू कडू यांनी…
पारोळा : प्रतिनिधी येथील अमळनेर रोड अशोक नगर भागातील बंद घरावर चोरट्यांनी डल्ला मारत सोने लंपास केले. त्याचबरोबर भोकरबारी तालुका पारोळा येथे देखील चोरीची घटना घडली. सविस्तर वृत्त असे कि, अशोकनगर येथील रहिवाशी समाधान बापू भवर (मराठे) हे बाहेरगावी गेले होते. ९ जानेवारीच्या रात्री चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून लोखंडी कपाटातील साडेचार ग्रॅम सोन्याचा नेकलेस तर १५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे टोंगल घेऊन पोबारा केला. चोरट्यांनी ६० हजार रूपयांचा ऐवज लंपास केल्याची तक्रार करण्यात आली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी भेट दिली. पुढील तपास स.फौ.बापूराव पाटील हे करीत आहेत.
चाळीसगाव : प्रतिनिधी धुळे रोडवरील उदेसिंग आण्णा सोसायटीत सेवानिवृत्त शिक्षकाच्या बंद घरातून ४६ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना दि. ३ रोजी दुपारी ३:३० ते दि. ८ रोजी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान घडली. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमलबाई अमरसिंग पाटील (वय ७२, धुळे रोड, चाळीसगाव) यांनी शहर पोलिसांत मंगळवारी फिर्याद दिली असून, त्यानुसार त्या व त्यांचे पती नाशिक येथे दि. ३ रोजी कामानिमित्त मुलाकडे गेले होते. जाताना घराला कुलूप लावले होते. तेथून दि. ८ रोजी रात्री आठ वाजता घरी आले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मागील दाराचे लोखंडी कुलूप तोडून घरातील लोखंडी कपाट…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसराच्या मुख्य रस्त्यावर १७ वर्षीय युवतीचा एकाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्थानकात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील रिंग रोड परिसरात दिनांक १० रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास एका ठिकाणी १७ वर्षीय युवती जात असताना तिच्या समोरून येणाऱ्या संशयित आरोपी राजेश विश्वनाथ भगत (वय ४२) रा.बिबा नगर याने युवतीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला आहे. याप्रकरणी युवतीच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी राजेश विश्वनाथ भगत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि. किशोर पवार हे करीत आहे
अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातून शेताच्या पत्राच्या शेड मधून लाखो रुपयाचा कापूस चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मारवाड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील लोन शिवारातील शेतकरी दिनेश निंबा साळुंखे यांचे शेताच्या पत्राच्या शेड मधून लाखो रुपयांचा कापूस यांनी एकत्र करून ठेवलेला होता. दिनांक ९ रोजी रात्रीच्या सुमारास त्यांनी कापसाची पाहणी करून घरी गेले होते. त्यानंतर सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतातील सालदार संतोष पाटील यांनी त्यांना फोन करून सांगितले की शेडच्या मागील दरवाजा उघडा असून व ठिकाण त्या ठिकाणी कापूस पडलेला दिसून येत आहे. याबाबत त्यांनी लागलीच शेतात धाव घेत…
राज्यातील शेतकरी व महावितरण मधील वाद गेल्या काही दिवसपासून थांबण्याचे नाव घेतच नाही. आहे. त्या वादाची सुरुवात महावितरणने शेतकऱ्यांना अंधाधुंद दिलेल्या बिलांमुळेच राज्यातील शेतकरी हैराण झाले होते. बीड तालुक्यातील १२ हजार नागरिकांना रीडिंग न घेता अंदाजे जास्तीच्या वीज बिलाचा शॉक दिला जात आहे. यामुळे याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. खंडाळा गावातील नागरिकांनी आपली व्यथा मांडली आहे. अंधारात राहू तुमचे बिलही नको आणि लाईट नको अशी भावना ग्रामस्थांनी मांडली. विजेची आकडे टाकून चोरी करणाऱ्या लोकांना मात्र महावितरणचे पाठबळ आहे. आम्ही तुमचे मिटर घेऊन चुक केलीय का असा सवाल संतप्त ग्रामस्थ विचारत आहेत. अनेकांच्या घरात अगदी कमी वीज वापरून देखील मोठ्या प्रमाणावर…
औरंगाबाद : वृत्तसंस्था राज्यात प्रेम प्रकरणातून हत्या कि टोकाचे पाऊल उचलत जीवन संपविल्याच्या घटना घडत आहेत. सोयगाव तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून विवाहित तरुणाने आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली आहे. भीमराव प्रकाश बोराडे असे मयत तरुणाचे नाव आहे. तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून ३० वर्षीय प्रेयसीच्या विरोधात फर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोयगाव तालुक्यातील पळसखेडा येथील भीमराव प्रकाश बोराडे हा पळसखेडा येथून जामनेर येथे क्रूझर जीपने शाळेतील मुलांची ने-आण करत असे. दरम्यान शनिवारी पळसखेडा ते वाकोद येथील आठवडे बाजारासाठी त्याने प्रवाशाची ने- आण केली होती. त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता घरी परतल्यानंतर…
मुंबई : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उजव्या डोळ्यावर मंगळवारी मुंबईतील रुग्णालयात मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली, अशी माहिती पक्षाच्या एका कार्यकर्त्याने दिली. आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला, असे ते म्हणाले. “त्यांच्या उजव्या डोळ्याचे मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी सोमवारी सांगितले की, शरद पवार एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते, परंतु डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागल्याने ते जाऊ शकले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांच्या काही काळापूर्वी त्यांच्या एका डोळ्याचे ऑपरेशन झाले होते. शरद पवार यांच्यावर मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. ही मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली असून दक्षता म्हणून त्यांना 18 जानेवारीपर्यंत…

