मुंबई : वृत्तसंस्था खरी शिवसेना कोणाची? यावर गेल्या 6 महिन्यांपासून राज्यात सत्तासंघर्ष दिसून येत आहे. सत्तासंघर्ष निर्णयक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. दरम्यान सुनावणीपूर्वी संजय राऊत यांनी एक शेर ट्विट केले आहे. ‘मन मे हमेशा जीत की आस होनी चाहिए… नसीब बदले या ना बदले,वक्त जरुर बदलता है’, अशा मजकूराचा हा शेर आहे. कोर्टाकडून अपेक्षित अशा गोष्टी घडणार का हे पाहवं लागणार आहे. मात्र सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी १४ फेब्रुवारीला होणार आहे. सत्तासंघर्ष प्रकरणी घटनापीठाने 8 मुद्दे निश्चित केले आहे. यातील 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भाच्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटाने, सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे द्यावे अशी मागणी मागच्या…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी शहरातील विकास कामांसाठी 200 कोटींचा विकास निधी देऊन येत्या सहा महिन्यात शहरातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुंबईत सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही बैठक झाली. शहरातील विविध कामे निधी अभावी रेंगाळली आहेत. सत्ताधारी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून कामे होत नसल्याबाबत प्रचंड तक्रारी होत्या. शहरवासीयांकडून याप्रश्नी नाराजी व्यक्त केली जात असल्याचा विषय लक्षात घेऊन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या विषयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्याकडे बैठक घेऊन शहर विकासासाठी निधीची मागणी करण्या संदर्भात बैठक घेण्याचे ठरविले होते.त्यानुसार ही बैठक आज सोमवारी…
मुंबई : वृत्तसंस्था शिवसेना कुणाची यावर सत्ता संघर्ष अनेक दिवसापासून सुरु होता आणि तो आता पुढेही सुरु राहणार असल्याचे चित्र दिसत आहे. यावर आजही खरी शिवसेना कोणाची? या सत्तासंघर्षावर सुनावणी आज सुप्रीम कोर्टात पार पडली. सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या ठाकरे गटाने सात सदस्यांच्या घटनापीठाकडे हे प्रकरण देण्याची मागणी केली. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी ही मागणी केली. यावेळी न्यायालयाने ही सुनावणी १४ फेब्रवारी रोजी घेण्याचा निर्णय दिला. आता शिंदे गट व ठाकरे गटातर्फे दाखल सर्व याचिकांवर सात सदस्यीय की पाच सदस्यीय पिठाकडे हे प्रकरण जाते, हे ठरणार आहे. १४ फेब्रुवारीपासून सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर सलग ही सुनावणी घेण्यात येणार आहे, अशी…
मुंबई : वृत्तसंस्था कल्याणमधील गौरी पाडा परिसरात एका सात वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली आहे. प्रणव भोसले असे या मुलाचे नाव असून या मुलाच्या आईच्या मित्रानेच ही हत्या केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी खडकापाडा पोलिसांनी आरोपी नितीन कांबळे याला अटक केली आहे. नेमकं काय घडलं? कल्याणमध्ये ही धक्कादायक घटना घडली असून, ज्या इमारतीच्या पाण्याच्या टाकीत मुलाचा मृतदेह आढळला, त्याच इमारती मध्ये नितीन काही महिन्यांपूर्वी वॉचमनचे काम करत होता. आपले कृत्य लपवण्यासाठी नितीन पोलीस ठाण्यात पोहचला आणि त्याने एका महिलेने माझे घेतलेले पैसे न दिल्याने त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असे सांगितले. तर दुसरीकडे कविता यांनी शाळेतून सायंकाळी मुलगा प्रणव…
मुंबई : वृत्तसंस्था उर्फी जावेदनं चित्रा वाघ यांना पुन्हा एकदा डिवचलंय. उर्फीनं केलेलं ट्विट, उर्फीवरुन चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर यांच्यात सुरु झालेला वाद, त्या वादात सुप्रिया सुळेंनी मारलेली उडी यामुळं प्रकरण अधिकच चिघळलंय. कधी चित्रा वाघ जी, कधी चित्रू, तर कधी सासू, मॉडेल उर्फी जावेदनं चित्रा वाघ यांना डिवचण्याचा सिलसिला चालूच ठेवलाय. उर्फी जावेदनं चित्रा वाघ यांना ट्विट करुन डिवचलं. आणि चित्रा वाघ यांच्या संतापाचा पारा पुन्हा चढला. काही दिवसांपूर्वी उर्फीनं हा नंगानाच सुरुच ठेवणार असल्याचं म्हटलं होतं. नंतर एक व्हिडीओ पोस्ट करत आपल्याला कपड्यांची अॅलर्जी असल्याचा दावा केला होता. कपड्यांची अलर्जी असल्याचा दावा उर्फीनं केल्यानंतर चित्रा वाघ यांनी…
अहमदनगर : वृत्तसंस्था शिर्डीच्या साईबाबा मंदिराची दानपेटी उघडताच सर्वांना उत्सुकता लागलेली असते ती म्हणजे दानामध्ये मिळालेल्या रक्कमेचा आकडा किती आहे हे जाणून घेण्याची! ही रक्कम इतकी जास्त असते की, ती मोजण्यासाठी अनेक लोकांना एकाच वेळेस काम करावे लागते. 2022 मध्ये साईंच्या दरबारात भक्तांनी त्यांच्या यथा शक्तिने दान केले आहे. या वर्षी श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट , शिर्डीला 400 कोटी रुपयांपेक्षा जास्त देणग्या मिळाल्या आहेत. सोने-चांदी, रोख रक्कम, चेक, ऑनलाइन पेमेंट अॅप आणि डिमांड ड्राफ्टद्वारे ही देणगी प्राप्त झाली आहे. साई मंदिरातील भक्तांची संख्या झपाट्याने वाढली. डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून मंदिरात दररोज 1 लाखाहून अधिक भाविक येत आहेत. 31 डिसेंबरला मंदिर रात्रभर…
एरंडोल : प्रतिनिधी परम पूज्य माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग परिवार एरंडोल/धरणगाव तर्फे पिंपळकोठे ता.एरंडोल येथे जळगाव जिल्हास्तरीय एक दिवसीय सहज कृषी कार्यशाळेचे चे आयोजन करण्यात आले. या सेमिनार मध्ये नागपूर येथील सहज कृषी चे राज्य समन्वयक श्री मोहन जोशी यांनी विज्ञानाच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात सहजयोग पध्दतीने शेती कशी करावी ? या बाबत मार्गदर्शन केले.कृषी उत्पादनात वाढ, त्यांची निगा आणि पंचमहाभूत तत्वांचा उपयोग सहज कृषीमध्ये कसा केला जातो? हे प्रात्यक्षिकाद्वारे विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालून कृषी क्षेत्रात सहजयोग पद्धतीने शेती करण्याची गरज का निर्माण झाली? याबद्दल सांगितले. सामूहिक पिकांना चैतन्य प्रदान करून आपल्या गावात एक वातावरण निर्मिती करून…
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या आठवड्याभरात सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून आली होती मात्र या आठवड्याच्या सुरवातीपासून म्हणजेच पहिल्याच दिवशी सोमवारी सोने चांदीचे दर तेजी दिसून आली तर आज सुद्धा सोन्याच्या दरात तेजी दिसून येत आहे तर चांदीचे दर आज स्थिर आहे. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 51,600 रुपये तर 24 कॅरेट साठी 56,290 रुपये आहे तर चांदीच्या दर कमी झाला असून आज 10 ग्रॅम चांदी 718 रूपये आहे. चेन्नई – 57,380 रुपये दिल्ली – 56,440 रुपये हैदराबाद -56,290 रुपये कोलकत्ता – 56,290 रुपये लखनऊ – 56, 440 रुपये मुंबई – 56,290 रुपये नागपूर -…
नात्यातील अविश्वासमुळे एक हसतं खेळतं कुटुंब उद्धवस्त झालं आहे. पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला संपवल्याचा प्रकार समोर आला आहे. पतीला राग इतका अनावर झाला की त्याने दोन वर्षाच्या बाळालाही सोडलं नाही. हि घटना संभाजी नगर येथे घडली आहे. चारित्राच्या संशयावरून संभाजीनगरच्या कांचनवाडीत पतीने पत्नीचा खून केल्याचा प्रकार सोमवारी समोर आला आहे. रात्री दोनच्या सुमारास पतीने पत्नी आणि अडीच वर्षाच्या बाळाचा दोरीने गळा आवळला आणि त्यांना संपवलं. या घटनेनंतर आरोपी पती सकाळपर्यंत घरातच थांबला होता. त्यानंतर सकाळी सातारा पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर होत पत्नी आणि मुलाच्या हत्येची माहिती दिली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केलली असून पुढील तपास सुरु केला…
गेल्या महिन्यापासून नाशिक शहरालगत होणाऱ्या अपघाताची मालिका थांबायचे नाव घेत नाही. आजही त्र्यंबकेश्वरजवळ भाविकांची बस उलटल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १3 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. बस मधील प्रवासी हे बुलढाणा जिल्ह्यातील चांडोळ गावचे रहिवासी आहेत. या बस मध्ये सर्व ज्येष्ठ नागरिक प्रवास करत होते. एकूण 29 लोक या गाडीत होते अशी माहिती समोर आली आहे.

