मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील भाजप पक्ष जरी देश पातळीवर मोठा झालेला असला तरी पक्षातील नाराज असलेले नेते प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमात भाजपच्या वरिष्ठ नेत्यावर असलेली नाराजी उघडपणे बोलून दाखवीत आहे. यावर आता ठाकरे गट भाजप मधील नाराज नेत्यासाठी पक्ष प्रवेशाची ऑफर देत आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पंकजा मुंडे यांना पक्षप्रवेशाची ऑफर दिली आहे. माध्यमांना ते म्हणाले की, पंकजा मुंडेंवर अन्याय होतोय. मुंडेमुळे भाजप वाढला. भाजपमध्ये बरेच राजकारण चालते त्यावर मला बोलायचे नाही. सुनील शिंदे खूप छोटे आहे पण त्यांचे उद्धव ठाकरेंशी बोलणे झाले. पंकजा मुंडेंना मातोश्रीचा दरवाजा कधीही उघडा आहे, हे खुद्द उद्धव ठाकरेंनी सांगितले आहे. माझी इच्छा आहे…
Author: editor desk
पुणे : वृत्तसंस्था शाळकरी मुलाने जुन्या भांडणातून १५ वर्षांचा मुलगा आणि त्याचा मित्र अशा दोघांवर ब्लेडने वार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील नगर रोडवरील वडगाव शेरी परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी चंदननगरमधील बोराटे वस्तीत राहणाऱ्या एका पालकाने चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हा पुण्यातील वडगाव शेरी परिसरातील गलांडे नगरमध्ये राहतात. त्यांच्या मुलाचं एका मुलाशी भांडण झालं होतं. तक्रारदार यांचा मुलगा परिसरात असलेल्या मदर तेरेसा शाळेतून चालत घरी जात होते. बस स्टॉपवर बसले असताना शाळकरी मुलगा आणि त्याचे तीन मित्र या बस स्टॉपवर आले. त्यावेळी त्या मुलांनी तक्रारदाराच्या मुलाना शिवीगाळ केली आणि…
मुंबई : वृत्तसंस्था मॉडेल उर्फी जावेद व भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला आहे. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आज पत्रकार परिषद घेत उर्फी जावेदवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. वाघ म्हणाले कि, महाराष्ट्रात नंगानाच चालू देणार नाही, माझी ही ठाम भूमिका आहे. ‘मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, तुमच्यात जितका दम आहे तितकं तुम्ही करा. उर्फी जावेदच्या कपड्यांना माझा विरोध कालही होता आजही आहे आणि उद्याही राहणार. त्यामुळे हा नंगानाच आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही. ही माझी ठाम भूमिका आहे. तुम्हाला काय करायचं ते करा.’ असं चित्रा वाघ म्हणाल्या ‘माझ्यासोबत गावा-गावातील जनता आहे. मी अनेक जिल्ह्यांमध्ये जाते,…
अमरावती : वृत्तसंस्था उद्धव ठाकरे यांच्या काळात फेसबुक लाईव्हवर सरकार अडीच वर्षे चाललं, असं टीकास्त्रही त्यांनी सोडलं. फक्त हनुमान चालिसा वाचली म्हणून एका लोकप्रतिनिधीला 13 दिवस या उद्धव ठाकरेंनी जेलमध्ये टाकलं. बाळासाहेबांचे विचारच जर त्यांच्या घरात ठेवले नाहीतर त्यांचं काय होईल? असा सवाल नवनीत राणा यांनी उपस्थित केला.त्या अमरावतीमध्ये बोलत होत्या. नवनीत राणा म्हणाल्या, ” सत्तासंघर्ष सध्या सुरु आहे. सत्ताचा काय संघर्ष आहे? जे बाळासाहेबांचे विचार घरात जिवंत ठेवू शकले नाहीत, ते सत्तेसाठी काय संघर्ष करणार? मला विश्वास आहे, येणाऱ्या काळामध्ये बाळासाहेबांची विचारधारा एकनाथ शिंदेंसोबत आहे, त्यांनाच धनुष्यबाण मिळेल असा विश्वास आहे. माझा देवावरचा विश्वास, हनुमान चालिसावर विश्वास आहे. बाळासाहेबांना…
धरणगाव : प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देणारं हक्काचं व्यासपीठ म्हणजे शाळेचं स्नेहसंमेलन असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण व्यक्तीमत्व विकासासाठी स्नेह संमेलन उपयुक्त आहे. स्नेह संमेलनातील विविध उपक्रमांमुळे विद्यार्थी घडले जातात. त्यांना विविध क्षेत्रात आवड निर्माण होते सुजाण नागरिक तयार होतात.विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच विविध कलागुण जोपासावेत असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते बाल कवी ठोंबरे विद्यालय आयोजित आनंद तरंग स्नेह संमेलन व वार्षिक बक्षीस वितरण सोहळा प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे हेमालालकाका भाटिया हे होते. आज धरणगाव येथील श्री विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बालकवी ठोंबरे प्राथमिक शाळा व सारजाई दामोदर कुडे माध्यमिक…
मुंबई : वृत्तसंस्था शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. पक्षचिन्हाबाबत बोलताना रामदास कदम म्हणाले की, काँग्रेसची गाय-बछडा किंवा बैल-जोडी असुदे पक्ष फुटल्यानंतर निशाणी देताना निकष पाहिले तर एकनाथ शिंदेंना नक्की न्याय मिळेल. खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच असल्याचं शिक्कामोर्तब होईल, असं वाटतं. कारण, यावर निकाल देताना एकूण आमदार आणि खासदाराला मिळालेली मते मोजली जातात. तसेच, एकनाथ शिंदेबरोबर १३ खासदार आणि ५० आमदार आहेत. उद्धव ठाकरेंबरोबर ५ खासदार आणि १४ आमदार आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदेंना धनुष्यबाण मिळालं पाहिजे. असे मत यावेळी बोलताना रामदास कदम यांनी व्यक्त केले. ठाकरे कुटुंबावर टीका करताना रामदास कदम म्हणाले की,…
मुंबई : वृत्तसंस्था चित्रा वाघ आणि उर्फी यांच्यामध्ये ट्विटरवर युद्ध सुरूच आहे. आता या वादावर अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, “फॅशन करावी, फॅशनला मोठा वाव आहे. फॅशन कुठेही करू शकता, पण कुठेतरी एक मर्यादा असते. प्रोफेशनल आणि रिअॅलिटी यात फरत आहे. या गोष्टी समजणं गरजेचं आहे. उर्फीने हे समजून घेतलं पाहिजे. सगळेच जण या वादात उतरले आहेत, पण रबर ताणला की तुटतो. त्यामुळे तो तुटायच्या आता यावर निर्णय घेणं गरजेचं आहे. उर्फीला समजवायला हवं.” त्याचबरोबर उर्फीच्या या गोष्टीचं समर्थन करत नसल्याचंही दिपाली सय्यद यांनी स्पष्ट केलं. उर्फी जावेद तिचा उदरनिर्वाह करण्यासाठी ज्या गोष्टी करत आहे,…
नांदेड ; वृत्तसंस्था आजीजवळ शिक्षणासाठी राहण्यासाठी आलेल्या एका सातवीतील चिमुकलीवर नात्याने चुलता लागणाऱ्या एका आरोपीने अत्याचार केल्याची घटना नांदेड जिल्ह्यात समोर आली होती. तर या प्रकरणात पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचाराच्या कलमाखाली गुन्हा नोंदविण्यात आला होता. दरम्यान आता यावर न्यायालयाने अंतिम निकाल दिला असून, न्या. आर. एम. पांडे यांनी आरोपी चुलत्याला 20 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित मुलीची आई पुण्यात राहत होते. त्यामुळे मुलगी ही आजीजवळ राहून शिक्षण घेते. दरम्यान 29 जानेवारी 2010 रोजी पीडित मुलीची तब्येत ठीक नसल्याने ती घरीच होती. सायंकाळी चार वाजेच्या सुमारास मुलीची आजी ही दळण आणण्यासाठी गिरणीवर गेली…
अहमदनगर : वृत्तसंस्था राज्यात नाशिकसह काही जिल्ह्यात अपघाताची मालिका सुरूच आहे. नुकतेच सिन्नर- शिर्डी महामार्गावर पाथरे शिवारात ईशानेश्वर मंदिराच्या कमानीजवळ दि.१३ रोजी शुक्रवारी भीषण अपघात झाला आहे. खाजगी आराम बस व ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात अनेक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात असून आराम बसमधील बहुसंख्य प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई येथून शिर्डी कडे जाणारी खाजगी आराम बस क्रमांक एम एच 04 एसके 2751 व शिर्डी बाजू कडून सिन्नर बाजूकडे जाणारा मालट्रक क्रमांक एम एच 48 टी 1295 यांची समोरासमोर धडक होऊन आपघात झाला. पाथरे ते…
राज्यातील शेतकरी हिवाळ्यात थंडीच्या संकटामुळे दुहेरी संकटात सापडला आहे. वाशिम जिल्ह्यात हळद पिकांवर करपा रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचे नुकसान होत आहे. दुसरीकडे, राज्यात दीड लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात तुरीची पेरणी झाली आहे. मात्र बदलत्या हवामानामुळे तुरीचे पीक धोक्यात आले आहे. राज्यातील बदलत्या हवामानामुळे हळद पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे . सध्या महाराष्ट्रात तुरीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तुरीच्या उत्पादनात महाराष्ट्र हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. दुसरीकडे, तेलंगणात तुरीचे सर्वाधिक उत्पादन होते. सध्या राज्यातील वाशिम जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पिकांचे नुकसान झाले आहे. हळद…

