नागपूर : वृत्तसंस्था संक्रांतीनिमित्त आभाळ पतंगांमुळं भरुन गेलं आहे. तर दुसरीकडे एकमेकांच्या पतंग कापण्याची स्पर्धा सुरु झाली आहे. मात्र ही कटलेली पतंग पकडण्यासाठीही जिवाची पर्वा न करता मागे धावणाऱ्यांच्याही अनेकवेळा अंगाशी येत असल्याच्या अनेक घटना शहरात घडल्या आहेत. असाच प्रकार कुंभारटोली परिसरालगत असलेल्या रेल्वे ट्रॅकवर घडला आहे.शहरात नायलॉन मांजाचा वापर नागरिकांच्या जीवावर बेतला असताना पतंगाच्या मागे धावताना एका १३ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना कुंभारटोली लगतच्या रेल्वे ट्रॅकवर घडली. आकाशात सुरु असलेल्या पतंगांच्या लढती बघत कुंभारटोली परिसरातील मुले उभी होती. तसेच कट झालेला पतंग पकडण्यासाठी त्या पतंग कटून जात असलेल्या दिशेने बेभाम पळत सुटायची. असाच एक पतंग कट…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलासोबत एकाने अनैसर्गिककृत्य केल्या प्रकरणी शहरातील रामानंद नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील एका परिसरात रहिवासी असलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलास शहरातील एका परिसरात दि १२ रोजीच्या रात्रीच्या सुमारास घेवून जात त्याठिकाणी त्याच्यासोबत अनैसर्गिक संभोग केल्या प्रकरणी अल्पवयीन म्मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून एका २८ वर्षीय गुड्डू नामक तरूणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनी गोपाल देशमुख हे करीत आहेत.
सातारा : वृत्तसंस्था ऑक्टोबर 2019 मध्ये पोटच्या दोन मुलांचा खून करणाऱ्या बापाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सातारा कोर्टाने हा निकाल दिला आहे. दोषी चंद्रकांत मोहितेने शिरवळ इथे आपल्या दोन मुलांची हत्या केली होती. या आरोपात दोषी ठरल्यानंतर सातारा कोर्टाने त्याला जन्मठेपेची शिक्षा आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास सहा महिन्यांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए एस जाधव यांनी हा निकाल दिला. हे प्रकरण सुमारे सव्वातीन वर्षांपूर्वीचं म्हणजेच ऑक्टोबर 2019 मधील आहे. आपल्या पश्चात पत्नी मुलांचा सांभाळ करणार नाही, असं वाटल्याने चंद्रकांत मोहितेने दोन्ही मुलांची निर्दयीपणे हत्या केली. त्याने शिरवळमध्ये आपला सात वर्षांचा…
नागपूर : वृत्तसंस्था केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी आल्याचं वृत्त आहे. त्यामुळे नितीन गडकरी यांच्या जीवाला धोका असल्याचं सांगण्यात येतंय. या कारणास्तव त्यांच्या घराची तसेच कार्यालयाची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयात लँडलाइन नंबरवर धमकीचे फोन कॉल आल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे ही धमकी डी गँग अर्थात दाऊदच्या नावाने देण्यात आली आहे. सू्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १०० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. १४ जानेवारी रोजी सकाळी तीन वेळा गडकरी यांच्या नागपूरमधील कार्यालयात धमकीचे फोन आले. त्यामुळे नागपूर पोलीस अलर्ट झाली आहे. सदर कॉल नेमके कुणी केले, यासंदर्भात पोलिसांचा तपास सुरू आहे.…
धरणगाव : प्रतिनिधी येथील ग्रामदैवत मरीमाता मंदिराचा जिर्णोद्धार भूमिपूजन प्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या उपस्थितीत धानोराचे माजी सरपंच भगवान महाजन माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन जागृती युवक मंडळाचे कडू महाजन पूनीलाल महाजन सूनील चौधरी यांचा हस्ते भूमिपूजन करण्यात आले. 12 जानेवारी मासाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने शिवसेना सह. संपर्कप्रमुख गुलाबरावजी वाघ व लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या हस्ते नारळ फोडून प्रतिमा पूजन करण्यात आले त्याप्रसंगी एडवोकेट शरद माळी गटनेते पप्पू भावे विलास महाजन ललित येवले कन्हैया रायपुरकर भागवत चौधरी, राजेंद्र ठाकरे, विजय महाजन वासुदेव चौधरी भैय्या महाजन दिलीप महाजन आर्किटेक सुनील शहा वाल्मीक पाटील बालू पाटील भानुदास पाटील…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात सुरु असलेली कॉंग्रेसची भारत जोडो यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. तर सध्या हि यात्रा पंजाबमध्ये सुरु असतांना मोठी दुर्दैवी घटना घडली आहे. यात्रेदरम्यान जालंधरचे काँग्रेसचे खासदार चौधरी संतोख सिंह यांचे निधन झाले. ते राहुल गांधीसोबत यात्रेत चालत होते. यादरम्यान, त्यांची प्रकृती खालावली.ल त्याना तात्काळ फगवाडा येथील रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान रुग्णालयात नेताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. यानंतर राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काही काळासाठी थांबवली आहे. ही यात्रा आज लुधियानाच्या लाडोवाल टोल प्लाझा येथून फगवाड्याच्या दिशेने निघाली होती. त्यादरम्यान ही घटना सकाळी घडली. सकाळी 8.45 च्या सुमारास…
जळगाव : प्रतिनिधी शहरात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रमुख रस्त्यांची कामे सुरू आहेत. परंतु हे रस्त्यांचे कामे व्यवस्थित होत नसल्याच्या तक्रारीवरून जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी आज प्रस्तावित कामे आणि सुरू असलेल्या रस्ते कामांची पाहणी केली. दरम्यान ज्याठिकाणी रस्त्यांची कामे झाली आहेत त्याठिकाणच्या रस्त्यांचे अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत थर्ड पार्टी ऑडीट केेले जाणार आहे. मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव शहरातील रस्ते कामासंदर्भात बैठक झाली होती. या बैठकीत जिल्हाधिकारी अमन मित्तल हे उपस्थित होते. शहरातील खराब रस्ते तसेच सुरू असलेले रस्त्यांचे कामे निकृष्ट दर्जाचे असल्याबाबत नागरिकांमध्ये सत्ताधार्यांविषयी मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सहा महिन्यात रस्त्यांची परिस्थीती सुधारली जावी यासाठी ही…
पारोळा : प्रतिनिधी जिल्ह्यातील गेल्या काही दिवसापासून असा एक दिवस नाही कि महिलेवर किवा अल्पवयीन मुलीवर अन्याय होत नाही रोज अशा घटना घडत असतांना नुकतीच एक घटना समोर आली आहे. मतीमंद तरुणीवर अज्ञात इसमाने तिच्यावर अत्यचार करीत तिला गर्भवती केल्याची संतापजनक घटना जिल्ह्यात घडली आहे. एका शेतमजुरी करणा-या मतीमंद तरुणीवर झालेल्या अत्याचारातून तरुणी तिन महिन्यांची गर्भवती झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी पारोळा पोलिस स्टेशनला अज्ञात आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारोळा येथे शेतमजुरी करणारे कुटूंब शेतात जात होते. दरम्यानच्या कालावधीत मतीमंद तरुणी घरात एकटी रहात असल्याचा गैरफायदा घेत तिच्यावर अज्ञाताने वेळोवेळी अत्याचार केला. त्यातून ती…
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसात भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यात मोठ्या प्रमाणावर वाद सुरु आहे. उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांवरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ही महाराष्ट्राची संस्कृती नसल्याचे म्हटले होते. असला नंगानाच खपवून घेणार नाही, असा थेट इशाराच त्यांनी उर्फी जावेद हीला दिला होता. त्यानंतर उर्फीनेही आपला नंगानाच असाच सुरु राहणार म्हणत त्यांना प्रत्युत्तर दिले होते. चित्रा वाघ यांनी उर्फीविरोधात मुंबई पोलिसांची भेट घेत तक्रार केली होती. आता सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन प्रकरणी मुंबई पोलिसांनी उर्फी जावेदला नोटीस पाठवली आहे. अंबोली पोलिस ठाण्यात उर्फी जावेदची चौकशी होणार आहे. पोलिसांनी उर्फीला आज हजर होण्याची नोटीस जारी केली आहे.…
जळगाव : प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील पहुर येथील बंद घर फोडून सोन्याचे दागिने व रोकड असा लाखो रूपये किंमतीचा मुद्देमाल लांबविणाऱ्या टोळीचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला असून या गुन्ह्यातील पाच संशयित आरोपींना शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. यात एका महिलेचा समावेश आहे. ज्याच्या घरी घरफोडी झाली होती, ते अटकेतील महिलेचे मामेभाऊ होते, मामेभावाकडे मोठ्याप्रमाणावर दागिणे व रोकड असल्याची माहिती महिलेने तिच्या पतीला व पतीच्या मित्रांना दिली होती. त्यानुसार महिलेसह इतर चौघांनी नियोजनबध्द रितीने ही घर फोडी केल्याचे तपासात समोर आले असून संशयितांनी गुन्ह्याची कबूली दिली आहे. त्यांच्याकडून चोरीपैकी १६ लाख ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत…

