जळगाव : प्रतिनिधी शहरात सोमवारी दुपारी आठवडे बाजार ते शासकीय तांत्रिक महाविद्यालयादरम्यान मद्यधुंद चालकाने भरधाव ट्रक चालवून एसटीसह तीन ते चार दुचाकींना धडक दिली. हा संपूर्ण थरार येथील नागरिकांनी अनुभवला दरम्यान, नागरिकांनी ट्रक चालकाचा पाठलाग करून त्याला चांगलाच चोप दिला. त्यामुळे रस्त्यावर बघ्यांची प्रचंड गर्दी जमली होती. मद्यधुंद अवस्थेत एक चालक ट्रक (एमएच.३४. एव्ही. १४५३) चालवत आठवडे बाजारकडून शिवतीर्थ मैदानाकडे येत होता. या रस्त्यावर त्याने सुरुवातीला रिव्हर्स घेताना एसटीला धडक दिली. त्यानंतर भरधाव ट्रक चालवत तीन ते चार दुचाकींना धडक दिली. काही दुचाकीधारकांनी ट्रक चालकाला शासकीय तांत्रिक महाविद्यालयाजवळ ट्रक अडवून चालकाला चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी भुसावळ तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील कोहुरखेडा फाट्यावर दोन तरूण भरधाव वेगात मोटरसायकल चालवून पुलाच्या भिंतीवर मोटरसायकल आदळल्याने एक तरुण जागीच ठार तर दुसरा उपचारादरम्यान मयत झाल्याची घटना दुपारी घडल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. गेल्या वर्षी सूरज याच्या भावाचा मृत्यू झाला होता. भावाच्या वर्षश्राद्धालाचा दुसऱ्या भावाच्या नवआयुष्यावर संक्रांत आली. पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, सुरज रामदास तांबे (वय 15, रा.काहुरखेडा), सुनिल विठ्ठल भालेराव (वय 20, रा. वघारी ता. जामनेर) हे दोघे तीन वाजेच्या सुमारास मोटरसायकल क्र. एमएच 19 डी 1600 वरुन काहुरखेडा फाट्यावर भरधाव वेगात मोटरसायकल चालवत असतांना महामार्गावरील भिंतीवर मोटरसायकल आदळल्याने सुरज यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने…
नागपूर : वृत्तसंस्था अनैतिक संबंधातून पत्नीची हत्या करण्यात आल्यानंतर हि हत्या कशी झाली याबाबत पोलिसांना मोठा यश आला आहे. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. नागपूर-अमरावती महामार्गावरील सत्याग्रही घाटात ३५ दिवसांपूर्वी आढळलेल्या महिलेच्या मृतदेहाचं रहस्य उलगडण्यात वर्धा पोलिसांना यश आलं आहे. यवतमाळ जिल्ह्यातील नेर नजीकच्या सातेफळ इथल्या जंगलात आरोपींना शोधण्यात आलं. अनैतिक संबंधातून पत्नीची हत्या केली असल्याची बाब समोर आली आहे. तर आधी दगडाने ठेचून हत्या करण्यात आली, त्यानंतर ओळख पटू नये यासाठी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचं पोलिसांनी सांगितलं. नागपूर-अमरावती महामार्गावरील तळेगाव श्यामजी पंत इथल्या सत्याग्रही घाटात 35 दिवसांपूर्वी एका महिलेचा मृतदेह सापडला होता. या मृतदेहाची ओळख…
मुंबई : वृत्तसंस्था ‘पठाण’ या चित्रपटावरून अभिनेता शाहरुख खान चांगलाच अडचणीत सापडला होता. आजही हा वाद अद्याप शमला नाही. हा चित्रपट येत्या २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. देशातल्या काही शहरांमध्ये या चित्रपटाला जोरदार विरोध होत आहे. सेन्सॉर बोर्डानेही यातील १० पेक्षा अधिक दृश्यांवर कात्री चालवली आहे. इतकंच नव्हे तर वादग्रस्त ‘बेशर्म रंग’ या गाण्यातूनही काही सीन्स हटवण्यास सांगितले आहेत. या वादादरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘पठाण’ हा शाहरुख खानचा चित्रपट आहे, म्हणून त्यातील दृश्यांवर कात्री चालवली जातेय, असं राऊत म्हणाले. “वाद निर्माण करण्याची गरज नव्हती. अभिनेत्रीने भगव्या रंगाची बिकिनी घातली होती. देशात इतके मोठे…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील गेंदालाल मिल परिसरातील २० वर्षीय तरुणाला अनोळखी तीन ते चार जणांनी मारहाण केल्या प्रकरणी जळगाव शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेली माहिती अशी की, शहरातील गेंदालाल मिल भागात राहणाऱ्या प्रतिक ईश्वर जाधव(वय २०) या तरुणास दि.१५ जानेवारीच्या रात्री १२.३० वाजेच्या सुमारास तीन अनोळखी तरुणांनी मागील वादाची खुन्नसच्या कारणावरून मारहाण व तरुणाच्या काकाचा मुलगा याला देखील या तीन जणांनी लाकडी दांड्याने मारहाण केल्याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्थानकात तीन संशयित आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार अजितखा तडवी हे करीत आहे.
चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील एका ठिकाणी दोन ते तीन जणांनी एका २८ वर्षीय तरुणांवर हल्ला करीत त्यांच्या गळ्यावर व पोटावर धारधार शस्त्राने सपासप वार करुन खून केल्याची घटना दि,15 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली. ऐन संक्रांतीच्या सणाला खून झाल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत गुन्हां दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. शहरातील पोदार शाळेजवळ निर्जनस्थळी 28 वर्षीय तरुणावर अशाप्रकारे झालेल्या हल्ल्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान खूनामागील नेमके कारण काय आहेे, हे समजून आले नाही. परंतू दोन गटातील वादामुळेच पूर्व वैमन्यसातून खून झाल्याची चर्चा शहरात आहे. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील पवार वाडीतील…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील जुना खेडी रोड परिसरातील सुंदरनगरमध्ये तीन बंद घरे चोरट्यांनी फोडल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली आहे. चोरट्यांनी याठिकाणाहून हजारो रुपयांचा ऐवज लंपास केला असून, याप्रकरणी सायंकाळी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुंदरनगर येथे संदीप रामलाल चौधरी हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. संदीप चौधरी हे पत्नी व मुलांना घेण्यासाठी शनिवारी धरणगाव येथे सासूरवाडीला गेले होते. त्यामुळे त्यांचे घर बंद होते. हीच संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घराच्या खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. संदीप चौधरींच्या घरात डल्ला मारल्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या घराशेजारी राहणारे पंकज…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील मूळचे कळमसरे येथील रहिवासी तर सध्या हिंगोणे येथे राहत असलेल्या दहा वर्षाच्या बालकाचा आज पतंग उडवतांना विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आज मकर संक्रांती निमित्त सर्वत्र पतंगोत्सव साजरा केला जात आहे. तथापि , यात काळजी न घेतल्यास दुर्घटना घडत असतात . अशीच एक दुर्घटना धरणगाव तालुक्यातील हिंगोणे येथे घडली आहे . येथे मूळचे अमळनेर तालुक्यातील रहिवासी असलेले महाजन ( माळी ) कुटुंब उदरनिर्वाहानिमित्त स्थायिक झालेले आहे . याच कुटुंबातील अक्षय संजय महाजन ( माळी ) हा बालक आज पतंग उडवत होता . याप्रसंगी त्याचा तोल जाऊन तो विहिरीत पडला . यामुळे त्याचा…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पिंपळे गावात अखेर आली गावात ‘ लालपरी ‘ विध्यार्थ्यांनी मागणी लावून धरल्याने पिंपळे बु।। ग्रामपंचायतीने पत्रव्यवहार केल्यावर गावात एसटी सुरू झाली आज पहिल्या दिवशी गावात एसटी आल्यावर गावकऱ्यांनी केले वाजत गाजत स्वागत केले. गावातील मुलांना शिक्षण घेण्यासाठी एक किलोमीटर फाट्यावर पायी जावे लागत होते तर विध्यार्थ्यांण मध्ये खुशी चे वातावरण तयार झाल्यावर त्यांनीही आभार वेक्त केले सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या पाठपुरावा केल्यानंतर व गुलाबराव पाटील यांच्या आदेशाने गावातील सरपंच कविता विनोद पाटील व उपसरपंच किरण मनोहर पाटील व माजी सभापती प्रमोद पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने गावात एसटी सुरू झाली गावात काहीही समस्या उदभवणार नाही अशी…
धरणगाव : प्रतिनिधी दरवर्षाप्रमाणे यंदाही धरणगाव तालुक्यातील विवरे – भवरखेडे येथे मकरसंक्रांत निमित्ताने कुस्तीची दंगल भरवण्यात आली होती. कुस्तीची दंगलची शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आली. या वेळी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते कुस्ती लावून दंगल ची सुरुवात करण्यात आली उपस्थित मध्ये भगवान महाजन, उगलाल पाटील, सतीश पेहलवान ,भानुदास विसावे, भानुदास पाटील, राहुल पाटील,प्रशांत पाटील सरपंच,भूषण महाजन, जीभाऊ पेहलवान, कैलास पेहलवान, सुनील पेहलवान,ग्रामपंचायत सदस्य दिलीप माळी,धनराज माळी, अर्जुन धोबी,अतुल पाटील , अविनाश भदाणे उपस्थित होते

