जळगाव : प्रतीनिधी एका परिसरात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देत तिला गर्भवती केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळीविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या हद्दीत वास्तव्यास असलेल्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह आठ महिन्यापूर्वी एका मुलासोबत झालेला होता. यावेळी मुलगी हि अल्पवयीन असल्याचे तिच्या सासरच्या मंडळीना माहित असून देखील त्यांनी विवाह करून घेतला, या विवाहासाठी मुलीच्या आईचा नकार असल्याने विवाह झाल्यानंतर याचा राग मनात ठेवून पतीसह सासरच्या मंडळींनी विवाहितेस मारहाण शिवीगाळ व मानसिक त्रास देत फिर्यादीच्या पतीने तिला वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्या घरी तिच्यासोबत अत्याचार करीत गर्भवती ठेवल्या प्रकरणी फिर्यादीने दि…
Author: editor desk
टेलिव्हिजनवरील अभिनेत्री उर्फी जावेद चित्रविचित्र फॅशनमुळे सातत्याने चर्चेत येत असते. सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद आणि तिचे विचित्र कपडे हे जणू समीकरणच झाले आहे. अंग झाकलेले, जरा बरे कपडे उर्फीने घातले तर नवलच. तिला कितीही ट्रोल केले तरी फरक पडत नाही उलट ती हवे तसेच कपडे घालते. तिची फॅशन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. नुकताच तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात तिने डर्टी लिहिलेलं ब्रालेट टॉप परिधान केले आहे. यावेळी तिच्या टॉपपेक्षा आयब्रोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अतरंगी फॅशनच्या नावावर चक्क आयब्रो गायब करुन टाकले आहेत. उर्फी जावेदचे बरेच व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये…
पाचोरा : प्रतिनिधी आयुष्यातल्या प्रत्येक सुख-दुःखात आपल्यासोबत असणाऱ्या सहचारिणीचा मृत्यू झाल्याचे समजताच पतीनेही प्राण सोडल्याची हृदद्रावक घटना जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथे घडली आहे. सिंधू दत्तात्रय वाणी (वय 75) आणि दत्तात्रय गणपत वाणी (वय 85) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. सातगाव डोंगरीमध्ये दत्तात्रय वाणी यांचे कुटुंब रहायचे. त्यांची पत्नी सिंधू व ते दोघेही अनेक दिवसांपासून आजारी होते. मात्र, दोघांच्याही प्रकृतीमध्ये म्हणावी तशी सुधारणा नव्हती. त्यातच 21 फेब्रुवारी रोजी सिंधू यांचा मृत्यू झाला. खरे तर घरातल्या व्यक्तींनी ही बातमी दत्तात्रय यांना कळू दिली नव्हती. मात्र, आईच्या निधनानंतर त्यांच्या मुलींनी टाहो फोडला. तेव्हा…
जळगाव : प्रतिनिधी शिरसोली जवळील विटनेर शेतकर्याचा भरधाव आयशरने धडक दिल्याने मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी दुपारी दोन वाजता घडला. आयशर चालकाविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सोपान विठ्ठल साबळे (44, विटनेर, ता.जि.जळगाव) असे मृत शेतकर्याचे नाव आहे. मिळालेली माहिती अशी कि, २२ फेब्रुवारी बुधवार रोजी ते शेतात दुचाकीने गेले असता दुपारी दोन वाजेच्या सुमारास शेतातून जळके गावात कामानिमित्त दुचाकीने निघाल्यानंतर जळके ते विटनेर रस्त्यावरील ज्ञानेश्वर पाटील यांच्या शेताजवळ भरधाव वेगाने येणार्या आयशरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने सोपान साबळे यांचा मृत्यू झाला. नागरीकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह हलवल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. एमआयडीसी पोलिसात अज्ञात आयशर ट्रक चालकाविरोधात…
मुंबई : वृत्तसंस्था कापसाची भाववाढ होत नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. त्यातच शेतकऱ्यांची तूर बाजारात दाखल झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत तुरीला चांगला भाव मिळत आहे. गेल्यावर्षी तुरीचा भाव हा 5 हजार 250 असा होता. मात्र, यंदा 7 हजार 500 ते 8 हजार 050 पर्यंत भाव तुरीला औरंगाबाद येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये मिळत आहे. मराठवाड्यामध्ये कापूस, सोयाबीन, तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. यावर्षीही तुरीला चांगला भाव मिळेल याचा अंदाज बांधून शेतकऱ्यांनी तुरीचे उत्पादन घेतलं. तुरीला यावर्षी चांगला भाव मिळत आहे. गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी पिकवलेल्या तुरीवर बुरशीचा आजार आढळून आला होता तसेच काही ठिकाणी तूर फुलांच्या अवस्थेत आलेली…
देशातील युवक मोठ्या प्रमाणात बेरोजगारीकडे जात असतांना त्या युवकांनी व्यवसाय सुरू करायचा असेल, तर केंद्र सरकारची एक खास योजना आहे. ज्याअंतर्गत लोकांना कोणतीही हमी किंवा तारण न ठेवता 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते. प्रधानमंत्री मुद्रा योजना असं या योजनेचं नाव आहे. ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी ही योजना खूप उपयुक्त ठरू शकते. तरुणांना स्वावलंबी बनवण्याच्या आणि छोट्या व्यावसायिकांना बळकट करण्याच्या उद्देशाने मोदी सरकारने 2015 मध्ये ही योजना सुरू केली होती. महत्त्वाचं म्हणजे या योजनेंतर्गत नॉन-कॉरपोरेट आणि बिगर कृषी कारणांसाठी कर्ज दिले जाते. चला तर मग जाणून घेऊया या योजनेचे फायदे आणि अर्ज करण्याची प्रोसेस या योजनेसाठी, तुम्ही कोणत्याही…
मुंबई : वृत्तसंस्था प्रेम म्हणजे कुठलीही सीमा नसलेले असते. जे कधी कुणावर होईल हे कधीच सांगता येत नाही अशीच एक थक्क करणारी घटना घडली आहे. गुजरातमध्ये चमेली नावाच्या एका महिलेचं दोन तरुणांवर प्रेम जडलं होतं. या दोघांनाही तिने लग्नाची गळ घालत पिच्छा करायला सुरुवात केली होती. ही महिला विवाहीत होती आणि तिला 3 मुले आहेत. चमेलीचं पहिले अजय यादव नावाच्या तरुणावर प्रेम जडलं होतं. मात्र त्याचं गावाला लग्न ठरल्याने तो गावाला निघून गेला होता. यामुळे चमेली भडकली होती. अजय गावाला गेल्यानंतर चमेलीची ओळख अजयचा मित्र असलेल्या उदय शुक्लाशी झाली. चमेलीचं उदय शुक्लावरही प्रेम जडलं. उदयलाही चमेली आवडायला लागली आणि दोघांमध्ये…
जळगाव : प्रतिनिधी गेल्या वर्षी ‘पुष्पा’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर अनेक भागात मोठ्या प्रमाणात ‘पुष्पा’ च्या स्टाईलने गुन्हेगारी जगत वाढत चालले असतांना पोलिसांनी याचा बंदोबस्त केला आहे. चाळीसगाव तालुक्यातील बोढरे गावलगत जंगल परिसरात वनपाल, वनरक्षक यांना गस्थी दरम्यान चंदनाचे लाकूड तोडून, तस्कारी करणारे दोन चोरटे तस्कर आढळुन आले आहे. त्यांच्या ताब्यातून ५.१५० कि.ग्रॅम. लाकडासह लाकूड तोडीचे साहित्य मिळुन आले आहे. याप्रकरणी गुन्हां दाखल करण्यात आला आहे. माहिती अशी, दि.२१ फेब्रुवारी रोजी चाळीसगाव वन्यजीव वनपरीक्षेत्रातील वनपाल, बोढरा व वनरक्षक, बोढरा जंगल गस्ती करत असताना, बोढरा गावामधील कक्ष क्रमां क.३१३ मध्ये दोन संशयात्मक इसम आढळून आले. वनपाल, बोढरा व वनरक्षक, बोढरा…
जळगाव : प्रतिनिधी कमरेला गावठी पिस्तूल लावून वरणगाव शहरात दहशत माजविणाऱ्या उदय राजू उजलेकर (२२, रा. आंबेडकर नगर, वरणगाव) या गुन्हेगाराला मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने पकडले. त्याच्यावर कारवाई करून पोलिसांनी गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतूस जप्त केले असून, याप्रकरणी वरणगाव पोलिसात आर्म अॅक्टनुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. उदय उजलेकर हा स्वत:च्या कमरेला गावठी पिस्तूल लावून वरणगाव शहरात दहशत माजवित असल्याची माहिती मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली होती. त्यांनी त्वरित स्वतंत्र पथक तयार करून कारवाईच्या सूचना केल्या. त्यानुसार पथकाने वरणगाव गाठून उजलेकर याचा शोध सुरू केला. अखेर त्याला पारस हॉटेलजवळ पोलिसांनी…
जळगाव : प्रतिनिधी तू जर माझ्याशी प्रेमसंबंध ठेवले नाही तर तुझा आणि तुझ्या पतीचा विचार करून ठेव, अशी धमकी देऊन पतीच्याच मित्राने २० वर्षीय महिलेला घरी बोलवून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून बुधवारी रामानंदनगर पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आला आहे. अधून-मधून पतीसोबत त्यांचा मित्र हा घरी येत होता. दीड महिन्यापासून पतीचा मित्र हा फोन करून विवाहितेशी बोलण्याचा प्रयत्न करीत होता. मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास त्याने विवाहितेला फोन करून तुझ्याशी अर्जंट काम आहे, तू लवकर माझ्या घरी ये असे त्याने सांगितले. विश्वास ठेवून विवाहिता त्या मित्राच्या घरी गेल्यावर…

