यावल : प्रतिनिधी तालुक्यातील किनगाव येथील इंदिरानगर परिसरतील रहिवाशी ६० वर्षीय वृद्धाची गळा चिरून निर्घृण हत्या झाल्याची बाब शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. चुंचाळेकडे जाणार्या रस्त्यावर एका नाल्याच्या पुलाखाली शुक्रवारी सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला असून घटनास्थळी पोलिसांचे पथक दाखल झाले आहे. मिळालेली माहिती अशी कि, किनगाव येथील इंदिरानगर भागातील रहिवासी भीमराव सोनवणे (60) हे व्यवसायाने ट्रक चालक होता व रात्री घरी आलेले नव्हते. शुक्रवारी सकाळी इंदिरानगर वस्तीच्या पुढील चुंचाळे रस्त्यावरील नाल्याच्या पुलाच्या खाली त्यांचा गळा कापलेला अवस्थेत मृतदेह शेतमजुरांना दिसून आला आणि एकच खळबळ उडाली. मजुरांना गावात माहिती दिल्यानंतर यावल पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी यावल पोलीस ठाण्याचे पोलीस…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था उर्फी जावेद नेहमी अशी काही फॅशन करते जी पाहिल्यानंतर तिच्या कल्पनाशक्तीवर विश्वासच बसत नाही. मात्र नुकताच तिने एक फोटो सोशल मिडियावर पोस्ट केला आहे. हा तिच्या फॅशनचा किंवा तिच्या कपड्याबद्दल नसून तो तिच्या रिलेशनशिपबद्दल आहे. होय उर्फी जावेद कुणाला तरी डेट करत असल्याच तिनं म्हटलंय. उर्फी जावेदने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला ज्यावर फुलांचा गुच्छ आहे आणि लिहिलेलं आहे की, त्यानं होय म्हटलं. ही पोस्ट पाहिल्यानंतर सोशल मीडियावर तिच्या रिलेशनशिपचे वारे वाहु लागले. नेटिझन्सने लगेचच उर्फीला तिचा जोडीदार सापडला असल्याचा अंदाज लावला. या पोस्टवर तिने हृदयाचा एक इमोजी देखील बनवला, ज्याला पाहून लोक उर्फीला तिचा पार्टनर…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली असून रुग्णवाढीचा दर सुमारे तीन टक्के इतका आहे. एच1एन1, एच3एन3 आणि एन्फ्यूएन्जा रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर, राज्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी विधान परिषदेत दिली. दरम्यान, नागरिकांनी बुस्टर डोस घ्यावा, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे. राज्यात कोरोना, एच1एन1, एच3एन3 आणि एन्फ्यूएन्जा रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने निवेदन करावे, अशी सूचना उपसभापती नीलम गोऱहे यांनी राज्य शासनाला केली होती. त्यानुसार आरोग्यमंत्र्यांनी राज्यातील रुग्ण संख्या आणि उपाययोजनांबाबतची माहिती परिषदेत दिली. राज्यात आतापर्यंत एच1एन1 बाधितांची संख्या 405 इतकी आहे. त्यापैकी तिघांचा…
एरंडोल : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात असलेल्या अल्पवयीन मुलीला अनोळखी इसमाने फूस लावून पळवून नेल्या प्रकरणी एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, एरंडोल तालुक्यातील एका गावात आपल्या परिवारासह वास्तव्य करणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी दि २५ फेब्रुवारी ते २३ मार्च दरम्यान एरंडोल बस स्थानक परिसरातून अनोळखी इसमाने काही तरी फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी एरंडोल पोलिसात अल्पवयीन मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनी शरद बागल हे करीत आहेत.
वरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील महामार्ग क्रमांक सहावर कपिलवस्तु नगरजवळ भुसावळहुन वरणगावकडे मोटर सायकलने येणार्या युवकास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना २३ गुरुवारी रोजी दुपारी दिड वाजेच्या सुमारास घडली. याबाबत वरणगाव पोलिसात अज्ञात वाहन चालकाविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, कपिल वास्तू नगर जवळ अज्ञात वाहनचालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालवित रस्त्याच्या परीस्थीतीकडे दुर्लक्ष करीत मिलींद भागवत राणे (वय 40, रा. होळी मैदान, तळवेल) हा युवक भुसावळ येथुन दुपारी 1.30 वाजेदरम्यान मोटरसायकल क्र. एमएच 19 एल 7171ने घराकडे जात असतांना त्याच्या मोटर सायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात मिलिंदचा महामार्गावरील दुभाजकाजवळ जागीच मृत्यू झाला.…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील मानराज पार्क येथे भरधाव वेगाने येणाऱ्या आयशरने जोरदार धडक देऊन चिरडल्याची घटना गुरुवारी २३ मार्च रोजी सायंकाळी घडली आहे, दरम्यान अपघात घडल्यानंतर नागरिकांनी पाठलाग करून ट्रक पकडला. परंतु आयशर ट्रक चालक हा ट्रक सोडून पसार झाला आहे. विवेक प्रकाश पाटील (वय-३५, रा. धरणगाव) असे ठार झालेल्या वकिलाचे नाव आहे. धरणगाव येथील रहिवासी वकील विवेक प्रकाश पाटिल (वय-३५) जिल्हा न्यायालयात वकिली व्यवसाय करतात. जळगाव ते धरणगाव दुचाकी (एमएच १९ सीएच १३९६) ने अपडाऊन करुन त्याचे कामकाज सुरु असते. गुरुवारी २३ मार्च रोजी नेहमी प्रमाणे विवेक पाटील हे जळगावी आले होते. कामाच्या व्यापामुळे उशिर होवुन रात्री साडेआठ वाजेच्या…
जळगांव : प्रतिनिधी जिल्ह्यात बाजार समितीची निवडणुकीच्या धामधूम सुरू सुरू झाली आहे यामध्ये शिवसेना-भाजप राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांची प्रतिष्ठापनाला लागली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने उमेदवारांची चाचणी तसेच पदाधिकाऱ्यांची जिल्हाप्रमुख निलेश पाटील, जिल्हापरिषद सदस्य प्रताप पाटील यांच्या प्रमूख उपस्थिती मध्ये आढावा घेण्यासाठी बैठकीच्या आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यात आगामी निवडणुकांचे नारळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांच्या माध्यमातून उठणार आहे. कानळदा रस्त्यावरील लक्ष्मी जिनिंग येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत स्वातंत्र्यलढायचे की भाजपासोबत युती करायची याबाबत मंथन करण्यात आले आहे यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधून स्वतंत्र लढण्याबाबतचा सूर म्हटला आहे. जळगाव तालुका सह ग्रामीण भागात सर्वाधिक ग्रामपंचायत…
जळगाव : प्रतिनिधी चाळीसगाव तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या हिस्स्यांची शेती पत्नीच्या नावे करण्यासाठी पाच हजाराची लाच घेणारा बोरखेडा येथील लाचखोर तलाठीसह कोतवालास रंगेहात जळगाव लाचलुचपत विभागाच्या पथकाने अटक केली आहे. याबाबत चाळीसगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा येथील एका शेतकऱ्याच्या नावावर वडीलोपार्जीत शेती आहे. त्यांच्या नावावर असलेले एक शेत पत्नीच्या नावावर करण्यासाठी त्यांनी बोरखेडा येथील तलाठी यांच्याकडे प्रकरण टाकलेले होते. दरम्यान, शेतजमीन पत्नीच्या नावावर करण्यासाठी तलाठी ज्ञानेश्वर सुर्यभान काळे (वय-५०) रा.बोरखडो ता.चाळीसगाव याने ७ हजाराची मागणी केली. तडजोडी अंती ५ हजार रूपये देण्याचे ठरले. दरम्यान, या संदर्भात तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत…
सुरत : वृत्तसंस्था काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गुजरातच्या सुरतच्या जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा दिली आहे. सर्व चोरांचे आडनाव मोदी का आहे? असा सवाल त्यांनी केला होता. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर सुरतच्या जिल्हा न्यायालयाने आपला निकाल देत राहुल गांधींना दोषी ठरवले आणि २ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच त्यांना जामीनही मंजूर केला आहे. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी कर्नाटकातील कोलार येथे झालेल्या जाहीर सभेत राहुल गांधींनी मोदी आडनावावरून जोरदार टीका केली होती. त्यावेळी त्यांनी निरव मोदी, ललित मोदी आणि नरेंद्र मोदी अशी नाव घेत सगळ्या चोरांची आडनाव मोदी का असतात असा सवाल केला होता. राहुल यांच्या…
मुंबई : वृत्तसंस्था गुजरातमधील एका तरुणाने बालकल्याण समितीकडे धाव घेत एका महिलेविरोधात कारवाईची मागणी केली आहे. या महिलेने आपल्यावर बलात्कार केल्याचं या तरुणाचं म्हणणं आहे. आपण 16 वर्षांचे असताना या महिलेने आपल्यावर बलात्कार केल्याचं या तरुणाचं म्हणणं आहे. आपल्यात आणि या महिलेमध्ये 5 वर्षांचे अंतर आहे. 16 वर्षांचा असताना ही तरुणी 21 वर्षांची होती. ही तरुणी आपल्याला हॉटेलमध्ये न्यायची आणि बलात्कार करायची असं या तरुणाने तक्रारीत म्हटलं आहे. तू सज्ञान झाल्यावर आपण लग्न करू असं आश्वासन या तरुणीने दिलं होतं. लग्नाचं आश्वासन देत या तरुणीने आपल्याकडून पैसेही उकळल्याचं या तरूणाचं म्हणणं आहे. ही तरुणी अन्य एका व्यक्तीशी लग्न करून मोकळी…

