Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी  यावल तालुक्यातील किनगाव येथील रहिवासी ६० वर्षीय वृद्ध भिमराव शंकर सोनवणे यांच्या हत्येचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लावला आहे. मयताच्या जवळच्या नातेवाईक महिलेसह एका इसमास या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील आणि त्यांच्या पथकाने अवघ्या चोवीस तासात हा गुन्हा उघडकीस आणल्याने ते आणि त्यांचे पथक कौतुकास पात्र ठरले आहे. मिळालेली माहिती अशी कि, यावल तालुक्यातील किनगाव येथील मयत भिमराव शंकर सोनवणे हे त्यांच्या जवळच्या नातेवाईक महिलेकडे शरीर सुखाची मागणी करत होते. त्याला वेळोवेळी नकार मिळत होता. नेहमीच्या या त्रासाला कंटाळून त्या महिलेसह रावेर तालुक्यातील उदळी येथील जावेदशाह ऊर्फ जय अलीशाह…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  तालुक्यातील आव्हाणा शिवारातील शेतात ईलेक्ट्रीक तारांच्या शॉर्टसर्कीटमुळे लागलेल्या आगीत शेतातील सव्वा लाख रुपये किंमतीचा मका जळून खाक झाला. या प्रकरणी गुरूवारी रात्री 10 वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली. मिळालेली माहिती अशी कि, तालुक्यातील आव्हाणा येथे प्रदीप मंगल पाटील (41) हे आपल्या परीवारासह वास्तव्याला असून शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे आव्हाणा शिवारातील शेत गट नंबर 517 मध्ये शेत आहे. शेतात त्यांनी रब्बी हंगामात मकाचे कणीस काढून ठेवलेले होते. बुधवार, 22 मार्च रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास शेतातून गेलेल्या विद्यूत तारांच्या शॉर्टसर्कीटमुळे शेतातील मकाला आग लागली. यात मकासह चारा जळून खाक झाल्याने सव्वा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव शहरातील मुख्य टॉवर चौकात शुक्रवारी भरधाव डंपरने कारला धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात तिघे जखमी झाल्याची नोंद जळगाव शहर पोलिसात करण्यात आली आहे. मिळालेली माहिती अशी कि, जळगाव शहरातील टॉवर चौकात शुक्रवार, 24 मार्च रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास कार क्रमांक (एम.एच.19 बी.जे.7917) ही नेहरू पुतळ्याकडून टॉवर चौकात येत असतांना त्याच वेळी शिवाजी नगरकडून चित्रा चौकात जात असलेला डंपर (एम.एच.19 झेड.4100) ने कारला डाव्या बाजूने जोरदार धडक दिली. या धडकेत कारमधील शिक्षिका सविता अशोक सानेवणे (40, रामानंद नगर, जळगाव) आणि शिक्षक विठ्ठल रूपसिंह चव्हाण (42) आणि सोबत असलेले रजियाबाद तडवी हे तिघे जण गंभीर जखमी झाले आहे.…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  बिहारच्या पूर्णियामधून एका धक्कादायक घटना समोर आली आहे. भाओजीने पत्नी असूनही आपल्या मेहुणीला काही लोकांसोबत मिळून उचलून नेलं. नंतर तीन महिने तिचं लैंगिक शोषण केलं. जेव्हा पत्नी आणि मेहुणीने विरोध केला तेव्हा दोघींनाही लस्सीमध्ये विष दिलं. आरोपीची पत्नी आणि मेहुणी दोघीही पूर्णियाच्या मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये भरती आहेत. पीडित मेहुणीनुसार, तिचा भाओजी राहुल याने तिला जानेवारी महिन्यात 5 लोकांसोबत मिळून जबरदस्ती उचलून नेलं होतं. 4 दिवस त्याने तिला मित्रांच्या घरी ठेवलं. नंतर पूर्णियाला आणलं आणि रोज तिच्यावर अत्याचार केले. विरोध केल्यावर तिला मारहाण केली आणि धमकी देत होता की, हत्या करून गंगा नदीत फेकेन. कुणीही तिला वाचवू…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील गोलाणी मार्केट परिसरात एका ३६ वर्षीय तरुणाला तिघांनी मारहाण करीत त्याच्याकडे असलेले एकूण ५३ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील गोलाणी मार्केट परिसरात नवी पेठेत कैजाद नवरोज जलगाववाला (वय ३६) यांचे कॉम्पुटर रिपेरिंगचे दुकान आहे ते दि २३ रोजी रात्री एमआयडीसी परिसराकडून रिक्षामध्ये बसून रात्री ११.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या दुकानात सामान ठेवण्यासाठी आले असता गोलाणी मार्केट परिसरातील ब्रेकर्स पोईट येथे ३ अनोळखी इसमांनी कैजाद याच्या जवळ येत मारहाण करण्यास सुरुवात केली त्यानंतर त्याच्या खिश्यातील १३ हजार रुपये किमतीचा मोबाईल, तर त्याच्याकडे असलेल्या ४० हजार रुपये…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  सध्याच्या परिस्थिती राज्यातील कोरोना रुग्णसंख्या हळूहळू वाढू लागली आहे. काही महिन्यात अत्यंत कमी झालेली रुग्णसंख्या आता वाढू लागू लागल्याने चिंताही वाढू लागली आहे. शुक्रवारी राज्यात 343 रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात राज्यात कोरोनाच्या तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यासाठी ही चिंतेची बाब आहे. सक्रिय रुग्णसंख्या वाढली राज्यातील कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या देखील वाढताना दिसत आहे. राज्यात आज एकूण 1763 सक्रिय रुग्ण आढळले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 8,65,71,673 इतक्या प्रयोगशाळा तपासण्या झाल्या आहेत. त्यापैकी 9.40 टक्के नमुने हे पॉझिटिव्ह सापडले आहेत. पुणेकरांची चिंता वाढली शुक्रवारी राज्यात 343 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर 194 रुग्ण बरे होऊन घरी…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी  शहरातील एका परिसरात नकली नोटा चलनात आणणाऱ्या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजता पैलाड भागात घडली. मिळालेली माहिती अशी कि, पैलाड भागात दोन जण नकली नोटा चलनात आणत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस पथक लागलीच या भागात पोहोचले. एका टेलरिंगच्या दुकानाजवळ दोन जण संशयास्पदरीत्या फिरताना आढळले. कैलास शिवराम भोया (२८, रा. बलसाड, गुजराथ) व वसंत कालसिंग मलकाशा (वय २२ रा कावडझिरी जि.अमरावती) अमरावती) अशी या अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांची चौकशी केली असता दोघांच्या खिशात ५०० रुपयांच्या १० हजाराच्या नकली नोटा आढळून आल्या. त्यांच्याकडील नोटा, मोटरसायकल व दोन मोबाइल जप्त…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढत चाललेला आहे. नुकतीच चाळीसगाव तालुक्यात तलाठीसह कोतवाल लाचखोरीत अडकला असल्याची घटना ताजी असतांना फैजपूर तालुक्यातील एका पोलीस स्थानकातील आज तीन पोलीस कर्मचाऱ्यानी लाच स्वीकारताना जळगाव एसीबीच्या पथकाने अटक केली आहे. मिळालेली माहिती अशी की, फैजपुर पोलीस स्टेशन हद्दीमधील असलेल्या बामणोद येथे पत्त्याचा क्लब सुरळीत सुरु राहण्यासाठी फैजपूर पोलिस स्थानकाचे 3 कर्मचाऱ्यांनी 4 हजार रुपयांची लाच स्विकारतांना जळगाव लाचलुचपत विभागाचे पथकाने ताब्यात घेतले आहे. यातील तक्रारदार यांचा फैजपुर पोलीस स्टेशन हद्दीमधील बामणोद येथे पत्त्याचा क्लब आहे. फैजपुर पोलीस स्टेशनचे बामणोद बीटचे हेंमत सांगळे,किरण चाटे यांनी तक्रारदार यांना त्यांच्या पत्त्याच्या क्लबवर कोणतीही जुगाराची…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यात अर्थ संकल्पीय अधिवेशन सुरु असतांना ठाकरे व शिंदे गटातील वाद देखील सुरु आहे. यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. आपल्याला देखील शिंदेंच्या शिवसेनेकडून पक्षात येण्याची ऑफर आलेली, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला आहे. पण आपण खोके घेतले नाहीत. निष्ठा सोडली नाही, असे त्यांनी सांगितले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. संजय राऊत म्हणाले, आम्हालाही सांगण्यात आल कशाला राहताय? काय राहिलंय? तुम्ही आमच्याकडे या. मी म्हटलं, मी थुकतो तुमच्या ऑफरवर. मी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आमची शिवसेना यांच्याशी बेईमानी करणार नाही. थुंकतोय तुमच्या ऑफरवर या भाषेत…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  देशाचे कॉंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी त्यांच्यावर आज लोकसभा सचिवालयाने मोठी कारवाई करीत त्यांची खासदारकी रद्द केली आहे. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे. मानहानीच्या खटल्यात सूरतच्या जिल्हा कोर्टानं राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली असून त्यांना जामीनही मंजूर झाला आहे. पण २ वर्षाची शिक्षा झाल्याने त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभा सचिवलयाने राहुल गांधी यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. चोरों का सरनेम मोदी क्यो होता है… काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं हे विधान त्यांना भोवलं आहे. या मानहानीच्या खटल्यात सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. तसेच…

Read More