Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील एका महिलेला बंधन बँकेतून बोलत असल्याचे सांगून फिक्स डिपॉजिट अपडेट करण्याच्या नावाखाली ओटीपी क्रमांक घेत आठ लाखांचा गंडा घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार जळगावात घडला. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार ढाके कॉलनीतील राहिवासी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, मंगळवारी दुपारी पावणेचार वाजता त्यांच्या मोबाईलवर भामट्याने बंधन बँकेतून बोलत असल्याचे सांगून एफ.डी.अपडेट करायची असल्याने तुमच्या मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी सांगा, असे सांगत विश्वास संपादन करून त्यांच्या बँक खात्यातून सात लाख 75 हजारांची रक्कम अन्यत्र वळवत फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली. तपास प्रभारी पोलिस निरीक्षक किसनराव नजन-पाटील…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  अनैतिक संबंधातून घडणाऱ्या अनेक घटना नेहमीच समोर येत असतात. इतकंच काय तर विवाहित असूनही काही महिला दुसऱ्या पुरूषांसोबत संबंध ठेवतात आणि नंतर जबरदस्ती केल्याचा आरोपही करतात. सुरूवातीला तर त्यांच्यात सगळं काही चांगलं चाललेलं असतं. पण नंतर तेच एकमेकांचे वैरी ठरतात. त्यांचं गायब होतं. मग कोर्टात केसेही चालतात. अशीच एक घटना कैथल जिल्ह्यातून समोर आली आहे. इथे विवाहित आणि काही मुलांची आई असलेल्या महिलेने 6 वर्ष आपल्या दीरासोबत अनैतिक संबंध ठेवले आणि नंतर तिला त्याच्यासोबत कुठेतरी दूर जाऊन रहायचं होतं. यासाठी ती आपल्या दीरासोबत 12 तारखेला पळून गेली. तीन दिवस दोघेही वेगवेगळ्या ठिकाणावर राहिले आणि नंतर दीर…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  गुढीपाडव्यानिमित्त मनसेची शिवतीर्थावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जाहीर सभेत माहिम समुद्र किनारी होत असलेल्या अनधिकृत बांधकामाकडे सरकारचं लक्ष वेधलं. त्यानंतर लगेचच रात्रीत कारवाईचे आदेश देण्यात आले आणि सकाळ-सकाळी लगेचच या पाडकामाला सुरुवातही झाली. आता हे काम पूर्ण झालं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल गुढीपाडव्यानिमित्त आयोजित सभेमध्ये माहिमच्या समुद्राच्या भागामध्ये होणाऱ्या अनधिकृत बांधकामाविषयीची माहिती दिली. त्यानंतर लगेचच रात्रीत मुंबई महापालिकेने हे बांधकाम हटवण्याचे आदेश दिले. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास महापालिकेचे पथक माहिम इथं दाखल झालं आणि पाडकामाला सुरुवात झाली.  माहिम इथं दर्ग्याची मजार आहे. ही मजार ६०० वर्षांपूर्वीची असल्याचा दावा इथल्या ट्रस्टने केला आहे. त्यामुळे ही…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  गेल्या आठ दिवसापासून सोन्याच्या दरात वेगाने मोठी वाढ झाली असून याचा परिणाम या चोख सोने खरेदीवर झाला. गुढीपाडव्यावेळी मुहूर्तावर केल्या जाणाऱ्या सोनेखरेदीला गेल्या काही दिवसात वेगाने वधारलेल्या दराचा मोठा फटका बसला आहे. दरवर्षी मुहूर्तावर खरेदी केल्या जाणाऱ्या चोख सोन्याच्या (वेढणी) व्यवहारात मोठी घट आल्याचे राज्यात प्रसिद्ध सराफ बाजारात पाहण्यास मिळाले आहे. या दरवाढीमुळे चोख सोन्याच्या खरेदी विक्रीत वीस ते तीस टक्के घट झाली आहे. गुढीपाडव्यावेळी मुहूर्तावर गुंतवणूक म्हणून हे चोख सोने (वेढणी) खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या गेल्या दोन दिवसांपासून घटली आहे. केवळ लग्नसराईसाठी गरज असणाऱ्यांनीच दागिन्यांची खरेदी आजच्या मुहूर्तावर मोठय़ा प्रमाणात केली. दरवाढीमुळे वीस ते तीस…

Read More

देशात अनेक तरूण बेरोजागरीच्या विळख्यात असतांना नुकतेच सेंट्रल बँक ऑफ इंडिया रिक्रूटमेंट 2023 मध्ये मेगा भरती सुरु करण्यात आल्याची माहिती समोर आल्याने अनेक तरुणाचा कामाचा प्रश्न सुटणार आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने शिकाऊ पदांसाठी भरती केली आहे. त्यामुळे तरुणांना हि कामाची मोठी संधी आहे. उमेदवार या पदांसाठी बँकेच्या अधिकृत वेबसाइट, Centralbankofindia.co.in द्वारे अर्ज करू शकतात. अर्ज 20 मार्च 2023 पासून सुरू झाला आहे आणि 3 एप्रिल 2023 पर्यंत सुरू राहील. अर्ज करण्याची लिंक अधिकृत वेबसाइटवर सक्रिय केली गेली आहे. बँकेने अप्रेंटिसच्या 5000 रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. उमेदवार या पदांसाठी विहित अंतिम तारखेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. ही…

Read More

नंदुरबार : वृत्तसंस्था  गेल्या आठवड्यापासून राज्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर दौऱ्यावर असलेले कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे नुकतेच नंदुरबार येथे असतांना त्यांनी थेट संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल त्यांनी केला आहे. संजय राऊत कधी खरं बोलतात का? जे आमच्या मतांवर निवडून गेले तेच आमच्यावर बोलत असल्याचं सत्तार यांनी म्हटलं आहे. ज्यांचं मीठ खाल्लं आहे, त्याचं तरी बोलताना राऊतांनी भान ठेवावं असंही सत्तार यावेळी म्हणाले. सत्तार यांनी नेमकं काय म्हटलं? अब्दुल सत्तार यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत कधी खरं बोलतात का? जे आमच्या मतावर निवडून गेले ते आमच्यावरच बोलत…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  राज्यात गेल्या आठवड्यापासून अवकाळी पावसाने शेतकऱ्याचे मोठे नुकसान केले आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी पंचनाम्याचे आदेश देखील दिले असून जळगाव जिल्ह्यात देखील शेतकरीचे नुकसानासह जनावरांचा मृत्यू देखील झाला आहे. धरणगाव तालुक्यातील पीपळे शिवारात १०० च्या जवळ पास मेंढीचा मृत्यू झाला आहे. या अवकाळी पावसामुळे मेंढपाळावर मोठा संकट कोसळले असतांना आज दि २२ रोजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत धरणगाव तहसीलदार यांना बोलवून पंचनामा करून त्यांना मोबदला भेटायला पाहिजे अशी मागणी केली आहे. या वेळी उपस्थित माजी सभापती प्रमोद बापू पाटील, सरपंच जगदीश पाटील, युवासेना तालुका प्रमुख दीपक भदाणे, रवी माळी, बाळू जाधव , मच्छिद्र…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी  अमळनेर तालुक्यातील एका गावात असलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस अनोळखी व्यक्तीने अमळगाव परीक्षा केद्रातून पळवून नेल्याची घटना घडल्याने मारवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, अमळनेर तालुक्यातील एका गावात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. दि २० मार्च २०२३ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अमळगाव परीक्षा केद्रातून अल्पवयीन मुलगी परीक्षा देवून बाहेर आल्यानंतर ती घरी परत न आल्याने अल्पवयीन मुलीच्या आईने मारवाड पोलीस स्थानक गाठत अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सा.फौ.राजेद्र पाटील हे करीत आहेत.

Read More

जळगाव : प्रतिनिधी  तालुक्यातील कुसुंबा येथील रायपुर परिसरातील रहिवासी असलेल्या होलसेल विक्रेता संदीप सीताराम परदेशी हा नारळाचा माल घेण्यासाठी दाणाबाजारात आलेला असतांना ‘तुमच्या वाहनातील हवा कमी होत आहे’ असे सांगून चोरट्याने कारमधील ३ लाख रूपये असलेली बॅग लांबविल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रात्री उशिरा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संदीप परदेशी हे आठवडयातून एकदा दाणाबाजार येथे माल घेण्यासाठी येत असतात. मंगळवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास ते दाणा बाजारात नारळाच्या गोण्या घेण्यासाठी कारमधून आले होते.

Read More

जामनेर : प्रतिनिधी  तालुक्यातील सोनाळा गावाच्या शिवारात तरुणाचा दगडाने ठेचून खून झाल्याचा प्रकार संध्याकाळी ४ वाजता उघडकीस आला. बाळू उर्फ प्रमोद भगवान वाघ (३५, शिंगाएत, ता. जामनेर) असे मृताचे नाव आहे. घटनास्थळावरून मारेकरी फरार झाले आहेत. जामनेर रस्त्याला जोडणारा व सोनाळा गावात जाणारा कच्चा वहिवाटी रस्ता आहे. याठिकाणी प्रफुल्ल भारत पाटील (सोनाळा ) यांचे शेत आहे. संध्याकाळी ४ वाजता प्रफुल्ल पाटील शेतात आल्यावर त्यांना मद्याच्या बाटल्य, चप्पल व रक्ताने माखलेला दगड आढळला. त्यानंतर त्यांना रक्ताने माखलेला मृतदेह आढळला. त्यांनी तात्काळ ही माहिती पोलिसांना दिली. बाळू उर्फ प्रमोद भगवान वाघ व मारेकरी हे दुचाकीवरून याठिकाणी आले होते. दुचाकी एमएच १२ /…

Read More