जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यात एकापाठोपाठ एक खून होत असल्याच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाही. यावल तालुक्यातील वृद्धाचा तर चोपडा तालुक्यात लहान भावाने मोठ्या भावाचा तर आज दि २६ रोजी जळगावातील गोलाणी मार्केटमध्ये रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास एका तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली आहे. मिळालेली माहिती अशी कि, पाचोरा, जामनेर, यावल तालुक्यात झालेले खुनाचे गूढ बाहेर येत नाही तोच आज दि २६ रविवारी रोजी रात्री पुन्हा तरुणाचा खून झाला आहे. गेल्या तिन्ही खून प्रकरणातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. गोलाणी मार्केटमध्ये तळ मजल्यावर काही तरुणांमध्ये रविवारी रात्री ९.३० च्या सुमारास वाद सुरू होता. रात्री १०.१५ च्या सुमारास…
Author: editor desk
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात गेल्या तीन ते चार वर्षापासून वेगवेगळ्या कारणाने चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेत्यांनी आपली जीवनयात्रा संपविल्याच्या घटना समोर आल्यानंतर आज पुन्हा एका अभिनेत्रीने वाराणसीच्या हॉटेलमध्ये गळफास घेत जीवनयात्रा संपविली आहे. मिळालेली माहिती अशी कि, रविवारी वाराणसीतील एका हॉटेलात अभिनेत्री आकांक्षा दुबेने आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री शूटिंग संपवून आकांक्षा हॉटेलमध्ये गेली. तिथे गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. ही बाब रविवारी उजेडात आली. तिने हे पाऊल का उचलले हे समजू शकले नाही. आकांक्षाचा जन्म 21 ऑक्टोबर 1997 रोजी उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे झाला. तिला बालपणापासूनच नृत्य व अभिनयाची आवड होती. ती सोशल मीडियावर नेहमीच आपल्या डान्सचे व्हिडिओ पोस्ट करत…
जामनेर : प्रतिनिधी शहरातील श्रीराम मार्केटजवळील एका दुकानावर वयोवृध्दाला काठीने मारहाण करून २७ हजार रूपये किंमतीची सोन्याची अंगठी चोरून लांबवण्यात आली. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेली माहिती अशी कि, जामनेर तालुक्यातील डोहरीतांडा येथील रामसिंग जवारसिंग राठोड (वय ७५) हे आपल्या परीवारासह वास्तव्याला असून शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. जामनेर येथील आठवडे बाजारात रामसिंग राठोड हे गुरूवार २३ मार्च रोजी आले होते. शहरातील श्रीराम मार्केटजवळील एका दुकानावर खरेदी करत असतांना एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या हातातील काठी हिसकावून मारहाण केली व रामसिंग राठोड यांच्या हातातील सोन्याची अंगठी जबरी हिसकावून चोरून नेली. हा प्रकार घडल्यानंतर शनिवार,…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था अनेक समाजात प्रेम प्रकरणांच्या घटना घडतात यामधीलच काही प्रेम प्रकरणांंमुळे गुन्ह्याचं प्रमाण वाढतं. महिलांवर अत्याचार करणाऱ्या घटनांमध्ये जे आरोपी असताता ते संबंधित पीडितेचे नातेवाईकांमधील किंवा ओळखीचेच असल्याचं समोर आलं आहे. मात्र काही नराधम त्यांच्याच घरातील महिलांकडे वाईट नजरेने पाहत असतात. अशातच एक प्रकरण समोर आलं आहे ज्यामध्ये दीराने आपल्या विधवा वहिनीसोबत चुकीचं कृत्य केलं आहे. त्यानंतर संबंधित महिलेने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे. काय आहे प्रकरण? ही घटना हरियाणाच्या पलवल जिल्ह्यातील आहे. विधवा महिला रात्री घरात झोपलेली होती. रात्रीचे 2 वाजले होते, मध्यरात्र झाली होती आणि त्यावेळी तिचा दीर घरी येतो. घरात कोणीच नव्हतं, याचाच तो…
मुंबई : वृत्तसंस्था उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली होती. तसेच त्यांनी शिंदे यांना तुम्ही दुसरा पक्ष काढा असा सल्ला दिला. त्यावरून शिवसेनेचे नेते आमदार संजय गायकवाड यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केला. शिवसेनेचे नेते आमदार संजय गायकवाड म्हणाले कि, संजय राऊतांना अक्कल पाहिजे, आमच्याकडे पक्ष असताना दुसरा पक्ष काढण्याची गरज काय असा सवाल केला आहे. एकनाथ शिंदे यांनी स्वतःचा स्वातंत्र पक्ष काढावा आणि निदान किमान पाच आमदार तरी निवडून दाखवावेत असं आव्हान राऊत यांनी दिलं होत. त्यानंतर संजय गायकवाड यांनी त्यांना अक्कल पाहिजे. आम्हाला शिवसेनेसारखा पक्ष असताना दुसरा पक्ष काढायची गरज…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील मेहरूण परिसरातील गायत्रीनगरात दुसऱ्या मजल्यावरून पडून कैलास बाबूराव महाजन (४२, रा. नशिराबाद) या मजुराचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुपारी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, नशिराबाद येथे आपल्या परिवारासह कैलास महाजन हे वास्तव्यास होते. उद्यानाचे काम करणारे ठेकेदार प्रकाश मराठे यांच्याकडे ते कामाला होते. मराठे यांनी गायत्रीनगरातील एका बंगल्यातील काम घेतले होते. त्यामुळे कैलास हे शनिवारी सकाळी कामाला आले होते. मात्र, सकाळी ११ वाजेच्या सुमारास अचानक बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावरून पडले. यात त्यांच्या हाता-पायाला व डोक्याला दुखापत होऊन…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरातून अल्पवयीन मुलीस पळविल्याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील एका परिसरात आपल्या परिवारासोबत वास्तव्यास असलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस अनोळखी इसमांनी दि २४ रोजी भर दुपारच्या सुमारास एका हॉस्पिटल परिसरात अल्पवयीन मुलीस काही तरी फूस लावीत पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी जळगाव शहर पोलिसात अल्पवयीन मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सफौ.उल्हास चरहाटे हे करीत आहेत.
अमळनेर : प्रतिनिधी अमळनेर नगरपालिकेचे अधिकारी कर वसुलीसाठी गेले असता त्याठिकाणी दोघांनी नगरपालिकेच्या पथकातील अधिकारीसह कर्मचारीना शिवीगाळ करीत धक्काबुकीयासह शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी अमळनेर पोलिसात दोघाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, अमळनेर शहरातील नगरपालिकेचे उपमुख्याधिकारीसह कर्मचारी यांनी शहरातील काही भागात दि २४ रोजी कर वसुलीसाठी गेले असता आल्हाद नगरातील पवार परिवाराकडे मालमत्ता कर घेण्यासाठी आले याठिकाणी असलेले संशयित आरोपी देवेद्र सुभाष पवार व धीरज सुभाष पवार यांनी पथकात आलेले उपमुख्याधिकारी व कर्मचारी यांना शिवीगाळ करीत धक्काबुकी केल्याने दोघाविरोधात अमळनेर पोलिसात उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन भावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अमळनेर…
जळगाव : प्रतिनिधी सावखेडा शिवारातील वर्धमान युनिव्हर्स सीबीएसई स्कूलमधील कार्यालय फोडून चोरट्यांनी २५ हजार रुपयांची रोकड लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुख्याध्यापकाच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसात चोरट्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. यामुळे आता चोरट्यांनी शाळेकडे धाव घेत चोरी सुरु केल्याचे म्हटले जात आहे. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील सावखेडा शिवारात वर्धमान सीबीएसई स्कूल आहे. बुधवार, दि. १५ मार्चच्या मध्यरात्री चोरट्यांनी कंपाउंडच्या भिंतीवरून उडी मारून स्कूलमध्ये प्रवेश केला. मुख्य गेटचे कुलूप तोडल्यानंतर चोरट्यांनी स्कूलच्या कार्यालयातील सुद्धा कुलूप तोडून २५ हजार रुपयांची रोकड आणि काही कागदपत्रे चोरून नेली. हा प्रकार १६ मार्च रोजी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान, आठ…
चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील मितावली येथे लहान भावाने मोठ्या भावाचा शेतातच खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबत अडावद पोलिसात गुन्हा दाखल होण्याचे काम सुरु होते. मिळालेली माहिती अशी कि, चोपडा तालुक्यातील मीतावली येथील प्रताप मंगा पाटील हे पत्नी, दोन मुलांसह वास्तव्यास आहे. त्यांची दोन्ही मुले एकत्रित १० एकर शेती करतात. दोघंही विवाहीत असून शनिवारी दि २५ रोजी दोन्ही मुले संदिप व सतीष पाटील हे पारगाव शिवारात असलेल्या भेंडी तोडण्यासाठी शेतात गेले होते. त्याठिकाणी त्यांच्यात वाद होऊन भांडण झाले. ३३ वर्षीय सतिष या लहान भावाने मोठा भाऊ संदिप पाटील (३६) याच्यावर धारदार विळ्याने वार करीत शेतातच खून केला. गावापासून…

