नवी दिल्ली : वृत्तसंस्था झारखंडमधील गुमला जिल्ह्यात एका 55 वर्षीय व्यक्तीने धारदार शस्त्राने गुप्तांग कापल्याची घटना समोर आली आहे. बसिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हाफू गावातील ही घटना आहे. जखमी माधो सिंग यांना त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ जवळच्या उपआरोग्य केंद्रात दाखल केले. यावेळी त्यांची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना गुमला सदर रुग्णालयात हलवण्यास सांगितलं. दरम्यान गुमला सदर रुग्णालयातही उपचार होत नसल्याने डॉक्टरांनी प्राथमिक उपचारानंतर त्यांना रांचीच्या रिम्समध्ये रुग्णालयात दाखल करण्यास सांगितलं. माथो सिंग असे त्यांचे नाव आहे. यावेळी त्यांचे भाऊ किशोर सिंग म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या भावाचे मानसिक संतुलन बिघडले आहे. तो विचित्र वागत होता. सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास…
Author: editor desk
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पुन्हा एकदा देशात कोरोनाचा कहर पहायला मिळतोय. गेल्या 24 तासांत देशात कोविड-19 (COVID-19) चे 3,038 नवीन रुग्ण आढळले आहेत. सध्या देशात कोविडचे 21,000 हून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत कोविडमुळं 7 मृत्यूची नोंद झाली आहे. पंजाबमध्ये कोरोनामुळं 2, उत्तराखंडमध्ये 1, महाराष्ट्रात 1 (Maharashtra), जम्मूमध्ये 1 आणि दिल्लीत 2 मृत्यूची नोंद झाली आहे. आज (मंगळवार) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, कोविड प्रकरणांची एकूण संख्या 4.47 कोटी (4,47,29,284) वर पोहोचली आहे. सध्या सक्रिय प्रकरणं एकूण संक्रमणांपैकी 0.05 टक्के आहेत. कोरोना आजारातून बरं झालेल्या रुग्णांची संख्या 44177204 आहे. तर, कोविड रुग्णांचा मृत्यू दर 1.19 नोंदवला गेला आहे. आरोग्य…
अमळनेर : प्रतिनिधी बनावट ट्रक क्रमांकासह बनावट ओळखपत्र वापरून बनवाबनवी करणाऱ्या टोळीतील दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी एकाने प्रेयसीला केलेला कॉल त्यांना गजाआड करण्यास पुरेसा ठरला. नरेंद्रकुमार हरिप्रसाद स्वामी (३१) आणि हारुन रशीद साजिदखान (३८, दोघे रा. जयपूर) अशी या बनवाबनवी करणाऱ्यांची नावे आहेत. त्यांनी जोधपूर येथे विकलेल्या १८ लाख रुपयांच्या ३२५ साबण पेट्या जप्त केल्या आहेत. राजस्थान येथील सुनील ओमप्रकाश भार्गव याने आपले नाव कैलास गुजर सांगून अमळनेर येथील कंपनीतून साबणाच्या ५६ लाख रुपये किमतीच्या पेट्या असलेला ट्रक भरला. त्यानंतर तो माल घेऊन गायब झाला होता. या गुन्ह्यातील मास्टर माइंड नरेंद्र स्वामी होता. स्वामी याने त्याचवेळी त्याच क्रमांकाचा…
अमळनेर : प्रतिनिधी शहरातील छत्रपती शिवाजी बगीचा जवळून एका ४५ वर्षीय महिलेची सोनसाखळी दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, अमळनेर शहरातील समर्थ रेसिडन्सी परीसरातील रहिवासी असलेल्या हेमलता नामदेव शिंपी (वय ४५) या दि २१ फेब्रुवारी रोजीच्या दुपारी ४ वाजेच्या सुमारास शिवाजी बगीचा परिसरात पायी जात असतांना अनोळखी दुचाकीवर दोन चोरटे धूमस्टाईलने येत महिलेच्या गळ्यातील सोन्याची ४ ग्राम वजनाची पोत एकूण किमत १६ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत लंपास केली आहे.या प्रकरणी महिलेने अमळनेर पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकीवर आलेल्या दोन अनोळखी चोरट्य विरोधात गुन्हा…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहर पोलीस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर घडली आहे. एका कपडे विक्रेत्या महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्या प्रकरणी शहर पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, जळगाव शहरातील शहर पोलीस स्थानकाच्या हाकेच्या अंतरावर कॉंग्रेस भवन आहे. या ठिकाणी एक महिला कपडे विक्री करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत असते. या परिसरात दि २ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास एका रिक्षाचालक असलेल्या संशयित आरोपी आसिफ शहा दिलावर शहा (वय ३६) हा या ठिकाणी येत महिलेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागला. त्यानंतर विनयभंग करण्याच्या उद्देशाने त्याच्या जवळील मोबाईल काढत त्यामध्ये महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न…
धरणगाव : प्रतिनिधी एका नवऱ्याने संतापाच्या भरात असतांना दुपाच्या २ वाजेच्या सुमारास पत्नी झोपेत असतांना पेट्रोल टाकून पेटवून दिल्याने धरणगाव तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात पतीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मिळालेली माहिती अशी कि, धरणगाव तालुक्यातील हिंगोणे बु.येथे संतोष आखडू भिल हे आपल्या परिवारासोबत वास्तव्यास आहे. गेल्या काही वर्षापासून पती व पत्नीमध्ये वाद सुरु असल्याने पती हे नेहमी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने पत्नीपासून वेगळा राहत होता. दि. ३ एप्रिल रोजी भरदुपारच्या २.३० वाजेच्या सुमारास पत्नी मीराबाई भिल (वय 55) हे झोपलेले असतांना पती संतोष हा पत्नीच्या घरी येत पुन्हा वाद सुरु झाल्यानंतर पत्नी…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात होत असलेल्या गुन्हेगारीचे अनेक कारणे हे प्रेम प्रकरणावर आलेले नेहमीच दिसत असतात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. यूपीच्या रायबरेली इथं झालेल्या राजेश मर्डर केसबाबत पोलिसांनी खळबळजनक खुलासा समोर आणला आहे. पत्नीने तिच्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केल्याचं उघड झाले. घटनेच्या पूर्वी महिलेने प्रियकरासोबत मिळून पतीला भरपूर दारू पाजली. त्यानंतर पती जेव्हा झोपी गेला तेव्हा दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले. रात्री अचानक जेव्हा पती झोपेतून उठला तेव्हा त्याला पत्नी अन्य व्यक्तीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसली. थूलेहंडी गावात ३० मार्च रोजी राजेशला त्याच्या पत्नीने प्रियकर नान्हू महताबसोबत मिळून दारू पाजली. जास्त नशा झाल्याने राजेश झोपला. त्यानंतर राजेशची…
सोलापूर : वृत्तसंस्था मुलगा-मुलगी होणं हे काही कोणाच्यात हातात नसतं. पण मुलगाच पाहिजे. वंशाला दिवा हवा अशा भ्रामक कल्पना मानून आजही महिलांवर अत्याचार केले जातात. असाच प्रकार पंढरपूर तालुक्यातील तारापूर येथे एका विवाहितेला मुलगी झाली म्हणून सासरच्या मंडळींनी केला. यात नवऱ्यानं चाकूनं वार केला तर सासू अन् नणदेकडून दोन्ही हाताला कापराचे चटके दिले. रेश्मा मारुती शिंदे (वय- ३५, रा. तारापूर) असे जखमी महिलेचे नाव आहे. सोलापूरच्या सिव्हील चौकीत नोंदलेल्या माहितीनुसार यातील जखमी विवाहिता ही पंढरपूर तालुक्यातील तारापूर येथे राहते. रविवारी सकाळी तिला पती मारुती शिंदे याने मुलगी झाली म्हणून रागाच्या भरात रेश्मा हिच्या पायावर चाकूने वार करुन जखमी केले. एवढे…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांना बदनामीच्या खटल्यात दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानं त्यांची खासदारकी रद्द झाली आहे. यापार्श्वभूमीवर त्यांनी कोर्टाच्या या निर्णयाविरोधात अपील करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ते आजच सूरत जिल्हा कोर्टात दाखल होणार आहेत. यापार्श्वभूमीवर काँग्रेसनं जोरदार शक्तीप्रदर्शन केलं असून कोर्टाच्या बाहेर राहुल गांधींचे पोस्टर्स लागले आहेत. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. सूरत कोर्टाच्या बाहेर लावण्यात आलेल्या पोस्टर्सवर राहुल गांधींसह काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचाही फोटो आहे. तसेच या पोर्स्टर्सवर फोटोंसह ‘डरो मत’, ‘सत्यमेव जयते’ असंही लिहिण्यात आलं आहे. युवक काँग्रेसच्यावतीनं ही पोस्टरबाजी करण्यात आली आहे. दरम्यान, राहुल गांधी सूरत कोर्टाकडं जाण्यासाठी रवाना झाले…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात महाविकास आघाडीची पहिली भव्य जाहीर सभा छत्रपती संभाजी नगरात यशस्वी झाल्याझाल्या शिंदेंच्या शिवसेनेतील एका आमदाराने गोप्यस्फोट केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे लोकसभा निवडणुकीवेळी भाजपात जातील असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलं आहे. तर 15 दिवसांच्या आत ठाकरे गटांतील अनेक आमदार शिवसेनेत येतील असा दावा देखील शिरसाटांनी केला आहे. त्यामुळे आता राज्याच्यात राजकारणात चर्चेला उधान आले आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यानुसार येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेस नेते अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तशा हालचाली सुरु आहेत असंही संजय शिरसाट म्हणाले. एवढ्या…

