Author: editor desk

भुसावळ : प्रतिनिधी  तालुक्यातील एका ४४ वर्षीय महिलेचा एका तरुणाने विनयभंग भर दिवसा केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे  कि, तालुक्यातील एका गावात ४४ वर्षीय विवाहिता आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. दि ५ एप्रिल रोजी दुपारी ६.३० वाजेच्या सुमारास गावातील बस स्थानकाजवळ महिला जात असतांना संशयित आरोपी इब्राहीम टिप्या सत्तार(वय २९) हा महिलाचा त्याच्याजवळील विनानंबरच्या दुचाकीने सतत पाठलाग करीत शिट्या मारीत वाईट इशारे करीत त्यासोबत महिलेच्या अंगावर दुचाकी आणत चलती का खंडाळा असे म्हणून ४४ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी महिलेने भुसावळ तालुका पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल करण्यात…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना मोठ्या जोमात कामाला लागली आहे. तर जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर विश्वास ठेवत दोनगाव गाव येथील ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकविला आहे. त्यामुळे आजही जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा जलवा कायम मानला जात आहे. विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर यांचा नेतृत्वात व पालकमंत्री ना.श्री गुलाबरावजी पाटील यांचा आशीर्वादाणे दोनगाव बु!! ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला या वेळी ग्रामपंचायत मध्ये नवीन सरपंच पदाचे पदभार स्वीकारलेले प्र.सरपंच सौ,वनिता सुरेश पवार, सौ चंदनबाई सुरेश पाटील. सौ. मनीषा भाऊलाल पाटील. सौ शुभांगी संदीप पाटील.सौ.अश्विनी गणेश पाटील. युवासेना उपतालुका प्रमुख अमोल विजय पाटील, सुरेश पवार, सुरेश…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  अनेकदा प्रवाशांची तक्रार असते की ट्रेन खूप उशिरानं धावत आहे. भारतीय रेल्वे तुम्हाला फक्त ट्रेनमध्येच प्रवास करवत नाही, तर रेल्वे स्थानकावर अनेक आलिशान खोल्या आहेत ज्यात तुम्ही आरामही करू शकता. या ५ स्टार सारख्या खोल्या बुक करण्यासाठी तुम्हाला फक्त ४० रुपये खर्च करावे लागतील. आजही ९९ टक्क्यांना लोकांना याबद्दल कोणतीही माहिती नाही, त्यामुळे बहुतांश लोक रेल्वेच्या या सुविधेचा लाभ घेऊ शकत नाहीत. कशी कराल रुम बुक? रेल्वे स्थानकावर रूम बुक करण्यासाठी तुम्हाला आधी कन्फर्म तिकीट लागेल. तुम्ही ज्या ट्रेनमध्ये प्रवास करत आहात त्या ट्रेनच्या कन्फर्म तिकिटाचा PNR नंबर रेल्वे स्टेशनवर रूम बुक करण्यात मदत करेल. या खोल्या…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नुकतीच ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका केल्यानंतर हि टीका मुख्यमंत्री शिंदे यांच्या जिव्हारी लागली असून आता त्यांनी थेट आदित्य ठाकरे यांचा जन्म काढल्याने राज्याच्या राजकारणात चर्चा सुरु झाली आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले कि, आदित्य ठाकरेचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून मी शाखाप्रमुख म्हणून काम करतोय. सोन्याच्या चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना आणि आयत्या पिठावर रेघोट्या ओढणाऱ्यांना मी काय बोलणार? असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे. एकनाथ शिंदे यांचा पक्ष नाही, तर ही चोरांची टोळी आहे. महाराष्ट्रात गुजरातचे मुख्यमंत्री बसले आहेत, अशी घणाघाती टीका बुधवारी ठाण्यात काढलेल्या…

Read More

पुणे : वृत्तसंस्था  अनैतिक सबंधातून महिलेसह तिच्या दोन लहानग्यां मुलांना जिवंत जाळल्याचा प्रकार समोर आला आहे. पुणे शहरातील कोंढवा परिसरातील पिसोळी भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. काल बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील या तिहेरी हत्याकांडात दिरानेच वहिनीसह तिच्या दोन मुलांची पेट्रोल टाकून जाळून हत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीने चारित्र्यावर संशय घेत अगोदर गळा दाबून जीव घेतला आणि नंतर पेटवून दिल्याची माहीती पोलिसांनी दिले आहेत. वैभव वाघमारे असे खून करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. तर अम्रपाली वाघमारे असे मयत महिलेचे नाव आहे. मृतांमध्ये चार वर्षांच्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील अजिंठा चौफुली जवळ भरधाव वेगाने जाणार्‍या कारने कंपनीतून घरी जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहत उभ्या असलेल्या राजकुमार सोमोमल धामेचा (वय-65) रा. सम्राट कॉलनी यांना जोरदार धडक दिल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. या अपघातात वृद्धाचा जागीच मृत्यू झाला असून कारचालक पसार झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील सम्राट कॉलनीत राजकुमार धामेचा हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होते. गेल्या 10 वर्षांपासून ते एमआयडीसीतील बाबा नमकीन येथे नोकरीला होते. मंगळवारी नेहमीप्रमाणे ते कामावर गेले होते. त्यांची तब्बेत बरी नसल्याने ते रात्री घरी येण्यासाठी निघाले. रात्री 9.30 वाजेच्या सुमारास अजिंठा चौकातील…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  झारखंडमधील बोकारो येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे पत्नीने दारु पिण्यास विरोध केल्याने पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत झालेली त्याची १२वी पत्नी होती. याआधी त्याने ११ लग्ने केली होती पण दारू पिऊन भांडण झाल्यामुळे अगोदरच्या पत्नींनी घटस्फोट घेतला. यानंतर त्याने बारावे लग्न केले. दरम्यान या पत्नीने देखील दारू पिण्यास पतीला विरोध केला. यावेळी त्याला राग आला, त्याने रागाच्याभरात पत्नीची हत्या केली. पोलिसांनी मंगळवारी आरोपीला अटक करून चौकशी सुरू केली आहे. मिळालेली माहिती अशी, झारखंडमधील बोकारो येथे राहणाऱ्या रामचंद्र तुरी याने १२ लग्ने केली होती. दारू पिऊन भांडण झाल्यामुळे अगोदर…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  केरळमधील एका ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान, आग लावून ३ प्रवाशांना जिवंत जाळण्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात यश आले आहे. त्याला रत्नागिरी येथून अटक करण्यात आली आहे. शाहरुख सैनी असे या आरोपीचे नाव आहे. सेंट्रल इंटेलिजन्स आणि महाराष्ट्र एटीएस यांच्या संयुक्त पथकाने रात्री उशिरा रत्नागिरी रेल्वेस्टेशन जवळून त्याला अटक केली. अलप्पुझा आणि कन्नुर एक्झिक्युटिव्ह एक्सप्रेसमध्ये २ एप्रिल रोजी रात्री सुमारे ९.४५ च्या दरम्यान, कोझिकोड शहर ओलांडल्यानंतर कोरापुझा रेल्वे पुलावर ट्रेन पोहोचली असताना प्रवाशांसोबत झालेल्या वादातून आरोपी शाहरुख सैफी याने सहप्रवाशांवर एक ज्वलनशील पदार्थ टाकून त्यांना पेटवून दिले. त्यावेळी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तीन प्रवाशांनी चालत्या गाडीतून…

Read More

पुणे : वृत्तसंस्था  उन्हाळा सुरु झाला की, आंबा प्रेमींना रसरशीत आंब्यांचे वेध लागतात. सुरुवातीला आंब्यांच्या किंमती या गगणाला भिडलेल्या असतात. यामध्ये हापूस आंब्यांविषयी तर मग बोलायलाच नको. पण पुण्यातील एका दुकानदाराने ग्राहकांसाठी खास ऑफर काढली आहे. मग काय आंबा प्रेमींना पैसे पाहून मनावर ताबा ठेवावा लागतो. पण पुणे तिथे काय उणे असं म्हणतात, ते उगाच नाही. पुण्यातील एका आंबा विक्रेत्यांने आंबा प्रेमींसाठी एक खास ऑफर आणली आहे. येथे चक्क EMI वर हापूस आंबा मिळतोय. तुम्हाला विश्वास बसत नाहीये ना? पण हे अगदी खरं आहे. गुरू सणस या व्यापाऱ्याने ही ऑफर सुरु केलीये. यामुळे आता आंबा प्रेमी पैशांची चिंता न करता…

Read More

मुंबई :  वृत्तसंस्था  राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौऱ्याबाबत अनेक चर्चा होवू लागल्या होत्या पण अद्याप तारीख जाहीर न झाल्याने आमदारासह कार्यकर्ते गोंधळात होते पण आता हा दौरा निश्चित झाला असून येत्या ९ रोजी मुख्यमंत्री शिंदेसह ४० आमदार अयोध्यात दाखल होणार आहे. या दौऱ्याचा टीझर आता जारी करण्यात आला आहे. ‘अयोध्या में शंखनाद… आ रहे है एकनाथ’, अशी टॅगलाईन असलेला हा टीझर सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने जारी करण्यात आलेल्या टीझरमध्ये महाराष्ट्रात रामराज्य असल्याचे म्हटले आहे. तसेच, महाराष्ट्र एक सुशासित राज्य आहे, असा दावा करण्यात आला आहे. टीझरमध्ये महाराष्ट्रात सामान्य जनता हा…

Read More