भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यात दोन गावठी पिस्टलसह जिवंत काडतूस व दोन चॉपर बाळगणार्या व विक्री करणार्या साकेगावातील दोघांसह भुसावळातील एकाच्या मुसक्या बांधल्या आहेत. भुसावळ पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे या कारवाईने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही कारवाई बुधवारी रात्री उशिरा करण्यात आली. साकेगावातील संशयित आरोपी शाहरूख राजू पटेल (वय २५) व विकास पांडुरंग लोहार (वय ३०) व जयसिंग उर्फ सोनू रायसिंग पंडित (वय २६) अशी अटकेतील संशयित आरोपींची नावे आहेत. ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील हवालदार सुरज पाटील, हवालदार रमण…
Author: editor desk
नवी दिल्ली : वृत्तसंस्था यूपी एसटीएफसोबत झालेल्या इन्काउंटरमध्ये गँगस्टर अनिल दुजाना याला ठार करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी यूपी सरकारच्या कार्यालयातून यूपीच्या टॉप 65 माफियांची यादी जाहीर करण्यात आली होती. यामध्ये ग्रेटर नोएडातील अनिल दुजाना यांचेही नाव होते. कुख्यात गँगस्टर अनिल दुजाना दिल्लीच्या तिहार तुरुंगात बराच काळ बंद होता, मात्र काही काळापूर्वी तो जामिनावर बाहेर आला होता. काही दिवसांपूर्वी यूपी सरकारच्या कार्यालयातून यूपीच्या टॉप 65 माफियांची यादी जाहीर करण्यात आली होती. यामध्ये ग्रेटर नोएडातील अनिल दुजाना यांचेही नाव होते. यूपी एसटीएफसोबत झालेल्या इन्काउंटरमध्ये गँगस्टर अनिल दुजाना याला ठार करण्यात आले आहे. कुख्यात गँगस्टर अनिल दुजाना दिल्लीच्या तिहार तुरुंगात बराच काळ…
इंदूर : वृत्तसंस्था गेल्या तीन वर्षांपूर्वी प्रियकराने प्रेयसीची हत्या करून तिचा मृतदेह चेंबरमध्ये टाकला होता. त्याने मृतदेहावर मीठ टाकून तो ब्लँकेटने झाकला होता. तीन वर्षांनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे. याप्रकणी हत्येशी संबंधित दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर मुख्य आरोपी अद्यापही फरार आहे. त्याला लवकरच अटक करण्यात येईल, असा दावा पोलिसांनी केला आहे. मध्यप्रदेशातील इंदूर येथे पोलिसांनी एका भंयकर हत्याकांडाचं गुढ उकललं आहे. तीन मुलांचा बाप असेलला विशाल अर्चना नावाच्या मुलीच्या प्रेमात पडला. त्यानंतर अर्चनाने विशालकडे लग्नासाठी तगादा लावला. याने त्रस्त झालेल्या विशालने एकदा अर्चनाला भेटायला बोलावलं. त्यानंतर विशालने अर्चानाचा तिच्याच ओढणीने गळा आवळून तिचा खून केला.…
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या महिन्यापासून राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत आहे. अशात पुन्हा एकदा हवामान खात्याकडून राज्यासाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात पुढील ४ ते ५ दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून यादरम्यान वादळी वाऱ्यासह ढगांचा गडगडाट आणि मुसळधार पाऊस होईल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, यावेळी सगळ्यात जास्त पावसाचा तडाखा हा विदर्भाला बसणार आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटर असेल. यावेळी मेघगर्जना आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरात आज गारा पडण्याची…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरात चॉपरच्या धाकावर दहशत निर्माण करणार्याला पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुविख्यात आरोपीस एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शैलेश शंकर चौधरी (रा.सम्राट कॉलनी जळगाव) असे अटकेतील गुन्हेगाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी हद्दीतील एचडी फायर कंपनीजवळ शैलेस चौधरी हा चॉपरसह आल्याची माहिती एमआयडीसी निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले. पोलीस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, हवालदार गणेश शिरसाळे, नाईक विकास सातदिवे, किशोर पाटील, इमरान सैय्यद, योगेश बारी, मुकेश पाटील, किरण पाटील, छगन तायडे आदींनी संशयिताच्या मुसक्या बांधत अटक केली. संशयिताविरोधात यापूर्वी जीवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल आहे.
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनेमध्ये सातत्याने वाढ होत असतांना दिसत आहे. बलात्कार, खून, अनैतिक संबंधातून फसवणूक, आत्महत्या यासांरख्या घटना सातत्याने राज्यामध्ये घडत आहेत. त्यातच आता छत्रपती संभाजीनगरमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (घाटीत) नर्स युवतीला एकाने प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. तसेच तिला लग्नाचे आश्वासन देत शारीरिक संबंधही प्रस्थापित केले. मात्र, या तरुणाने संबंधित प्रेयसीला सोडून देत दुसरीसोबतच विवाह केला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर मानसिक तणावातून टोकाचे पाऊल उचलले. प्रियकराकडून फसवणूक सहन न झाल्याने या तरुणीने राहत्या घरातील टॉयलेटमध्ये विषारी इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना 1…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था लग्नासाठी तरूणीच्या घरी वरात घेऊन पोहोचलेल्या नवरदेवाच्या प्रेम प्रकरणाचा अचानक खुलासा झाला. त्यानंतर लग्नात वाद पेटला होता. अशात नवरदेवाचं त्याच्या प्रेयसीसोबत लग्न लावून देण्यात आलं. हैराण करणारी बाब म्हणजे नवरदेवाची प्रेयसी दुसरी कुणी नसून त्याची होणारी मेहुणीच निघाली. दोन्ही परिवाराच्या सहमती त्यांचं लग्न लावून देण्यात आलं. बिहारच्या सारण जिल्ह्यात एका लग्नात चांगलाच गोंधळ झाला. ही घटना भभौली गावातील आहे. गावात राहणाऱ्या रामू बीनची मुलगी रिंकू कुमारीचं लग्न छपरा शहरातील राजेश कुमार याच्यासोबत जुळलं होतं. 2 मे रोजी त्यांचं लग्न होणार होतं. नवरदेव ठरल्यानुसार वरात घेऊन आला. पण पुढे जे झालं ते सगळ्यांना हैराण करणारं ठरलं. 2…
२ मे रोजी राज्यातील राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचा गोप्यस्फोट शरद पवार यांनी केल्यानंतर असंख्य कार्यकर्ते आक्रमक होत उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र त्यानंतर आता पक्षाध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या नावाची चर्चा सुरु झाली. मात्र यावरून भाजपने राष्ट्रवादीला कोंडीत धरले आहे. शरद पवार यांनी राजकीय निवृत्तीची घोषणा करू नये अशी इच्छा राष्ट्रवादीसह ठाकरे गटाने केली असली तरी, भाजपकडूनही त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, अशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र त्यानंतर आज पुन्हा एकदा सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा सुरु झाली. त्यानंतर मात्र भाजपने आता राष्ट्रवादीला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. पवार कुटुंबीय हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर…
जळगाव : प्रतिनिधी असोदा रेल्वे गेटजवळ धावत्या रेल्वेतून पडून अनोळखी तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली आहे. रेल्वे कर्मचारी व नागरिकांच्या मदतीने जखमी तरुणाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जळगावकडून भुसावळकडे जाणाऱ्या धावत्या रेल्वेतून अनोळखी तरुण खाली पडला. यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत होऊन तो बेशुद्ध झाला. ही घटना रेल्वे कर्मचारी सुभाष सपकाळे आणि विकास कुमार यांच्या लक्षात आली. त्यांनी आसोदा गावातील गिरीश प्रदीप चिरमाडे आणि निखिल भानुदास चिरमाडे यांच्या मदतीने खासगी वाहनातून जखमीला जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील शिरसोली रस्त्यावर दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात सुसाट प्रवासी खासगी बस झाडाला आदळून अपघात झाल्याची घटना बुधवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातामध्ये चार प्रवाशांना दुखापत झाली असून त्यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झालेली नाही. तर बसच्या पुढील भागाचे नुकसान झाले आहे. बुधवारी दुपारी खासगी बस ही प्रवाशांना घेवून जळगावकडून पाचोराकडे निघाली होती. दुपारी ४ वाजेच्या सुमारास शिरसोली रस्त्यावरील हॉटेल प्रितजवळून बस जात असताना अचानक दुचाकी समोर आली. तिला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि क्षणार्धात बसही रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जोराने आदळली. बस झाडाला आदळल्यानंतर खासगी बसच्या चालकाने…

