मुंबई : वृत्तसंस्था राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली यानंतर नव्या अध्यक्षांच्या निवडीसाठी एक समितीही गठीत करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. तसेच या समितीमध्ये कोण सदस्य असतील याची संभाव्य नावंही त्यांनी आपल्या भाषणातच जाहीर केली. शरद पवारांच्या या घोषणेनंतर कार्यकर्त्यांनी टाहो फोडला आहे. निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती कार्यकर्ते करीत आहेत. दरम्यान पवारांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष नाजेर काझी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच धाराशिवचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनीही आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर राज्यभर राजीनामा मोहीम सुरु होण्याची शक्यता आहे. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के. के. शर्मा, पी.…
Author: editor desk
नाशिक : वृत्तसंस्था चालत्या ट्रकमधून बकऱ्या फेकतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे समोर आले होते. ट्रक मागून येणाऱ्या चारचाकीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी चित्रीकरण केले होते. व्हायरल झालेला हा व्हिडीओ इगतपुरी जवळचा असल्याचे स्पष्ट झाले असून संबंधितांविरोधात घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपासून समाज माध्यमावर सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एका चालत्या ट्रकमधून बकऱ्या फेकण्यात येत असल्याचा निर्दयी प्रकार समोर येत आहे. दरम्यान हा व्हिडीओ आधी उत्तर प्रदेशमधील असल्याचा दावा करण्यात येत होता. परंतु उत्तर प्रदेशातील उन्नाव पोलिसांनी हा व्हिडीओ महाराष्ट्रातील इगतपुरी तालुक्यातील असल्याचं ट्वीट केलं. त्यानंतर इगतपुरी तालुक्यातील खंबाळे फाटा परिसरातील हा व्हिडीओ…
जळगाव : प्रतिनिधी राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीची काल वज्रमूठ सभा पार पडली. या सभेत बोलताना राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजप आणि शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. काही दिवसांआधी मंत्री तानाजी सावंत यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी १५० हून जास्त बैठका झाल्याचे सांगितले होते. त्याचा दाखला अजित पवार यांनी कालच्या भाषणात दिला. मधल्या काळात दीडशे बैठका घेणारा हिंदकेसरी महाराष्ट्राला मिळाला, असा दावा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केला. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी त्यांचे षडयंत्र सुरू होते, हे त्यांनीच सांगून टाकले आहे. महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी एवढ्या बैठका घेतल्या? असा सवाल अजित पवार यांनी विचारला होता.…
मुंबई : वृत्तसंस्था राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं. यानंतर यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवेसना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा दाखला देताना राऊतांनी शरद पवारांची काय मानसिकता असेल हे सांगण्याचा प्रयत्न केला. https://twitter.com/rautsanjay61/status/1653305842391822338?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1653305842391822338%7Ctwgr%5E060bada8660c399ebaf2db987458687548d3130a%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.esakal.com%2Fmaharashtra%2Fsanjay-raut-commented-on-sharad-pawar-retirement-gives-example-of-balasaheb-thackeray-aau85 संजय राऊतांनी ट्विट करत म्हटलं की, “एक वेळ अशी आली…घाणेरडे आरोप…प्रत्यारोप…राजकारण याचा उबग येऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देखील शिवसेना प्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. शरद पवार यांनी तेच केलं आहे. जनतेच्या रेट्यामुळं बाळासाहेबांना राजीनामा मागे घ्यावा लागला. शरद पवार हे देशाच्या राजकारणाचे आणि समाजकारणाचे श्वास आहेत”
नवी दिल्ली : वृत्तसंस्था सरकारी तेल कंपन्यांनी सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. पण, दिलासा देणारी बाब म्हणजे इंधन दरात कोणताही बदल झालेला नाही. यामुळे देशासह राज्यातील जनतेला मोठा झटका याचा बसला आहे. 21 मध्ये केंद्रातील मोदी सरकारने वाहन इंधनावरील (पेट्रोल-डिझेल) उत्पादन शुल्क कमी केले असले तरी महाराष्ट्रातील काही भागात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत किंचीत बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol-Diesel Price) नवीनतम दर जाहीर केले आहेत. यामध्ये बिहारमध्ये पेट्रोल 25 पैशांनी स्वस्त होऊन 108.90 रुपये आणि डिझेल 23 पैशांनी स्वस्त होऊन 95.57 रुपये प्रति लिटर झाले आहे. तर…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था RRR फेम अभिनेत्री आलिया भट्ट हिने या वर्षी मेट गालामध्ये पदार्पण केले.मेट गाला हा जागतिक फॅशन इव्हेंट आहे. या वर्षी आलीया प्रथमच मेट गाला इव्हेंट मध्ये सहभागी झाली होती. आलिया मेट गाला इव्हेंट मध्ये अत्यंत सुंदर आणि मनमोहक दिसत होती. आलियाने या इव्हेंटसाठी एका आकर्षक पांढऱ्या गाऊनची निवड केली होती. इव्हेंटसाठी, आलियाने मोत्यांनी सजवलेला स्लीव्हलेस पांढरा गाऊन निवडला. तिने अंगठ्या आणि कानातल्यांसह अनेक दागिने सुद्धा परिधान केले होते. फोटोंमध्ये, आलियाने पापाराझींसाठी पोज देताना वेगवेगळे एक्सप्रेशन्स दिलेले दिसत आहेत. आलियाची बहीण शाहीन भट्टने या कार्यक्रमातील आलियाचे फोटो शेयर करत पोस्टला कॅप्शन दिले, “एंजल.” या फोटोंवर प्रतिक्रिया देताना,…
जळगाव : प्रतिनिधी चाळीसगाव व भडगाव शहरातून दोन अल्पवयीन मुलीना अनोळखी इसमाने पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहरातील एका परिसरातून १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी दि ३० एप्रिल रोजी सकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास अनोळखी इसमाने अल्पवयीन मुलीच्या राहत्या घरातून पळवून नेले आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी चाळीसगाव शहर पोलिसात धाव घेत अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ.किशोर सोनवणे हे करीत आहे. दुसऱ्या घटनेत भडगाव शहरातील एका शाळेच्या परिसरात रहिवासी असलेल्या १७ वर्ष १० महिने अल्पवयीन मुलीस अनोळखी इसमाने दि १ मे रोजी सकाळी…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एकलग्न गावातून घराला कुलूप असतांना ते तोडून अनोळखी चोरट्यांनी घरातून हजारो रुपयाचे सोन्यासह चांदीचे दागिने लंपास केल्या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एकलग्न येथील विजय योगराज पाटील(वय३४) हे शेती करून आपला उदरनिर्वाह करीत आहे. दि १ मे रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास ते कामानिमित बाहेर गेले असता त्यांनी घरच्या दरवाजाला कुलूप लावून गेले होते. यावेळेत घराला लावलेले कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करीत देवघरामध्ये असलेले कपाटाचे कुलूप तोडून घरातून ४८ हजारांचे सोन्यासह चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात…
छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था आयुष्याची दोरी बळकट असल्याने वाचलेल्या ८ वर्षीय शिवमने पोलिसांना सांगितलेल्या आपबीतीने ऐकणाऱ्यांच्या अंगावर शहारे आले. ‘पप्पाने आधी श्रेयसला विहिरीत फेकल्यानंतर मी रडू लागलाे. त्यांनी मलाही विहिरीत फेकले, विहिरीत पडताच अंधारात हाताला लागलेला दोर मी धरला, दुसऱ्या हाताने श्रेयसचा हात पकडला. मात्र, तो हातातून निसटून पाण्यात बुडाला.’ हि घटना छत्रपती संभाजी नगरात घडली आहे. बाप पोटच्या गोळ्याच्या जिवावर उठलेला परंतु हा लहानगा जीव धाकट्या भावाला वाचविण्यासाठी धडपडत होता. चिकलठाण्यातील राजू प्रकाश भोसले या मद्यपीने पत्नी नांदायला येत नसल्याने शिवम (८) आणि श्रेयस (४) या त्याच्या दोन्ही मुलांना शुक्रवारी रात्री विहिरीत फेकले होते. यात श्रेयसचा मृत्यू झाला.…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था कर्जाची परतफेड न केल्यानं एका ४० वर्षीय व्यक्तीनं जिल्ह्यातील मैरवा पोलीस स्टेशन हद्दीतील एका ११ वर्षीय तरुणीशी लग्न केल्याचं सांगितलं जात आहे. महेंद्र पांडे असं त्या व्यक्तीचं नाव आहे. तो मैरवा पोलीस ठाणे हद्दीतील लक्ष्मीपूर गावचा रहिवासी आहे.बिहारच्या सिवान जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मैरवा पोलीस ठाणे हद्दीतील छेनी छपर गावात या घटनेची चर्चा सुरू आहे. लक्ष्मीपूर पोलीस ठाणे हद्दीत राहणारा ४० वर्षीय महेंद्र पांडे यानं मुलीच्या आईला २ लाख रुपयांचं कर्ज दिलं होतं. महेंद्र हा मुलीच्या आईकडे पैसे परत मागत होता. मुलीचे आई-वडील गरीब असल्यानं त्यांना काही कारणास्तव कर्जाची परतफेड करता आली नाही.…

