Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी  आसोदा शिवारातील डाउन रेल्वेलाइनवर धावत्या रेल्वेतून पडून बाबूभाई माणखाँ पठाण (६९, रा. नगरसूल, ता. येवला, जि. नाशिक) या वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रसूल येथील बाबूभाई पठाण हे शुक्रवारी रेल्वेतून प्रवास करीत होते. आसोदा शिवारातील डाउन रेल्वेलाइनवरील खांबा क्रमांक ४२६/१ ते ३ च्या दरम्यान ते धावत्या रेल्वेतून पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना तालुका पोलिस ठाण्यातील विलास शिंदे व माणिक सपकाळे यांना कळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची अंगझडती घेतल्यानंतर खिश्यामध्ये आधार कार्ड, मतदान कार्ड मिळून आल्यानंतर मृतदेहाची ओळख पटली. शिंदे यांनी लागलीच येवला…

Read More

चोपडा : प्रतिनिधी  चोपडा तालुक्यातील लासुर परिसरात अवैध लिंबाची वृक्षतोड करून ते ट्रॉलीत भरून रात्री लाईट बंद ट्रॅक्टर चालकाने भरधाव वेगात रस्त्याच्या विरुद्ध साईडने चालवून समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक देऊन लाकडांचे भरलेले ट्रॅक्टर ट्रॉलीसह रस्त्यावर पलटी झाले. यावेळी झालेल्या भीषण अपघातात कृष्णापूर(ता.चोपडा) येथील ३५वर्षीय आदिवासी तरुण दुचाकी चालक जागीच ठार झाला तर दुचाकीवरील मागे बसलेला तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना लासुर-चोपडा रस्त्यावर घडली. अपघातानंतर मयत झालेला व गंभीर जखमी तरुणांना नागरिकांच्या मदतीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.तर गंभीर जखमी तरुणास जळगावला हलविण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील लासुर परिसरात जिवंत लिंबाची अवैध वृक्षतोड करून संध्याकाळी ट्रॅक्टर क्रमांक-MH-18 N 4438…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  गेल्या २ मे पासून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा दिल्यापासून कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यानंतर आज शरद पवार यांनी यावर मौन सोडत पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा कार्यकर्ते आणि नेत्यांच्या आग्रहानंतर शरद पवारांनी राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला आहे. शरद पवार म्हणाले, “मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर तीव्र भावना उमटल्या. तसेच मी निर्णयाचा पुनर्विचार करावा म्हणून माझे हितचिंतक, माझ्यावर प्रेम आणि विश्वास असणारे कार्यकर्ते, असंख्य चाहते यांनी संघटीत होऊन एकमुखाने आवाहन केलं.” “देशभरातून विशेषत: महाराष्ट्रातून विविध राजकीय पक्षाचे नेते आणि सहकारी, मी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी, अशी विनंती केली. लोक माझे सांगाती,…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी राजीनामा दिल्यानंतर आज झालेल्या बैठकीनंतर मुंबईतल्या वाय.बी. सेंटरबाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला आहे. थोड्याच वेळात शरद पवार हे पत्रकार परिषद घेणार आहेत. मात्र त्यापूर्वीच कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात आनंदोत्सव सुरु केला आहे. २ मे रोजी शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र कार्यकर्त्यांनी त्यांच्या निर्णयाला विरोध केला होता. आज साडेपाच वाजता शरद पवार हे पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करणार आहेत. मात्र आता त्यापूर्वीत कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव सुरु झाला आहे. मुंबईतल्या वाय.बी. सेंटरबाहेर नेते नाचत आहेत. ढोल-ताशांचा गजर सुरु आहे. त्यामुळे पवार आपला निर्णय मागे घेणार, हे जवळपास स्पष्ट होत आहे. त्याची अधिकृत घोषणा…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  हमीरपूर जिल्ह्यातील बसेला या गावामध्ये पूजा नावाची 22 वर्षीय तरूणी राहत होती. त्याच गावामध्ये दीपक नावाचा तरूण राहत होता. दीपकचं पूजावर एकतर्फी प्रेम होतं. अनेकवेळ त्याने तिला विचारलं होतं. मात्र तिने वारंवार नकार दिला होता. नंतर त्याने अनेकवेळा विनयभंग केला. या त्राासाला कंटाळून तिने आपलं कॉलेज बंद केलं होतं. 2 मे ला पूजाचे कुटुंबीय एका लग्नाला गेले होते. त्यावेळी घरात फक्त पूजा आणि तिची आजी आणि आई हजर होत्या. याबाबत दीपकला माहिती मिळाली होती. दीपकने याचाच फायदा घेतला आणि घरात घुसला आणि टेरेसवर झोपलेल्या पूजाजवळ गेला. जबरदस्तीने पूजाचा हात धरून तिला घेऊन जाऊ लागला. त्यावेळी तिने…

Read More

मालेगाव : वृत्तसंस्था  तालुक्यातील एका ४२ वर्षीय शेतकरीने आपल्या ६ वर्षीय मुलाला घेत अजंग शिवारातील शेती शेती महामंडळाच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. मिळालेली माहिती अशी कि, मालेगाव तालुक्यातील आघार-ढवळेश्‍वर रस्त्यालगत राहणाऱ्या यशवंत लक्ष्मण हिरे (वय ४२) यांचा पशुखाद्यचा व्यवसाय आहे. विशेषत: म्हशींना लागणारे बिअर खाद्य ते घाऊक भावाने घेऊन ग्रामीण भागात त्यांच्या पिकअपमधून किरकोळ विक्रेत्यांना विकतात. आज सकाळी त्यांनी मुलगा रुद्र यशवंत हिरे (वय ६) यालाही बरोबर घेतले. शहरालगतच्या मनमाड चौफुलीवरुन बिअर खाद्य घेत ते पिकअपमध्ये भरले.अजंग-रावळगाव रस्त्यावरील शेती महामंडळाच्या विहिरीजवळ त्यांची पिकअप उभी होती. विहिरीबाहेर चपलांचे दोन जोड होते. दीर्घकाळ पिकअप उभी असल्याने…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील सर्वात महत्वाचा पक्ष म्हणून भूमिका घेणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर आज पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार यांचा पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा नामंजूर करण्यात आला आहे. या बैठकीत शरद पवार यांनी त्यांचा उत्तराधिकारी निवडण्यासाठी स्थापन केलेली समितीने त्यांना पक्षप्रमुखपदाचा राजीनामा मागे घेण्याची विनंती केली होती. शरद पवार यांनी राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्रभर कार्यकर्ते आक्रमक झाले होते. अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी स्थापन केलेल्या समितीने शरद पवार यांच्या राजीनामा नामंजूर करण्याचा ठराव आज मांडला. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांनी पुन्हा अध्यक्ष व्हावे, असा प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आला आहे. प्रफुल्ल पटेल…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  एरंडोल तालुक्यातील खेडी कढोली येथील ज्ञानेश्वर रमेश कोळी (३५) या शेतमजुर अमळनेर येथून घरी परतल्यानंतर बुधवारी मध्यरात्री विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी ७ वाजता रहिवाशांना घरामागे कोळी यांचा मृतदेह दिसून आल्यानंतर उघडकीस आली. दरम्यान, आत्महत्येचे कारण समजून आलेले नसून या प्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ज्ञानेश्वर कोळी हे पत्नी व दोन मुलांसह वास्तव्याला होते. शालकाच्या मुलीच्या लग्नानिमित्त कोळी हे कुटुंबीयांसह अमळनेर येथे गेले होते. बुधवारी रात्री ९ वाजता ते एकटेच खेडी-कढोली येथे परत आले. पत्नी आणि दोन्ही मुले अमळनेर येथे थांबले होते. मध्यरात्री कोळी यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव मनपाची २० रुपयांची बाजार शुल्क पावती आत्ताच फाड म्हटल्यानंतर नकार दिल्याच्या कारणावरून एकाने शेख रफीक शेख हमीद मणियार (४०, रा. मासुमवाडी) या विक्रेत्याला फायटरने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना बुधवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास मासुमवाडी भागात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख हे हातगाडीवर कटलरी साहित्य विक्रीचा व्यवसाय करतात. बुधवारी सकाळी ९ वाजता ते हातगाडी घेऊन व्यवसायासाठी घरातून बाहेर निघाले. रस्त्यात त्यांना मनपाची २० रुपयांची बाजार शुल्क पावती फाडणारा व्यक्ती भेटला. त्याने त्यांना पावती फाडण्यास सांगितली. पण, मी आत्ताच घरातून बाहेर निघालो असून पावती देऊन द्या, नंतर पैसे घेऊन जा…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी  जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून महिलासह अल्पवयीन मुलीना प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिच्या सोबत चुकीचे कृत्य केल्याच्या घटना दिवसेदिवस वाढ होत असतांना आता पुन्हा भुसावळ तालुक्यात एक संताजनक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात व लग्नाचे आमिष दाखवून तिथे शारीरिक शोषण करणाऱ्याविरुद्ध तालुका पोलिसात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. १४ वर्षांच्या या पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिचे शारीरिक शोषण केले. याप्रकरणी अल्पवयीन पीडितेने तालुका पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. या मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी जळगाव येथे पाठवण्यात आल्याची माहिती मिळालेली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि प्रकाश वानखेडे,…

Read More